शुक्रवार, ४ जुलै, २००८

हा छंद जिवाला लावी पिसे !

हा छंद जिवाला लावी पिसे !
मी नुकताच नोकरीला लागलो होतो. वय १९ ! ती दहावीत ! माझ्या घरासमोरच पादचारी पुल होता आणि त्याच्याच खाली कुंपण तोडून केलेला short-cut. पुलाचा वापर कोणीही करत नसत ! ही मुलगी मात्र ह्ट्कून पुलावरूनच जायची, कदाचित म्हणूनच नजरेत भरली ! दिसायला ही अगदी "graceful" होती. तिने काँलेजात प्रवेश करेपर्यंत नुसते बघणेच चालले होते. जीवश्च-कंठश्च असे आम्ही चार मित्र, समान धागा एकच, कोणालाही मैत्रीण नव्ह्ती ! दिसायली ही बावळेच ! मित्रांकडून 'तिचे' नाव गाव समजले. ती जातवाली नव्ह्तीच तर चक्क मागासवर्गीय होती ! आता मात्र बंडखोर स्वभाव उफाळून आला. या मुली बरोबर निदान ओळख तरी करून घ्यायचीच असा निश्चय केला ! मित्रांची फूस होतीच ! शेवटी एकदा आंबेडकर काँलेज समोरच्या बसस्टाँप वर तिला मैत्री प्रस्ताव सादर करायचा असे ठरले. मित्र समोरच्या बसस्टाँप वर उभे राहून माझे मनोधैर्य वाढवणार होते.


स्टाँप वर तिच्या जवळ उभा राहिलो. बरोबर तिची एक मैत्रिण पण होती. समोर मित्र होतेच ! एक भीती होती, तीची बस पटकन आली असती तर ? बस आली पण गर्दी असल्यामुळे तिने ती सोडून दिली. प्रचंड गर्दी आणि कोलाहलात मी "excuse me" म्हणून पहीला बाँल टाकला. मला तुझ्याशी मैत्री करायचीय असे बोलून एक मोठा श्वास घेतला !तिला आधी आश्चर्य वाटले. मला आपादमस्तक न्हाहाळून तीने माझ्यावर अक्षरश्: प्रश्नांची सरबत्ती सूरू केली ! नाव काय, करतोस काय, राहतोस कुठे -- ? मला अक्षरश्: घाम फूटला ! माझी उत्तरे देताना तत-पप होत होती. ती मात्र आता enjoy करत होती. शेवटी एकदाचे ती गोड हसली व मला आपले नाव सांगितले ! लगेच तिची बस आली, मला ह्ळूच bye करून ती बसमधे चढली ! समोरून मित्र धावतच माझ्याजवळ आले. "साल्या काय फाफलला होतास, तुझ्या कपाळावरचा घाम आम्हाला पण दिसत होता" म्हणाले. मार पडायचीच लक्षणे होती. पण एक मोठा टप्पा पार पडला होता !
माझ्या कामाच्या वेळा आठवड्याला बदलायच्या, दिवस पाळी सकाळी ८ त्ते ५, दूसरी पाळी ५ ते ११:३० तर ५ आठवड्यातुन एकदा रात्र पाळी (रात्री ११:३० ते सकाळी ६ ). पहीली भेट झाली तेव्हा दूसरी पाळी होती. आणि मग परत दिवस पाळी सूरू झाली. संपूर्ण आठवडा तिचे नख ही दिसले नाही ! त्या दिवसातली तगमग, व्याकूळता, घालमेल, कासावीस शब्दात व्यक्त करता येणारच नाही. माझ्या वागण्यातपण सकारात्मक बदल झाला होता. चिड्णे कमी झाले होते, समजूतदारपणा आला होता,चेहर्यावर एक निराळेच तेज आले होते. सगळे जगच सुंदर आहे असे वाटू लागले होते ! "हा छंद ---" हे गाणे त्या काळात हजारदा तरी ऐकले असेल ! सोमवारी दूपारी वाण्याकडून नारळ घेउन घरी निघालो होतो, आणि पाठून आवाज आला, 'आहेस तरी कोठे, काँलनी सोडलीस की काय '. ती 'तिच' होती ! सगळं अंग मोहरून निघाले ! तू गीताचा भाउ ना ? मी उडालोच, माझ्या बहीणीला ही कशी ओळखते ? तिची best friend आणि माझी बहीण एकमेकींच्या best friend होत्या. 'नारळ घेउनच स्टाँपवर येणार का ?' हो- नाही अशी उत्तरे मी आलटून पालटून देत होतो आणि ती खळखळून हसत होती. शेवटी हातात नारळ घेउनच मी तिच्या बरोबर स्टाँप वर गेलो ! मग हे रोजचेच झाले. घर ते स्टाँप या साधारण २० मिनिटांत आम्ही काय बोलायचो rather मी काही बोलायचो तरी का हे सुद्धा आता आठवत नाही !


शुक्रवारी मला off होता. मित्रांबरोबर briefing झाले. 'आगे बढो' असा सल्ला मिळाला ! हाँटेलात तिला चहाची आँफर द्यायचे ठरले. शनिवारची ती दूपार, एका वळणावर ती आणि मी. एक वाट स्टाँपची तर एक उडप्याच्या हाँटेलची. आपण चहा घ्यायचा ? धीर एकवटून मी विचारले. 'ही काय चहा प्यायची वेळ आहे, आणि मी पोट फूटे पर्यंत आज जेवले आहे' तीचे उत्तर ! पण मी अशा उत्तराची अजिबात अपेक्षा केली नव्ह्ती. त्यामुळे पुढे काय बोलायचे मला सूचेचना ! मी पार हडबडून गेलो ! loop मधे गेल्यासारखा 'चल ना, चल ना' करीत राहीलो ! आणि ती एकदम बोलून गेली,'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्ह्ती' ! झटकन पुढे निघुन गेली. माझ्या कानात गरम शीसे ओतल्यासारखे झाले. स्वत:चीच लाज वाट्ली. एवढे कसे आपण अधीर झालो, बस झाले हे प्रेमाचे खूळ, आता पुन्हा या भानगडीत पडायचे नाही असे स्वत:ला बजावुन घरी आलो. मग पुढचे काही दिवस प्रेमाच्या hangover मधुन बाहेर पड्ण्यात गेले. मित्रांना सगळा सीन सांगितला,तीला पुन्हा कधीही भेटणार नाही असे सांगितले. मित्र समजावू लागले ती 'दूपारी' चहाला नाही बोलली याचा अर्थ संध्याकाळी चहा घेउ असा होतो. पण माझ निर्णय ठाम होता. माझ्या मित्रांकडे ती अनेकदा माझी चौकशी करायची पण माझ्यात कमालीचा न्युनगंड निर्माण झाला होता. मी परत कधीही तिला भेटलो नाही.


त्या नंतर अनेक trek केले, बहुतेक भारत फिरलो, अनेक मुली भेटल्या. आवडल्याही, पण स्वत:हुन कधी कोणाशी ओळख करून घेतली नाही. एका मर्यादेपलीकडे कोणात अडकलो नाही. २५ व्या वर्षी लग्न झाले, arranged, यथावकाश सूरही जूळले, पण, पण पहील्या प्रेमातली ती अधीरता, कातरता, तरलता, संवेदनाशीलता, ते खयालों मे हरवुन जाणे, ती ओढ... पुन्हा कधी कधीच अनुभवली नाही ! एकदा अकस्मात बायकोबरोबर भाजी घेत असताना 'ती' दिसली ! तीने मला पाहीले की नाही, don't know ! पण अपराधीपणाची जाणीव मात्र प्रकर्षाने घर करून राहीली ! मागाहुन घरी आल्यावर बायकोला सगळी story सांगितली ! हसली, म्हणाली, 'प्रेम आंधळे असते' असे म्हणतात ते आज कळले !


आता तुम्ही म्हणू शकता "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं !"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: