मराठी ब्लॉग - मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नोकरीतले अनुभव, स्वत:चे विचार, संस्कृत सुभाषिते, मुंबईच्या लोकलने रोज कराव्या लागणार्या प्रवासाचे अनुभव, इंग्रजीतले जे भावले त्याचा माय मराठीत अनुवाद आणि बरेच काही, जुन्या व गाजलेल्या हिंदी,मराठी गीतांच्या एम.पी.३ खजिन्याची किल्ली! वि.सू - हा ब्लॉग स्वामीत्व हक्क मुक्त आहे.
शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४
शरद पवार आणि त्यांचे दळभद्री राजकारण !
सोमवार, २० ऑक्टोबर, २०१४
ओवैसी फॅक्टर !
25 वर्षानी मिळाला उ:शाप !
गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०१४
लोकशाहीचा गाडा का अडला ? मतदार न फिरकल्यामुळे !
बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४
कमळेच्या काडीमोडाची करूण कहाणी !
मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४
रमेश किणीचे काय झाले ?
नौटंकी साला !
रविवार, ५ ऑक्टोबर, २०१४
बाळासाहेबांच्या नावाने भावनिक साद घातली तर मराठी मतदार विरघळतो का ?
शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०१४
उद्धवा अजब तुझे वागणे !
बुधवार, ११ जुलै, २०१२
प्रतिभाताईंमुळे मराठी माणसाची मान शरमेने खाली गेली आहे !
शनिवार, २३ जून, २०१२
पळपुट्या दादा !
नेत्यांना नुसते नावाने ओळखले जाणे कमीपणाचे वाटत असावे. अंगात कर्तबगारी काही नसतेच तेव्हा निदान नावाला तरी काही उपाधी जोडणे त्यांना गरजेचे असते. कोणी साहेब, कोणी पंत, कोणी राव तर कोण दादा ! दादाचा मुळ अर्थ थोरला भाऊ पण त्याही पुढे जावून जबाबदारी घेणारा, सगळ्यांना सांभाळणारा, आधार वाटणारा. पण आजच्या काळात दादा हा शब्द गुंड या शब्दाला समानार्थी म्हणून वापरला जातो. राजकारण करणे म्हणजे गुंड असणे आता स्वाभाविक झाले आहे. त्यात सत्ता हाती असले तर काय बघायलाच नको !
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा दादा व्यक्तिमत्व आहे. त्यांचा दरारा सर्वदूर पसरलेला आहे. मंत्रलयाला आग लागली तेव्हा हे दादा तिकडेच होते. या दादाने सगळ्यात आधी मैदान गाठले ! त्यांना भेटायला आलेले त्यांचे दोन मित्र त्यांची वाट बघत तिकडेच थांबलेले आहेत याचे भान सुद्धा त्यांना राहिले नाही. दादा वाचले पण त्या दोघांचा मात्र कोळसा झाला ! त्या दोघांची दादांवरची निष्ठा तरी किती अढळ बघा, आपल्या शेवटच्या कॉलमध्ये सुद्धा त्यांना दादांच्या जीवाची काळजी होती ! पण दादा मात्र मैदान सोडून केव्हाच मैदानात आले आहेत हे त्यांना कळले असते तर ?
जहाज बुडते तेव्हा कप्नान सगळ्यात शेवटी जहाज सोडतो. तसे झाले नाही तर तो जहाजाबरोबरच जलसमाधि पत्करतो. पण इथे मात्र दादा असल्याचा दावा करणार्याने सगळ्यात आधी मंत्रालय सोडले ! आता तुम्हीच ठरवा याला दादा म्हणायचे का फद्या ते !
बुधवार, ३१ ऑगस्ट, २०११
माजी पंतप्रधानांच्या मारेकर्यांना फाशी झालीच पाहिजे.
तब्बल ११ वर्षाच्या विलंबानंतर राष्ट्रपतींनी राजीव गांधी यांच्या मारेकर्यांचा दया अर्ज फेटाळला. अर्थात १९९१ मध्ये हत्या झाल्यावर १० वर्षे हा खटलाच चालला होता. खुद्द सोनिया गांधीनीच राजकारणात प्रवेश करताना , व त्यांच्याच पक्षाचे नरसिंहराव पंतप्रधान असताना या दिरंगाईबद्दल अमेठीच्या जाहीर सभेत नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्याच मर्जीतल्या राष्ट्रपतींना ही फाइल क्लियर करायला एवढा विलंब का लागला या बद्दल त्यांनी किंवा त्यांच्या मुलाने राहुलने कधी बोंब मारली नव्हती हे ही लक्षात घ्यायला हवे.
आपला स्वत:चा नवरा / बाप मारला गेला तरी सोनिया व राहुलला तामिळनाडूतली सत्ता जास्त प्रिय वाटत होती / आहे. काय दळभद्री मायलेक आहेत बघा ! यातुनच द्रमुक बरोबर चुंबाचुंबी सुरू होती. करूणानिधी उघडपणे तामिळ वाघांचे समर्थन तेव्हाही करत होते व आजही करीत आहेत. जेव्हा राजीव गांधी यांची हत्या झाली तेव्हा त्यांचेच सरकार तिकडे सत्तेत होते. तामिळ वाघांशी हातमिळवणी केली असल्याच्या सबळ पुराव्यावरून तेव्हा त्यांचे सरकार चंद्रशेखर यांनी बरखास्त केले होते. राजीव हत्येपाठोपाठ झालेल्या लोकसभा व राज्य विधानसभेच्या निवडणुकित करूणानिधींचा द्रमुक पार भुईसपाट झाला होता व तेव्हा अण्णाद्रमुकने कॉंग्रेसशी केंद्रात व राज्यात युती केली होती. यावरून तामिळनाडूतील जनतेची सहानुभूति श्रीलंकेतील फुटीरतावादी तामिळ वाघांना केव्हाही नव्हती हे सुस्पष्ट आहे. संख्येच्या बळावर जयललिता यांनी अत्यंत बेमुर्वतखोरपणे तेव्हा काँग्रेसला राज्यातील सत्तेतला वाटा नाकारला होता. जयललिता यांनी मग टाडाचा वापर करत द्रमुकला चांगलेच अडचणीत आणले होते. आज तामिळ अस्मितेच्या नावाने गळा काढणारे जयललिता व करूणानिधी कधी काळी तामिळ वाघांच्या हिटलिस्टवर होते, प्रभाकर त्यांच्या जीवावर उठला होता तेव्हा केंद्र सरकारने दिलेल्या संरक्षणातच त्यांना रहावे लागले होते ! आज श्रीलंकेने तामिळ वाघांचा पुरता बिमोड केल्यावर व त्यांचा म्होरक्या प्रभाकरनचा खातमा केल्यावर तामिळनाडूतल्या तामिळ नेत्यांना त्याचा पुळका आला आहे.
राष्ट्रपतींनी ११ वर्षे विलंब का केला हे विचारायचा अधिकार मद्रास उच्च न्यायालयाला कसा आहे ? दया अर्ज करताना खुन्यांनी "वेळेत निर्णय द्या" अशी काही अट घातली होती का ? "इतका विलंब का होत आहे" असे आधी कधी विचारले होते का ? फाशीला दिलेली स्थगितीच बेकायदा ठरवून ठरल्या दिवशी सगळ्यांना फासावर लटकवायलाच हवे. कहर म्हणजे तामिळनाडू विधानसभेने "फाशी रद्द करावी" असा एकमुखी ठराव केंद्राला पाठविला आहे. हा तर सरळ सरळ देशाच्या एकात्मतेवर घाला आहे. मारेकरी तामिळ होते म्हणून त्यांना फाशी देवू नये ही मागणी मान्य केल्यास देशाच्या विघटनाची प्रक्रीयाच सुरू होणार आहे. देशाच्या सीमावर्ती भागातल्या फुटीरतावादी कारवायांना अलिकडे बराच चाप बसला आहे, त्यांना या निर्णयाने नव्याने बळ मिळेल. उद्या मुसलमान दुखावतील म्हणून कसाबची फाशी रद्द करायची का ? का त्यामुळेच संसद हल्ल्याचा सूत्रधार अफझलला फाशी दिले जात नाही ? शीख मारेकर्यांनी इंदिरा गांधी यांची हत्या केली होती तेव्हा उडालेल्या आगडोंबात ३००० पेक्षा जास्त शीखांची कत्तल झाली होती. त्यांच्या मारेकर्यांना फासावर लटकाविले गेले व त्यानंतरही कॉंग्रेसचे सरकार पंजाबात सत्तेवर आले होते. तेव्हा कोणाचीही प्रादेशिक अथवा भाषिक अस्मिता कुरवाळण्याची गरज नाही. वेळ आली तर राजीव यांच्या मारेकर्यांबरोबरच त्यांच्या सहानुभूतिदारांना सुद्धा फासावर लटकावयची धमक केंद्र सरकारने दाखवायला हवी. "देरसे आये लेकिन दुरूस्त आये" या न्यायाने देशाच्या सार्वभौमत्वाला आवाहन देणार्यांना जरब बसावी म्हणून तसेच देशाची अखंडता टिकवण्यासाठी ही फाशी अत्यंत आवश्यक आहे.
सोमवार, २५ जुलै, २०११
इनोसंट कलमाडी साहेब !
चला, आज दसरा, आजच दिवाळी ! अहो , तोंड सांभाळून बोला, मला विस्मरणाचा रोग नाही जडला आहे, जडला होता आमच्या कलमाडी साहेबांना ! या रोगाने त्यांची नुसती आठवणच नव्हती गेली , राजकारणातली सोन्यासारखी फुललेली करीयरही संपूष्टात आली होती. कोणी म्हणत होते की शरदाचे चांदणे त्यांना बाधले. महालात राहणारा माणूस तिहारच्या तुरूंगात सडत होता. भगवान के दरबारमे देर है लेकिन अंधेर नही याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. आमचे साहेव आता निर्दोष सूटणार !
आता कोणाला सांगायला हरकत नाही, माझी व साहेबांची ओळख फार फार जुनी, म्हणजे किती वर्षापुर्वीची हे बी आठवत नाय यवडी जुनी ! आता गोदीत कारकुनी करणारा माणूस एवढ्या मोठ्या माणसाच्या संपर्कात तरी कसा आला असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे म्हणा, पण वो एक बहुत पुरानी कहानी है ! किती पुरानी ते मात्र आता आठवत नाय बघा ! झाले असे की आस्मादिक पुण्याचा प्रसिद्ध दगडूशेट हलवाईचा गणपती बघायला गेले होते. दगडूशेटला पोहचे पर्यंत पुण्यातल्या रीक्षावाल्यांनी घुम घुम घुमवून माझा अर्धा खिसा रिकामा केलेला होताच. दर्शनासाठी नंबर लागेपर्यंत माझे पाकिट, मोबाइल, घड्याळ, अंगठी,( चेन घातली होती का व घातली असेल तर ती सुद्धा मारली का ते आठवत नाही.) असे काय काय गहाळ झाले, दगडूशेटच्या पायावर लोटांगण घाले पर्यंत माझा कॉटन किंगचा कॉटनचा शर्ट सुद्धा कोणीतरी मारला. भयंकर प्रसंग ओढवला होता. त्याच वेळी दाढीधारी, पांढरे शुभ्र कपडे घातलेला माणूस नवस फेडण्यासाठी तिकडे आलेला होता. माझी त्याची नजरा नजर झाली व लगेच त्याने मला "पपलू" अशी जोरात हाक मारली. माझी ही अवस्था बघून तो मला "पुना कॅफे" अशी पाटी असलेल्या एका दूकानात घेवून गेला. त्याने दोन कॉफी अशी झोकात ऑर्डर ठोकली. मला उगीच वाटतय की ज्याने कॉफी आणली त्याची सुरत बारामतीकरांशी काफी मिलती जुलती होती. मी पपलू नाही, एकनाथ मराठे असे त्यांना हजारदा सांगितल्यावर त्यांना पटले. पण माणूस मोठा दिलदार ! "या कलमाडीने एकदा कोणाला आपला दोस्त मानले की मानले, कवा बी येत जा राव, हा कॅफे आपलाच आहे, दोस्त आपकी सेवा मे हाजिर है !" असा सबूद दिला आणि तो पाळलाही. योगायोग असेल पण माझी अपघाती झालेली ओळख त्यांना चांगलीच लकी ठरली. सोनिया (मा/आ)यने आश्रय दिला, राज्यसभेची खासदारकी मिळाली , पुढे तर राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजन समितीचे यजमानपद सुद्धा मिळाले.
साहेब म्हणजे एक वल्ली आहेत. मला त्यांनी एकदाही मराठे वा एकनाथ म्हणून हाक मारलेली मला आठवत नाही. खरेच आठवत नाही हो - नाही तसे नाही – कधी मारलीच नाही अशी हाक ! कधी मला ते टी बाळू म्हणत, कधी लखोबा, कधी आर आर कधी राहुल --- एकदा तर मला त्यांनी ममद्या अशी हाक मारून पाठीत प्रेमळ धपाटा सुद्धा घातला होता ! मला थोडे विचित्र वाटायचे पण मोठ्या माणसांच्या लिला आपल्याला कशा कळणार म्हणून सोडून द्यायचो. पुढे मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतले. दिल्लीत आयपीएचे ऑफिस आहे त्यात त्यांनी मला डेप्युटेशनवर बसविले. माझा दिल्लीत चांगलाच जम बसला. राष्ट्रकूल स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली होती, विविध कामांची धडाक्यात टेंडरे निघू लागली व माझ्या पायाला जणू भिंगरी लागली. चहा सोनियाजीं बरोबर, फराळ प्रियांकाच्या घरी, रॉबर्टबरोबर बीयर, राहुलबाबा बरोबर धाब्यावर खाणे, मनमोहनांसोबत मलईदार लस्सी, शीला दिदींच्या घरी रात्रीचे शाकाहारी खाणे ---- ! मस्त चालले होते सगळे ! पण प्रत्येक चांगल्या गोष्टीला नजर लागतेच ना ! साहेबानी काहीतरी गडबड सुरू केली होती. टेंडर एकाचे, कंत्राट दूसर्यालाच, कामाचे पैसे तिसर्यालाच ते सुद्धा ठरल्यापेक्षा कितीतरी जास्त ! एकच काम, पण बिले हजार, काम रूपयाचे, बिले लाखाची तर कधी काम न करताच बिले ! एरवी साहेब सुरेश कलमाडी याच नावाने क्रॉस्ड चेकच घ्यायचे पण हल्ली मला ते चेक भरायला द्यायचे त्यावर आपले नाव काही भलतेच लिहायचे. मग चेक घेणे बंदच करून गांधीच घ्यायला लागले. पण मग मिळालेले पैसे तरी नीट तिजोरीत ठेवायचे ना ? अहो काय सांगू, नोटांची बंडलेच बंडले कोठेही टाकून द्यायचे, गादीखाली, लादीत, सोफ्यात, बाथरूममध्ये , अगदी संडासात सुद्धा ! शेवटी मी त्यांना जबरदस्ती डॉक्टरांकडे घेवून गेलो. सगळी लक्षणे विस्मृती रोगाची होती ! हे कळल्यावर साहेबांनी क्षणाचीही उसंत न घेता आपला राजीनामा खरडला, सार्वजनिक जीवनातुन निवृत्त होणार असून आता फक्त पुना कॅफे सांभाळणार असे प्रत्रक माझ्याकडून बनवून घेतले. आपल्या निवृत्तिचे कारण सोनिया माय, शीला दिदी, प्यारे मोहन या सगळ्या सगळ्यांना कळवायची जबाबदारी त्यांनी मोठ्या विश्वासाने माझ्यावर दिली. मी उदयिकच १० जनपथ गाठले. सोनियामाय बरोबर पास्ता खात असतानाच मी कलमाडी साहेबांना झालेल्या असाध्य रोगाची माहीती दिली व ते सार्वजनिक जीवनातुन निवृत्त होत आहेत असेही सांगितले. मग मात्र अजबच झाले, सोनियांना कलमाडी कोण तेच आठवत नव्हते ! मी जोरात "राहुलबाबा जल्दी आओ" असे ओरडलो व तो धावतच आल्यावर कलमाडी टेप वाजविली तेव्हा राहुलबाबाने "कलमाडी हो या अनाडी, उनसे हमारा क्या वास्ता ? " असे मला विचारले. तिकडून मी थेट मनमोहनांकडे धाव घेतली तर त्यांना राष्ट्रकुल स्पर्धा किस चीज का नाम आहे हेच आठवत नव्हते, त्यांनी माझी बोळवण शीला दिदींकडे केली. शीला दिदींना मी सगळा प्रकार धाप लागेपर्यंत सांगितला तर त्यांनी "आपको विश्राम की सख्त जरूरत है" असे सांगत हातावर एक पेपरमिटची गोळी देवून पिटाळले. हा सगळा प्रकार साहेबांना सांगायला गेलो तर त्यांनी मलाच "कोन है बे तू ?" असे खडसाविले व धक्के देवून बाहेर काढले ! काहीतरी भयंकर घोटाळा होणार, साहेबांबरोबरच देशाचे नाव सुद्धा खराब होणार म्हणून मी पवार साहेबांना बारामतीत जावून लोटांगण घातले. मी त्यांना त्यांच्या नावाने साद घालताच ते एकदम शून्यात नजर लावून बोलू लागले " कोण मी, कोठून आलो, बारामतीची भानामती की मैद्याचे पोते ? की ममद्या खाटीक की मी श्रीखंड्या ? मराठा सदार की मोघल बादशहा ?" असे स्वगत बोलल्यासारखे बोलू लागले !
मधला काही काळ मीच कोमात होतो (म्हणे )! काही महिन्यानंतर की वर्षानंतर डोळे उघडल्यावर "मै कहा हूं" असे न विचारता मी "राष्ट्रकूल स्पर्धा पार पडली का ?" हा प्रश्न विचारला. पडली एकदाची रडत खडत पण त्यात करोडोचा घोटाळा केला म्हणून कलमाडी तुरूंगात आहेत असे कळताच मी "ये हरगिज नही हो सकता, साब बेकसूर है, वो तो अपनी यादगाश खो बैठे है, उन्हे छोड दो" असा टाहो फोडला तेव्हा डॉक्टरांनी "इसके दिमाखपे असर हुआ है" असे म्हणून मला येरवड्याला हलवायची व्यवस्था केली.
शेवटी आज तो सोनियाचा दिनू उगवला, माझी मेंटल वार्ड मधून सूटका झाली तशी आदरणीय कलमाडी साहेबांची सुद्धा होईलच ! गेलेला मान-सन्मान परत मिळेल ! चला, मला आता दिल्लीत होणार्या ऑलिंपिकच्या तयारीला आतापासूनच लागायला हवे !
शुक्रवार, १० जून, २०११
मरणानंतर वैर संपते पण ---
महाराष्ट्रातील पंढरपूर येथे जन्मलेले चित्रकार एम.एफ. हुसेन लंडनमध्ये पैगंबरवासी झाले. भारतात उदंड पैसा, प्रसिद्धी कमावलेले हुसेन लंडनमध्ये कशाला गेले होते ? हिंदू देव-देवतांची नग्न चित्रे काढल्याबद्दल त्यांच्यावर भारतात न्यायालयात खटले चालू होते. त्यात त्यांना शिक्षा होणार होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांना जर एवढा पुळका होता तर आपली ही भूमिका त्यांना न्यायालयात ठामपणे मांडता आली असती. जिकडे कसाबचे ऐकले जाते तिकडे हुसेनचे सुद्धा ऐकले गेले असतेच ! पण भ्याड हुसेन यांनी आधी दुबईत मग इंग्लंडमध्ये पलायन करणे पसंत केले. आता वयाच्या पंचाण्णवाव्या वर्षी मृत्यू येणे तसे स्वाभाविकच आहे आणि तो जिकडे असाल तिकडेच येणार. यमदूत काही देशांच्या सीमा पाळायला बांधील नाहीत. हुसेन यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दावाच मुळात खोटारडा होता. हिंदू देव देवतांची नग्न चित्रे त्यांनी रेखाटलीच पण त्याही पुढे जावून त्यांनी भारतमातेच्याच वस्त्राला हात घातला. या वेळी मात्र भडका उडाला व हुसेन यांचे हात त्यात पोळले, तोंड दाखविणे त्यांना मुष्किल झाले. त्यांनी या प्रकाराची माफी मागितली तेव्हाच हिंदू देव-देवतांना विकृत स्वरूपात रेखाटल्याबद्दल खेद व्यक्त करायला हवा होता. पण तसे मात्र त्यांनी केले नाही ! हिंदूच्या देव देवतांना नग्न रेखाटणारा हुसेन यांचा कुंचला इतर धर्मातल्या विभूति रेखाटताना मात्र भलताचा सोज्वळ असे. हुसेन यांची आई लहानपणीच गेली होती व अखेरपर्यंत ते आपल्या आईच्या कबरीचा शोध घेत होते. आईचे रेखाटन करताना हे असले थेर हुसेन यांना का सुचले नाहीत ? तेव्हा हिंदूना दुखविणे, त्यांच्या श्रद्धा स्थानांना ठेच पोचविणे व यातुन अधर्मी मिडीयाचा वापर करून स्वत:ची तुंबडी भरणे हेच हुसेन यांचे खरे स्वरूप होते. जिकडे आपण नाव कमाविले तिकडेच मरण येणे हे भाग्यलक्षण असले तरी ते भाग्य हुसेन यांनी स्वत:च लाथाडले होते. दोष त्यांच्या कर्माचाच आहे. देशद्रोहाचा आरोप माथ्यावर मिरवत परागंदा असलेला दावूद सुद्धा केव्हातरी मरणारच आहे, तो उद्या पाकमध्ये किंवा दुबईत मेला म्हणून भारतीय मिडीया असाच मातम करणार आहे का ?
झाले ते झाले ! हुसेन मेले ,वैर संपले, आता खुषाल त्यांचे थडगे पंढरपूरमध्ये बांधा पण कफन म्हणून भारतमातेच्या वस्त्राला हात घालू नका म्हणजे झाले !
रविवार, १३ मार्च, २०११
म्या मरीन पण तुका ---- !
कालचा पराभव माझ्या मते सर्वात लाजिरवाणा पराभव म्हणावा लागेल ! अगदी जावेदने शेवटच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराचे वळ एक वेळ बुजतील पण हा सचिनच्या खेळीला नाट लावण्यासाठी ओढवून घेतलेला पराभव विसरू विसरता येणारा नाही ! काल आपल्याला दक्षिण आफ्रिकेने हरविले यावर अजूनही माझा विश्वास बसलेला नाही. नक्की कोठे घोटाळा झाला ? चावलाला काढून टाकले तर त्याच्या जागी अश्विनला घ्यायचे सोडून नेहराच बरा धोणीला गवसला ? आणि सुरेश रैना काय फक्त क्षेत्ररक्षणासाठीच संघात आहे का ? गंभीर किंवा विराट कोहली यातल्या एकाला आलटून पालटून विश्रांती देवून रैनाला का खेळविले जात नाही ? रैना गोलंदाजी सुद्धा करू शकतो व त्याची फिल्डींग हा बोनसच आहे.
सचिन-सेहवागच्या धडाकेबाज सलामीनंतर भारताची धावसंख्या कमाल ४०० ते किमान ३५० असायलाच हवी होती. इंग्लंडविरूद्ध अशीच दणकून सलामी मिळून सुद्धा शेवटी उडालेल्या घसरगुंडीने शेवटचा चेंडू खेळायला आपल्याकडे फलंदाजच शिल्लक उरला नव्हता. या इतिहासातुन टीम इंडीयाने कोणता बोध घेतला ? तर या वेळी शेवटचे आठ चेंडू खेळायला आपल्याकडे फलंदाजच शिल्लक नव्हता ! याला म्हणतात अनुभवाने शहाणे होणे ! धोणीचे गणित सुद्धा कच्चे आहे हे नक्की. शेवटचे षटक आपल्या सर्वोत्तम गोलंदाजाकडे कसे यावे यासाठी त्याने शिकवणी लावायची गरज आहे. धोणीच्या वकुबाबद्द्ल सुद्धा शंका घ्यायला बराच वाव आहे. पॉवर प्ले कधी घ्यायचा याचा निर्णय कायम त्याच्या व पर्यायाने संघाच्या अंगलट आला आहे. शतकी खेळी केलेला सचिन दमला असणे स्वाभाविक होते व पॉवर प्ले मध्ये उलचून चेंडू मारण्यात तो यशस्वी होण्याची शक्यता कमी होती. तो एकेरी-दुहेरी धावा घेवून धावफलक हलता ठेवत असताना पॉवर प्लेचा अवसानघातकी निर्णय पुढे ढकलता आला असता. बरे पॉवर प्ले मध्ये विकेट पडत आहेत हे लक्षात आल्यावर आक्रमकपणाला मुरड घालून खेळपट्टीवर तळ ठोकला असता तरी निदान ३०० चा पल्ला गाठता आला असताच. सचिन असेपर्यंत फलंदाजीला साथ देणारी खेळपट्टी एकदम रंग बदलेल हे संभवत नाही. पण सचिनला नाट लावायची या एकाच प्रेरणेने सगळे खेळत होते व हे सगळे दूसर्या टोकाला धोणीच्या साक्षीने चालले होते. धोणी कॅप्टन कुल नसून खूनशी आहे नाहीतर बथ्थड तरी आहेच आहे ! अगदी शेवटच्या षटकात तेरा धावा हव्या असताना धोणीने चेंडू दिला नेहराकडे ! काय त्या नेहराचा चेहरा ! एरंडेल घेतलेला नेहरा शेवटचे षटक टाकणार म्हटल्यावर छातीत धस्स झाले होते ! सचिन गोलंदाजीसुद्धा ( हो, सेहवाग सुद्धा ! ) करू शकतो याचा हल्ली धोणीला विसरच पडलेला आहे ! याच सचिनने पोरसवदा असताना याच आफ्रिकेविरूद्ध शेवटचे षटक टाकून सामना टाय केला होता , इंझमाम हक सारख्या कसलेल्या फलंदाजाला शेवटच्या चेंडू पर्यंत जखडून ठेवण्याची करामत केलेली होती --- पण सचिन द्वेषाने पछाडलेल्या झारखंडी धोणीला त्याचे काय ? मराठ्यांचे पानिपत कसे करायचे हेच त्याच्या सडक्या डोक्यात असणार ! निदान शेवटच्या चेंडू पर्यंत तरी उत्कंठा वाटेल असेही नेहराने काही केले नाही ! चोकार, षटकार, चौकार ! खेळ खल्लास ! हीच का टीम इंडीयाची सचिनला संस्मरणीय भेट ? ३७ वर्षाचा तरूण तडाखेबंद शतक ठोकतो, तेवढ्याच उत्साहात स्वत:च्या शरीराचा कोट करून क्षेत्ररक्षण करतो व त्याला नाट लावण्यासाठी बाकी टोळभैरव विकेट विकतात, हातातले झेल सोडतात, तो जेव्हा दूसरी धाव घेण्यासाठी अर्धे अंतर पार करून आलेला असतो तेव्हा त्याचा तरूण सहकारी एक धाव कशीबशी पुरी करीत असतो !
सचिन भारतात जन्माला आला हे आपले भाग्य पण त्याचे काय ? ही कसली टीम इंडीया ही तर ’शेम इंडीया’ !
शुक्रवार, २८ मे, २०१०
भाषावार प्रांतरचना आणि बाळासाहेब !
खूप वर्षे आधी “माझी नातवंडे कॉनवेंट (इंग्रजी माध्यम नव्हे ! ) मध्ये शिकल्यामुळे स्मार्ट झाली आहेत “ असे उद्गार काढले होते. ( उद्धव यांचा मुलगा ज्या बॉम्बे स्कॉटीश हायस्कूलात शिकला त्या संस्थेने आपले नाव बदलायला ठाम नकार दिला आहे !) तेव्हा सुद्धा लोक चांगलेच संभ्रमात पडले होते. आजच्या पेपरात बाळासाहेबांनी जातवार जनगणनेला विरोध करतानाच “भाषावर प्रांतरचनेमुळे देशाचे वाटोळे झाले” असले परस्पर काहीही संबंध नसलेले विधान विधान केले आहे. मराठी भाषिकांचे वेगळे राज्य हवे ही मागणी फार जुनी होती. तसे भाषिक राज्याला काँग्रेसच्याच अनेक नेत्यांचा पाठींबा होता. फक्त आकसाने वेगळे मराठी भाषिक राज्य देण्यास मात्र नेहरू तयार नव्हते.. या साठी फार मोठी चळवळ झाली, अनेकांनी आपले रक्त सांडले, मराठी भाषिक राज्य हवे हा एककलमी कार्यक्रम घेवून काँग्रेस विरोधी पक्षांची एक मोठी ताकद उभी राहिली होती, निवडणुकित या आघाडीने चांगलाच हादरा दिल्यावर संयुक्त महाराष्ट्राचा जन्म झाला होता. तसे राज्य स्थापूनसुद्धा साठी उलटली. साठ वर्षाचा मराठी भाषिक राज्याचा ताळेबंद नक्कीच उत्साहवर्धक आहे. अनेक क्षेत्रात देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे. दुर्दैवाने या विकासाचा लाभ मराठी माणसाला कमी मिळाला. हिंदुस्थानवर गझनीने केली नसतील एवढे भयंकर आक्रमणे पुढील काळात युपी-बिहारींनी महाराष्ट्रावर केली व महाराष्ट्राचे लचके तोडले, शहरे भकास व बकाल करून टाकली. देशाच्या इतर कोणत्याच राज्यात युपी-बिहारींना मोकळे रान मिळाले नाही, त्यातील अनेक राज्यात भाषिक अभिमान जागा असल्याने प्रादेशिक पक्षांची सरकारे आली. हिन्दीचा कोणत्याही प्रकारे मुलाहिजा या राज्यांनी राखला नाही ! आंध्रात तर रामारावांनी हिन्दी बातम्यांचे प्रसारणच बंद पाडले होते ! काँग्रजी मराठा नेत्यांनी मात्र महाराष्ट्राला दिल्लीची बटीग बनवून टाकले. मराठी माणसावर व भाषेवर केंद्र व राज्यातील काँग्रेस सरकार अन्याय करते, केंद्र सरकार आपल्या आस्थापनात मराठी भाषिकांना डावलते, दिल्लीत मराठी माणसाला मान नाही या मुद्द्यांवरच तर सेनेचा जन्म झाला. मराठी अस्मितेचा निखारा सेनेने सतत फूंकर मारून धगधगत ठेवला व त्याचा पुर्ण लाभ उठविला त्याच सेनेचा संस्थापक भाषावार प्रांतरचनेला ६० वर्षानी विरोध करतो आहे हे किती अजब ! असली बेछूट विधाने करून मिळते काय व गमावतो काय याचा बाळासाहेबांनी विचार करायची वेळ आली आहे. जर ते तसा करणार नसतील तर मराठी माणसाने तरी वेगळा विचार केला पाहिजे !