सोमवार, १९ ऑक्टोबर, २००९

वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र

२६ डिसेंबर १९५२ ला स्व. बाळासाहेव देशपांडे यांनी लावलेल्या या छोट्याश्या रोपट्याचे रूपांतर आज प्रचंड वटवृक्षात झालेय !

५८ वर्षापुर्वी बाळासाहेबांनी एक स्वप्न पाहिले होते …

या स्वप्नाला भरभक्कम आधार होता तो या देशाला पुन्हा वैभवशाली बनविण्यासाठी अखंड कार्यरत राहण्याचा संकल्प उराशी बाळगलेल्या एका तेजस्वी राष्ट्रशक्‍तीचा ..

या कार्याला आशिर्वाद होते … स्व. ठक्करबाप्पा व प.पू. श्री. गुरूंजीसारख्या द्रष्ट्या महापुरूषांचे ..

आणि मुख्य म्हणजे त्या मागे होता एक दुर्दम्य विश्वास ..’नर सेवा हीच नारायण सेवा’ हा संस्कार वर्षानुवर्षे मनावर कोरल्या गेलेल्या समाजातील जनशक्‍तीवरचा !

कुठले स्वप्न होते ते ?

आपल्याच समाजाचे .. इथल्या प्राचीन व गौरवशाली परंपरेचे अभिन्न अंग असलेल्या वनवासी बांधवांची सर्वांगीण उन्नती साधून त्याला एवढे सामर्थशाली बनवणे की राष्ट्रउभारणीच्या कार्यातही हा समाज आपले योगदान देऊ शकेल.

एक विशाल दृष्टीकोन घेउन विविध सेवाकार्याच्या माध्यमातून कार्याची सुरवात झाली. शिक्षण, आरोग्य, आर्थिक विकास, श्रद्धाजागरण, संस्कार इ. विषय घेउन हजारो सेवाप्रकल्प उभे राहिले. या सार्‍या प्रकल्पाच्या माध्यमातुन देशभरातील वनवासी क्षेत्रात एक प्रचंड शक्‍ती निर्माण झाली आहे.

स्व. बाळासाहेबांनी पाहिलेल्या स्वप्‍नातील प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात उतरली आहे.

भूतकाळात सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणारा वनवासी समाज आज नव्या तेजाने तळपताना दिसू लागला आहे !

महाराष्ट्रात वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याचा प्रारंभ १९७८ साली झाला.

या ३० वर्षामध्ये केलेल्या कामाचा प्रभाव म्हणून ..

· हजारो सुशिक्षित, सुसंस्कारित व प्रतिष्ठीत वनवासी युवकांची पीढी तयार झाली आहे.

· ’आपल्या समाजाचा विकास आपणच केला पाहिजे’ अशी भावना बाळगणारे शेकडो युवक पुढे येत आहेत.

· वैद्यकीय सेवा व आरोग्यरक्षक योजनेच्या माध्यमातुन लाखो वनवासी बांधवांच्या वेदना दूर झाल्या आहेत.

· श्रद्धाजागरणाच्या कार्यामुळे अराष्ट्रीय कारवायांना जबरदस्त खीळ बसली आहे.

· आपल्या वनवासी बांधवांची उन्नती करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असा विचार करून समर्पितपणे कार्य करणारे हजारो नगरीय कार्यकर्ते तयार झाले आहेत.

· एकलव्य खेलकुद स्पर्धेमुळे वनवासी क्षेत्रातील हजारो ’एकलव्यांचे’ प्रगटीकरण झाले आहे.

· वनवासी महिलांनी बचत गटांच्या माध्यमातुन उद्योग-व्यवसाय प्रारंभ करून आपल्या कुटुंबाचा व गावाचा आर्थिक विकासा साधण्यात यश मिळवले आहे.

गेल्या ३० वर्षामधील महाराष्ट्राची वाटचाल प्रेरणादायक असली तरी वनवासी क्षेत्रात अद्यापही समस्यांचा महाकाय डोंगर उभा आहे. पुर्बीची आव्हाने तर आहेतच, पण त्यात काळानुरूप नव्याने भर पडत आहे. या सार्‍या समस्यांचा सामना करून वनवासी समाजाला अधिक शक्‍तीशाली बनवण्याचे कार्य आपण सर्वाना मिळून पूर्ण करायचे आहे.

आतापर्यंतची वाटचाल हजारो हातांच्या बळावर शक्य झाली पण या क्षेत्रातील समस्या पाहता आता लाखो हातांची आवश्यकता भासणार आहे.

या कार्यात आपण तन-मन-धनाने सहभागी व्हावे असे आमचे विनम्र आवाहन आहे.

महाराष्ट्र राज्य सद्यस्थिती (जून २००९ )

शैक्षणिक प्रकल्प

वसतिगृहे १९

प्राथमिक शाळा २

माध्यमिक शाळा २

बाल संस्कार केंद्रे १२

लाभार्थी १,६००

आर्थिक विकास प्रकल्प

औद्योगिक शिक्षण केंद्र २८

शेतकी प्रकल्प ४

बचत गट ५५८

लाभार्थी १६,०००

आरोग्य प्रकल्प

साप्ताहिक आरोग्य केंद्रे ४

दैनिक केंद्रे १

आरोग्य रक्षक ५८६

लाभार्थी ४,००,०००

खेलकूद केंद्रे १५

श्रद्धा जागरण केंद्रे ६०

एकूण प्रकल्प १,१२३

पूर्णवेळ कार्यकर्ते ८१ ( पुरूष ६५, महिला १६)

ग्राम समिती २१८

महिला समिती ६५

यापैकी आपण नक्कीच काहीतरी करू शकाल

· रू. १५,०००/- ३० विद्यार्थांच्या वसतिगृहाचा एका महिन्याचा खर्च.

· रू, ५०००/- वार्षिक देणगी देउन एका वनवासी विद्यार्थाचे पालकत्व.

· शुभप्रसंगी व प्रियजनांच्या आठवणीप्रीत्यर्थ प्रासंगिक देणगी.

· आश्रमाच्या कार्यासाठी वेळ.

· आश्रमाच्या वैद्यकीय केंद्रासाठी औषध संकलनास मदत.

· वनवासी परिसरात सांस्कृतिक भवन उभारणीस सहाय्य-सहभाग.

· कल्याण आश्रमाच्या केंद्रास नियमित/प्रासंगिक भेटी.

· वनवासी कलेस प्रोत्साहन – दिवाळी भेटकार्डे, दिनदर्शिका व राख्या विकत घ्याव्यात.

· वस्तुरूप देणगी – शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेशाचे कापड व अन्य शालेय साहित्य, धान्य, अन्य मदत.

· एका आरोग्यरक्षकाचा वर्षाचा खर्च रू. ५०००/-

सर्व देणग्या आयकराच्या ८०जी कलमाखाली सवलतीस पात्र आहेत. चेक वा ड्राफ्ट “वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र” या नावाने काढावा.

प्रांत कार्यालय : १५, कृषिनगर, महाविद्यालय मार्ग,

नाशिक ४२२ ००५.

दूरध्वनी ०२५३-२५७७ ४९१, ०२५३-२५८२ ४२९

पनवेल कार्यालय : द्वारा – श्री. उदय टिळक, यशोगंगा सोसायटी,

पहिला मजला,६४५, टिळक रोड, पनवेल – ४१० २०६.

दूरध्वनी – ०२२-२७४५ ६८२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: