सोमवार, ३० जून, २००८

सुभाषित संग्रह - भाग ३

१०१)आदित्यस्य गतागतैर अहरहः संक्षीयते जीवितं
व्यापरैर बहुकार्यभारगुरुभिः कालो न विज्नायते
द्ऱ्ष्ट्वा जन्मजराविपत्तिमरणं त्रासस' च नोत्पद्यते
पीत्वा मोहमयीं प्रमादमदिराम उन्मत्तभूतां जगत
१०२) यदि वा याति गोविन्दः मथुरातः पुनः सखि
राधायाः नयन द्वन्द्वे राधा नाम विपर्ययः
१०३) रत्नैर्महार्हैस्तुतुशुर्न देवा न भेजिरे भीमविषेण भीतिं
सुधां विना न प्रययुर्विरामं न निश्चिदार्थाद्विरमन्ति धीराः
१०४) तिलवत् स्निग्धं मनोऽस्तु वाण्यां गुडवन्माधुर्यं
तिलगुडलद्दुकवत् सम्बन्धे अस्तु सुवृत्तत्त्वं
अस्तु विचारे शुभसंक्रमणं मंगलाय यशसे
कल्याणी संक्रान्तिरस्तु वः सदाहमाशंसे
१०५) द्राक्षा म्लान मुखी जाता शर्करा चाश्मताम गता
सुभाशित रसम द्रुश्ट्वा सुधा भीता दिवम गता
१०६) सर्वत्र देशे गुणवान् शोभते प्रथितः नरः
मणिः शीर्शे गले बाहौ यत्र कुत्र अपि शोभते
१०७) येन केन प्रकारेण यस्य कस्यापि देहिनः
सन्तोशं जनयेत्प्राज्ञः तदेवेश्वरपूजनं
१०८) गुणवत जन सम्सर्ग अत य अस्ति नीच अपि गोउरवम
पुश्प माला प्रसन्ग एन सूत्रम शिर असि धार्यते
१०९) गुणवत जन सम्सर्ग अत य अस्ति नीच अपि गोउरवम
पुश्प माला प्रसन्ग एन सूत्रम शिर असि धार्यते
११०) यः पठति लिखति पश्यति परिपृच्छती पण्डितान् उपाश्रयति
तस्य दिवाकरकिरणैः नलिनी दलं इव विस्तारिता बुद्धिः
१११) बालस्यापि रवेः पादाः पतन्त्युपरि भूभृतां
तेजसा सह जातानां वयः कुत्रोपयुज्यते
११२) यस्य अस्ति वित्तं स वरः कुलिनः
स पण्दितः स श्रुतवान् गुणज्ञः
स एव वक्ता स च दर्शनीयः
सर्वे गुणाः काञ्चनं आश्रयन्ते
११३) पार्वती फणि बालेन्दु भस्म मन्दाकिनी युता
अपवर्ग प्रदा मूर्तिः कथं स्यात् तव शंकर
११४) सुमित्रा नन्दन आसक्तं इमं राजानं ईक्ष्य वा
अथ वा मां कृशतनुं जलधे रोदिषि स्वयं
११५) जीविते यस्य जीवन्ति लोके मित्राणि बान्धवाः
सफलं जीवितं तस्य को न स्वार्थाय जीवति
११६) चातक धूम समूहं दृष्ट्वा मा धाव वारि धर बुद्ध्या
इह हि भविष्यति भवतः नयन युगादेव वारिणां पूरः
११७) जाता शिखण्डिनी प्राक् यथा शिखण्डि तथावगच्छामि
प्रागल्भ्यमधिकमाप्तुं वाणी बाणो बभूवेति !
११८) दातव्यं भोक्तव्यं धनविषये संचयो न कर्तव्यः
पश्येह मधुकरीणां संचितार्थं हरन्त्यन्ये
११९) त्यजन्ति मित्राणि धनैर्विहीनं दाराश्च पुत्राश्च सुहृज्जनाश्च
तं अर्थवन्तं पुनराश्रयन्ति अर्थो हि लोके पुरुषस्य बन्धुः
१२०) तृणादपि लघुस्तूलस्तूलादपि च याचकः
वायुना किं न नीतोऽसौ मामयं प्रार्थयेदिति
१२१) अयं निजः परो वा इति गणना लघु चेतसां
उदार चरितानां तु वसुधा एव कुटुम्बकं
१२२) अतिपरिचयादवज्ञा सन्ततगमनादनादरो भवति
मलये भिल्लपुरन्ध्री चन्दनतरुकाष्ठमिन्धनं कुरुते
१२३) छायां अन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयं आतपे
फलानि अपि पर अर्थाय वृक्षाः सत्पुरुषा इव
१२४) लालयेत् पंच वर्षाणि दश वर्षाणि ताडयेत्
प्राप्ते तु षोडशे वर्शे पुत्रे मित्रवद् आचरेत्
१२५) वैध्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोधर
यमो हरति प्राणान वैध्यह प्राणन धनानि च
१२६) चिताम प्रज्वलिताम द्रुस्त्वा वैध्यह विस्मयमागतह
नाहम गतह न मय भ्राता कस्येदम हस्तलागवम
१२७) यथैकेन न हस्तेन तालिका सम्प्रपद्यते
तथोद्यमपरित्यक्तं कर्म नोत्पादयेत् फलं
१२८) अष्टादश पुराणानां सारं व्यासेन कीर्तितं
परोपकारः पुण्याय पापाय पर पीडनं
१२९) अर्थागमो नित्यमरोगिता च प्रिया च भार्या प्रियवादिनी च
वश्यश्च पुत्रोऽर्थकारी च विद्या षड् जीवलोकस्य सुखानि राजन्
१३०) अकृत्वा पर सन्तापं अगत्वा खल मन्दिरं
साधोः मार्गं अनुसृत्य यत् स्वल्पं अपि तद् बहु
१३१) आपदि मित्र परीक्षा शूर परीक्षा रण अंगणे भवति
विनये वंश परीक्षा शील परीक्षा धन क्षये भवति
१३२) विद्वत्त्वं च नृपत्वं च न एव तुल्ये कदाचन
स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते
१३३) गणयन्ति न ये सूर्यं वृष्टिं शीतं च कर्षकाः
यतन्ते सस्यलाभाय तैः साकं हि वसामि अहं
१३४) मूर्खस्य पंच चिह्नानि गर्वो दुर्वचनं तथा
क्रोधश्च दृढवादश्च परवाक्येष्वनादरः

१३५) अष्टौ गुणा पुरुषं दीपयन्ति प्रज्ञा सुशीलत्वदमौ श्रुतं च
पराक्रमश्चाबहुभाषिता च दानं यथाशक्ति कृतज्ञता च
१३६) कः न याति वशं लोके मुखं पीण्डेन पूरितः
मृदंगः मुख लेपेन करोति मधुरं ध्वनिं
१३७) ऐक्यं बलं समाजस्या तदभावे स दुर्बलः
तस्मात् ऐक्यं प्रशंसन्ति दृढं राश्त्र हितैषिणः
१३८) गुरुर्बन्धुरबन्धूनां गुरुश्चक्षुरचक्षुषां
गुरुः पिता च माता च सर्वेषां न्यायवर्तिनां
१३९) गर्वाय परपीडायै दुर्जनस्य धनं बलं
सुजनस्य तु दानाय रक्षणाय च ते सदा
१४०) अम्बा यस्य उमादेवी जनकः यस्य शंकरः
विद्यां ददाति सर्वेभ्यः स नः पातु गजाननः
१४१) गौरवं प्राप्यते दानात् न तु वित्तस्य संचयात्
स्थितिः उच्चैः पयोदानां पयोधीनां अधः स्थितिः
१४२) उद्यमः साहसं धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः
षड् एते यत्र वर्तन्ते देवः तत्र सहायकृत्
१४३) उपदेशः हि मूर्खाणां प्रकोपाय न शान्तये
पयः पानं भुजंगानां केवलं विषवर्धनं
१४४) आत्मनः मुख दोषेण बध्यन्ते शुक सारिकाः
बकाः तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थ साधनं

१४५) करोति स्वमुखेनैव बहुधान्यस्य खण्दनं
नमः पतनशीलाय मुसलाय खलाय च
१४६) खलः करोति दुर्वृत्तं नूनं फलति साधुषु
दशाननोऽहरत् सीतां बन्धनं तु महोदधेः
१४७) कार्यार्थी भजते लोकः यावत् कार्यं न सिध्यति
उत्तीर्णे च परे पारे नौकायाः किं प्रयोजनं
१४८) मनो मधुकरो मेघो मद्यपो मत्कुणो मरुत्
मा मदो मर्कटो मत्स्यो मकारा दश चंचलाः


१३४.३३ कोटी रूपयांचे वाटप कस करायचे ?

१३४.३३ कोटी रूपयांचे वाटप कस करायचे ?
( निमित्त आहे १ एप्रिलचे !)

गेली अनेक वर्षे कट्ट्यांचे मालक आँर्कुट्च्या प्रचंड फायद्यामधला आपला रास्त वाटा मागत आहेत. या दबावाला झूकून फायद्याच्या ४% वाटा कट्ट्याच्या मालकांना मिळणार आहे. तो त्यांनी सभासदांना द्यावा असे अभिप्रेत आहे. १०,००० च्या वर सभासद संख्या असलेल्या आपल्या कट्ट्याला कमीत कमी १३४.३३ कोटी रूपये मिळणार आहेत. ही बातमी मला कळल्यावर हल्ली मालकांच्या वाढत्या उद्दामपणाचे रहस्य मला कळले. ३० एप्रिल या सभासद निश्चिती तारखेच्या आत जमेल त्या सभासदाला हाकलून आपला वाटा वाढवायचा त्याचा डाव आहे, तो आपण हाणून पाडला पाहीजे. स्वत:हुन unjoin तर कोणीही होउ नये. लगोलाग मी मालक आदी जोशी यांचे घर गाठले. रात्रीचे १ वाजले तरी आदीच्या घराचा दिवा चालूच असल्यामुळे मला घर लगेच सापडले ! त्याने आधी मला ओळख दिली नाही पण मी माझ्या उडवलेल्या टाँपिकची नावे सांगितल्यावर त्याचा नाईलाज झाला ! द्ळण न दळता एवढे करोडो रूपये कसे वाटणार ते सांग असे खडसाविले. कसले पैसे, कोणते पैसे हे प्रश्न पण मी कात्रण समोर ठेवताच उडून गेले ! आदीने मला on the spot एक खोका देउ केला मी म्हटले जातिशी गद्दारी करणार नाही ! (५०-५० केले असते तर ? )तेव्हा आदीने दूसरा (डाव) टाकला ! म्हणाला, ठीक आहे टाँपिक काका, उद्या हाच टाँपिक टाका, सभासदांच्या सूचना मागवा, यावर जर एकमत झाले तर त्याप्रमाणे मी वागायला तयार आहे ! पण जर हा टांपिक भरकटला, त्याचा कँफे झाला तर मी एकही पै देणार नाही ! मी हे आव्हान स्वीकारले आहे ! तुम्ही ?

वाटप कसे करायचे याचे अनेक पर्याय आहेत, माझ्या मते ते असे,

१) एकूण रक्कम भागिले सभासद संख्या, हे सगळ्यात सोपे ! प्रत्येकी १ लाख मिळतील !

२) फक्त सक्रीय सभासदांमधे वाटप. टांपिक प्रमाणे काही रक्कम आणि पोस्टस साठी काही रक्क्म, फालतू, कँफे करणार्या पोस्ट जमेस धरायच्या नाहीत.

३) टाँपिक ला ज्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो त्या प्रमाणात त्याच्या निर्मात्याला वाटा. delete topic धरायचे नाहीत !

४) निबंध स्पर्धेत भाग घेतलेल्यांना काही रक्कम व विजेत्यांना काही

5) जुन्या सभासदांना जास्त वाटा.

६) प्रक्षोभक भाषा वापरणार्यांना एक पैही देउ नये.

७) पैसे शेयर बाजारात गुंतवावेत व डबल करावेत.

८) एक विश्वस्त संस्था स्थापन करून ज्ञातीच्या भल्यासाठी पैसे खर्च करावेत.

९) सहली, मेजवान्या आयोजित करून त्यावर पैसे खर्च करावेत.

१०) सोडत काढून पैसे वाटावेत.

दाउद इब्राहिमला अनावृत्त पत्र.

कधी येशील परतून ?

दाउद इब्राहिमला अनावृत्त पत्र.

प्यारे दाउद ,सलाम आलेकूम, तुझ्या भावाला कोर्टाने बाईज्जत रिहा केले हे तुले कळले असेलच. मुबारक हो मियाँ. मागच्याच आठवड्यात तुझ्या बहीणालाही भारतातील नि:स्पृह न्यायालयात न्याय मिळाला. हिंदी चित्रपटात जसा खलनायक नायकाच्या आईला अथवा प्रेयसीला ओलीस ठेवतो तसेच आबांच्या पोलीसांनी तुझ्या बहीणीला अडकवायचा विडा उचलला होता. तू तिला वाचवायला आलास कि पोलीस तुझाच 'गेम' करणार होते ! पण हसीनाच्या करीष्म्याने आबांचा हिरमोड झाला ! शेवटी बहीण कोणाची ? मान गये भाई ! या पारायणात मुद्द्याचे राहून जायचे. या दोन प्रकरणातून 'दुखके दिन बीते रे भैया' हेच दिसून येते. तेव्हा स्वत:चा प्यारा हिंदोस्ता सोडून तू तरी का बाबा असा दर दर के ठोकरे खात हिंडतो आहेस ? परवा दुबई तर आज कराची ?देशातीला आर्थिक विषमता दूर व्हावी म्हणून प्रस्थापित सरकारविरूद्ध तू बंड पूकारलेस. सरकारी ससेमिरा पाठी लागल्यामुळे तुझ्यावर परागंदा व्हायची पाळी आली. तरी तुझी लोकप्रियता वाढतच होती. मग सरकारने ९३ च्या बॉम्बस्फोटात तुला गोवले व मुस्लीम अतिरेकी घोषित करून तुझे परतीचे दोरच कापून टाकले. तुझ्या निष्ठावंत सहकार्यात (सरकारी शब्द गँग) सर्वच धर्माचे लोक होते. (सरकारी शब्द सेक्यूलर) या आरोपानंतर तुझे हिंदू सहकारी बिथरले, तुझी साथ सोडली. (पण पोलीसांना हे कोठे पटायला ? त्यांनी त्यांचा एन्काउंटरच केला !)तुला गंमत सांगतो. शिवाजी महाराजही आम्हाला लहानपणी कट्टर हिंदूत्वनिष्ठ वाटायचे. त्यांनी मुस्लीम आक्रमकांपासून मुस्लीम धर्म वाचवला ,वाढवला असा गैरसमज झाला होता. मग सरकारी क्रमिक पुस्तकातिन कळले की महाराजही सर्वधर्मसहभावी होते. त्यांनी खानाचा कोथळा बाहेर काढला हे ही खोट्टं.मग हाच न्याय तुला का नाही ? तू बापडा पवार साहेबांना फोन लावून बाकी कसलेही आरोप करा पण देशद्रोहाचा कलंक लावू नका असे विनवलेस. पण साहेब पडले पक्के राजकारणी. त्यांनी तू मूळात न फोडलेल्या बॉम्बमध्ये आणखी एक अधिकचा फोडला व इनोसंट संजूबाबाला पण गोवला. तू कलेवर नि:स्सिम प्रेम करणारा, कलाकारांवर खैरात करणारा, म्हणून ते ही तुझ्यासाठी कूर्बान होण्यास तयार. विजनवासात तू असताना तुला रीझवायला कलावंत दुबईला यायचे. सरकारने त्यांनाही धमकावले.सच्चा भारतीयाप्रमाणे क्रिकेटवर तुझे जीवापाड प्रेम. वाळवंटात तू क्रिकेट फूलवलेस. आपल्या खेळांडूवर दौलतजादा करून त्यांना आपलस करून टाकलस. छळ तरी किती सोसावा ? बेटीची सगाई झाली, तीही जावेदमियाँच्या पोर्याबरोबर, पण लाडक्या लेकीची बिदाईही तुला करता आली नाही. कसा तीळ तीळ तूटला असशील ते एक बापाचे मनच जाणो. हीच शादी जर कोकणात झाली असती तर कोकणी माणसाच्या डोळ्याचे पारणे फिटले असते व घाटावरल्या लोकांचे डोळे उघडले असते. भारतात कोठे खुट्ट झाल तरी तुझ्यावर खापर फोडून पोलीस आपले तंबाखू मळायला मोकळे ! आपल्याने काही होत नाही म्हटल्यावर त्या अमेरिकेलाही तुझ्याविरूद्ध भडकवले. तुला बढती मिळून तू आंतरराष्ट्रीय दहशतवादी झालास ! जॉर्ज अंकलचा रोष नको म्हणून दुबईने तुझी पाठवणी केली भारत-पाक मैत्रीचे खंदे पुरस्कर्ते मुशर्रफ मियाँकडे. तिकडे तुझी चांगली बडदास्त आहे हे वाचून बरे वाटले. पण म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती ! तू भारतात शेर असलास तरी आंतरराष्ट्रीय राजकारणात प्यादेच ! मुशर्रफ मियाँ पक्का लबाड आहे. आपली सत्ता वाचविण्यासाठी तो तुला भारताच्या ताब्यात न देता 'जिंदा या मुर्दा' सँम अंकला ला नजर करेल आणि तुझा सद्दाम होईल ! तेव्हा भारतात न्यायसंस्था स्वायत्त आहेत तोपर्यंत परत ये रे बाबा, तुझीही अवस्था कराचीचा समुद्र बघून 'सागरा प्राण तळमळला' अशी झाली असताना मातृभूमीला परतून का येत नाहीस ?तुझा आणि तुझ्याच वाटेकडे डोळे लावून बसलेला कोकणी माणूस.

रविवार, २९ जून, २००८

शब्दांचे वर्तूळ !

शब्दांचे वर्तूळ !


कोणत्याही एका शब्दाने खेळ चालू करा. त्या शब्दातले शेवटचे अक्षर घेउन पुढील शब्द बनवा, असे शब्द करता करता आपण ज्या शब्दापासून सूरवात केली त्याचे सुरवातीचे अक्षर शेवटी आले की झाले वर्तूळ पूर्ण ! एकदा शेवटी आलेले अक्षर परत शेवटी येता कामा नये.(अपवाद सुरवात एक अक्षरी शदाने केल्यास !)उदा. मी, मीत, तलवार,रपेट, टरफल, लस, सलामी यात मी 'मी' पासून सुरवार केली व शेवटी 'सलामी' देउन वर्तूळ पूर्ण केले !असे वर्तूळ करता आल्यास ते विशेष कौशल्य समजले जाईल,


१) ज्या अक्षरावरून सुरवात केली आहे ते जसेच्या तसे शेवटी आणता आल्यास. जसे वरील उदाहरणात मी, सलामी.


२) पहीला शब्द एक किंवा दोन अक्षरी आणि पुढचे त्याहून एक-एक अक्षर जास्त असे साधता आल्यास.


3) जास्तीत जास्त मोठे वर्तूळ करता आल्यास.


४) सुरवात एक अक्षरी शब्दाने करून एक सम गाठणे व परत उतरत्या क्रमाने येणे. जसे १ २ ३ ४ ३ २ १ !


चला तर लागा वर्तूळ काढायला !

शब्द शिवून द्या !

शब्द शिवून द्या !


कापड घेउन आपण दूकानात जातो, टेलर आपले माप घेतो, मग आपण त्याला सांगतो, थोडा सैल शिव, बाह्या पूर्ण हव्यात, बॉटम एवढाच हवा, खिसे तिरके, चोर खिसा हवाच, बेल्ट लावता आला पाहीजे---. तसाच तुम्हाला जसा शव्द हवा असेल तशी आँर्डर द्या ! उदा. मला तीन अक्षरी शब्द हवा पण त्यातले मधले अक्षर जोडाक्षर हवे पण बाकी अक्षर अकारान्त हवी (सरळ वळणाची !)जितके जास्त शब्द बनवाल तितके बनवा ! अर्थात हे तुम्हाला जमले तर तुम्हीही order देउ शकाल !


१) एका पक्षाचे नाव ओळखा !पहील्या आणि शेवटच्या अक्षराने त्याचा रंग बनतो, तर पहील्या दोनने त्याचा आवाज !
२)पहीली दोन अक्षरे घेतल्यास अर्थ पान असाही होतो तर पहीला आणि शेवटच्या अक्षराचा अर्थ पंख असा होतो. तर स्वत:ला सर्वज्ञ समजणारे हे कोण ?
३) ४ अक्षरी गावाचे नाव.
१+२ देणारा
२+४ भरपूर आयुष्य असणारे झाड
२+३ लोककलेचा एक प्रकार
४) ६ अक्षरी आडनाव
२+३ - एक मादक पेय
३+४+६ - एक रास
---------------
१) मला हवा शब्द असा ,५ अक्षरी, पहीला आकार, चवथा अनुस्वार, पाचवा परत् आकार !
२) पहीला इकार, दूसरे जोडाक्षर, तिसरे अकार, चवथे आकार आणि पाचवे परत अकार !
३) ५ अक्षरी
पहीला अकार
दूसरा रफार (र्त असा)
तिसरा अकार
चवथा आकार
पाचवा परत अकार

मला वाटते एवढे पुरेसे आहे ! ओळखा १
४) ४ अक्षरी
पहीला ओकार
दूसरा व तिसरा अकार
चवथे मात्र जोडाक्षरच हवे !
५)पहीले आकार
दूसरे अकार
तिसरे अनुस्वार+इकार
चवथे ऊकार
६) ४ अक्षरी
पहीला कृकार (कृष्ण मधला कृ )
दूसरा आकार
तिसरा अनुस्वार
चवथा अकार
७) ४ अक्षरी शब्द
पहीला आकार
दूसरा रफार
तिसरा क्रकार
चवथा अकार
८) पहीला एकार
दूसरा आणि चवथा अकार
तिसरा आकार !
९) ४ अक्षरी शब्द
पहीला इकार
दूसरे जोडाक्षर
तिसरे आकार
चवथे अकार
१०) ५ अक्षरी शब्द
पहीले, दूसरे आणि पाचवा अकार
तिसरा अनुस्वार
चवथा ऊकार
११) ४ अक्षरी शब्द
पहीला अनुस्वार
दूसरा ईकार
तिसरा आकार
चवथा ऊकार
१२) पहीला ऊकार
दूसरा रफार
तिसरा अकार
चवथा आकार
१३) ४ अक्षरी
पहीले आकार+अनुस्वार
दूसरे ऊकार
तिसरे अनुस्वार
चवथे अकार
१४) पाच अक्षरी शब्द
पहीला, दूसरा आकार
तिसरे जोडाक्षर
चवथे आकार+अनुस्वार
पाचवा आकार
१५) पहीले चारही अकार
पाचवे आणि शेवटचे जोडाक्षर !
१६) पहीला अकार
दूसरे जोडाक्षर
तिसरा इकार (ईकार चालणार नाही, आधीच सांगून ठेवतो )
चवथा ईकार (इकार चालणार नाही, आधीच सांगून ठेवतो )
१७) एकच ओकार
एकच अकार
एकच आकार
व एकच ईकार असलेला शब्द ! क्रम कोणताही घ्या !
१८) पहीला इकार
दूसरा अकार
तिसरा ऊकार
चवथा अकार
१९) पहीला आकार
दूसरा अकार
तिसरा इकार
चवथा रफार
पाचवा अकार
२०) तिन्ही ऊकार !
२१) पहीला ओकार
दूसरा आकार
तिसरा अकार !
२२) पाच अक्षरी शब्द
फक्त तिसरा शव्द अकार
बाकी सगळे आकार !
२३) चार अक्षरी शब्द
पहीला कृ कार
दूसरा अकार
तिसरे व चवथे जोडाक्षर !
२४) पहीला उकार
दूसरा अनुस्वार
तिसरा, चवथा अकार
असा ४ अक्षरी शब्द !
२५) किमान ४ अक्षरी शब्द
पहीले आणि शेवटचे अक्षर अकार,
मधे काहीही कोंबा, घुसवा, बसवा, माझे काहीही म्हणणे नाही !
२६) पहीला इकार
दूसरा अकार
तिसरा अकार
चवथा इकार+रफार
पाचवा आकार
२७) पहीला आकार
दूसरे जोडाक्षर
तिसरा रफार
चवथा उकार
पाचवे परत जोडाक्षर !
२८) चार अक्षरी शब्द द्या
पहीले एकार
दूसरे अकार
तिसरे आकारचवथे ईकार
२९) पहीला कृकार
दूसरे जोडाक्षर+अनुस्वार
तिसरा अकार
३०) पहीला आकार
दूसरा अकार
तिसरा आकार
चवथा ईकार असेल
३१) पहीला आकार
दूसरा आकार
तिसरा अकार
चवथा ईकार असेल
३२) ६ अक्षरी शब्द
पहीला अकार
दूसरा ईकार/इकार
तिसरा अकार
चवथा उकार
पाचवा अकार
सहावा आकार (हा एक जोड-शब्द आहे)
३३) ४ अक्षरी शब्द
पहीला उकार
दूसरा अकार
तिसरा परत उकार
चवथा ईकार
आणि अजून एक , दोनच मूळ अक्षरे वापरायची आहेत !
३४) आता सांग, एका औद्योगिक वसाहतीचे नाव ज्यात
पहील ओकार
दूसरा एकार
तिसरा, चवथा अकार
पाचवा ऊकार
सहावा आकार
सातवा परत अकार !
३५) महाभारतातले पात्र
पहीले ओकार+जोडाक्षर
दूसरे , तिसरे आकारचवथे रफार
३६) अजून एक महाभारतातील पात्र शोधा
पहीला अकार
दूसरा इकार
तिसरा अकार
चवथे जोडाक्षर
३७) ४ अक्षरी
पहीले आणि चवथे अकार
दूसरा उकार
तिसरा आकार




आवर्तन अक्षराचे !

आवर्तन अक्षराचे !

शब्दखेळच पण जरा वेगळ्या धाटणीचा ! कोणतेही एक अक्षर द्या , ते अक्षर सुरवातीला असलेले, दूसरे असलेले, तिसरे असलेले,चवथे असलेले व पुढे जेवढे शक्य असेल तेवढे घेउन शब्द बनवा ! उदा. क्र या अक्षरापसून मी क्रम, विक्रम, पराक्रम, कालचक्र असे क्र हे अक्षर एक ते चार या स्थानी घेउन शब्द बनवले आहेत. खेळ पुढे सुरू करण्यासाठी मी अक्षर देत आहे "म". "क्र" हे अक्षर पाचव्या किंवा त्याही पुढच्या स्थानी घेउन काही शब्द होत असल्यास ते ही लिहा !

शब्दवेध !

१) एका पक्षाचे नाव ओळखा !पहील्या आणि शेवटच्या अक्षराने त्याचा रंग बनतो, तर पहील्या दोनने त्याचा आवाज !
२)पहीली दोन अक्षरे घेतल्यास अर्थ पान असाही होतो तर पहीला आणि शेवटच्या अक्षराचा अर्थ पंख असा होतो. तर स्वत:ला सर्वज्ञ समजणारे हे कोण ?
३) ४ अक्षरी गावाचे नाव.
१+२ देणारा
२+४ भरपूर आयुष्य असणारे झाड
२+३ लोककलेचा एक प्रकार
४) ६ अक्षरी आडनाव
२+३ - एक मादक पेय
३+४+६ - एक रास
मला वाटते एवढे पुरेसे आहे ! ओळखा १
५) ४ अक्षरी आडनाव ओळखा,
१+२ एक संख्या,
१+४ हे चहात टाकतात
३+४ ओले चा अपभ्रंश
६) ६ अक्षरी शब्द
१+२ बरोबर
४+६ जंगल
४+५+६ वर्तणूक
७) ५ अक्षरी शब्द
१+४ = निवडणुकित असतात
५ + १ = used for tea
३+५ = उठला (eng)
८) एक हुद्दा (५ अक्षरी)
४+२ = किंमत
१+३ = एक पिदूकल देश
१+५ = ताडण करणे
९) पाच अक्षरी शब्द
२+३ = खंत
२+५ = वर्ष
४+३ = जिन्नस
१०) उपनगरी रेल्वेचे एक स्थानक ओळखा;
१+२ गटार
३+४ सहज
१+५ घोषणा
११) पाच अक्षरी आडनाव

४+५ = हात
३+४ = संशय (हिंदी)
१+४ = साधू (ईंग्रजी)
३+५ = बाण
१२) खेळाडूचे नाव व आडनाव (७)
१+७ = गाण्याला हा हवाच
२+४ = काळजी
४+७ = थंड
५+१+३ = जबरदस्तीने उकळणे
१३) माणसाचा एक स्वभाव (६ अक्षरी)
१+३ = एक संख्या
१+५ = लांबी अशीही मोजतात
६+३ = व्यर्थ काथ्याकूट
४+३ = संपवून टाकणे
१४) हा राजकारणी कोण ? (नाव + आडनाव = ९ अक्षरे )
१+८+९ = पाठ फिरवणे
४+१ = एक नदी
३+४+५ = साधना
७+५ = प्रेत
१५) हा शब्द ओळखा !
५+४ = कधी कधी माणूस यात सापडतो !
१+२ = विचारणा करणे
५+३ = फोडी, तूकडे
१६) नाव + आडनाव = ७ अक्षरी शब्द ओळखा;

२+३ = स्वभावाचा एक प्रकार
१+३ = दर्जा
४+५+७+४ = भुलविणारा
१७) ५ अक्षरी शब्द ओळखा;
१+३ = धर्म-सेविका
१+४ = पूर्ण पुरूष
४+५ = रमणीय
१८) एका महापुरूषाचे संपूर्ण नाव (१३ अक्षरी)
२+३+४ = प्रमुख
९+१०+११ = सांभाळ
६+७ = मोद
२+५+१३ = दिवाळखोर
१+३ = शूर
१९) आता हा राजकारणी ओळखा (नाव + आडनाव = ८ अक्षरे )
२+६ = मस्तक
२+३ = राजकारणारण्यांचे हे अजिबात चांगले नसते !
८+५+६= चित्रपटाचा एक प्रकार
४+३ = सर्व जमेस धरून (हिंदी शब्द)

२०) एक प्रख्यात मराठी साहीत्यीक (आद्याक्षर + आडनाव = ८ अक्षरे )
१+८ = फळाचा एक भाग
५+६ = काही जण याच्यासारखे चिकटून बसतात
७+४ = बाजू
३+२ = स्त्री
३+१ = याच्यावर वस्त्र वीणतात
२१) एक चतूरस्त्र व्यक्तीमत्व (संपूर्ण नाव = ८ अक्षरे )
५+६ = पार्थिव
४+५ = या वर्षानुवर्षे तुंबून राहतात
४+१ = यांची लोणची प्रसिद्ध आहेत
१+२+३ = विष्णू भक्त
२२) प्रसिद्ध क्रीकेटपटू, संपूर्ण नाव, ११ अक्षरी
५+६ एक रास
८+९ कानात घालायचा एक अलंकार
२+११ भेग
१+९ बोच , खंत
२३) गाजलेला मराठी चित्रपट (७ अक्षरे )
६+७ = आशिर्वाद
१+४ = सांभाळा
२+७ = थंड
७+६ = आवाज

२४) महान नाट्य कलावंत (नाव + आडनाव = ८ अक्षरे )
३+४ = नवरा
५+८ = हीची नजर तीक्ष्ण असते
१+७ = एकाक्ष
१+२ = -- जावे नित्य वदावे
२५) हिन्दी अभिनेता (७ अक्षरी)
४+७ = लकेर
५+७ = जंगल
२+३ = मुलीचे एक नाव
७+४ = आकाश
२६) एका लढाउ कोकणस्थाचे संपूर्ण नाव (११ अक्षरी)
५,६ = शक्ती, ताकद
१०,९ = एक वाद्य
१,८,१० = शिळे
२,११ = कोरडे
१०,५,११ = पाणी साचून राहीलेली जागा
२७) स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी (संपूर्ण नाव १२ अक्षरे )
१२,७ = संयम
९,४ = वर्गणी
५,४ = नेहमी
१,२,७,८ = एक मुस्लीम सण
२८) थोर नाटककार (संपूर्ण नाव ९ अक्षरी )
१,३ = याच्यावर नियंत्रण हवे.
८,४,९ = आजारी माणसाला देतात
२,६ = मोठा कप
२९) A,B,C हे तीन पाच अक्षरी शब्द शोधा
A1,B1,C2 = शरीराच्या भरून निघतात, मनाच्या नाही !
C2,A5,B5 = हे नेहमी थंड ठेवा
A2,C4,C2 = श्रीमंतांचे शेंगदाणे
A2,B1,C5 = ऐतिहासिक पुरावा म्हणून मान्यता नाही.
तर शोधा हे तीन शब्द !
३०) ५ अक्षरी शब्द ओळखा,
१+२ = आदरयुक्त संबोधन
२+४ = गोडी, आवड
२+३ = ट्रेन मधे रंगणारा एक खेळ
१+२+५ = 'वळण' असेही असू शकते.
३१) ५ अक्षरी शब्द ओळखा;
४+२= जमिनीखाली पुरणे
४+५ = हे गोबरे असतील तर--
३+२ = उठाव
१+२ = एक आदीवासी जमात
४०) एका संगीत नाटकाचे नाव (६ अक्षरी )
३+२ = प्रयत्न करणार्यालाच हे मिळते
४+६ = बटण
४+२ = सिगारेटचा झूरका
४+५+६ = वेगवेगळ्या वाद्यांचा एकत्रित आवाज
४१) प्रख्यात शास्त्रीय संगीत गायक (नाव व आडनाव ९ अक्षरी)

२+३ = हा शब्द तीन प्रकारे लिहीता येतो.
२+६+७= माहीती पोचवणे
१+९ = श्राद्धाला हे हवेतच !
९+४ = मुक्काम
४२) मराठी विनोदी कलाकार (नाव + आडनाव ६ अक्षरी )
५+४= विचार
१+२ = रमा
५+१= शंकराच्या पूजेसाठी आवश्यक
३+४ = मुलगा
४३) दूसर्या स्वातंत्र्य लढ्याचा महानायक ! (९ अक्षरी नाव )
१+२ = विजय
६+७+१= नाखुष
३+९+८ = हा रंग जरा जपूनच उडवा !

४४) एक साहसी काल्पनिक पात्र (संपूर्ण नाव १० अक्षरे)
६,८ = अति
९,८ = रिंगण करणे
५,६ = सुगंधी फूल
५,२ = एक सम संख्या
३,५,८ = सर्वत्र भटकणे
१,४,८ = हवा भरल्यामुळे होणारा आकार
४५) एक विनोदी चित्रपट (९ अक्षरी)
२,३ = याचा भात उपासाला चालतो
४,८ = डोक्यावर वाटायला देउ नका !
६,२ = जंगल
२,५ = सोने या रूपात खरेदी करता येते.

शेवटचे अक्षर तेच हवे !

शेवटचे अक्षर तेच हवे !
खेळ सोपा आहे. कोणतेही एक अक्षर घ्या. तेच अक्षर शेवटी असलेले एक अक्षरी (शक्य असल्यास), दोन अक्षरी, तीन, असे जेवढे मोठे करता येतील तेवढे शब्द बनवा, एकच लक्षात ठेवा शेवटचे अक्षर तेच पाहीजे ! जसे,


मी
नामी
सलामी
पुरोगामी
बहुआयामी.


शनिवार, २८ जून, २००८

सुभाषित संग्रह - भाग २

51) ईक्षणं द्विगुणं प्रोक्तां भाषणस्येति वेधसा
अक्षि द्वे मनुष्याणां जिंव्हा त्वैकेव निर्मिता
52) उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखं मृगाः
53) उत्तिष्ठ उत्तिष्ठ राजेन्द्र मुखं प्रक्षालयस्व टः
प्रभाते रोदिती कुक्कु च वै तु हि च वै तु हि
54) उत्तमो नातिवक्ता स्यात् अधमो बहुभाषते
न काञ्चने ध्वनिस्तादृक् यादृक् कांस्ये प्रजायते
55) चिन्तायास्तु चितायास्तु बिन्दु मात्रम विशेशतः
चिता दहति निर्जेएवम, चिन्ता दहति जेएवितम
56) चिता चिन्ता समाप्रोक्ता बिन्दुमात्रं विशेषता
सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता
57) उपकारो हि नीचानां अपकरो हि जायते
पयःपानं भुजंगाणां केवलं विषवर्धनं
58) उत्तमाः आत्मना ख्याताः पितुः ख्याताः च मध्यमाः
अधमाः मातुलात् ख्याताः शवशुरात् च अधमाधमाः
59) उद्यमस्साहसं धैर्यं बुद्धिश्यक्तिः पराक्रमः
षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवः सहायकृत्
60) आदित्यचन्द्रावनलानिलौ चद्यौर्भूमिरापो हृदयं यमश्च
अहश्च रात्रिश्च उभे चधर्मश्च जानाति नरस्य वृत्तम्
61) न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवम्
कामये दुःखतप्तानां प्राणिनाम् आर्तिनाशनम्
62) अजायुद्धमृषिश्राद्धं प्रभाते मेघडम्बरम्
दम्पत्योः कलहश्चैव परिणामे न किञ्चन
63) क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत्
क्षण त्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम्
64) अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी
65) परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः
परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थमिदं शरीरम्
66) अमन्त्रम् अक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषदम्
अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः
67) एकचक्रो रथो यन्ता विकलो विषमे हयाः
आक्रामत्येव तेजस्वी तथ्याप्यर्को नभस्तलं
68) मधुसिक्तो निम्बखन्डः दुग्धपुष्टो भुजन्गमः
गन्गास्नातोपि दुर्जनः स्वभावं नैव मुन्चति
69) एकेनापि सुवृक्षेण पुष्पितेना सुगन्धिना
वासितं तद् वनं सर्वं सुप्त्रेण कुलं यथा
70) ऋणशेषोऽग्निशेषश्च शत्रुशेषस्तथैव च
पुनः पुनः प्रवर्धन्ते तस्माच्छेषं न रक्षयेत्
71) उदये सविता रक्तो रक्तश्चास्तमने तथा
सम्पत्तौ च विपत्तौ च साधुनामेकरूपता
72) उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीः दैवेन देयमिति कापुरुषा वदन्ति
दैवं निहत्य कुरु पौरुषमात्मशक्त्या यत्ने कृते यदि न सिध्यति कोऽत्र दोशः ?
73) उपसर्गेण धात्वर्थो बलादन्यत्र नीयते
प्रहाराहारसंहारविहारपरिहारवत्
74) एते सत्पुरुषाः परार्थघटकाः स्वार्थान् परित्यज ये सामान्यास्तु परार्थमुद्यमभृतः स्वार्थाविरोधेन ये तेऽमी मानवराक्षसाः परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये ये तु घ्नन्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे
75) अनुदिनमनुतापेनास्म्यहं राम तप्तः परमकरुण मोहं छिन्धि मायासमेतं
इदमतिचपलं मे मानसं दुर्निवारं भव्ति च बहु खेदस्त्वां विना धाव शीघ्रं
76) न भूतपूर्वं न कदापि वार्ता हेम्नः कुरंगः न कदापि दृष्टः
तथापि तॄष्णा रघुनन्दनस्य विनाशकाले विपरीतबुद्धिः
77) सौवर्णानि सरोजानि निर्मातुं सन्ति शिल्पिनः
तत्र सौरभ निर्माणे चतुरः चतुराननः
78) स्वायत्तमेकान्तहितं विधात्रा विनिर्मितं छादनमज्ञतायाः
विषेशतः सर्वविदां समाजे विन्हूषणं मौनमपण्डितानां
79) गुरुशुश्रूशया विद्या पुष्कलेन धनेन वा
अथ वा विद्यया विद्या चतुर्थो न उपलभ्यते
80) चलत्येकेन पादेन तिष्ठत्येकेन पण्डितः
न समीक्ष्यापरं स्थानं पूर्वमायातनं त्यजेत्
81) कल्पद्रुमः कल्पितमेव सूत सा कामधुक कामितमेव दोग्धि
चिन्तामणिश्चिन्तितमेव दत्ते सतां तु सन्गः सकलम प्रसूते
82) सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियं
प्रियं च नानृतं ब्रूयात् एष धर्मः सनातनः
83) सम्पूर्णकुम्भो न करोति शब्दंअर्धो घटो घोषमुपैति नूनं
विद्वान् कुलीनो न करोति गर्वंमूधास्तु जल्पन्ति गुणैर्विहीनाः
84) नारिकेलसमाकारा दृश्यन्तेऽपि हि सज्जनाः
अन्ये बदरिकाकारा बहिरेव मनोहराः
85) न भूतपूर्वं न कदापि वार्ता हेम्नः कुरंगः न कदापि दृष्टः
तथापि तॄष्णा रघुनन्दनस्य विनाशकाले विपरीतबुद्धिः
86) परान्नं प्राप्य दुर्बुद्धे मा प्राणेषु दयां कुरु
दुर्लभानि परान्नानि प्रानाः जन्मनि जन्मनि ! !
87) न दुर्जनः सज्जनतामुपैति बहुप्रकारैरपि सेव्यमानः
भूयोऽपि सिक्तः पयसा घृतेन न निम्बवृक्षो मधुरत्वमेति
88) केयूरा न विभूषयन्ति पुरुषं हारा न चन्द्रोज्ज्वलाःन स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजाः वाण्येका समलंकरोति पुरुषं या संस्कृता धार्यतेक्षीयन्ते खलू भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणं
89) अन्द इन चोन्त्रस्त तो थे प्रेविओउस सुभाशित हेरे इस ओने :किं वाससेत्यत्र विचारणीयं वासः प्रधानं खलु योग्यतायै
पीताम्बरं वीक्ष्य ददौ स्वकनां दिगम्बरं वीक्ष्य विषं समुद्रः
90) गुणैरुत्तुंगतां याति नोत्तुंगेनासनेन वै
प्रासादशिखरस्थोऽपि काको न गरुडायते
91) अशनं मे वसनं मे जाया मे बन्धुवर्गो मे
इति मे मे कुर्वाणं कालवृको हन्ति पुरुषाजं
92) नाभिषेको न सम्स्कारह सिम्हस्य क्रियते
वनेविक्रमार्जितसत्वस्य स्वयमेव म्र्गेन्द्रता.
93) अल्पकार्यकराः सन्ति ये नरा बहुभाषिणः
शरत्कालिनमेघास्ते नूनं गर्जन्ति केवलं
94) गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत्
वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः
95) चित्ते भ्रान्तिर्जायते मद्यपानात् भ्रान्ते चित्ते पापचर्यामुपैति पापं कृत्वा दुर्गतिं यान्ति मूधास्तस्मान्मद्यं नैव पेयं न पेयं
96) प्रत्यक्ष कविकाव्यं च रूपं च कुलयोषितः
गृहवैद्यस्य विद्या च कस्मैचिद्यदि रोचते
97) किन्तु मद्यं स्वभावेन यथौषधं तथा स्मृतं
अयुक्तियुक्तं रोगाय युक्तियुक्तं यथा स्मृतं
98) वितर वारि द वारि दव आतुरेचिर पिपासित चातक पोतके
प्रचलिते मरुति क्षणं अन्यथाक्व च भवान् क्व पयः क्व च चातकः
99) वनानि दहतः वह्नेः सखा भवति मारुतः
स एव दीप नाषाय कृशे कस्य अस्ति सौहृदं
100) यत्रआनेकः क्वचिदपि गृहे तत्र

तिष्ठत्यथैकोयत्राप्येकस्तदनु बहवस्तत्र नैकोऽपि

चान्तेइत्थम नैयौ रजनिदिवसौ लोलयन

द्वाविवाक्षौकालः कल्यो भुवनफलके क्रीडति प्राणिसारैः

पहीला वहीला पंचनामा !

पहीला वहीला पंचनामा !
जेव्हा संगणकीकरणाचा विस्तार पूर्ण झाला तेव्हा जहाजातने उतरलेला माल तात्पुरता ठेवण्यासाठी शेडस, मग गोदामे, व मालाच्या सोडवणूक करतात ती गेटस अशी एकूण १२० terminals बसवली गेली होती. सोबत मॉडेम व गरजेप्रमाणे प्रिंटर बसवला जाई. पुढे पुढे काम कमी झाल्यामुळे किंवा त्याचा pattern बदलल्यामुळे अनेक points बंद करण्यात आले. काही नवे points चालू करण्यात आले. बंद केलेल्या अनेक ठीकाणी संगणक तसेच पडून होते व अनेक ठीकाणी अतिरीक्त कामामुळे त्यांची आवश्यकता होती. शेवटी मीच पुढाकार घेउन एक shifting plan बनविला, जीप, शिपाई व विभाग प्रमुखाचे पत्र घेउन ही मोहीम चालू केली. असेच एका गेटला गेलो तर ते बंद होते. त्याची किल्ली time keeper कार्यालयातुन सही करून घेतली व गेटच्या केबिनचे दार उघडले. आणि आश्चर्याचा धक्काच बसला ! संगणक, मॉडेम, प्रिंटर तिकडे नव्हतेच. हे कमी म्हणून की काय पंख्याची पाती पण कापून नेली होती. केबिनच्या खिडकीची काच फोडून कोणीतरी ते चोरले होते !गोदीतल्या नोकरीत खरे तर चोरी - पोलीस - पंचनामा - साक्ष या गोष्टी तशा नित्याच्याच, त्याचा पुढे पुढे त्रासही होत नाही ! पण मला मात्र हा अनुभव संगणक विभागाचा मुख्य असताना आला आणि तो ही अगदी अनपेक्षित पणे !
बरीच फोनाफोनी केली पण पोलीस तक्रार करायला कोणीच तयार होईना ! तू केबिन उघडलीस तूच तक्रार कर असे सांगून जो तो कलटी मारू लागला ! शेवटी मी फोन करून पोलीसांना बोलावले. लगेच माझ्या साहेबाचा फोन आला की पोलीस येतील तेव्हा तू तिथे थांबूच नकोस. पुढेचे काय ते पुढे बघू ! मी लगेच जीप पिटाळून शिवडी गाठले. पोलीस वाट बघून कंटाळले व माझ्या अपरोक्षच त्यांनी पंचनामा उरकला. सध्याकाळी ५:३० च्या पुढे मी पोलीस स्टेशन गाठले. मला सोबत म्हणून माझा एक सहकारी तिथे आलेला होताच. गोदीतली शुल्लक चोरी सुद्धा पोलीसांना गंभीरपणे घ्यावीच लागते त्यामुळे ते भलतेच कातावले होते. आल्या आल्या माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती चालू झाली ! मूळात तुमचे तिकडे कामच काय होते हा पहीला प्रश्न ! मी office order त्यांना दाखविली आणि मग ते थंड झाले. मग ते गेट शेवटचे कोणी उघडले, ते मूळात बंद का केले , बंद करतानाच आतले सगळे सामान का नाही हलवले, तिकडे security guard होता का, तुम्हीच तो कोठे शिफ्ट नाही ना केला या प्रश्नांच्या फैरी मी परतवून लावल्या. मग चहापान झाले. रागावू नका हा आमच्या कामाचा भागच आहे अशी मग साखरपेरणी झाली. मग हळूच त्या मालाची किंमत काय आली----( मोठा puase !) असती ? असा बंपर टाकला गेला मी तो खाली वाकून सोडून दिला ! दरम्यान हस्ताक्षर तज्ञ व श्वान पथक बोलावले गेले. ते येई पर्यंत आम्ही पंचनामा फायनल करायला बसलो. पोलीस पंचनामा १०० % मराठीत असतो व black & white Terminal, printer, modem या शब्दांना मराठीत काय म्हणायचे यावर गाडे अडले. शेवटी मी कृष्ण धवल पटल, मुद्रक असे शब्द सूचवून modem मॉडेम असेच लिहा म्हणून सांगितले. आता त्यांना याचे serial number हवे झाले ! ते कसे मिळणार ? त्या साठी ऑफीस तर उघडे पाहीजे. मग ते मागाहून द्यायचे ठरले. मध्येच मला घरची आठवण झाली तेव्हा पोलीस स्टेशन मधूनच फोन करून बायकोल उशीर होणार एवढेच कळवले. थोड्यावेळाने finger print expert आला, आमचा लवाजमा घटनास्थळी गेला. सगळीकडे धूळीचे साम्राज्य असल्यामुळे त्याचा काही फायदा होणार नव्हता. मग आले श्वानपथक ! याची मात्र मला प्रचंड उत्सूकत होती काय भला दांडगा कुत्रा होता तो ! बघून धडकीच भरली आणि विचार आला आपण त्या केबिनकडे गेलो होतो तेव्हा आपल्यावरच त्याने झेप घेतली म्हणजे. पण माझा गैरसमज त्याच्या ट्रेनर ने लगेच दूर केला. कुत्र्याला एखाद्या वस्तूचा वास दिला जातो व तो त्या रोखाने जातो. त्याची साखळी कायमच धरलेली असते. परत सगळे घटनास्थळी आलो. आसपास शोध घेतल्यावर एक फाटका शर्ट सापडला. त्याचा वास त्याला हुंगवण्यात आला. त्या नंतर तो कुत्रा कुंपणाकडे झेपावून भूकू लागला ! पण २० फूट उंच आणि वर तारा असलेल्या कुंपणावरून हातात टर्मिनल घेउन कोण कसे पळणार होते ? पण गर्दूला असेल तर हे सहज करतो हे कळल्यावर ( शिवाय पंख्याची पाती कापली होतीच !)मी थक्कच झालो ! परत सगळे ठाण्यात आलो. पंचनामा फायनल झाला आणि मग त्यांना कळले की दोन तरी पंच हवेत. सहकारी एक बरोबर होता, दूसरा कोण आणणार ? on duty officer ला फोन केला, त्याने लगोलग एक वरीष्ठ सहकारी पाठवुन दिला पण तो सही करेना. माझ्या समोर पंचनामा परत करा मगच सही करणार ! पोलीसानी त्याला दम देउन बघितले पण त्याने एका ACP ची ओळख सांगितल्यावर त्यांचीच तातरली ! शेवटी मी त्याला समजावल्यावर त्याने सही केली व आमची सूटका झाली ! घरी मी १२ वाजता पोचलो !
दूसर्या दिवशी याचा एक अहवाल, पंचनाम्याची प्रत आमच्या Deputy कडे जमा केली. आता खरतर माझे काम संपले होते पण पुढचा सर्व आठवडा पोलीस ठाण्यात बोलवत. तासंतास बसवून ठेवत. शेवटी मी 'येणार नाही' असे निक्षून सांगितल्यावर हा छळ थांबला !
त्या नंतर काही वर्षे मोडली. जुने रेकॉर्ड चाळता चाळता मला एक नोंद सापडली त्यावरून 'ते' सर्व खूप आधी दूसर्या ठीकाणी हलवल्याचे सिद्ध झाले ! म्हणजे चोरी झालीच नव्हती ! अर्थात हे आम्ही कोणत्या तोंडाने पोलीसांना कळवणार ?

शुक्रवार, २७ जून, २००८

सुभाषित संग्रह - भाग १

1 या कुन्देन्दुतुशारहारधवला या शुभ्रवस्त्रावृताया वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना

या ब्रह्माच्युतशन्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दितासा मां पातु सरस्वती भगवती निःषेशजाड्यापहा

2)अविश्रामं वहेद्भारं शीतोष्णं च न विन्दति

ससन्तोषस्तथा नित्यं त्रीणि शिक्षेत गर्दभात्

3)पिनाक फणि बालेन्दु भस्म मन्दाकिनी युता

प वर्ग रचिता मूर्तिः अपवर्ग प्रडास्तु नः

4)पानियम पातुमिच्छामि त्वत्तः कमललोचने

यदि दास्यसि नेच्छामि न दास्यसि पिबाम्यहं

5)सन्तप्तायसि संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायतेमुक्ताकारतया तदेव नलिनीपत्रस्थितं राजते

स्वात्यां सागरशुक्तिमध्यपतितं सन्मौक्तिकं जायतेप्रायेणोत्तममध्यमाधमदशा संसर्गतो जायते

6)न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यम न च भारकारी

व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधनप्रधानं

7)परस्परविरोधे च वयं पन्च च ते शतं

अन्यैः साकं विरोधे तु वयं पन्चाधिकं शतं

8)अजरामरवत्प्राज्ञो विद्यामर्थं च साधयेत्

गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत्

9)कमले कमलोत्पत्तिः श्रूयते न तु दृश्यते

बाले तव मुखाम्भोजे कथमिन्दीवरद्वयं

10)कमले कमला शेते ःअरषेते ःइमालये

क्षिराब्धौ च ःअरिषेते मन्ये मत्कुण शन्कय

11)आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं

सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति

12)चिन्तनीया हि विपदामादावेव प्रतिक्रिया

न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे

13)यत्कोकिलः किल मधौ मधुरम विरोति

तच्चारु चाम्र कलिका निक्रैक हेतुः

14)क्षमा शस्त्रं करे यस्य दुर्जनः किं करिष्यति

अतृणे पतितो वह्निः स्वयमेवोपशाम्यति

15)क्षमा बलमशक्तानाम शक्तानाम भूशणम क्षमा

क्षमा वशिक्रुते लोके क्षमया: किम न सिध्यति

16)कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती

करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम्

17)काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदः पिककाकयोः

वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः

18)सज्जनस्य हृदयं नवनीतं यद्वदन्ति कवयस्तदलीकं

अन्यदेहविलसत्परितापात् सज्जनो द्रवति, नो नवनीतं

19)काचं मणिं काञ्चनमेकसूत्रे मुग्धा निब्ध्नन्ति किमत्र चित्रं

विचारवान् पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह

20)शुनेव यूना प्रसभं मघोना प्रधर्शिता गौत्मधर्मपत्नी

विचारवान् पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह

21)निःस्वो वष्टि शतं शती दशशतं लक्षं सह्स्राधिपःलक्षेशः क्षितिपालतां क्षितिपतिश्चक्रेशतां वाञ्छति

चक्रेशः पुनरिन्द्रतां सुरपतिः ब्राह्मं पदं वाञ्छतिब्रह्मा शैवपदं शिवो हरिपदं चाशावधिं को गतः

22)निन्दन्तु नीतिनिपुणा यदि वा स्तुवन्तुलक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टं

अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वान्याय्यात्पथः प्रविचलन्ति पदं न धीराः

23)निन्दोत वानोत सुनीतिमन्त चळो असो वा कमला गृहात

हो मृत्यु आजिच घडो युगान्ती सन्मार्ग टकोनि भले न जाती

24)स्वयं पञ्चमुखः पुत्रौ गजाननषडाननौ

दिगम्बरः कथं जीवेत् अन्नपूर्णा न चेद्गृहे

25)स्वयं महेशः शव्शुरो नगेशः सखा धनेशश्च सुतो गणेशः

तथापि भिक्षाटनमेव शम्भोः बलीयसी केवलमीश्वरेच्छा

26)गर्जसि मेघ न यच्छसि तोयं चातकपक्षी व्याकुलितोऽहम

दैवादिह यदि दक्षिणवातः क्व त्वं क्वाहं क्व च जलपातः

27)रे रे चातक ! सावधानमनसा मित्र क्षणं श्रूयतांअम्भोदा बहवो वसन्ति गगने सर्वेऽपि नैकादृशाः

केचित् वृष्टिभिरार्द्रयन्ति धरणीं गर्जन्ति केचिद्वृथायं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्ऱूहि दीनं वचः

28)रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातंभास्वान् उदेश्यति हसिष्यति पङ्कजश्रीः

इत्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफ़ेहा हन्त हन्त नलिनिं गज उज्जहार

29)मा निषाद प्रतिष्ठां त्वं अगमः शाश्वतीः समाः

यत्क्रौंचमिथुनादेकं अवधीः काममोहितं

30)न हि कश्चित् विजानाति किं कस्य श्वो भविष्यति

अतः श्वः करणीयानि कुर्यादद्यैव बुद्धिमान्

31)प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैःप्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः

विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाःप्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति

32)सिंहः शिशुरपि निपततिमद मलिन कपोल भित्तिषु गजेषु

प्रकृतिरियं सत्त्ववतांतेजसां हि न वयः समीक्ष्यते

33)यथ देशस्तथ भश यथ रज तथ प्रजः

यथ भुमिस्तथ तोयम यथ बेएजस्तथन्कुरः

34)यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ

समेत्य च व्यपेयातां तद्वत् भूतसमागमः

35)कस्यचित् किमपि नो हरणीयंमर्मवाक्यमपि नोच्चरणीयं

श्रीपतेः पदयुगं स्मरणीयंलीलया भवजलं तरणीयं

36)साहित्य संगीत कला विहीनः साक्षात् पशुः पुछ विषाण हीनः

तृणं न खादन्नपि जीवमानः तद् भागधेयं परमं पषूणां

37)येषां न विद्या न तपो न दानंज्ञानं न शीलं न गुणो न धर्मः

ते मर्त्यलोके भुविभारभूताःमनुष्यरूपेण मॄगाश्चरन्ति

38)अधिगत्य गुरोः ज्ञानं छात्रेभ्यो वितरन्ति ये

विद्या वात्सल्य निधयः शिक्षका मम दैवतं

39)अश्वस्य भूषणं वेगो मत्तं स्याद् गजभूषणं

चातुर्यं भूषणं नार्या उद्योगो नरभूषणं

40)अहं नमामि वरदां ज्ञानदां त्वां सरस्वतीं

प्रयच्छ विमलां बुद्धीं प्रसन्ना भव सर्वदा

41)अपारे काव्यसंसारे कविरेकः प्रजापतिः

यथास्मै रोचते विश्वं तथा वै परिवर्तते

42)असितगिरिसमं स्यात् कज्जलं सिन्धु पात्रंसुरतरुवरशाखा लेखनी पत्रमुर्वी

लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालंतदपि तव गुणानां ईश पारं न याति

43)क्षते प्रहाराः निपतन्ति अभीक्ष्णंधनक्षये वर्धति जाठराग्निः

आपत्सु वैराणि समुद्भदंतिचिद्रेषु अनर्थाः बहुलीभवंति

44)केशवम पतितम दृष्ट्वा पाण्डवाः हर्षनिर्भरआः

रुदन्ति कौरवाः सर्वे हा हा केशव केशव

45)के शवं पतितं दृष्ट्वा पाण्डवाः हर्षनिर्भराःरुदन्ति कौरवाः सर्वे हा हा के शव के शव !

46)वैद्यराज नमस्तुभ्यं यमराजसहोदर

यमस्तु हरति प्राणान् वैद्यो प्राणान् धनानि च

47)अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च

अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्बलघातकः

48)चिन्तनीया हि विपदां अदावेव प्रतिक्रिया

न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे

49)आयुशः क्षण एकोऽपि सर्वरत्नैर्न लभ्यते

नीयते स वृथा येन प्रमादः सुमहानहो

50)आत्मनः परितोषाय कवेः काव्यं तथापि तत्

स्वामिनो देहलीदीपसमं अन्योपकारकं

हे असे माझ्याच बाबतीत का बरे घडते ?

हे असे माझ्याच बाबतीत का बरे घडते ?
अकारावीसाठी पोद्दार मध्ये प्रवेशाच्या रांगेत उभा होतो. ३ तासांनी नंबर आला तेव्हा waiting list चालू झाली होती ! बहुदा सर्वच waiting list मधे मीच पहीला असतो !
माझे waiting list असलेले तिकीट कधीही confirm / RAC होत नाही !
शाळेत कधी चूकूम मुलांना आणायला गेलो तर गणवेष घातलेली सगळी मुले सारखीच दिसतात. त्यात माझी मुले ओळखणे निव्वळ अशक्य होते. तरी बरे मुलेच मला शोधून काढतात !
जेवणाच्या पंक्तीत बसलेलो असतो, बरोबर मध्ये ! दोन्ही टोकाकडून खेकडा भजी किंवा श्रीखंड येत असते. नेमके माझ्या अलीकडे पलीकडे आले की त्या वाढप्यांच्या थाळ्या रीकाम्या होतात. दोघेही दूसरा आणेल म्हणून परत जातात ते जातातच !
तिकीटाला भली-मोठ्ठी रांग असते. मला जरा घाईच असते, मग काय , जातो without ticket.नेमके त्याच दिवशी special checking असते. नेमका पकडला जातोच. कधी पास संपलेला गावीही नसते. तिकीट तपासनीस पास विचारतो, मी तो रूबाबात दाखवितो, तो त्याची तारीख केव्हाच संपली आहे असे सांगून थेट पावतीच फाडायला घेतो !
बेस्टची वाट वघत तासंतास उभा असतो. समोरच्या रस्त्यावर विरूद्ध दिशेच्या त्याच नंबरच्या बस खंडीभर आणि रिकाम्या जात असतात ! मी कंटाळून जेव्हा टॅक्सीत बसतो तेव्हा हवी ती बस अगदी रिकामी येते !
मला फार क्वचितच कार्यालयात निघायला उशीर होतो, पण नेमके त्याच दिवशी ट्रेन अगदी डॉट टाईम सूटते. साहेब पण मस्टर क्लोज करतो, अगदी वेळेवर !
माझ्याच वीजेच्या वापराचे बील सगळ्यात जास्त येते !
माझ्याच स्कूटरची average सगळ्यांत कमी मिळते !
मला जे कोणी भेटतात ते मला फसवणारेच असतात. माझा फायदा करून घेणारे, काम झाले की विसरून जाणारे !
मला जेव्हा जेव्हा Registered पत्र येते तेव्हा आमचे घर बंद असते. पोस्टमनची नोटीस घेउन टपाल खात्यात जावे लागतेच ते आणण्यासाठी, पण पोस्टमन पोस्ट मागायला आलाय आणि घर बंद असे मात्र कधीही होत नाही.
Gurantee / Warantee संपली रे संपली की दूसत्याच दिवशी त्या वस्तू बिघडतात !
टेलर माझे कपडे हमखास उशीरा देतात वर ते बिघडवूनही टाकतात !
मी फेरीवाल्याकडून मोठी हिंमत करून तो १०० रूपये बोलेलेली वस्तू ५० ला घेतो , मग कळते की ती वस्तू खरतर २५ रूपयाचीच आहे.
काहेबाही टाईप करत बसलेला असतो, मस्त मांडणी जमलेली असते, त्या नादात save करायचे राहूनच जाते, आणि जेव्हा करायला जातो तेव्हा नेमका copmputer hang होतो. सगळी मेहनत वाया जाते !

मी जे शेयर खरेदी करतो ते खाली पडायला लागतात, मी ह्ट्टाला पेटून त्यांची average करायचा प्रयत्न करतो, पण घसरण काही संपत नाही. शेवटी माझी क्षमता संपते, मी ते विकून टाकतो व मग मात्र ते रोज upper circuit ला जात राहतात ! शेयर चे काही नाही हो, पण मी जेव्हा जेव्हा electronic goods घेतल्या आहेत, त्याच्या किंमती अगदी दूसर्याच दिवशी खाली आल्या आहेत !

पत्ता शोघून शोधून पार थकून जातो. शेवटी ego सोडून कोणालातरी पता विचारतो, तो आपल्याकडे 'काय येडबंबू आहे' असे बघतो व नुसते बोट दाखवितो, मी त्याच ईमारतीखाली उभे असतो !

आमच्या कडे संगणकीकरण होईपर्यंत माझी वार्षिक वेतनवाढ काढायला आमचा पे-शीट क्लार्क हमखास विसरायचा !

निदान २ लोकांचे प्रत्येकी लाखभर रूपये मी फसवणुकीच्या योजनांत बुडताना वाचवून दिले आहेत, माझे मात्र अशाच एक योजनेत पैसे बुडले ते बुडलेच !

दूसर्याला दिलेली वस्तू--

दूसर्याला दिलेली वस्तू--

निदान कोकणस्थांत तरी उधार-उसनवारी केली जात नाही. संसारोपयोगी सर्वच वस्तू एक एक करून आपण घेत असतो आणि नसेल तर दूसर्यापुढे हात नक्कीच पसरत नाही. पण जे मिश्र वस्तीत रहात असतील त्यांचा मात्र वेगळा अनुभव असेल. कोणाकडे काय मागायचे याचा अक्षरश: काहीही घरबंध पाळला जात नाही. बरे वस्तू घेतल्या नंतर त्या वेळीच आणि आहेत तशा परत करा या किमान अपेक्षेवरही पार बोळा फिरवला जातो. अनेकदा आपली वस्तू परत मिळण्यासाठी सुद्धा शेजार्याच्या नाकदूर्या ओढाव्या लागतात ! काय आहेत तुमचे अनुभव ? कोणकोणत्या वस्तूंची उसनवारी होते ? असे कोणी काय मागितले तर तुम्ही काय करता ? दिलेली वस्तू आहे त्या स्थितीत आणि वेळेत परत मिळते का ? तुम्हाला कधी दूसर्याकडे काही मागायची वेळ आली होती/येते का ? काय करता अशावेळी ?

आमचे सगळे घराणे भीडस्त किंवा दूसर्याला उपयोगी पडावे या वृत्तीचे. आमची ही कीर्ती जिथे बिर्हाड करू तिथे अल्पावधीतच पसरायची. कोणी काय मागावे याला काही अंतच नव्हता. आई गमतीने म्हणायची नवरा-मुले मागितला नाही म्हणजे मिळवले ! आधी माम्ही कोणाला काय काय वस्तू उसनवारीवर दिल्या त्याची यादी देतो आणि ते मिळविताना झालेली दमछाक पुढच्या भागात..स्टूल, टेप (दोन्हीही), टी-पॉय, कँमेरा, मिकसर, कूकर, गँस शेगडी- सिलेंडॅर सकट, पाट, इस्त्री, टेबल-क्लॉथ, बूट, सँक, चाकू, सूटकेस, पुस्तके, करवत, हातोडी, चकल्या करायचा सोर्या, ईडली पात्र, मोदक पात्र, कढई, डबे, विविध खाण्या-पिण्याचे जिन्नस, बंटरी, ईमर्जन्सी बँटरी, सुई-दोरा, कुलुप, तोरण, सूतारकामाचे साहीत्य, पंखा----- बापरे ! अजून काय काय आठवू ?ठामपणे न दिलेल्या वस्तू-- एकदा एका बयेने आईकडे चक्क मंगळसूत्र घालयला मागितले होते, तर एकदा एकाला TV च हवा होता !

वडाळ्याला आम्ही नवेच होतो. समोरच्या एका मालवण्याकडे ७ दिवसाचा गणपती असायचा. त्याने गणपती असणार, घरी पाहुणे मंडळी येणार तेव्हा तुमचा कूकर द्या असे सांगितले. तसा कूकर तर रोज हवाच पण धार्मिक कार्य आहे तर का नाही म्हणा . दीला ! गणपती जाउन तीन दिवस झाले. परतीचे नाव नाही. आमची प्रचंड गैरसोय होत होती तेव्हा मी तो मागण्याकरीता त्याच्या घरी गेलो. तो काय, कोपर्यात पडलाय आणल्यापासून, बिघडलेला कूकर आम्हाला दीलात रे भटांनो ! छान ! मी उडालोच ! कोपर्यात कूकर न धूतलेल्या अवस्थेत पडला होता तो उचलला व सरळ घर गाठले. कूकर वापरायची काही माहीती नसल्यामुळे पहील्याच दिवशी त्याचा वाल् उडला होता. आम्हालाच खर्च करून तो बदलावा लागला ! एवढे सगळे घडूनही पुढच्या वर्षी कूकर आणि सोबत मिक्सर सुद्धा त्यांना हवा होता ! नाही दीला !

अनेक मित्रांनी माझ्याकडे कँमेरा उसना मागितला , मी दिला, त्यांनी तो मागेपर्यंत परत नाही केला, परत घेताना कधी त्याचा फ्लँश गुल करून दिला कधी लेन्सवर ओरखडे काढून दिले ! हे असे किमान चारदा घडले आहे ! पण एकदा अतिच झाले--साधारण ९० साली मी zenith हा रशियन SLR कँमेरा घेतला होता. हिमालयीन ट्रेक मध्ये ठाण्याचा एक डॉक्टर मित्र झाला. माझ्या घरी तो जेव्हा प्रथमच आला तेव्हा कँमेरा घेउनच गेला. नुसता कँमेरा नाही सोबत फोटोग्राफीवरचे एक नितांत सुंदर पुस्तक पण घेउन गेला. जो गेला तो गेलाच. परत द्यायचे पठ्ठ्या नावच काढेना ! मधल्या काळात माझ्या बहीणीचा साखरपुडा झाला, पुढे लग्न, पण मला फोटो बाहेरून काढायला लागले. अनेक फोन करून झाले, निरोप पोचवले पण पठ्ठ्या दाद देईना. शेवटी पोस्टकार्ड वर त्याचा पंचनामा केला तेव्हा त्याने पार जीर्ण झालेला कँमेरा परत केला, flash, timer cord आणि ते पुस्तक परतच नाही केले ! त्या पुस्तकासाठी मी फोर्ट मधेले सर्व फूटपाथ पायदळी तुडवले पण व्यर्थ !

चार्ली चँप्लीन चा मी जबरदस्त फँन आहे. प्लँनेट एम मधून त्याच्या लघुपटांचा एक संच ( १७ सीडी, १ पूर्ण लांबीचा चित्रपट, Gold Rush) विकत घेतला होता. अनेक मित्रांनी तो write करून घेण्याकरीता मागून घेतला. एका कडून दूसर्याकडे, कधी परस्पर, कधी माझ्याकडे परत केल्या केल्या--. हा सिलसिला एक वर्ष चालू होता. मग तो कोणाकडे आहे याचाही track मला राहीला नाही. अचानक घरी मुलांना त्याची आठवण झाली. सौ ने ठणकावून सांगितले की चार्ली घरी परत आलाच पाहीजे. अनेकांना विचारून बघितले, सगळ्यांनी कानावर हात ठेवले ! शेवटी बारकाईने चौकशी केल्यावर तो माझ्या एका महीला सहकार्याकडे असल्याचे पुरावे मिळाले. पण विचारणार कसे ? घरून दबाव वाढू लागला तेव्हा हिंमत करून विचारले एकदाचे ! आहे, मागचे सहा महीने मझ्याकडेच आहे ! मग परत क नाही केला ? तुम्ही कोठे मागितला ? ! उद्या आणा मग . आणला एकदाचा. परत त्याला spot demand आली. एकदा घरी बायकोला दाखवितो मग आणतो म्हणून सगळ्यांना थोपवून धरले. त्या दिवशी डबा आणला नव्हता म्हणून बँग नव्हती. तरी न्यायचाच असे ठरवले. पनवेलला घरी पोचलो आणि आठवले की तो संच ट्रेनमध्येच विसरलो आहे ! बायकोने कपाळावर हात मारून घेतला. स्वत: घरी येतोस हेच खूप आहे ---! दूसर्या दिवशी कामावर गेलो तर तो संच माझ्या टेबलावर ! हा काय चमत्कार ? मला कळेचना. मग कळले की त्या दिवशी तो संच मी घरी न्यायचाच विसरलो होतो !सूटलो बाबा एकदाचा. चार्ली स्वगृही आला एकदाचा !(टीप :- मला कोणाला नाही म्हणता येत नाही तेव्हा हा संच माझ्याकडे मागून खर्या मित्रांनी मला अडचणीत आणू नये ही विनंती )

उसनवारीवर शेजार्यांना दिलेल्या वस्तू काही राहून गेलेल्या वस्तू--पुरण यंत्र, मेदूवडा यंत्र, Extention Cord ! स्टँपलर !पनवेलला नवे असताना खाली राहणार्या शेजारणीचा गँस संपला. दूसरा गँस पण संपला आणि बाईला आठवले की आपण अजून पहील्याचा नंबरच दिला नाही आहे ! आम्ही शेजारधर्म म्हणून आमचा पण गँस तिला दिला. त्या आधी थोडेच दिवस आमचा पण एक सिलेंडर रिकामा झाला होताच. 'ही'पण नंबर द्यायला विसरली व 'ती' पण !परत काही दिवसांनी आमचाही गँस संपला व प्रचंड गोंधळ झाला !वडाळ्याला काही दिवस काढल्यावर शेजार्यांना समजले की बायको खाष्ट आहे तर नवरा आपला साधा-भोळा. त्याला काही नाही म्हणता येत नाही. तेव्हा शेजारी मी घरी असताना मागायला येउ लागले ! अर्थात मलाही नही म्हणता येत नसेच ! शेजार्याने वस्तू परत नाही दिल्या की आमचीच घरी भांडणे होउ लागली ! तेव्हा मी ठरवले की स्वयंपाक घरातल्या वस्तू द्यायच्या भानगडीत मी पडणार नाही. तरीही एकदा ही माहेरी गेली असताना आमचा शेजारी चकलीचा सोर्या घेउन गेला. मी परत मागायला विसरलो तो द्यायला ! बायको आल्यावर सोर्या जागेवर नाही हे तिच्या लक्षात आलेच पण मी कानावर हात ठेवले. मी कामावर असताना शेजारीण माझ्या बायकोला भेटली व सोर्या एवढच बोलल्यावर बायको सापडत नाही असे बोलताच ती तो आमच्या कडे आहे असे म्हणाली ! वर बायकोलाच तो कसा वापरायचा ते दाखवा असे सांगू लागली ! त्या नंतर घरी आल्यावर जे स्वागत झालंय -- कोणाही नवर्याच्या वाट्याला असे स्वागत न येवो ही देवाचरणी प्रार्थना !

धक्का तंत्र !

धक्का तंत्र !
नाही, गर्दीचा फायदा घेण्याचे तंत्र मी सांगणार नाही आहे ! मला तशी अनेक तंत्र अवगत आहेत, पण सगळ्यात हुकमत मात्र धक्का तंत्रावर आहे ! मी आतापर्यंत अनेकांवर याचा प्रभावी वापर केलाय आणि ते अजून त्या प्रभावाखाली आहेत ! अर्थात माझे धक्के नेहमीच सुखद असतात, pleasant surprise ! त्यातलेच एक मासलेवाईक उदाहरण देउन सूकाणू तुमच्या कडे देतो !आम्ही वडाळ्याला असताना शिवाजी मंदीर ला नाटके बघायला बर्याचदा जायचो. प्रशांत दामलेच्या "गेला माधव कोणी कडे" चा प्रयोग दूपारी चारला असल्यामुळे मला बघता येणार नव्हता तेव्हा बायको व दोन मुलांची तिकिटे काढण्यासाठी रांगेत उभा राहीलो. ऐन वेळी काही वेगळा विचार करून मी एक जास्त तिकिट काढले ! दूसर्या दिवशी boss ची परवानगी घेउन मी लवकर ऑफीस सोडले. नाट्यगृहात काळोख होत असतानाच मी 'प्रवेश' केला. बायको दोन मुलांच्या मधे बसली होती ! पण नशीब जोरावर होते ! कोणीतरी उंच माणूस पुढे बसल्यामुळे रिकाम्या खुर्चीच्या बाजुला बायको आली ! कलाकार रंगमचावर आल्यावर मी ह्ळूच बायकोच्या बाजूला स्थानापन्न झालो ! त्यात मुलगी बोललीच "शी आई, बाबा यायला हवे होते ना ?" थोड्या वेळाने मी हीला कोपराने ढोसले ! ही खुर्चीवर जेवढे आखडून बसता येइल तेवढे बसली पण माझ्याकडे ढूकूनही न बघता ! थोडया वेळाने मी हीच्या गळ्याभोवती हात टाकला आणि हीने तो झूरळा सारखा झटकून टाकला व ताडकन उभी राहात मोठ्याने "काही लाज बीज आहे की नाही" ओरडली ! आसपासचे प्रेषक नाटकातले नाटक डोळे फाडून बघु लागले ! बायकोने मला ओळखले व या नाटकावर पडदा पडला. पण आसपासच्या प्रेषकांना या नाट्यमय कलाटणीचा अर्थ शेवट पर्यंत कळला नाही !

हे मला कसे जमत नाही अजून ?

हे मला कसे जमत नाही अजून ?
आपल्याला प्रत्येक गोष्ट आली पाहीजे, निदान तसा प्रयत्न तरी आपण केला पाहिजे, पण अनेकदा प्रयत्न करूनही जमत नाही तेव्हा काय करायकचे ? या गोष्टी मला अनेकवार प्रयत्न करूनही जमल्या नाहीत ;

न चिडता मुलांचा अभ्यास घेणे.

बायकोने सांगितलेल्या सर्व वस्तू एका फेरीत आणणे.

घरी परतताना miss call देणे .

कोणाला "नाही" असे म्हणणे.

महीलांचे टेनिस सामने चालले असताना खेळावर लक्ष केन्द्रित करणे !

Billiards kinva snooker khelatana cushion handball chikatala asel tevha nishana sadhane ! (hamkhas fault hoto, kadhi handball table chi maryada sodato !)

क्रिकेट खेळताना स्लीप मधे उभे(?) राहून कँच पकडणे !

नको ती द्रुश्ये tv वर चालू असतील तर पटकन चँनल बदलणे !

पतंग उडविणे (खरा, कल्पनेचा नाही !)

मैत्रिणींबद्दल बायकोचे वारंवार होणारे गैरसमज दूर करणे.

मुलांच्या बालसुलभ (?) शंकाना शास्त्रशुद्ध उत्तर देणे.

शाळेतुन बाहेर पडणार्या शेकडो मुलातुन आपली मुले ओळ्खणे.

समभाग कधी घ्यावेत व कधी विकावेत याचे गणित.

आई समोर बायकोचे कौतुक किंवा उलटे,

बायको समोर दूसर्या बाईचे कौतुक करू नये हे अजून कळत नाही.

कट्ट्यावरच्या अनेक सुंदर्या माझा काका असा उल्लेख करतात तो सहन करणे. (का ? का ??) (आपला अगतिक)

बायको सोबत असताना मान १८० च्या कोनात वळवुन न बघणे , स्कूटर वर असताना !

चोखंदळ ग्राहक बनणे. (माझ्या कपाळावर सटवीने "याला फसवा" असे लिहीले आहे जे विक्रेत्यांनाकच वाचता येते!)

hishob thevane ! sarv ayushyach be-hishebi jhale ahe !

"tula kadichi akkal nahi, nusata nandibail ahes" ha bayakocha arop khodoon kadhane !

गोष्टी - भाग ३

स्वभाव !

रामकृष्ण परमहंस गंगेत आंघोळ करत असतात. गंगेच्या प्रवाहाता गटांगळ्या खाणारा एक विंचू त्यांना दिसतो. त्या विंचवाला स्वत:च्या ओंजळीत धरून ते त्याला काठावर सोडायला बघत असतात, तो विंचू त्यांना दंश करतो व त्यांच्या ओंजळीतून निसटून पुन्हा गटांगळ्या खायला लागतो. रामक़ृष्णांनी त्याला वाचवायला जावे व त्याने दंश करून परत पाण्यात पडावे असा प्रकार बराच काळ चालू असतो. दूसरा एक सज्जन हा प्रकार बघून परमहंसाना म्हणतो बूडू द्या त्या विंचवाला, आपला दंश करण्याचा गुण काही तो सोडणार नाही. यावर परमहंस म्हणतात की तो जर आपला दंश करण्याचा गुण सोडत नसेल तर मी माझा मदत करण्याचा गुण का सोडू !

देवाचा अपराधी !

कृष्ण आणि त्याचा सखा अर्जून जंगलात फेरफटका मारत होते. त्या निबीड अरण्यात एका झोपडीत, पणतीच्या अंधूक प्रकाशात एक वृद्ध स्त्री कृष्णनामाचा जप करीत होती. तिने आपल्या शेजारी तलवार पण ठेवली होती ! अर्जून आश्चर्य वाटून कृष्णाकडे सूचक अर्थाने बघतो. त्याला कृष्ण सांगतो की तूच आत जाउन तिला विचार पण तुझी ओळख तिला सांगू नकोस ! अर्जून झोपडीत जाउन त्या वृद्ध स्त्रीला नमस्कार करतो व तलवार बाळगण्याचे कारण विचारतो. ती वृद्ध साध्वी सांगते कि त्या तलावारीने ती द्रौपदी व अर्जूनाचा शिरच्छेद करणार आहे. थरथर कापत अर्जून कारण विचारतो. ती सांगते आपली अब्रू राखण्यासाठी द्रौपदीने जेव्हा कृष्णाचा धावा केला तेव्हा तो बिचारा जेवण अर्धवट सोडून तिच्या रक्षणासाठी धावला. महापराक्रमी असे तिचे ५ पती तेव्हा कोठे गेले होते ? देवाला असं जेवणावरून उठवणे चांगले का ? कसाबसा अर्जून 'अर्जूनाचा' अपराध विचारतो. त्यावर ती वृद्धा क्रोधाने लालेलाल होते, तलवार हातात घेउन ती फणकार्याने म्हणते,"एक वेळ मी द्रौपदीला माफ करेन पण अर्जूनाला अजिबात नाही ! त्या शेळपट अर्जूनाने कृष्णाला चक्क आपला सारथी बनवले. कृष्णाने त्याच्यावरचे सर्व घाव आधी आपल्यावर झेलले, आपली प्रतिज्ञा सुद्धा मोडली ! एका सामान्य माणसाने देवाला दावणीला तरी किती बांधावे !" या नंतर अर्जून अंतर्मुख होउन बाहेर पडतो.

लोक म्हणजे ओक !

गुरांच्या बाजारातून ते दोघे बाप-लेक गाढव खरेदी करून आपल्या गावाकडे जात असतात. बाप साधारण पन्नाशीच्या घरातला तर पोरगा तरणाबांड ! वाटेत जे पहीले गाव लागते त्याच्या चावडीवर चार चहाटळखोर बसलेले असतात. ओझी वहायलाच जर गाढव घेतले आहे तर किमान पोरानेतरी त्यावर बसायला काही हरकत नाही असे त्यांचे मत पडते. लगेच बापाच्या इशार्यावरून पोरगा गाढवावर बसतो. पुढच्या गावातल्या चावडीवर म्हातार्या बापाने तरी पायी का चालावे असे मत पडते. गाढव काय ओझी वहायलाच तर जन्माला आले आहे. झाले ! बाप व लेक दोघेही गाढवावर स्वार होउन पुढच्या गावाकडे मार्गस्थ झाले ! पुढच्या गावाची चावडी बोलते की गाढव असले म्हणून काय झाले, त्याच्यावर बाप-लेक दोघेही बसणे हे गाढवपणाचे आहे, पोरगा तरूण आहे त्याने बरोबर चालायला काय हरकत आहे ? पोरगा आता पायउतार होतो ! पुढच्या गावात बाप गाढवावर व लेक पायी हे लोकांना बघवत नाही, तेव्हा बापही पायउतार होतो. पुढचे गाव भूतदया वाल्यांचे असते. त्यांच्या मते आता आयुष्यभर त्या गाढवाकडून काबाडकष्ट करून घ्यायचेच आहेत तर निदान घरी नेताना तरी या दोघांनी त्याला उचलून न्यायला काय हरकत आहे ! भूतदयेच्या गोष्टी काय फक्त पुस्तकात ठेवायच्या काय ? बाप-लेकांवर याचा फारच परिणाम होतो. ते एका काठीला त्या गाढवाचे चार पाय बांधतात व कावड करून त्या गाढवाला वाहू लागतात. गावातली उनाड मुले धिंगाणा घालत त्यांच्या मागोमाग चालू लागतात. या गोंधळाने गाढव बावचळते, हात-पाय झाडू लागते. शेवटी एका पुलावरून जाताना काठी मोडून ते नदीत पडते !

ज्ञान आणि भान !

गुरूकडून सर्व विद्यात पारंगत होउन ते ४ शिष्य आपल्या घरी निघाले होते. वाट जंगलातली होती. आपण शिकलेल्या तंत्र आणि मंत्र विद्येचा उपयोग करायला ते अगदी उत्सूक होते ! एके ठीकाणी पावलाचे काही ठसे उमटले होते. ते बघून एक शिष्य सांगतो की ते ठसे वाघाचे आहेत. दूसरा त्या ठशांचा माग घेत सांगतो की तो वाघ जखमी होउन आसपासच कोठेतरी असला पाहीजे व लगेचच त्याला एका झाडीत मरून पडलेला वाघ सापडतो ! आता तिसरा शिष्य पुढे येतो व सांगतो की मी आता माझ्या मंत्र-सामर्थ्याने या वाघाला जिवंत करणार आहे. यावर चौथा शिष्य हे योग्य होणार नाही असे त्याला समजावतो पण बाकी तिघे त्याची अक्कल काढतात व तूच सगळ्यात ढ होतास, आमच्यावर जळू नकोस म्हणून त्याला गप्प करतात. बिचारा वेडा शिष्य अधिक वाद न घालता एका झाडावर चढून बसतो. मंत्र जागराने वाघ जिवंत तर होतो पण उपास सोडण्यासाठी त्या तिन्ही विद्वान शिष्यांना स्वाहा करतो !

कशाला उद्याची बात ?

एक शेटजी, अर्थातच पैसा हेच सर्वस्व मानणारा ! भल्याबुर्या मार्गाने पैसे कमाविण्यात आयुष्य जाते व शेवटी अंतकाळ जवळ येतो. मृत्यूची चाहूल त्याला अस्वस्थ करते. आपल्या मुनीमजींना तो सांगतो मी जो पैसा कमावलेला आहे तो माझ्या पुढच्या किती पुढ्यांना पुरणार ते जरा सांगा ! मुनीमजी सांगतात की शेटजी तुमच्या १२ पिढ्या या पैशावर सहज पोसतील पण तेराव्या पिढीला थोडी अडचण जाणवेल. शेटजी आता दु:खी होतो ! अरेरे, थोडी अजून मेहनत घेतली असती तर ? इतक्यात त्याला कोणीतरी सांगते की फलाण्या गावात कोणी एक ब्राह्मण राहतो, त्याला तू एक वेळचे जेवण दान म्हणून दिलेस तर तुझी तेरावी पिढी पण बसून खाईल ! शेटजी लेगेच त्या गावाला पोचतो. एका देवळातून दूपारी बाहेर पडताना तो त्या ब्राह्मणाला गाठतो व त्याला जेवण घेण्याचा आग्रह करतो. ब्राह्मण त्याला नम्र पणे नकार देतो व सांगतो माझे आताच जेवण झाले आहे आणि पोट भरल्यावर पुन्हा अन्न ग्रहण करणे पाप आहे. आता शेटजी सांगतो की मग हे जेवण आत्ता ठेउन घ्या व उद्या घ्या ! ब्राह्मण म्हणतो मी उद्याची काळजी केव्हाच करत नाही आणि शिळे अन्न खात नाही, माझी काळजी त्या उपरवाल्याला ! शेटजी विचारत पडतो. या ब्राह्मणाला उद्याच्या जेवणाची काळजी नाही व आपण आपली तेरावी पिढी बसून खाउ शकत नाही म्हणून दु:खी होत आहोत ? या विचाराने मरताना तरी तो समाधानाने मरतो !

जे होते ते चांगल्यासाठीच !

एका राजाचा एक विश्वासू प्रधान असतो. काहीही झाले तरी तो एकच वाक्य म्हणायचा, जे काही होते ते चांगल्यासाठीच होते ! एकदा ते जंगलात शिकारीसाठी गेलेले असताना राजाचे बोट कापले जाते व प्रधान त्याच्या सवयीप्रमाणे "जे होते ते चांगल्यासाठीच होते" असे म्हणतो. राजाला हा आपला अपमान वाटतो व तो प्रधानाची रवानगी थेट अंधारकोठडीत करतो. पुढे राजा शिकारीच्या नादात जंगलात वाट चूकतो व सैन्यापासून वेगळा पडतो. नरबळीची प्रथा पाळणार्या एका आदीम जमातीच्या तावडीत सापडतो. राजा बळी जाणारच असतो पण त्याचे तूटलेले बोट ऐनवेळी त्याला तारून नेते. (बळी देताना व्यंग असलेला मनुष्य चालत नाही.) राजा परततो व प्रधानाची शमा मागून त्याला मुक्त करतो व गमतीने विचारतो की माझ्या बाबतीत जे घडले ते योग्यच घडले पण तुला अकारण तुरूंगात खिचपत पडावे लागले हे कसे योग्य होते ? प्रधान हसत हसत म्हणतो, महाराज मी तुमचा सेवक, शिकारीत मी तुमच्या बरोबर असणारच होतो. मी ही वन्य जमातीच्या तावडीत सापडलो असतोच. तुम्ही सूटलात मी मात्र बळी गेलो असतोच ! तुरूंगात असल्यामूळेच वाचलो !

लोभ आणि शोभ !

दिलावर व मुजावर यांचा व्यवसाय असतो मालकाकडून वृक्ष विकत घेउन ते तोडायचा व त्याचे लाकूड विकायचा. असाच एकदा ते पिंपळाचे मोठे झाड विकत घेतात १०० रूपयांना. दूसर्या दिवशी झाड तोडायला घ्यायचे नक्की करून ते आपल्या घरी परततात. त्या रात्री ते पिंपळाचे झाड मनुष्य रूपात दिलावरच्या स्वप्नात येते व जीवनदान मागते. हे ही सांगते की त्याच्या मुळात थोडे खणल्यास एक सोन्याची पहार त्याला मिळेल ती दोघा मित्रांनी विकून नूकसान भरून काढावे. दिलावर त्याप्रमाणे खणून ती पहार काढतो. पण मग त्याची बुद्धी फिरते. आपल्य मित्राला अर्धे पैसे देण्यापेक्षा हे झाड तोडूनच टाकावे. काय करणार ते झाड आपले असा विचार करून तो मजूर गोळा करून झाडावर शेवटी कु-हाड चालवतोच. कु-हाडीचे घाव बसत असताना त्या झाडातून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागतात. पण दिलावरला तरीही सत्य सांगावे असे वाटत नाही. झाड संपूर्ण तोडूनच तो घरी परततो. पाहतो तो काय त्याच्या घराभोवती बघ्यांची गर्दी जमली होती. त्याचा तरूण मुलगा रक्ताच्या उलट्या होउन मेला होता. त्याची बायको सगळ्यांसमोरच त्याच्या पापाचा पाढा वाचते व मुलाच्या मृत्यूला याचा लोभच कसा नडला ते सगळ्यांना ओरडून सांगते.( कर्माचा अकाट्य सिद्धांत या आसाराम बापूच्या पुस्तकातील सत्यकथा )

देखावा !

एक सज्जन मेल्यावर चित्रगुप्ताच्या दरबारात येतो. त्याचे खाते बघून चित्रगुप्त निर्णय देतो की स्वर्ग की नरक घ्यायचा ते या माणसानेच ठरवावे ! दूत त्या माणसाला आधी नरकात आणतात. तिकडे त्याला आपले सगळे जुने मित्र, नातलग भेटतात. अगदी मजेत असतात ते. मेजवान्या झोडत असतात, उंची मद्य रीचवत असतात, गात असतात, नाचत असतात, अगदी publically hug सुद्धा करत असतात. याला तर अगदी राजेशाही वागणूक मिळ्ते ! त्याला कळॅतच नाही की हा नरकच आहे का ?आणि असेल तर मग स्वर्ग काय वेगळा असणार ? सोबतच्या देवदूताला तो सांगतो की मी नरकातच माझ्या मित्रांबरोबर राहणार ! दूत सांगतो की नियमाप्रमाणे तुला स्वर्ग बघावाच लागेल आणि मग काय ते ठरव. उपचार म्हणून हा माणूस स्वर्ग बघतो. तेच सगळे, अप्सरा, त्यांचा नाच, निवांतपणे सूरापान, देवाचा दरबार ई.ई ! त्याचे मन काही त्यात रमत नाही. तो सांगतो मला नरकातच टाका ! देवदूत त्याला नरकात ढकलून देतो. पण आता नरकातला चकचकाट त्याला कोठेच दिसत नाही. सगळीकडे नुसते घाणीचे साम्राज्य पसरलेले, दुर्गंध, कोंदटपणा, रोगट , खंगलेली , कचाकचा भांडणारी, अर्वाच्य शिव्या देणारी माणसेच त्याला दिसतात. सत्य काय व स्वप्न काय तेच त्याला कळत नाही ! आधी त्याला hug करणारी माणसेच आता आपल्या 'असली' रूपात त्याला दिसतात, कसे फसवले असे म्हणत !

न संपणारी गोष्ट !

आटपाट नगराचा एक राजा असतो. त्याला एक राजकन्यासुद्धा असते व ती ह्ट्टी सुद्धा असतेच असते. त्यातच तीला नव-नवीन गोष्टी ऐकायचे व्यसन जडते. राजा पंचक्रोशीतल्या सगळ्या कथाकारांना पाचारण करतो आपल्या कन्येचा हट्ट पुरवायला. देशोदेशीच्या गोष्टी ऐकून राजकन्या अजूनच चेकाळते. आता तीला हवी असते न संपणारी गोष्ट ! आता राजा दवंडीच पिटतो जो कोणी राजकन्येला न संपणारी गोष्ट सांगेल त्याला अर्धे राज्य वर राजकन्या फ्री ! पण जर गोष्ट संपली तर आजीवन कारावास ! अनेक जण प्रयत्न करतात, पण गोष्ट म्हटली की ती संपणारच ना ? एक दिवस, दोन दिवस, फार तर एखादा आठवडा ! (त्या काही मराठी मालिका आहेत, न संपणार्या !) शेवटी एक तरूण आव्हान स्वीकारतो पण एक अट घालून, राजकन्येने मधे मधे प्रश्न विचारून त्याची link तोडायची नाही व ती स्वत:च जेव्हा गोष्ट थांबव असे म्हणेल तेव्हा मी पैज जिंकलो असे मान्य करावे लागेल.

अट मान्य होते, न संपणारी गोष्ट चालू होते !एक आटपाट नगर असते. राजा कर्तव्यदक्ष असतो व प्रजा सुखी असते. एकदा दरबारात एक विदेशातला ज्योतिषि येतो व भयंकर भाकीत वर्तवतो, आजपासून बरोबर ५ वर्षानी राज्यात भयंकर दुष्काळ पडणार आहे. राजा ताबडतोब आपल्या मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावतो व काही उपाय सुचवण्यास सांगतो. चर्चा पुष्कळ दिवस चालते व ठरते की या संकटाचा सगळ्यांना मिळून सामना करायचा. युद्ध पातळीवर योजना राबवायच्या. ठरते की गावोगावी प्रचंड मोठी गोदामे बांधायची व पुढ्च्या पाच वर्षात अधिक उत्पादन व काटकसर करून ही गोदामे शिगोशिग भरून ठेवायची. दुष्काळ पडला की यातला धान्यसाठा वापरायचा. म्हणता म्हणता प्रचंड गोदामे उभी राहतात व धान्याने भरून पण जातात. त्या गोदामात उंदीर तसेच इतर प्राण्यांचा उपद्रव होउ नये म्हणून प्रभावी उपाययोजना केलेली असतेच पण नजरचूकीने म्हणा, हलगर्जीपणामुळे म्हणा एका गोदामाच्या छताला लहानशी फट राह्ते. त्या फटीतून एक चिमणी आत शिरते व धान्याचे प्रचंड भांडार पाहुन अगदी हरखून जाते !आपल्या इवल्याशा चोचीत ती एक दाणा धरते व मोठ्या आनंदाने बाहेर येते. हळूहळू ही बातमी सर्व चिमण्यांना कळ्ते. मग काय, दूसरी चिमणी येते, एक दाणा चोचीत घेते, उडून जाते, मग अजून एक चिमणी येते, एक दाणा चोचीत घेते, उडून जाते !मग अजून एक चिमणी येते, एक दाणा चोचीत घेते, उडून जाते !मग अजून एक चिमणी येते, एक दाणा चोचीत घेते, उडून जाते !मग अजून एक चिमणी येते, एक दाणा चोचीत घेते, उडून जाते !मग अजून एक चिमणी येते, एक दाणा चोचीत घेते, उडून जाते !मग अजून एक चिमणी येते, एक दाणा चोचीत घेते, उडून जाते !मग अजून एक चिमणी येते, एक दाणा चोचीत घेते, उडून जाते !

----असे बराच वेळ चालल्यावर राजकन्या वैतागते व म्हणते बरं बरं, एक लाख चिमण्या येउन जातात, पुढे सांगा ! तरूण म्हणतो, त्यानंतर एक लाख एकावी चिमणी येते, दाणा घेते व उडून जाते !--- शेवटी राजकन्या म्हणते, बरं, जगातल्या सगळया चिमण्या दाणे घेउन जातात, आता पुढे सांग. तरूण म्हणतो, त्यानंतर पुन्हा पहीली चिमणी येते, दाणा घेते उडून जाते !----. आता राजकन्या ओरडून म्हणते, बरं, आता त्या गोदामातले सगळे धान्य संपते, आता पुढे सांग ! तरूण सांगतो की त्या गोदामातले धान्य संपल्यावर चिमण्या असेच दूसरे ए गोदाम शोधून काढतात, त्यांच्या नशीबाने त्यात पण छताला लहानशी फट असतेच, अगदी चिमणी जाउ शकेल एवढीच ! त्यात एक चिमणी शिरते, इथेही प्रकंड धान्य साठा बघून ती ही हरखून जातेच ! एक दाणा घेउन बाहेर पडते व सगळ्यांना या नव्या गोदामाची माहीती मिळते. मग काय, इथेपण तीच गोष्ट परत चालू होते,मग अजून एक चिमणी येते, एक दाणा चोचीत घेते, उडून जाते !मग अजून एक चिमणी येते, एक दाणा चोचीत घेते, उडून जाते !

----आता राजकन्येचा संयम संपतो, ती मोठ्याने ओरडून बस झालं, अगदी उबग आला आता, बंद कर तुझी ही गोष्ट असे सांगते. तरूणाला काय हेच तर हवे असते !

गोष्टी - भाग २

कल्पवृक्ष !

चालून चालून दमलेला एक वाटसरू विश्रांतीसाठी एका झाडाखाली विसावतो. ते झाड असते कल्पवृक्षाचे ! मनातल्या सर्व इच्छा ताबडतोब पूर्ण करणारे ! त्याच्या मनात पहीला विचार येतो थंडगार पाण्याचा आणि काय आश्चर्य, कुठुनतरी थंडगार पाणी त्याच्या समोर हजर ! मग त्याला हवीशी वाटते मंद हवेची झुळूक आणि तत्क्षणी मंद वायूलहरी निर्माण होतात. आता त्याला पंच पक्वान्नाचे जेवण हवे होते आणि ते ही सत्वर हजर होते. मग असाच पंचगुणी विडा त्याला मिळतो व नंतर उंची मद्य ! मद्याचे घोट घेताना त्याला नवल वाटते की काय चाललय तरी काय ? ही भूताटकी तर नाही ? आणि मग भूत त्याच्या समोर अवतरते. माझी शंका खरी ठरली तर, आता हे भूत माझ्या मानगूटीवर बसणार ! आणि होते ही तसेच ! "आता हे भूत माझा गळा आवळून माझा जीव घेणार" मनात येते आणि --- खेळ खल्लास !

काळ , वेळ आणि स्थळ !

एका चिमणीला सकाळपासूनच मृत्यूची चाहूल लागली होती. जग़ण्याच्या आसक्तीने ते सैरभैर होउन इकडे तिकडे उडत होती. पण मृत्यूचे दूत काही तिचा पिच्छा सोडत नव्हते. एका गरूडाला तिची दया आली. त्याने तिला आपल्या पंखावर घेतले आणि प्रंचंड वेगाने तो हिमालयाकडे झेपावला. हिमालयातल्या सर्वात उंच शिखरावर त्याने तिला उतरवले. क्षणाधार्तच मृत्यूचे दूत तिथे प्रगटले व चिमणीचे प्राण त्यांनी हरण केले ! यमदूत गरूडाला बोलले या चिमणीचा काळ तसेच वेळ ही भरली होती. पण हीमालयाच्या नेमक्या याच शिखरावर तिचा मृत्यू लिहीलेला होता. आम्हाला काळजी वाटत होती की चिमुरडी चिमणी एवढ्या कमी वेळात या शिखरावर पोचणार तरी कशी ? पण तू ते काम सोपे केलेस ! काळ , वेळ व स्थळ तुझ्यामुळेच जुळले व आमचे काम झाले ! धन्यवाद !

उंटावरचा शहाणा !

एका शेतकर्याची म्हैस वैरणीच्या रांजणात तोंड घालते व ते तिला बाहेर काढता येत नाही ! त्या गावात एक उंटावरचा शहाणा असतो. समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्याला पाचारण करतात. घराला असते कुंपण ! शहाणा म्हणतो, मी उंटावरून खाली उतरतच नाही. सल्ला हवा असेल तर कुंपण पाडा, नाहीतर मी चाललो परत. कुंपण पाडून वाट केली जाते. शहाणा सल्ला देतो, यात काय विषेश आहे, आधी म्हशीची मान कापा! मान कापतात पण ती तर रांजणात अडकून पडलेली ! आता काय करायचे ? शहाणा सांगतो, सोप्पे आहे, आता मडके फोडा ! माझे काम झाले, मी चाललो !

देणारा कोण ?

एक धर्मपरायण शेटजी असतो. दूपारचे भोजन साधूसंतांबरोबर करायचे असे त्याचा नेमच असतो. गावात कोणी नवा साधू आला की त्याला बंगल्यावर भोजनाचे आमंत्रण मोठ्या अगत्याने दिले जाई. असाच निरोप मिळाल्यावर एक साधू मात्र उलटा निरोप पाठवतो "शेटजी तुम्ही मला आज जेवण देत अहात पण उद्या मला जेवण कोण देणार ?". शेटजीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. तो स्वत: सत्वर त्या साधूला भेटून त्याचे पाय धरतो व सांगतो, "साधू महाराज, तुम्हाला ज्याने काल जेउ घातले तोच आज तुम्हाला जेवण देणार आहे व नि:संशय उद्याही देईल !"

कोण राजा ? कोण भिकारी ?

एक मनमौजी साधू नगराच्या मुख्य रस्त्यातुन जात असतो. त्याच रस्त्यावरून त्या नगराचा राजा पण नेमका त्याच वेळी हत्तीवरून चाललेला असतो. राजाचे सैनिक रस्त्यावरील सर्वाना बाजूला हाकलत असतात व रस्ता मोकळा करत असतात. पण २ दंडूके लगावूनही साधू ह्टत नाही तेव्हा राजाच त्याला सामोरा जातो. मी या नगराचा राजा आहे, तू स्वत:ला समजतोस तरी कोण ? असे राजा त्या साधूला विचारतो. साधू म्हणतो "मी तर या दूनियेचा राजा आहे ! आणि राजा-राजा म्हणतोस तर तुझे कोण ऐकते ते तरी सांग ?". राजा सांगतो या नगरातले पान सुद्धा माझ्या आज्ञेशिवाय हलत नाही ! तसेच नगरातल्या कोणालाही मी ह्द्द्पार करू शकतो ! साधू म्हणतो मग तुझ्य1 नगरातल्या डासांना व चिलटांना हाकलून दाखवशील ! राजा निरूत्तर होतो व साधूला महालात येउन पाहुणचाराचे आमंत्रण देतो. असाच मस्तीत भटकत असलेला साधू राजाच्या महालासमोर उभा ठाकतो. त्याला राजाचे आमंत्रण आठवते व तो महालात प्रवेश करू लागतो, पण पहारेकरी त्याला अडवतात व सांगतात राजाला भेटण्यासाठी आधी वेळ घ्यावी लागेल. साधू म्हणतो मग हा कसला राजा तर एक सामान्य कैदी आहे व परत फिरतो ! हे राजाला कळताच तो धावत-पळत जाउन साधूचे पाय धरतो व त्याला महालात आणतो. त्याच रात्री राजा देवघरात प्रार्थना करून देवाजवळ सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य मागत असतो. साधू ते ऐकतो व जोराने म्हणतो ,"अरे तू तर भिकारी आहेस भिकारी ! मी इथे आता क्षणभरही थांबणार नाही !" आणि त्वरेने महालाबाहेर पडतो !

दारूचा नैवेद्य !

कसे कोण जाणे पण रामकृष्ण परमहंसाचा एक शिष्य दारूच्या आहारी गेला. अनेक प्रकारे समजाउनही तो व्यसनाच्या गर्तेत फसतच गेला. त्याला दारू सोडावी असे वाटतच नसल्यामुळे सर्व उपाय निरर्थक ठरत होते. शेवटी प्रकरण परमहंसाकडे गेले. कोणाला अमके कर असे सांगणे त्यांना मान्य नव्हते, पण तरीही परमहंस त्याला बोलावून निदान वर्षभरासाठी दारू सोडण्यास सुचवतात. व्यसनाच्या पूरता आहारी गेलेला तो साधक वर्ष काय एक दिवसही आपण दारू सोडू शकत नाही असे सांगतो ! तेव्हा परमहंस म्हणतात , ठीक आहे, हवी तेवढी पी पण एक कर ,पिण्यापुर्वी एक चमचाभर दारू देवासमोर प्रसाद म्हणून ठेवत जा ! साधक याला तयार होतो पण प्रत्यक्ष देवाला दारूचा प्रसाद दाखविताना त्याचा हात कापू लागतो, छे, काय तरीच काय, देवाला दारूचा प्रसाद ? दिवसातुन असे ४ ते ५ वेळा त्याला दारूची तलफ येते पण देवासमोर दारू ठेवायचे त्याला जमत नाही व त्या शिवाय दारू पिणेही जमत नाही. असे ३ ते ४ दिवस जातात. मग मात्र हा साधक परमहंसाच्या पायावर लोळण घेउन या अटीतुन सोडवा म्हणून विनवतो ! परमहंस सांगतात , अरे एक क्षण दारू सोडू न शकणारा तू ४ दिवस दारूचा थेंबही न घेता राहू शकत आहेस. मग असेच काही आठवडे, मग काही महीने, मग वर्षे राहणे काय कठीण आहे ? साधकाची दारू सूटते ती कायमचीच !

लाकूडतोडयाचा मुलगा !

लाकूडतोड्याचा मुंबईतला मुलगा प्रथमच बायकोला घेउन गावी आला होता. ज्या विहीरीत कु-हाड पडल्यामुळे सासर्याचा भाग्योदय झाला ती विहीर बघायची तिला फार ईच्छा होती. 'अय्या किती खोल आहे 'असे म्हणत असतानाच तोल जाउन ती विहीरीत पडते. आता देवाचा धावा करण्याची पाळी लाकूडतोड्याच्या मुलाची असते ! देव तत्परतेने बिपाशा बसूला बाहेर काढतो आणि ही का तुझी बायको ? असे विचारतो. लाकूडतोड्याचा मुलगी आधी हो मग नाही मग परत हो अशा अर्थाने माना हलवत राहतो व शेवटी निर्धाराने "हो" म्हणून सांगतो ! देव संतापून म्हणतो, कलीयुग म्हणतात ते हेच ! कोठे तुझा बाप आणि कोठे तू, या item girl ला आपली बायको म्हणून सांगतोस ! थांब तुला शापच देतो ! मुलगा धावत देवाचे पाय धरून आपले म्हणणे पूर्ण ऐकून तरी घ्या म्हणून विनवतो. "देवा, तुमची ही जुनीच खोड आहे, तुम्ही आधी बिपाशा, मग करीना आणि शेवटी माझी लग्नाची बायको बाहेर काढली असतीत, माझ्या प्रामाणिक पणाला भूलून तुम्ही या दोन फटाकड्यापण माझ्या गळ्यात बांधल्या असतात. कायद्याने याला बंदी आहेच वर या महागाईच्या काळात एक बायको सांभाळणे जड जाते तर तीन सांभाळताना माझे तीन-तेराच झाले असते.". हा खुलासा देवाला पटतो आणि बिपाशा बरोबर तो अदृष्य होतो. बराच वेळॅ थांबोन देव आपल्या मूळ बायकोला पण वर आणत नाही असे बघून "देवाची लीला अगाध आहे" असे म्हणत तो एकटाच घरी परततो !

न्यायबुद्धी !

लाक्षागृहाच्या आगीतुन पांडव बचावतात. पुढचा प्रवास भीषण अरण्यातुन असतो. दमलेल्या पांडवांना तहान लागते. युधीष्ठीर आपल्या सर्व भावंडाना पाणी आणण्यास पाठवतो पण यक्षाच्या शापाने सर्व मृत्यूमूखी पडतात ! पुढे यक्षाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देउन युधीष्ठीर त्याला प्रसन्न करून घेतो. हा कथाभाग सर्वाना माहीत आहे. पण त्या नंतर यक्ष सर्व पांडवांना एकदम जिवंत करत नाही. धर्माला तो आधी तुझा एकच भाउ जिवंत होईल असे सांगतो. धर्म तेव्हा नकुल किंवा सहदेव यातील कोणा एकाला जिवंत कर असे सांगतो. यक्षाचे रूप घेतलेला यम म्हणतो त्याहुन तू अर्जून किंवा भीमाला जिवंत करून घे, ते तुझे सख्खे भाउ आहेत, पराक्रमी आहेत, त्यांच्या सामर्थ्यावरच तू गतवैभव परत मिळवू शकशील ! धर्मराज ठाम पण नाही सांगतो. आम्ही तिघे कुंतीपुत्र आहोत व नकुल सहदेव माद्रीचे आहेत. कुंतीपुत्र म्हणून मी जिवंत आहेच म्हणून माद्रीचा कोणताही एक पुत्र जिवंत होणे जास्त न्यायपूर्ण आहे. या त्याच्या न्यायसंगत बोलण्यावर यमधर्म प्रसन्न होतो व माझी शेवटची परीक्षा पण तू उत्तीर्ण झालास असे सांगून सर्व मृत पांडवांना जिवंत करतो !

याचक !

एक राजा होता. विविध देवस्थानांना भेटी देउन तो भरपूर द्रव्य दान करायचा. पण या दानाची टिमकी वाजवायची त्याला वाईट सवय होती. देवस्थानांच्या पूजार्यांकडून आपली स्तुती ऐकून तो फार खूष व्हायचा ! असाच एक देवळाला तो सोन्याच्या नाण्यांनी भरलेले ताट दान करतो. पूजारी बहुदा कोब्रा असावा ! एकही शब्द न बोलता तो ते ताट देवा समोर ठेवतो. राजाला आश्चर्य वाटते. तो त्या पूजार्याला आढ्यतेने विचारतो "काय हो, माझ्या एवढा महान दाता तुम्ही या अधी कधी पाहीला होता का ?" ब्राह्मणाला त्याच्या बोलण्याचा रोख समजतो. आपल्या कनवटीला गुंडाळलेला बंदा रूपया तो त्या तबकात टाकतो व राजाला म्हणतो, "हे घे माझ्याकडून तुला दान ! लक्षात ठेव, माझ्यासारखा याचक पण तुला कधी भेटला नसेल !"

काय मागायचे ?

कृष्ण शिष्टाई फसते आणि कौरव व पांडव हे दोन्ही पक्ष सैन्याच्या जुळवाजुळवीला लागतात. आपल्याला सहानुभूती असलेले राजे हेरून दूतामार्फत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना आपल्या कडे वळविले जाते. स्वत: कृष्ण कोणाकडून यूद्धात सहभाग घेणार हे त्याने गुलदस्त्यातच ठेवलेले असते. कृष्णाला आपल्या बाजूला वळवण्यासाठी दूर्योधन व अर्जून हे दोघेही एकाच वेळी द्वारका गाठतात. ते जेव्हा कृष्णाच्या महालात प्रवेश करतात तेव्हा कृष्ण विश्रांती घेत असतो. अहंकारी दूर्योधन त्याच्या उशाला बसतो तर भक्त अर्जून त्याच्या पायाशी बसतो. कृष्ण उठल्यावर साहजिकच अर्जूनाला आधी पाहतो व त्याला येण्याचे प्रयोजन विचारतो. यावर दूर्योधन भडकतो व मी आधी आलो आहे तेव्हा माझे मागणे आधी ऐक असा ह्ट्ट धरतो. कृष्ण म्हणतो कोण कधी आले याच्याशी मला देणे घेणे नाही. मी अर्जूनाला आधी बघितले आहे. असो . आधी माझी भूमिका स्पष्ट करतो. तुम्ही दोघेही माझे आप्त आहत. हा गृहकलह टाळायचा मी प्रयत्न केला. आता मी कोणाही कडून यूद्धात भाग घेणार नाही. माझी नारायणी सेना मात्र यूद्धाल1 तयार आहे. तर तुम्हाला दोन पर्याय आहेत. एका बाजूला "न धेरी शस्त्र करी मी" असा मी आणि दूसरी कडे माझी नारायणी सेना. बोला तुम्हाला काय पाहीजे ? दूर्योधन पटकन नारायणी सेना हवी असे सांगतो व अर्जून मात्र जिथे श्रीकृष्ण तिथे विजय असे जाणून असल्यामुळे कृष्णाला आपल्या रथाचे सारथ्य करण्याची गळ घालतो. पुढे काय महाभारत होते ते आपल्या चांगले माहीतच आहे !

एका पैशाचे दान !

रोज काबाडकष्ट करून कमाई करणार्या तरूणाचा एक नेम असतो. रात्री झोपायच्या आत कमावलेले सगळे खर्च करून टाकायचे ! एका रात्री त्याला काही केल्या झोप लागत नाही. याचा खुलासा त्याला सकाळी होतो. आदल्या दिवशी २ पैसे शिल्लक राहीलेले असतात ! हे दोन पैसे तो एका भिकार्याला देउ करतो तर भिकारी दोन पैशाची भीक घ्यायला चक्क नकार देतो ! एका वकीलाला सल्ला विचारतो तर तो म्हणतो आधी सल्ल्याची ३०० रू. फी दे ! त्या राहीलेल्या दोन पैशापायी बिचार्या तरूणाच्या झोपेचे पार खोबरे होते. ते पैसे खर्च व्हावेत म्हणून तो आपला सगळे प्रयत्न करून बघतो, पण व्यर्थ ! असंच त्याच्या कानावर येते की आपल्या देशाचा राजा शेजारच्या राजावर आक्रमण करणार आहे. त्याल वाटते नक्कीच राजा गरीब आहे. आपले दोन पैसे त्यालाच देउन टाकू आणि मोकळे होउ. राजाला भेटून तो सगळा वृतांत कथन करतो. माझे दोन पैसे घ्या मग हे युद्ध टळेल, अनावश्यक प्राणहानि टळेल असे विनवतो. राजाचे डोळे उघडतात. कोठे रोजच्या रोज श्रम करणारा हा तरूण आणि आपल्या हव्यासापोटी प्रजेला संकटात लोटणारे आपण ! युद्ध टळते. संभाव्य हानि सुद्धा !

सगळे तुमचे, पाप मात्र देवाचे ?

एक असतो शेठजी. भला मोठा बंगला आणि भोवती त्याने स्वत: कष्टाने जोपासलेली बाग ! शेठजीला आपल्या कर्तबगारीचा सार्थ अभिमान. येणार्या जाणार्या प्रत्येकाला तो आपली बाग जरूर दाखवायचा. एकदा एक गाय त्याच्या बागेत शिरते व नासधूस सुरू करते. शेटजी रागावतो. हातातली काठी त्या गाईवर फेकतो. काठी नेमकी गाईच्या वर्मी बसते व ती गतप्राण होते. गोहत्येचे पाप शेटजीच्या पाठी पडते. पण तो पक्का वस्ताद, त्या पापाला सांगतो, काठीमूळे गाय मेली, पड तिच्या पाठी ! काठी म्हणते मी तर निर्जीव वस्तू, मी कशी गाय मारेन, मला हाताने गती दिली, धर त्या हाताला जबाबदार ! हात म्हणतो, माझ्यात शक्ती देतो इंद्र, तेव्हा तोच पापाचा धनी ! इंद्र म्हणतो, विष्णू सृष्टीचा पालनकर्ता, त्याच्याच आदेशावरून मी चराचरात शक्ती उत्पन्न करतो, तेव्हा तोच खरा या पापाचा धनी ! शेवटी पाप विष्णूकडे येते. विष्णू वेष बदलून शेटजीच्या बंगल्यावर येतो. शेटजी त्याचे छान आगत-स्वागत करतो. त्याला आपले सगळे वैभव दाखवितो, बंगला, घोडा, गाड्या आणि सगळ्यात शेवटी आपण कष्टाने फुलवलेली बाग ! सगळीकडे मी व माझे ! फिरत फिरत ते त्या मेलेल्या गाईजवळ येतात. विष्णू विचारतो ,अरे ही गाय कोणी मारली ? शेटजी म्हणतो काठीने ! विष्णू संतापून म्हणतो, वा शेटजी ! बंगला, गाडी, घोडा व बाग सगळे 'तुमचे' पण गाय मात्र काठीमुळे मेली ! ते काही नाही, गोहत्येचे पाप तुमच्याच माथी बसणार !

गोष्टी - भाग १

द्वेष !

एकमेकांचा पराकोटीचा द्वेश करणारे दोन शेजारी असतात. दूसर्यापेक्षा आपणच श्रेष्ठ या गंडाने दोघांना पुरते पछाडले होते.परस्पर द्वेशाची परिसीमा गाठल्यावर शेवटी देवाला दावणीला बांधले जाते ! दोघेही दूसर्यापेक्षा जास्त सुखी व्हावे म्हणून देवाचा धावा सुरू करतात. देव एकाच वेळी दोघांना दर्शन देउन काय हवे ते मागा म्हणून सांगतो पण हे पण बजावतो की तुला जे मिळेल त्याच्या दुप्पट तुझ्या शेजार्याला मिळेल ! आता आली का पंचाईत, ज्या साठी एवढा अट्टाहास केला त्याचे असेच का फळ मिळणार ? दोघेही देवाला सांगतात , 'असेच' होणार असेल तर माझा १ डोळा, एक कान, एक हात, एक पाय तोडून टाक देवा ! देव तथास्तू म्हणून अंतर्धान पावतो व दोघेही शेजारी विकलांग होउन जातात !

पाटी

एक कोकणी माणूस मासे विकायचे दूकान टाकतो. दूकानावर पाटी लावतो, "येथे ताजे मासे विकत मिळतील."बसतो आपला गि-हाईकांची वाट बघत. एक मालवणी येतो म्हणतो मेल्या "येथे" असे लिहायची काय गरज आहे का ? पाटीतुन 'येथे' शब्द खोडला जातो तोवर दूसरा शहाणा येतो, सांगू लागतो की 'ताजे' असे लिहील्यामुळे लोकांना अकारण ते शिळे असल्याचा संशय येईल ! झाले, 'ताजे' या शब्दावर काळे फासले जाते. तिसर्या एका शहाण्याचे मत पडते की धंदा उधारीवर जर करायचाच नसेल तर 'विकत' असे तरी वेगळे का लिहायचे ? 'विकत' वर पण काट पडते. 'मासे' तुझ्या पाटीत फडफ़डत असताना त्यांचा पाटीवर उल्लेख तरी कशाला करायचा म्हणतो मी ? खेकडे तर तू विकत नाही आहेस ! अजून एका शहाण्याचा सल्ला पण त्याला मान्य करणे भागच पडते ! शेवटी 'मिळतील' या शब्दाला तरी काय अर्थ उरला ? शेवटी पाटीच खाली उततते ! धंदा मात्र एका पैचाही होत नाही !

क्या भगवान है ?

एकदा गावातल्या काही लोकांना जंगलात एक साधू दिसतो. साधूच्या चेहर्यावर एक आगळे तेज असते. याला गावात नेउन त्याचे एखादे किर्तन ठेवावे असे ठरते. साधूने सर्वसंग परित्याग केलेला असतो. या मुळेच तो खरे तर जंगलात रहात असतो. पण लोकांचा आग्रह त्याला मोडवत नाही. साधू सांगतो की तुम्हीच मला विषय द्या, मी त्यावरच आपले चार शब्द बोलतो ! साधूने देव या विषयावर बोलायचे ठरते. ठरल्या वेळेला साधू गावात येतो. आसपासच्या गावातील लोकांनी तोबा गर्दी केलेली असते. साधू खड्या आवाजात जनसमुदायाला प्रश्न विचारतो."देव आहे ?" एकमुखी उत्तर येते, "होय". साधू म्हणतो हे जर तुम्हाला एवढ्या ठामपणे माहीत आहे मग मी काय वेगळे सांगणार ! मै तो चला !एकच गोंधळ उडतो. आयोजक बाबापुता करून साधूला पुन्हा स्टेज वर आणतात. परत तोच प्रश्न, पण उत्तर "नाही" असे येते ! आता साधू म्हणतो जे अस्तित्वातच नाही आहे, त्यावर मी काय बोलणार, मै तो चला ! आयोजक निकराचा प्रयत्न करून साधूला पुन्हा उभा करतात ! लोकांनाही यात रंगत वाटू लागते. या वेळी उत्तरात होय आणि नाही सारख्याच प्रमाणात मिसळतात ! तर साधू म्हणतो हा मुद्दा हो वाल्यांनी नाही वाल्यांना समजावा हेच चांगले ! मै तो चला ! आता सभेत शांतता पसरते. हा साधू कोणी 'पहुंचा हुवा' आहे हे सर्वाना समजून चुकते. सर्वाची पाटी "कोरी" झाल्यावर साधू या विषयावर रसाळ निरूपण सुरू करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकतो !

परिक्षा !

अकबर बादशहा भल्या पहाटे आपल्या प्रासादाच्या गच्चीवर बेगम बरोबर गप्पा मारत होता. वेळ साधून बेगमने जुनेच तुणतुणे पुन्हा वाजविले. त्या काफीर बिरबलाला हाकलून द्या व माझ्या भावाला वजीर करा ! पहाटे दूरुन कुठून तरी घंटाचा किणकिणाट ऐकू येत होता. अकबराने आपल्या मेव्हण्याला बोलावुन हा आवाज कसला याचा तपास लावायचा आदेश दिला. धावत गेला आणि पळत आला. बैलांच्या गळ्यात बांधलेल्या घूंगरांचा तो आवाज होता तो. लगेच बादशहाने पुढचे फर्मान सोडले, कोठे चालल्या आहेत या गाडया ? मेव्हण्याची परत धावपळ ! गाड्या शेजारच्या राज्यात बाजाराला चालल्या आहेत ! पुढचा प्रश्न, काय विकायला चालल्या आहेत ? परत पळापळ आणि समजते तांदूळ आहे गाडयांत ! मग बासमती आहे का कोलम,दर्जा कसा आहे, भाव काय, आपल्याकडचा भाव काय ? मेव्हणा पार मेटाकूटीला यतो. शेवटी धाप लागून मट्कन खालीच बसतो ! आता बादशहा बिरबलाला पाचारण करतो. बेगम समोरच खड्या आवाजात "कसला आवाज येत आहे" याचा छडा लावायचा आदेश देतो ! मोजून दहाव्या मिनिटला बिरबल परततो. सविस्तर वृतांत देतो की आवाज बैलांच्या गळ्यात बांधलेल्य घूंगराचा आहे. अतिशय उत्तम प्रतीचा बासमेती तांदूळ बाजूच्या राज्यात विकायला जात होता. भाव आपल्या पेक्षा स्वस्त असल्यामुळे मी तो सर्व तांदूळ खरेदी करून मुदपाकखान्याच्या प्रमुखाकडे सोपवला आहे ! बादशहा बेगमला काही सांगण्याअगोदरच तिने आणि तिच्या भावाने तोंड काळे केलेले असते !

मातीचा गुण !

पित्याच्या आज्ञेवरून वनवासात निघालेल्या रामाची वाटचाल आता परशूरामाच्या वास्तव्याने पावन झालेल्या कोकणातून सुरू झाली. कोकणचे निसर्गसौंदर्य राम आणि सीतi डोळ्यात साठवुन घेत मार्गस्थ होत होती. पण लक्शमण कोठे होता ? खर तर तो सतत त्यांच्या पुढे रहायचा, त्यांना काहीही कष्ट पडू नयेत म्हणून खपायचा. त्याच्या या वागण्यातला फरक राम-सीता दोघांनाही जाणवला. दूपारी विश्रांतीसाठी सर्व बसले असताना लक्शमणान आपल्या भावनांना वाट मोक़ळी करून दिली ! "माय झया रामा, तुझा बरा असा, तू आपल्या बायली संग वनवासात पण मजेत असाक आणि मी मात्र तुमच्या सुखापायी खपतोया ! म्या काय तुमचा नोकर असाक ? काय समजतल काय तू मला ? बस झालो यो थेर , माका काय आता तुमच्या संगतीने यायचो नाय--- " ! सीता हैराण ! झाले तरी काय याला ? राम तिला सांगतो की गंभीर काही नाही, इकडची थोडी माती पदरात बांधून घे आणि जरा लवकर पाय उचल. कोकण पाठी पडते आणि लक्श्मण ताळ्यावर येतो. स्वत:च्या थोबाडीत मारून घेउन पुन्हा असे होणार नाही, माफ करा असे सांगून मोक़ळा होतो ! राम सीतेला ती माती टाकायची खूण करतो, लक्श्मणाचा पाय त्या मातीवर पडतो मात्र "माय झया रामा------". दुही हा कोकणच्या मातीलाच लागलेला शाप आहे हे सीतच्या लक्षात येते.

चोर आणि गीता.

देवळात गीतेवर रसाळ प्रवचन चालू असते. "मनुष्य केवळ निमित्तमात्र आहे. कर्ता-करविता ईश्वरच आहे. आपली प्रत्येक कृती त्याच्याच ईच्छेने होते तेव्हा कर्म चांगले वा वाईट असायचा प्रश्नच नाही --" हा विचार एका चोराच्या कानावर पडतो. त्याला खूप बरे वाटते. आपण चोरी करतो म्हणजे काही पाप करतो ही त्याची भीती नष्ट होते.ईश्वरी संकेतानुसारच आपल्याला चोरी करायची प्रेरणा मिळते. आता तो अधिकच निर्ढावतो. कर्मातली सफाई वाढ्ते. अट्ट्ल चोर अशी त्याची पंचक्रोशीत ख्याती पसरते. राजा त्याला पकडण्याकरता मोठे इनाम जाहीर करतो.जंगलात राजाच्या सैनिकांना गुंगारा देताना चोराल तहान लागते. ध्यान लावून बसलेला एक साधू त्याला दिसतो व त्याच्या समोर पाण्याने भरलेले कमंडलू असते. चोर परवानगी मागायच्या फंदात न पडता त्यातले पाणी पिउन टाकतो. साधूचे ध्यान भंग पावते व तो चोराल 'दगड होशील' म्हणून शाप देतो ! पण चोरावर त्या शापाचा काही एक परिणाम होत नाही ! पुढे चोराचा उपद्रव फारच वाढल्यावर राजा त्याचे संपूर्ण कुटूंब ताब्यात घेतो. २४ तासाच्या आत चोर शरण न आल्यास सर्वांना फासावर लटकवायचा आदेश जारी करतो. चोर मुदतीत शरण न आल्यामुळे आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होते ! आपल्या सर्व कुटूंबियांचे देह फासाला लटकत असलेले पाहून चोर शोक सागरात बूडून जातो. त्याच्या तोंडून उद्-गार बाहेर पडतात, "मी या सर्वनाशाला जबाबदार आहे" ! पुढच्याच क्षणी तो दगड होउन पडतो !

फसवलं म्हणून सांगू नकोस !

एका गावात एक वैद्य रहात होता. सेवाभावी वृत्तीचा होता. हातगुण पण चांगला होता. पंचक्रोशीत चांगला मान होता. वयपरत्वे रूग्णसेवेसाठी गावोगाव भटकणे त्यांना जमेना म्हणून एका धनिकाने चांगला अबलख घोडा त्यांना भेट दिला. आता वैद्यबुवा नव्या उमेदीने आपल्या सेवाकार्यात रमले. गावात एक भुरटा चोर होता. त्याची नजर त्या घोड्यावर पडली. हा तेज घोडा जर आपल्याला मिळाला तर आपल्या चौर्यकर्माला चांगली साथ मिळेल असे त्याला वाटले. एकदा पाय मोडल्याचे सोंग घेउन तो वैद्याच्या वाटेवर पडून राहीला. त्याच्या त्या सोंगाला फसून वैद्याने घोडा थांबविला व त्याला घोड्यावर घेतले. लगेचच त्या वैद्याला चोराने खाली फेकून दिले व टाच मारून तो पळून जाउ लागला. तशाही अवस्थेत वैद्याने त्याला एक मिनीट थांबायची विनंती केली. घोडा आता तुलाच घे, पण तो तु मला फसवुन घेतलास हे कोणाला सांगू नकोस, मी तुला तो भेट दिला असेच सांग ! खरे कारण कळल्यास लोक यापुढे खरोखरच विकलांग असलेल्यांना मदत करणार नाहीत !

कोणी कोणाला धरले आहे ?

व्यसनाधीन झालेला एकजण एका साधूच्या पायावर लोळण घेतो. "साधू महाराज, वाचवा ! दारूचे हे व्यसन मला पूर्ण संपवून टाकण्याच्या आत मला या गर्तेतुन बाहेर काढा, माझ्या कातड्याचे जोडे-----" साधू यावर काहीही न बोलता बाजूच्या जंगलात निघून जातो. तासभर वाट बघूनही जेव्हा साधू परत येत नाही तेव्हा तो व्यसनी माणूस त्याच्या मागावर निघतो. थोडे जंगलात शिरल्यावर त्याला एक विचित्र दृष्य दिसते. एका मोठ्या झाडाच्या बुंध्याला साधू विळखा घालून बसलेला असतो आणि "मला सोड, मला सोड" असे मोठ्याने ओरडत असतो. व्ससनी माणूस वैतागुन म्हणतो, हा काय वेडेपणा आहे ? तुम्हाला धरलाय तरी कोणी ? तुम्हीच झाडाच्या बुंध्याला वेढा घालुन बसला आहात ! तुम्हीच झाडाला सोडा ! साधू हसून उभा राह्तो व म्हणतो की तूच आता मला सांग की दारूने तुला धरले आहे की तू दारूला ? व्यसनी माणसाला आपली चूक उमगते , तो व्यसनमुक्त होतो !

प्रपंच आणि संन्यास !

संसारातील कटकटींना कंटाळून एक जण जंगलाचा रस्ता धरतो.थोडेफार चित्त थार्यावर येत आहे असे वाटत असतानाच त्याचे सगेसोयरे त्याचा माग काढतात. आपला माणूस जंगलात दिगंबर अवस्थेत भटकत आहे म्हणजे त्याला ईश्वरी साक्षात्कार झाल आहे असा ते 'अर्थ्' काढतात. त्या निबीड अरण्यात सुद्धा त्याचे दर्शन घ्यायला लोक येउ लागतात. आता दिगंबरावस्थेत राहणे त्याला शक्य होत नाही ! एका भक्ताकडून तो लंगोट मागून घेतो. पुढे एक xxला तर एक दांडीला , अशा दोन होतात. जंगलात एक झोपडी बनते. लंगोट उंदीर कुरडतात म्हणून एक भक्त मांजर देतो. त्या मांजराला दूध हवे म्हणून एक भक्त गाय देतो. गायीचे चारा-पाणी-शेण काढण्यासाठी एक भक्त एका बाईची सोय करतो. पुढे हा संन्यासी त्या बाईच्या प्रेमात पडून , लग्न करून परत संसारी होतो !

ठंडा ठंडा, कूल कूल !

गावाच्या वेशीवर एक जीर्ण मारूतीचे मंदिर असते. त्यात गावातल्या ओवाळून टाकलेल्या टारगटांचा अड्डा जमायचा. त्यातीलच एकाला मारूतीच्या भव्य मुर्तीची बेंबी दिसते. त्याच्या डोक्यात किडा शिरतो. मारूतीच्या बेंबीत बोट घालण्याचा ! घालतो बोट ! आत असतो एक विंचू. विंचवाच्या दंशामुळे त्याच्या सगळ्या अंगाची आग आग होते. पार डोक्यात जाते कळ ! बाजूचा एक जण विचारतो, "काय रे कसे वाटले ?". गार. एकदम मस्त थंडगार नुसतं !तो ही बोट घालतो, कळा त्याच पण सांगतो मात्र, वा ! खरंच काय गार वाटत म्हणून सांगू ! एक एक करत सगळे अनुभव घेउन बघतात. सगळ्यांचे अगदी एकमत होते, "लई गार, एकदम थंड ! ठंडा ठंडा, कूल कूल !"

जसा भाव तसा देव !

समर्थ रामदास स्वामींनी रामायण लिहायला घेतले होते. एकेक अध्याय लिहुन झाला की संध्याकाळी शिष्यांना तो वाचून दाखवत. असे म्हणतात की जिथे जिथे राम कथेचे वाचन्, निरूपण चालू असते, तिथ तिथे मारूति ती ऐकायला गुप्त रूपाने येतो. सीतेच्या शोधात मारूति अशोकवनात येतो तो प्रसंग वर्णन करताना सम्रर्थ तिकडची फूले पांढरी होती असे म्हणतात. त्या क्षणी मारूती प्रकट होउन म्हणतो की नाही ती फूले लाल होती. सम्रर्थ सांगतात माझेच बरोबर आहे. शेवटी साक्षात प्रभू रामाची साक्ष काढली जाते. राम सांगतो, फूले पांढरीच होती पण मारूतीचे डोळे संतापाने लाल झाल्यामुळे ती फूले त्याला लाल वाटली ! तेव्हा दोघांचेही बरोबर आहे !

माझा १ नम्बरचा शत्रू !

माझा १ नम्बरचा शत्रू !
शत्रू तर बरेच आहेत, मित्र म्हणून वावरणारे शत्रू ही आहेतच ! पण या सगळ्यात numbero uno कोणाला द्यायचा ? उद्यापासून एक list बनवायला घेउया आणि मग ranking ठरवूया !सकाळी बरोबर सहा वाजता वाजणारा गजर हा ही तसा शत्रूच ! घर सोडताना हे करा, ते करा, हे विसराल हे बायकोचे बाण चुकवत घर सोडले. थोडा उशीर झालेला होताच. सोसायटीचे फाटक बंद ठेउन गायब झालेला वाँचमन शत्रूच नाही का ? स्कूटर रस्त्यावर आणल्यावर कट मारून जाणारे biker, माझ्याच हातून मोक्ष हवा असणारे पादचारी, रस्त्यावर खड्डे ठेवणारे पालिकेचे ठेकेदार, स्टेशन जवळ वाहने वेडीवाकडी park करणारे चालक या शत्रूंची यादीत भर पडली. लोकल पकडण्यासाठी जीवाच्या आकांताने धावलो पण त्या नालायक मोटरमनने ती अगदी डाँट टाईम वर सोडली. एरवी सिग्नल असूनही हे पठ्ठे गाडी लेट करतात ! पुढची लोकल अपेक्षेप्रमाणेच late झाली ! बसायला मिळाले पण गर्दीमुळे दोन सीटच्या मधे public घुसले, पाय अगदी आखडून गेले. मग भजने म्हणणारे, मोबाइल वर गाणी ऐकवणारे, दंगा करणारे यांची यादीत भर पडली ! कामावर पोचल्यावर गेट मधून आत शिरताना नेमके मलाचा ओळखपत्र विचारणारा सुरक्षा कर्मचारी यादीत add झालाच ! कामावर आपली कामे माझ्या गळ्यात मारणारे, माझ्याकडून फूकट सल्ला हवा असणारे, माझ्या डब्यावर डोळा असणारे, माझी orkutgiri न बघविणारे यांची दखल नको घ्यायला ! घरी परतताना रस्ता बळकावणारे परप्रांतीय हे पण black list मधे आलेच ! आता यादी बरीच फुगल्यामुळे मी ती update करणे बंद करून घर गाठले.
संध्याकाळच्या शांत धीरगंभीर वातावरणात मुले प्रार्थना म्हणत होती, "विश्वकल्याण मेरा मंत्र है--- बाहर मेरा कोई शत्रू नही,अंदर कुछ शत्रू जरूर सही" डोक्यात जणू वीज चमकली ! सकाळ पासून जी यादी बनवतोय ती तर सगळी बाह्य शत्रूंची, पण आपल्या आत लपलेल्या या शत्रूंचे काय ? काम, क्रोध, लोभ्, मोह , मद , मत्सर हे षड् रीपू आपल्यातच तर दडून बसले आहेत. यांच्याच तर प्रभावाने आपल्याला आपले परके वाटतात तर परके आपले. बायकोचे परखड बोलणे आपल्यातल्या पुरूषी अहंकारामुळे आपल्याला अप्रिय वाटते. मनावर साचलेला हा सहा शत्रूंचा लेप ज्ञानाने लख्ख पूसून काढायलाच हवा ! गीतेतील उपदेशामुळे अर्जूनाचाही "मोह्" नष्ट झाला, त्याला त्याचे सत्व कळले व मग त्याने या शत्रू विरूद्ध लढण्याचा कृत-निश्चय केला !--तो एक दिन सब जग मेरा ही बनेगा !" प्रार्थना संपली, माझा शत्रूचा शोध ही संपला !

लहानपण दे गा देवा !

लहानपण दे गा देवा !
मला अजून काही दिवस नागूच रहायचे आहे !
चिउ काउ बघत गुरगुट्या भात खायचा आहे !
दूध पिताना ते फुरर् करून उडवायचे आहे !
टूच करायच्या आधीच भोकांड पसरायचे आहे !
कडू औषध नाक दाबल्यावरच प्यायचे आहे !
मला अजून काही दिवस अंथरूणात लोळत पडायचे आहे !
दात घासण्यापेक्षा पेस्ट खायची आहे !तासंतास पाण्याशी खेळायचे आहे !
आईबरोबर कांदे बटाटे खेळायचे आहे !
बाबांबरोबर ढूशूम ढूशूम करायचे आहे !
आंघोळीनंतर टॉवेल नेसून घरभर पळायचे आहे !
मला अजून काही दिवस टॉम ऍण्ड जेरी बघायचे आहे !
क्रीकेटचा थरार पहील्या बॉल पासून शेवटच्या बॉल पर्यंत अनुभवायचा आहे !
भारत जिंकल्यावर गोंगाट करून घर डोक्यावर घ्यायचाय !
हरल्यावर खेळाडूंच्या नावाने शिमगा करायचा आहे !
मला अजून काही दिवस पावसात चिंब भिजायचे आहे !
सर्दी न होता ही शाळेला बुट्टी मारायची आहे !
कॉम्प्युटर वर तासं तास खेळायचे आहे !
चिखलात फूटबॉल खेळायचे आहे !
शेजार्यांची काच फोडल्यावर धूम ठोकायची आहे !
पाण्याच्या उंच टाकीवर चढून बसायचे आहे !
सायकलवरून मनसोक्त भटकायचे आहे !
ढोपर आणि कोपर एकदमच फोडून घ्यायचे आहे !
नको क्लास, नको ट्यूशन, नको संस्कार नको छंद वर्ग !
गुणांच्या शर्यतीत मला नाही पळायचय !
नाचू दे खेळू दे बागडू दे मला !
'हाय' म्हणजे काय ते कळू दे माझे मला !
माझ्यातला 'मी' उलगडू दे ना माझा मलाच !
लहानपणी जे जे करायचे ते करू दे ना लहानपणीच !
लहानपणीच लहानपण कळू दे ना मला !
मोठा झाल्यावर मला पण आठवू दे ना लहानपण !
देवा एवढे जरा ऐक माझे, या मोठ्यांनी आमचे लहानपणच लपविले आहे,
स्वत:चे लहानपण पूरेपूर enjoy करूनआम्हाला मात्र तंगविले आहे !
या मोठ्यांनी पकडून ठेवलेले, आमचे हक्काचे,
लहान पण दे गा देवा !

मुलगी झाली हो !

मुलगी झाली हो !

कॉलेजात असताना "मुलगी झाली हो" हे पथनाट्य पाहीले होते. खूपच प्रभावी मांडणी होती. पण मला तरी तो विषय फारसा गंभीर वाटत नव्हता. आम्ही सर्व भावंड लोकशाही वातावरणात वाढलो , मुलगा-मुलगी असा भेद कधी जाणवला नाही, पटत पण नाही. मुलाने मुलासारखे असावे, मुलीने मुलीसारखे, it's all !लग्न झाल्यावर ज्या काही फार कमी मुद्द्यांवर एकमत झाले ते म्हणजे १) दोन मुलं हवीत २) मुल मराठी माध्यमात शिकतील ३) लोकशाही व्यवस्था. मला एकतरी मुलगा हवाच होता, हीला एकतरी मुलगी हवीच होती ! मला मुलगा हवा होता त्याच्याशी मस्ती करायला, मनसोक्त क्रीकेट खेळायला, मोठा झाल्यावर त्याच्या बरोबर ट्रेक करायला ! हीला मुलगी हवी होती तिला नटवायला, थटवायला, छान छान ड्रेस घ्यायला, स्वयंपाक करताना लुडबुड करण्यासाठी, माझ्यावर वचक , नजर ठेवण्यासाठी !पहील्या वेळी अनेक जाणकार सांगत होते की मुलगीच होणार पण झाला मुलगा ! दूसर्या वेळी सर्व लक्षणे मुलाची होती आणि मला टेंशन आले कारण मुलीसाठी अजून एक चान्स घ्यायला बाईसाहेब तयार होत्या ! बर्याच प्रतीक्षेनंतर , दिलेल्या तारखेनंतर ४ दिवस वाट बघून, शेवटी सिझरिंग करून प्रियाका जन्माला आली ! मुलगी झाली हो ! मी प्रथम तीला काचेच्या पेटीत ठेवलेले बघितले तेव्हाही ती माझ्याकडे मुठी वळवून बघत असल्याचा मला भास झाला !पहीली मुलगी धनाची पेटी असे म्हणतात पण दूसरी लेक माझ्यासाठी घबाड योगच घेउन आली ! तिच्या जन्माच्याच वेळेला, चक्क हॉस्पिटलच्या लॉबीत महीना १०,००० रू. चे काम done झाले ते पुढची १० वर्ष चालू होते !तिची skin खूप छान होती, अजूनही आहे ! आईने भरपूर शहाळ्याचे पाणी प्यायलाचा तो म्हणे परीणाम होता. तिच्या अंगावर लव अजिबात नव्हती. पण रंग मात्र सावळा होता. नर्स गमतिने म्हणायच्या "आउस बी गोरी नी बापूस बी गोरा ही काळी पोरगी कोणाची ?"३ महीन्यात तीने चांगलेच बाळसे घरले. माझ्याकडे मात्र ती बिलकूल येत नसे. मी हात लावला, जवळ गेलो की जी टाहो फोडायची की बस रे बस ! हीला सगळी कामे टाकून धावत यायला लागायचे. भटकायला , मस्ती करायला तीला मी हवा असे पण मांडीवर बसणे, जेवण भरवणे, झोपणे या साठी मात्र आईच ! सकाळी सकाळी माझे तोंड बघावे लागले तर टाहो फोडायची ! तू का आधी समोर आलास असा त्रागा करायची ! एकदा मात्र प्रियांकाला सडकून ताप आला, रविवार होता, दवाखाना बंद म्हणून तिला घेउन थेट हॉस्पिटल मधे गेलो. डॉक्टर बोलले अँडमिट करावे लागेल. महीलांचा वार्ड फूल होता म्हणून लहान मुलांच्या विभागात ठेवले , रात्रपाळीची जबाबदारी माझ्यावर आली. तापात सतत चढ-उतार चालू होता, माझा जागता पहारा होता, जरा ताप वाढताच पाण्याने पूसून काढत होतो, तीच्याशी गप्पा मारत होतो, हसवत होतो, अगदी नाईलाजाने ती हे सगळे करून घेत होती ! जागवलेल्या तीन रात्री अगदीच वाया नाही गेल्या, एकदाचे तिने मला accept केले !मग काय , घरी पण ती माझ्याबरोबरच आली. मग सूरू झाली आमची फूलटू धमाल ! माझ्या बायकोने मला जेवढे जोखले आहे त्याहून जास्तच मुलगी मला ओळखून आहे ! तीच्यावर मला हात उचलताच येत नाही, तिच्यापुढे आवाज चढवता नाही कारण त्याआ आधीच ती भोकाड पसरते, अगदी मीच तीला परत उचलून घेईपर्यंत ! बायको हे सगळे मस्त enjoy करते , लेक तुझ्या डोक्यावर मिर्या वाटणार आहे मिर्या असे बजावत असते ! प्रसाद ,मुलगा तटस्थ असतो आणि लेक आणि बायको बहुमत सिद्ध करून माझी अनेक वेळा गोची करतात ! मी कोणते कपडे घालायचे, मीशी काढायची का ठेवायची हे सर्व लेक ठरवते. तिच्या शाळेत कधी जायचा प्रसंग आलाच तर आधीच ठणकावून सांगते, बावळटासारखा यायच नाही, शर्ट ईन करायचा, पट्टा लावायचा, भांग पाडायचा ! एकदा तर मला तुला "काडीचीही अक्क्ल नाही" हे सत्य सांगून मोकळी झाली. आधी मला वाटले हीच बोलली ! दोन्ही मायलेकींचा आवाज फोनवर कमालीचा सारखा येतो ! मी प्रियांका असे म्हटले की फोनवर नेमकी ही असते ! देवा वाचव रे बाबा ! मुलगा स्वभावाने खूपच शांत आहे तर मुलगी भयंकर आक्रमक ! प्रचंड उत्साही, बडबडी ! भरतनाट्यम शिकली आहे आणि t.v. वर नाचाचा कोणताही कार्यक्रम चालू असला की घरी पण समांतर नाच चालू असतो ! मँच t.v. वर बघणे बहुदा आता इतिहासजमाच होणार आहे. प्रसाद थोडासा आईसारखा दिसतो तर प्रियांका माझ्यासारखी. पण तीला नुसते म्हणून बघा, काय चवताळते ! मी माझ्या आईसारखीच दिसते हे ठासून सांगेल! माझ्यावर घारीसारखी नजर असते. बहुतेक बरोबर येतेच. स्कूटरचा स्पीड जरा ४० च्या वर गेला की तंबी मिळते. वाटेत मल कोण भेटले, मी कोणाकडे बघितले, माझ्याकडे कोण बघत होते--- अगदी साद्यंत अहवाल गेल्या गेल्या गृहमंतत्र्यांना सादर होतो. कधी कधी खुलासा पण द्यायची पाळी येते ! पेपी घेते पण रीपोर्ट लिक करत नाही. जे घडले ते सांगतेच ! तर अशी ही माझी लेक, तिला मी लाडोवा, जयसूर्या (डावरी बँटींग करते म्हणून), धडाकेबाज, दांडगोबा याच नावाने हाक मारतो. एकदा बायको बोलली की या लाडोबाचे लग्न तरी करून देणार ना ? तर मी ठरवलय, मुलाला घरजावई म्हणून पाठवायचा आणि लाडोबाला घरजावईच आणायचा ! तेव्हा मित्रांनो, 'मुलगी झाली हो' असा टाहो फोडायची काही गरज नाही ! तशी बायको आपल्यावर अधिकार गाजवत असतेच, त्यात लेकीची भर ! म्हणतात ना 'एकसे भले दोन' !

हाती काय लागले ?

हाती काय लागले ?
गेली १६ वर्ष मी सलग संगणक विभागात कार्यरत आहे. मुंबई गोदीत संगणकयुग आणण्यात मोलाची कामगिरी केली पण कामाचे मोल झाले का ? कदर झाली का ?संगणक विभाग जेव्हा सुरू झाला तेव्हा बाहेरची अनेक प्रलोभने सोडून त्यात काम करायला कोणी तयार नसायचे. धरून आणलेली माणसे चष्मा आहे, A.C. बाधतो अशी कारणे सांगून लवकरात लवकर कटायला बघायची. नवा आलेला माणूस काम शिकायलाच ३ महीने घ्यायचा व तो पर्यंत त्याची जाण्याची वेळ आलेली असायची. संगणकीकरणाला छुपा विरोध होताच, याने आपली नोकरी जाईल ही भीती होतीच ! शेख साहेबांसारखे खंबीर अधिकारी होते म्हणूनच आम्हाला पाठबळ मिळाले व उघड विरोध कोणी केला नाही. संगणकाची गाडी रूळावर आल्यावर मात्र अनेक जण काम करायला पुढे होउ लागले. मग मराठेच तिकडे सलग एवढी वर्षे कसा, त्याचा त्यात काय interest आहे , अशा विचारणा होउ लागल्या. कुजबुज मोहीम आमची वार्षिक बदली व्हायची तेव्हा तीव्र व्हायची. अनेक दावेदार पुढे यायचे पण मग 'ये अपने बस की बात नाही' हे समजल्यावर दूसर्याच्या खांद्यावर बंदूक ठेवली जायची. वरीष्ठांकडे खोट्या-नाट्या तक्रारी जायच्या ! माझ्या वर माझ्या वरीष्ठांचा पूर्ण विश्वास होता आणि मी जबरदस्त results देत असल्याने निर्धोक असायचो. मला मूदतवाढ मिळायचीच. सलग १२ वर्ष हा उंदीर-मांजराचा खेळ चालल्यावर मीच कंटाळलो. नवीन प्रणाली आल्यावर जे प्रोग्रँमर होते त्यांनाच काही काम उरले नव्हते तर आमची काय कथा ! पण बदली झाली ती पण दूसर्या संगणक विभागातच. तिथलीही बरीच कामे online केली. तिथेही एकदा मुदतवाढ मिळाली. त्यानंतर कामगारांच्या विभागातील संगणकीकरणावर २ वर्ष काम केले व परत मूळ जागी आलो आहे. एक वर्तूळ पूर्ण झाले आहे !शिकायला तर भरपूर मिळाले. स्वत:वरचा विश्वास वाढला. माझ्यातच द्डलेल्या अनेक सुप्त गुणांची मलाच नव्याने ओळख झाली. एरवी कधी ज्यांच्यासमोर जायचीही भीती वाटायची त्या अधिकार्यांबरोबर चांगला परिचय झाला. Employess Son म्हणून नोकरी लागली होती, सगळे ज.गो.मराठे यांचा मुलगा म्हणून ओळखायचे. कोठेतरी मनात सल, खंत होती. संगणक विभागात काम केल्यामुळे 'एकनाथ मराठे' हे नाव गोदी विभागात सर्व-परिचीत झाले. आता मला कोणी ज.गों. चा मुलगा असे न म्हणता याने गोदी विभागाचे संगणकीकरण केले असे ओळखू लागले. एरवी आमच्या विभागाचे दूसर्या विभागांशी सख्य कधीच नसायचे पण कामाच्या निमित्ताने सर्व विभागातील लोकांशी चांगला परिचय झाला, काही जीवाभावाचे मित्र मिळाले ! तेव्हा मी समाधानी आहे पण कधी विचार येतो हेच काम जर आपण एखाद्या खाजगी कंपनीत केले असते तर आज आपण कोठे पोचलो असतो ? संगणक विभागात दाखल झालो तेव्हा मी टँली-क्लार्क होतो. त्यानंतर 'सब घोडे बारा ट्क्के' याच न्यायाने दुय्यम श्रेणी लिपिक झालो, अजूनही तोच आहे ! पगारात एका पैचीही वाढ मिळाली नाही ! १५ ऑगस्ट व २६ जानेवारी येतात आणि त्याच्या बरोबरच एखादा सन्मान मिळायची आशा सुद्धा मावळते. सरकारी यंत्रणेत सर्वस्व झोकून काम करणार्याची कशी कुचंबणा होते त्याचे हे मासलेवाईक उदाहरण आहे. गंमत म्हणजे अनेक वर्ष पाट्या टाकणारे सुद्धा म्हणतात की कशाला खपायचे, मराठे करून घ्यायचा आहे का ?जाउ दे - गीता कधी काळी वाचली होती, फार नाही, पण 'आपण कर्म करत रहावे, फळाची अपेक्षा करू नये' हे मात्र चांगले उमगले आहे !

नोकरी जायचे प्रसंग !

नोकरी जायचे प्रसंग !
गोदी विभागात काम करताना दूसर्यावर विश्वास हा ठेवावाच लागतो पण विश्वासघात करणारे पण तुम्हाला भेटतातच. निव्वळ नशीब चांगले असेल आणि पुर्व-चरीत्र चांगले असेल तरच तुम्ही यातुन सूटू शकता, अन्यथा तुरूंगात पण रवानगी होउ शकते !आमच्या अनेक कामांपैकी एक जोखमीचे काम म्हणजे शेड मध्ये पडून असलेला माल गोदामात हलविणे. यात जराही हयगय चालत नाही. गाडी भरताना समोर उभे राहून मालाची सद्यस्थिती, मोजदाद करून loading sheet बनवायची असते. त्या गाडीबरोबर escort म्हणून जावे लागते. गोदामात तो माल खाली झाला की मगच सूटका होते. अशाच एका आधी केलेल्या कामाच्या संदर्भात चौकशीकरता मला बोलावले गेले. loading sheet दाखवून सही माझीच आहे का विचारले गेले. सही माझीच होती. ball bearing चे काही खोके मी warehouse केले होते. त्याच्यावर मी remark पास केला होता "REPACKED AFTER CUSTOM EXAMINATION". शेडच्या कारकूनाच्या सांगण्यावरून मी तो remark लिहीला होता पण त्याने मला सरळ सरळ फसवले होते. मी खरतर custom forwarding register बघून त्याची खातरजमा करायला हवी होती. आयातदारचा एजंट जेव्हा माल सोडवायला आला तेव्हा त्याला त्या खोक्यात कमी माल आढळला. आता तो पोलीस तक्रार करणार होता आणि मी चांगलाच अडकणार होतो. मी यात निर्दोष आहे अशी खात्री असलेल्या एकाने एजंटाला तक्रार न करता माल सोडवायला सांगितले. साधारण १५ दिवस बरीच भवती न भवती होउन तो माल तक्रार न करता सोडवला गेला व माझा जीव भांड्यात पडला !असेच एकदा warehousing ची गाडी भरून झाल्यावर मी loading sheet बनवायला घेतली होती. त्याचवेळी शेडचा निरीक्षक सांगू लागला की अजून एक जड पेटार तुझ्या गाडीत भरला आहे तेव्हा त्याची पण नोंद कर. मला आश्चर्य वाटले कारण गाडी escort समोरच भरायची असते. मी विचारले आत काय आहे ? माहीत नाही ! पेटीवर मार्क काय आहे ? ताज महाल हॉटेल ! मला वेगळीच शंका आली. नक्की आता दारूचे क्रेट असणार आणि ते सुद्धा या लोकांनी फोडून चोरले असणार ! मी ठामपणे सांगितले मला पेटी बघायची आहे. शेडचा स्टाफ सांगू लागला की पेटी जड आहे, ती आता खाली काढता येणार नाही व आता आपल्याकडे fork lift पण नाही. आमच्यावर विश्वास ठेव, गडबड काहीही नाही. पण मी हट्टाने गाडीवर चढलो. त्या पेटीला एका बाजूने भगदाड पाडून आतला काही माल लंपास केला होता ! मी सांगितले मी damaged , content exposed चा remark घेउनच warehousing करीन ! त्यांनी झक मारत ती पेटी खाली उतरवली. जर मला हे कळलेच नसते तर माझ्यावरच भलता आळ आल असता.कधी कधी दूसर्याला वाचवायच्या नादात आपणच गोत्यात कसे येतो त्याचे हे मासलेवाईक उदाहरण आहे. तिसर्या पाळीत माझ्यासमोर जहाजातून रेल्वे रूळ उतरवले जात होते. अंधूक प्रकाश व जहाज रिकामे होत आल्यामुळे बरेच वर आले होते, त्यामुळे रात्री ३ च्या सुमाराल एक sling निसटून जहाज व धक्का यांच्या मधल्या पोकळीत पडले. मोठा आवाज झाला व झोपलेला सगळा सुपरवायजरी स्टाफ धक्क्यावर आला. याचा त्यांना जाब द्यावा लागला असता पण सर्वानुमते हे प्रकरण दाबून टाकायचे ठरले. मी पण गप्प राहीलो. ५ दिवसांनी जिकडे हा प्रकार घडला त्याच्या प्रमुखाने मला तातडीने चौकशीकरता बोलवून घेतले. त्याच्या केबिनच्या बाहेर सर्व 'संबंधित' मंडळी गंभीर चेहर्याने जमली होती. मी जर गळपटलो तर त्यांना ते भारी पडणार होते. आत शिरल्या शिरल्या साहेबाने मला विचारले की तुझा कोणता report करू ? कामावर असताना झोपा काढता म्हणून की रूळ पाण्यात पडून सुद्धा गप्प राहीलात म्हणून ? मी क्षणात सावरलो व ठामपणे सांगितले की तुमचा 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' थाटाचा आरोप मला साफ अमान्य आहे. मी संपूर्ण shift जागा होतो, माझ्यासमोर, माझ्या shift मध्ये असा कोणताही प्रकार घडलेला नाही. dredging करून जर रूळ मिळाले तरी ते माझ्या shift मध्ये पडले असे कसे म्हणता येइल. तुम्ही ज्या surveyor च्या report वरून चौकशी करता आहेत त्याच्या वरची तारीख प्रसंग घडून गेल्यावर दोन दिवसानंतरची आहे. असे का ? माझा युक्तीवाद अगदी बिनतोड होता. पुढे मी हे ही सांगितले की मला लेखी मेमो द्या, मी हे सर्व लेखी द्यायला तयार आहे ! सूटलो ! सगळ्यांनी माझे अगदी मनापासून अभिनंदन केले पण त्या अधिकार्याने माझ्यावर अजूनही डूख धरलेला आहेच !

'ते' तिघे !

'ते' तिघे !

संगणक विभागात काम करताना जे अफाट यश मिळाले ते अर्थातच एक team work होते ! आमच्या विभागाचे प्रमुख होते श्री. रियाज शेख, सहायक गोदी प्रबंधक (आता उप-पबंधक आहेत) तर श्री. विनोद भोज programmer होता (आता त्यांच्या विभागात सहायक अधिकारी). या दोघांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला आहे, (तसेच तिसरा श्री. नितीन बने ) यांच्या कडून भरपूर शिकायला मिळाले, मी त्यांचा ऋणी आहे !
श्री. शेख हे यांचा अतिषय कडक शिस्तीचे अधिकारी असा लौकीक आहे. गोदी मध्ये तिसर्या पाळीत असताना ते आमच्या झोपण्याच्या वेळेतच येत आणि चांगलेच खडसावत. येताना ते जीप लांब उभे करीत व थोडे अंतर पायी चालत येत, त्यामुळे जागे असलेले सुद्धा झोपलेल्यांना जागे करू शकत नसत ! अशा अधिकार्याबरोबर काम करायचे म्हणजे मी आधी धास्तावलोच होतो आणि तो पर्यंत कोणा अधिकार्या समोर जायचा प्रसंग सुद्धा आला नव्हता. उगाच कशाला गाढवाच्या पाठी आणि साहेबाच्या पुढे जा ? पण जसे जसे कामाचा व्याप वाढू लागला, त्यांच्या बरोबर अधिकाधिक संबंध येउ लागला व त्यांच्यातले अनेक गुण समजू लागले. त्यांची निर्णयशक्ती अफाट आहे, drafting जबरदस्त आहे, नियमांचे नेमके ज्ञान आहे, स्मरणशक्ती दांडगी आहे, एकदा फोनवर ऐकलेला आवाज ते कायम लक्षात ठेउ शकतात, नालायकातल्या नालायक माणसाकडून कसे काम करून घ्यायचे हे त्यांना चांगले ठाउक आहे. हग्या दम कसा द्यावा हे त्यांच्याकडून शिकावे तसेच चांगल्या कामाचे कौतुक करण्यात पण ते कमी पडत नाहीत ! त्यांच्या व्यक्तीमत्वाचा माझ्यावर प्रभाव पडला व पुढे सगळ्या विभागाचा भार सांभाळताना अडचणी आल्या नाहीत. ते चांगले सहा फूट उंच आहेत, गोरेपान, देखणे आहेत. कामचूकार , खोटारड्या माणसाला त्यांच्या समोर जायला भीती वाटावी अशी जरब त्यांच्या नजरेत आहे पण एकदा का त्यांचा विश्वास तुम्ही जिंकलात की त्यांच्या सारखा सुह्र्य दूसरा कोणी नाही. त्यांच्यात करडया अधिकार्याबरोबरच एक मस्त मिष्कील, खट्याळ इसम दडलेला आहे. इंग्रजी वरचे त्यांचे प्रभुत्व वादातीत आहे. अनेक नियतकालीकांत प्रसिद्ध होणारे त्यांचे व्यवस्थापन या विषयावरचे लेख, ललीत लेख वाचनीय असतात. एकदा निर्णय घेतल्यावर त्याच्या चांगल्या-वाईटाची जबाबदारी ते स्वत:वर घेतात, निर्णयाशी ठाम राहतात, मी असे आदेश दिलेलेच नाहीत म्हनून हाताखालच्या माणसांना कधीही उघडे पाडत नाहीत ! एकदा guide lines ठरवून दिल्यावर कामात अवाजवी हस्तक्षेप ते कधीही करत नाहीत.त्यांच्या सारखा धडाडीचा अधिकारी सुरवातीलाच मिळाला म्हणूनच गोदी विभागाचे संगणकीकरण सूरळीत पार पडले. विरोध अनेक प्रकारे झाला पण तो त्यांनी खंबीरपणे मोडून काढला. माझ्या पाठीशीपण प्रत्येक प्रसंगात ते ठामपणे उभे राहीले त्यामुळे विरोधासाठी विरोध मला झाला नाही.अशा अधिकार्याबरोबर काम करायला मिळाले, गोदीच्या संगणकीकरणात स्वत:ची छाप पाडता आली, हे मी माझे भाग्यच समजतो !

आमचा programmer विनोद भोज हा एक टीपिकल गुजू आहे. सडसडीत बांध्याचा, उंच, उभट चेहर्याचा, soft spoken, true gentleman ! तसे तो इनडोअरचा व मी आउटडोअरचा , दोन्ही विभागाच्या माणसांना परस्परांविषयी प्रचंड अविश्वास, असूया, पण आमच्या बाबतीत असे कधीही घडले नाही. पहील्या भेटीतच आमचे tuning जमले आणि पुढची १० वर्षे शब्दश: खांद्याला खांदा लावून काम केले ! विनोद VJTI च्या पहील्या बँच चा MCA आहे. गोदी विभागाचे संगणकीकरण करण्याची जबाबदारी त्याने अक्षरश: एक हाती पार पाडली आहे ! त्याचा कामाचा झपाटा विलक्षण आहे. टापटीप, नीटनेटकापणा हे गुण त्याच्या बरोबर काम केल्याने माझ्यात थोडेफार आले. त्याला चिडलेला मी कधी बघितले नाही. कोणत्याही प्रसंगात तो डोक्यावर बर्फ ठेवल्यासारखा कसा राहू शकतो याचे मला राहून राहून आश्चर्य वाटते. तसा हुद्द्याने मी त्याला बराच कनिष्ठ होतो/ आहे पण तसे त्याने मला कधीही जाणवू दिले नाही. मी त्याला अनेक गोष्टी, बदल सूचवले आणि ते पटल्यावर कोणतीही खळखळ न करता त्याने अमलात आणले. आमच्या कामात नियमापेक्षा अपवादच जास्त आणि अशा कामांचे संगणकीकरण हे तसे किचकटच काम पण माझी कामाची जाणकारी व त्याचे त्याच्या क्षेत्रातले ज्ञान यांच्या युतीने एक अतिषय अवघड काम सोपे झाले.माझ्या विभागाची सर्वसाधारण शैक्षणिक पात्रता दहावी पास असल्यामुळे प्रोग्रँम युजर फ्रेंडली असावे या साठी मी कायम आग्रही असे आणि त्या साठी मी कधी कधी टोकाचा आग्रह धरत असे. COBOL च्या अनेक मर्यादा आहेत पण त्यातूनही त्याने युजर फ्रेंडली प्रोग्रँम बनवायचा चांगला प्रयत्न केला. मला थोडेबहुत प्रोग्रँम करता येउ लागल्यावर त्याने नि:संकोच सर्व डाटा फाईलची स्ट्रक्चर मला समजावुन सांगितली. छोटे मोठे प्रोग्रम लिहायला मला उत्तेजन दिले, केल्या कामाचे कौतुकही केले. पुढे पुढे house keeping मध्ये ही मी तरबेज झालो. माझ्यामुळे त्याला रोजच्या कामापासून सूटका मिळाली. unix च्या अनेक कमांड / short cuts त्याला माहीत होते व पाठी उभा राहून शिकवायचे काम तो मनापासून करायचा. आजही आम्ही बरोबरच आहोत पण वेगळ्या project वर, पण काहीही समस्या आल्यास मी त्याला अजूनही त्रास देतो !

समुद्रात जशी अनेक रत्ने असतात तशी आमच्या मुंबई बंदरात अनेक नर-रत्ने आहेत. काही अप्रकाशित, काही तावून-सुलाखून उजळून निघालेली. सगळीच रत्न जरी बहूमूल्य असली तरी त्यातही कोहीनूर एकच असतो. श्री. नितीन बने उर्फ बन्याबापू, आमचा प्रोग्रँमर ( आज्ञावलीकार ?) हा खरच हिरा आहे हिरा ! स्वत:च्या बुध्दीमतेवर संगणकावर त्याने मिळवलेले प्रभुत्व वादातीत आहे. त्याला जेवढ्या संगणकाच्या भाषा येतात तेव्हढ्या खचितच दूसर्या कोणाला येत असतील. यातली कोणतीही समस्या तो चुटकीसरशी सोडवतो. तो असला की कोणी manual उघडायचे कष्ट घेत नाही कारण तोच एक चालते बोलते manual आहे ! खरतर हा अजून आमच्याकडे कसा याचेच मला राहून राहून आश्चर्य वाटते.तसा त्याचा आणि माझा कामानिमित्त संबंध यायचे पहीले १० वर्ष काही कारणच नव्हते. गोदीतल्या कामगारांची हजेरी, त्यांचा पगार, त्यांच्यासाठी असलेली प्रोस्ताहन योजना अशी सगळी किचकट कामे त्याच्याकडे होती. मी cargo tracking टीम मध्ये होतो. युनिक्स च्या शेल कमांड वापरून मी काही चिल्लर प्रोग्रँम लिहीले होते. awk चा माझा थोडाबहुत परीचय झाला होता. बन्याबापू त्यातही पारंगत होता ! अशीच एका awk प्रोग्रँम संबंधीची काही समस्या मी त्याला विचारली आणि बापूंनी माझे जीवन awkमय करून टाकले. त्याची एक खास लकब आहे. त्याच्या कडे काही समस्या नेली की तो आधी काय अगदी सोपे आहे, जरा नीट बघ ना म्हणणार. मग हळूच आपला प्रोग्रँम t1 , t2 किंवा nit1 या नावाने कॉपी करणार, त्याची पार चिरफाड करणार, किती लिहीता रे असे म्हणणार. आणि मग समस्या समाधान !प्रोग्रँम जणू त्याच्याशी बोलतो ! त्याला काय प्रोब्लेम आहे ते सुद्धा अनेक वेळा सांगावे लागत नाही.अतिषय मितभाषी , पण जे बोलणार त्यात ठामपणा, बोलताना कोणाचीही भीडभाड बाळगणार नाही. कामाला वाघ. सलग एका जागी बसून काम उडवायची अजब क्षमता !संगणकावर त्याचे सतत काही प्रयोग चालूच असतात. स्वत:चे ज्ञान तो कायम अद्ययावत ठेवत असतो, आपल्या बरोबरच्यांनाही सतत मदत करत असतो. माझा कार्गो मधला अवतार संपल्यावर त्याने ज्या विभागाचे प्रोग़्रम लिहीले होते तिथे माझी बदली झाली. बापूंची प्रतिक्रीया होती "तुझी बदली मीच रद्द करतो, नाहीतर माझे काही खरे नाही !"आणि खरंच २ आठवस्यातच अनेक सुधारणा करण्यासाठी मी त्याचा पिच्छा पुरविला ! खरतर गेली १० वर्ष ते प्रोग्रँम वापरात होते, तो स्वत: सुद्धा दूसर्या अनेक व्यापात गळ्यापर्यंत बुडाला होता. तरीही त्याने मला रोज संध्याकाळी ४:३० च्या पुढची वेळ दिली. प्रसंगी ७ वाजेपर्यंत थांबून त्याने मी जे जे सांगितले ते ते मला करून दिले, ते ही अवघ्या ४ दिवसात, माझ्या समोरच ! एरवी याच कामाला कोणी हातही लावला नसता ! खरंच , तो gr8 आहे !तसा माझ्यामुळे त्याला शेयरचा नाद लागला, गुण नव्हताच पण वाण मात्र लागला. मग बापू या ही भानगडीत अखंड बूडाले. शास्त्रोक्त अभ्यास का काय तो केला त्याने. मग chartist बनून तो आता आम्हालाच टीप देत असतो !मध्ये मी त्याच्या मुलीकरता काही भन्नाट गेम कॉपी करून दिले. काल माझी त्याने चांगलीच फिरकी घेतली. तुझ्या गेमने माझा गेम झालाय. बायकोच तासंतास खेळत बसते. नसती भानगड माझ्यापाठी लावून दिलीस !हल्लीच त्याला त्यांच्या विभागात सहायक प्रबंधक म्हणून बढती मिळाली आहे. त्याला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा !