मंगळवार, २२ जुलै, २००८

टी.सी. किंवा तिकीट तपासनीस !

टी.सी. किंवा तिकीट तपासनीस !

लोकलने प्रवास म्हटले की तिकीट तपासनीसाशी गाठ पडणारच. का कोण जाणे खिषात तिकीट असो नसो हा काळ्या कोटातला प्राणी समोर दिसला की मला धडकीच भरते ! मी जेव्हा जेव्हा कोणत्याही कारणाने विना-तिकीट प्रवास केला आहे तेव्हा तेव्हा मला टीसीने हमखास पकडलेच आहे ! एकदा तर एक पाय स्टेशनच्या आत, एक बाहेर अशा स्थितीत पकडले आहे. अर्थात तेव्हा दंडाची रक्कम मामुली असल्यामुळे काही विशेष वाटत नसे. आता दंड २५० ते ५०० झाला आहे पण स्मार्ट कार्ड , कूपन्स खिषात सदैव असल्यामुळे बचावलो आहे. तसा माझा पनवेल ते व्ही.टी. पास असल्यामुळे या रूटवर काहीच भीती नाही. टी.सी. समोर उभा असेल आणि त्याने आपल्याला पास, तिकीट विचारले नाही तरी वाईट वाटते ! उगीच तिकीट काढले असे वाटते किंव आपल्याला तो अगदीच 'हा' समजला याचेही वाईट वाटते. जर अडवले तर माझ्यासारख्या जेंटलमनलाच हे अडवतात म्हणून रागही येतो !

पहील्यापासूनच मी तिमाही पास काढतो आहे . का ? तर दर महीन्याला विसरण्यापेक्षा निदान तीन महीन्याने तरी विसरेन म्हणून ! आधी बराच काळ माझा पास संपल्याचे मला टी.सी. ने पकडल्यावरच कळायचे. पुढे मोबाईल मध्ये रिमाईंडर लावणे आणि सध्या ऑनलाईन पास काढायची सोय यामुळे सरकारी खजिन्यात माझ्याकडून होणारी भर थांबली आहे ! पास संपला असेल आणि माझ्या ते आठवणीतही नसेल तर मी अगदी आठवडा आठवडा प्रवास 'असाच' केला आहे. पण कधीतरी प्रवास चालू असतानाच ते ध्यानात यायचे आणि मग मात्र भीती वाटायची. फलाटावर उतरल्यावर टी.सी. ला टाळण्यासाठी मी ज्या ज्या गोष्टी करायचो त्याचा नेमका उलट परीणाम व्हायचा व मी त्यांच्या जाळ्यात बरोबर सापडायचो ! टी.सीं ना एक नजरेत आपला पास कधीपर्यंत वैध आहे आणि कोठून-कोठपर्यंत, कोणत्या रूटचा हे कसे समजते ? कमाल आहे नाही ! मी कॉटन ग्रीन वरून वडाळ्याला शीफ्ट झालो तेव्हा टीसी मला हमखास वडाळ्याच्या पुलावर हटकायचा व मी पास त्याच्या समोर धरल्यावर जाउ द्यायचा. असे एक आठवडा चालले होते आणि गंमत म्हणजे माझा पास एक आठवड आधीच संपला होता ! टीसीत पण माझ्यासारखे वेंधळे असतात तर !

टीसीच्या खमकेपणाचा अनुभव मला उत्तर भारताची सहल करताना आला. कोणीतरी छोटा टूर ऑपरेटर होता व आम्ही अगदी शेवटच्या क्षणी जॉईन झालो होतो. आयोजकाने आम्हाला रेल्वेची तिकीटे दिली व टीसी आल्यावर काय नाव सांगायचे ते ही सांगून ठेवले. त्या दिवशी टीसींचे विशेष पथक तपासणीकरता आले होते. आमचे तिकीट बघून त्याने प्रभु कोण एवढेच विचारले. प्रभु नावाचा होता प्रत्यक्षात करंजेकर, कोळी जातीचा ! टीसी ने त्याला नखशिखान्त न्याहाळले व ठामपणे मराठीत बोलला की तुम्ही प्रभु असूच शकत नाही ! त्याने उसना आव आणून मीच प्रभु आहे असे सांगितले. त्यावर त्याने चक्क आपल्या मुलाची शप्पथ घे आणि सांग असे सांगितले ! आता मात्र कोळी लटपटला. शपथेवर काही तो सांगू शकला नाही. गुमान दंड भरावा लागला ! जाताना तो टीसी म्हणाला खोटे वागताना पण काही अक्कल लावावी, हे (माझ्याकडे बोट दाखवून !) प्रभु म्हणून थोडेफार तरी खपले असते, थोडेतरी गोरे आहेत ! पण प्रभु या कारवारी आडनावाचा माणूस कोळ्यासारखा काळा असूच शकत नाही !

वडाळ्याला असताना माझा प्रथमवर्गाचा पास होता. प्रथमवर्गाचा प्रवास enjoy करता येतो तो फक्त हार्बरवरच ! कारण या मार्गावर प्रथम वर्गात फारशी गर्दी केव्हाच नसते ! चालत्या लोकलमध्ये टी.सी. फारसे शिरत नाहीत याचा गैरफायदा अनेक जण घेतात. रेल्वेचे कर्मचारी सुद्धा युनियनचे कार्ड दिसेल अशा बेताने खिषात ठेउन बिनदिक्कत प्रथमवर्गाने प्रवास करत असतात. असाच एक तरूण प्रथमवर्गात अगदी खिडकीजवळ बसला होता. पुढच्या सीटवर पाय पसरून व बाजूच्या सीटवर स्पोर्ट कीट ठेउन स्वारी आरामात बसली होती ! टीसी आल्यावर त्याने आधी दादच दिली नाही पण टीसी खमक्या असावा. तो त्याच्या समोर उभाच राहीला. मग त्याने सर्व शोधल्यासारखे केले व चेहरा पाडून 'मेरा फर्स्ट क्लास का quarterly पास है, घर भूल गया शायद' असे सांगू लागला. टीसी बोलला की मग दंड भर ! बराच वेळ हुज्जत घालून तो तरूण दंड भरण्याकरता माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगू लागला. नाटक अधिक चांगले वटावे म्हणून त्याने आपले सर्व खिसे उलटे करून दाखविले आणि इथेच गडबड झाली ! त्याच्या खिषातुन कार्ड तिकीट खाली पडले. ते टीसीने लगेच उचलून बघितले तर ते दूसर्या वर्गाचे नुकतेच काढलेले तिकीट होते. पास आहे तर तिकीट का काढलेस या प्रश्नावर त्या तरूणाकडे उत्तर नव्हते ! टीसी ने त्याला मानगुटीला धरूनच खाली उतरवले !

एकदा मी वडाळ्याला धावतपळत दूसर्या वर्गाचा डबा कसाबसा पकडला. शिवडीपर्यंत लटकत गेलो व मग प्रथमवर्गाच्या डब्यात आसनस्थ झालो. गाडी सूटतानाच एक जण जीवाच्या आकांताने धडपडत त्या डब्यात शिरला ! तो टी.सी होता ! इतर कोणालाही काहीही न विचारता तो थेट माझ्यासमोर पावती-पुस्तक घेउनच उभा राहीला. भरा फाइन ! मी म्हटले पण का ? तर म्हणे मी तुम्हाला दूसर्यावर्गातुन पहील्या वर्गात घुसताना बघितले आहे ! मी शांतपणे प्रथमवर्गाचा तिमाही पास त्याच्या अगदी डोळ्यासमोर धरला. त्यानेही तो डोळे फाडफाडून बघितला व मला परत केला ! अख्खा डबा त्याला हसू लागला. खजिल होउनच तो खाली उतरला ! गंमत म्हणजे चार तरूणांचे टोळके टीसी आत शिरल्यावर धास्तावले होते, ते अनायसेच वाचले !

आता पासाबरोबर रेल्वेने दिलेले फोटो असलेले ओळखपत्र बाळगावे लागते पण पासावर आधी नुसती सही व नाव असायचे. एकाच कुंटुंबातले , मित्र असलेले, कार्यालयातले अनेक जण एकाच पासावर प्रवास करून त्याचा गैरफायदा घ्यायचे. हेच थीम एका मालीकेत मस्त वापरले होते. चार मुले व त्यांचा बाप , सगळ्यांची आद्याक्षरे 'प' वरून, एकाच पासावर प्रवास करत असतात ! असेच एके दिवशी दूपारी घरात सगळ्यांच्या बायका असताना रेल्वे पोलीस येतो व तुमच्या कुटंबातला 'प्' या आद्याक्षराचा कोणीतरी रेल्वे अपघातात मेला आहे. आम्ही पासावरून या पत्त्यावर आलो. ओळख पटवून प्रेत घेउन जा असा निरोप देतो ! त्या बायांवर आभाळच कोसळते ! आपला नवरा जिवंत असावा, दूसरीचा मेला असावा की -- ? या विचाराने त्या आशा-निराशेच्या अजब खेळात सापडतात ! एवढयात सासरा , प्रदीप नावाचा घरी येतो, त्याची बायको सूटकेचा निश्वास टाकते व चारी सुनांना धीर देउ लागते ! असेच मग प्रशांत, पवन व पकाश घरी येतात व मग त्यांच्याही बायका सूटतात व प्रवीण या सर्वात धाकट्याच्या बायकोचे सांत्वन करू लागतात. थोडा उशीराने प्रवीण पण सुखरूप घरी येतो व घरातल्या सूतकी वातावरणाचे त्याला कारण समजते. त्याने आपल्याकडचा पास त्याच्या प्रमोद नावाच्या मित्राला दिलेला असतो !

सोमवार, २१ जुलै, २००८

कळ , दाबायची आणि वाजवायची !

कळ , दाबायची आणि वाजवायची !

हिला दूसर्या बाळंतपणात, सातव्या महीन्यापासून अतिरक्तदाबाचा त्रास होउ लागला होता. वडाळ्याला असताना, मुंबई बंदराचे सुसज्ज रूग्णालय माझ्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर होते त्यामुळे रूग्णालयात दाखल केले नव्हते पण आठवा महीना लागला आणि डॉक्टरांनी सक्तीने दाखल करून घेतले. माझी बहीण पारल्याला राहते. जेवायला मी तीच्या घरी जाउ लागलो. असेच जेवण करून गप्पा चालल्या असताना रूग्णालयातुन फोन आला व मला ताबडतोब बोलावून घेतले गेले. बाळाचे ठोके कमी पडत होते. सिझरींग करावे लागल्यास माझी सही लागणार होती. मी लगेच निघालो.

साधारण अकराच्या सुमारास रूग्णालयात पोचलो. विभागात गेल्यावर कळले की बायकोला लेबर रूम मध्ये शिफ्ट केले आहे. मी लगेच तिकडे निघालो. त्या विभागाचे दार बंद होते. बाहेर लाल अक्षरात शुद्ध मराठीत पाटी होती , "कळ दाबून धरा, आगंतुकाला प्रवेश नाही". आत सगळ्याच महीला असणार तेव्हा आत जाण्यावर निर्बंध असणे साहजिकच होते, बाळंतपणातल्या कळा ऐकुन माहीत होत्या त्यामुळे ती सूचना वाचून त्याही स्थितीत हसू आले ! आत जायचे नाही तर मला बोलावले तरी कशाला होते ? मी आपला काळजीने बाहेर येर-झारे घालत बसलो होतो. रूग्णालयात एरवीही वातावरण गंभीरच असते, रात्री तर ते भयाण वाटत असते. डॉक्टर आणि सिस्टर त्या विभागातुन सतत धावपळ करत होत्या, मी अनेक वेळा त्यांचे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत होतो पण व्यर्थ !

साधारण दोनपर्यंत भयंकर तणावाखाली काढले. दोन नर्स डॉक्टरांना विभागाबाहेर पोचवायला आल्या होत्या. परत जाताना त्यांचे बोलणे कानावर पडले, "काय पण एकेक निष्काळजी नवरे असतात, फोन करूनही येत नाहीत म्हणजे काय ? बायकोची काही काळजीच नसते यांना". आता मात्र मी त्यांना आडवाच गेलो. म्हटले मलाच फोन आला होता, मी इकडे रात्री अकरा पासून आहे, तुम्हीही मला बघितले असेलच. बायको कशी आहे माझी आता ? त्या काहीही न बोलता मला मुख्य नर्स कडे घेउन गेल्या. तिने बायकोला हाक मारली. ती सुद्धा आली. आताच डॉक्टर तपासून गेले, सगळे व्यवस्थित आहे, सध्या तरी सिझरींगची गरज नाही.हे समजल्यावर जीव भांड्यात पडला. सगळ्या नर्स जमा झाल्यावर म्हणू लागल्या , तुमचीही कमाल आहे, इतका वेळ बाहेर का थांबलात ? तुम्ही कळ का नाही दाबली ? बाहेर बोर्ड आहे ना ? मग ? असे म्हणताना त्यांनी बेल दाबल्याचा अभिनय करून दाखविला ! आता माझी ट्यूब पेटली. मी म्हणालो तुम्हाला कळ म्हणजे बेल असे म्हणायचे आहे का ? मी समजलो --- ! मला कोणती कळ वाटली हे त्या नर्सना समजायला फारसा वेळ लागला नाही. आता हसून हसून त्यांच्या पोटात कळा आल्या. एक नर्स तर बोलली की हा किस्सा आपण लेबर रूम मधल्या बायकांना ऐकवूया, मग कळा येण्यासाठी इंजेक्शन देण्याची गरज पडणार नाही !


अजूनही तो बोर्ड तिकडे 'तसाच' आहे !

रविवार, २० जुलै, २००८

आम्ही सारे खिलवय्ये !

आम्ही सारे खिलवय्ये !


माझे बाबा ज्योतिषि, किर्तनकार, प्रवचनकार, लेखक, कवी, समाज सुधारक, कथाकार, मोडीचे अभ्यासक, गीतेचे अभ्यासक, संस्कृतचे अभ्यासक, चित्रकार, मुर्तीकार अशा अनेक गुणांनी ओळखले जातात. लाज वाटते सांगायला पण यातला अगदी एकही गुण, वारसा ,माझ्यात आला नाही. बाबांचा फक्त एकच गुण मात्र माझ्यात पुरेपुर उतरलेला आहे तो म्हणजे खिलवणे ! अगदी लहान असल्यापासून बाबांना मी लोकांना सढळ हाताने खायला घालताना बघत आलो आहे. घरी काही केले असले म्हणजे सोबत कोणी मित्र नसेल तर त्यांच्या गळ्याखाली घास उतरतच नाही. या वरून आईशी त्यांचे अजूनही खटके उडतात. 'यांनी घ्रर म्हणजे अन्नछत्र करून ठेवले आहे' असे आई कायम म्हणते खरी पण आतापर्यंत बाबांचा शब्द तिने खाली पडू दिला नाही हे ही तेवढेच खरे ! तसे नोकरीची जागा आणि कार्यालय यात भरपूर अंतर असल्याने बाबा आमच्या वाट्याला फारसे येत नसत. कामावरून थेट घरी येणे सुद्धा बाबांना कधी जमले नाही. आगाशीला बर्यापैकी ब्राह्मण वस्ती होती. मग कामावरून परस्पर एखाद्या वाडीत जाणे आणि तिथल्या मुलांना गोळा करून अथर्वशीर्ष, महीम्न, रूद्र, गणपती स्तोत्र, रामरक्षा असे काही शिकवणे, त्यांना गोष्टी सांगणे असे आटोपूनच स्वारी घरी येई. केव्हढा दांडगा उसाह ! बरे रविवारी तरी आराम करावा, तर ते ही नाही. दर रविवारी सकाळी ७ ते ८ गीता पठण असे. ३० ते ४० मुले सकाळी गीता शिकायला हजर असत. जाताना त्यांच्या हातावर काही खाउ ठेवणे असायचेच. एकदा दूसरे द्यायला काही नव्हते पण आईने डिंकाचे लाडू मात्र केले होते. अर्थात घरातल्या मुलांना न देता कोणती आई लाडू दूसर्यांना देईल ? पण बाबांनी सरळ डबा घेतला व सगळे लाडू वाटून टाकले ! एक ब्राह्मण आणि तो ही कोब्रा, हे करतो म्हटल्यावर लोक थक्कच होत. (राहवत नाही म्हणून सांगतो 'तुमचा चहा झाला असेलच ना' किंवा 'चहा घेणार का' असा प्रश्न ब्राह्मण घरातच विचारला जातो ! इतर कोणाच्याही घरात जा, चहा किंवा फराळाचे तुमच्या समोर ठेवले जाते !) रविवारी संध्याकाळी सुद्धा अडोस-पडोसच्या सर्व बच्चेकंपनीला भाटीबंदर येथे फिरायला नेत व येताना सर्वाना उसाचा रस पाजत. खरे तर आम्हाला खूप राग यायचा , कधी कधी बोलायचो सुद्धा पण त्याचा काहीही फरक पडत नसे. आता खिशात लिमलेटच्या गोळ्या भरून लहान मुलगा दिसला की त्याच्या हातावर गोळी ठेवतात. साधू संताचे बाबांना भारी आकर्षण ! असेच कोणी साधू दिसला की सरळ त्याला घरी आणत व त्याला पोटभर जेउ घालत. यातले अनेक साधू भोंदूबाबाच असत. भरपेट जेउन काही हातचलाखी दाखवून ते आम्हाला गंडा घालायचा प्रयत्न करत पण आई खमकी होती. अशा वेळी सरळ ती या भोंदूना हाकलून देत असे. आई सुगरण आहे याची किर्ती सर्वत्र पसरली होतीच. पुढे केव्हा कार्यालयीन वसाहतीत रहायला आलो तेव्हा बाबा कार्यालयातल्या मित्रांना खिलवू लागले. कधी मिसळ, कधी पुलाव, कधी खांडवी, कधी फणसाची भाजी ! वडाळ्याला ब्राह्मण वस्ती जवळपास नव्हतीच. मग बाबांनी दर संकष्टीला अथर्वशीर्ष आवर्तनाचा उपक्रम चालू केला. पुढे अनेकजण यजमान म्हणून पुढे येउ लागले. अनायसे ब्राह्मण भोजनही होउ लागले !



पुढे माझे मित्र सुद्धा या खवय्येगिरीत सामील झाले व तृप्त झाले. मित्रांच्या आया पण माझ्या आईला , आमच्या मुलांना चांगले चुंगले खायला घालता व व मग ती तसेच घरी करा म्हणून आमच्या मागे लागतात असे कृत-कोपाने म्हणू लागल्या ! एकटे खाताना मग माझ्याही घशाखाली घास उतरेनासा झाला ! कामाला लागल्यावर मी पण आईच्या मागे लागून मित्रांसाठी इडल्या, घावन, आंबोळ्या असे खास पदार्थ भरपूर करून मित्रांना खिलवू लागलो ! मग पुढे घरच्या खाण्यातली गंमत कमी झाली व बाहेरचे खाण्याची चटक लागली आणि आईला तरी किती त्रास द्यायचा ? तसे ती ही म्हणू लागली होती, तुझी बायको यातले काय करते बघतेच मी ! कामावरून घरी आल्यावर मित्रांना घेउन पंचक्रोशीतली हॉटेल पालथी घालण्याचा छंदच लागला. मित्रांमध्ये कामाला एकटा मीच लागलो होतो, घरची जबाबदारी नव्हतीच , अर्थात बील मीच भरायचो ! पुढे लग्न झाले, लगेच विरारला शीफ्ट झालो.



वेगळे बि-हाड कार्यालयीन वसाहतीत थाटले पण मधल्या काळात मित्र दुरावले ते दुरावलेच. आमच्या आईने आम्हाला चांगलेच सोकावून ठेवले होते, तेव्हा नवर्याच्या पोटात शिरल्याशिवाय तरणोपाय नाही असे उमजल्यावर हिने सुद्धा अन्नपूर्णेची आराधना सुरू केली. मोदक करणे महाकठीण म्हणून दर संकष्टीला मोदक करायचा संकल्प सोडला. आणि खरंच तिच्यावर अन्नपूर्णा प्रसन्न झाली ! खिलवायची माझी वृत्ती परत उफाळून आली. घरी कोणी नाही आले म्हणून काय झाले आपण त्यांना कामावरच खिलवूया ! मग कधी इडली, ढोकळा, उपमा, पोहे, थालीपीठ, आंबोळ्या असे पदार्थ डबे भरभरून मी कामावर नेउ लागलो. लग्न होउनही मराठे बदलला नाही म्हणून मित्रांना बहुत संतोष जाहला ! याने एक बरे झाले, जो तो आपल्या बायकोची हातखंडा डिश बनवून सगळ्यांना खिलवू लागला. संगणक विभागात आल्यापासून हा जो सिलसिला चालू आहे तो अगदी आजतागायत ! एकदा असाच कोणीतरी विकतचा सुरती उंधयो आणला होता, मला तो काही आवडला नाही, माझी बायको उंधयो याच्या हजारपट चांगला बनवते ! मी शेखी तर मारली आणि एकदा करून तुम्हाला खिलविन असा शब्द देउन बसलो. पण घरी हा विषय काढल्यावर बायको उखडलीच ! फार झाले तुमच्या मित्रांचे कौतुक, ही काय बटाट्याची भाजी आहे का भरपूर करून न्यायला ? उंधयो करणे खरच जिकीरीचे आहे कारण त्यासाठी लागणार्या भाज्या पनवेलला मिळत नाहीत. त्या करीता पार्ले किंवा दादरच गाठायला हवे. पण एकदा काही कामासाठी ही दादरला गेली होती व न विसरता सगळ्या भाज्या घेउन आली. दूसर्या दिवशी पहाटे चार वाजता उठली व सकाळी निघताना माझ्या बरोबर चांगले दोन डबे उंधयो भरून दिला ! धक्काच बसला मला आणि ती भाजी खाल्ल्यावर तब्बल २५ मित्रांना ! कारण इतका चांगला उंधयो त्यांनी बापजन्मात खाल्ला नव्हता ! मग हा वार्षिक नेमच बनला ! याची सूचना मला एक आठवडा आधी द्यावी लागते नाहीतर त्या दिवशी कामावर न आलेल्यांचे शाप वर्षभर खावे लागतात. बाकीचे त्यांना करंटे म्हणून चिडवतात ते वेगळेच ! मधल्या काळात नवीन पनवेलला स्वत:चे घर झाले. २ शयनगृहांचे व जोडून ४०० फूटाची गच्ची ! ट्रेकर मित्रांची चांगलीच सोय झाली ! मित्र परिवार ही बराच वाढला. अनेक कौटुंबिक मित्र जोडले गेले. असेच एक मित्र , आपटे घरी आले होते. गच्ची बघून ते बोलले, चांदण्या रात्री गच्चीत बसून जेवायला काय मजा येत असेल नाही ! कमाल आहे ! हे मला कधी सुचलेच नव्हते ! मग तिकडेच ठरले, हीने पावभाजी बनवायची, आपटे वहीनींनी पुलाव आणायचा आणि आज रात्रीच चांदण्यात जेवण करायचे. ही खबर करंदीकरांना पण लागली व करंदीकर गाजराचा हलवा बनवून आमच्यात सहकुटुंब सामील झाले. पुढे कोजागिरी पोर्णिमा सुद्धा गच्चीतच होउ लागली. खाद्ययात्रेला मग अजूनच उधाण आले ! दरम्यान ब्राह्मण सभा, नवीन पनवेलची स्थापना झाली. आता आमच्या ब्राह्मण सभेच्या कार्यक्रमात लोकांना मेनू काय आहे याचीच जास्त उत्सूकता असते व आम्हीही त्यांचा अपेक्षाभंग करत नाही. कार्यक्रम एकवेळ फसेल पण मेनुची लोक आठवण काढतातच ! नशीबाने आम्हाला कॅटरर पण चांगला मिळाला आहे.


माझ्या डब्यात नेहेमी लोणची असतातच. एकदा एका मित्राने चक्क विकत लोणचे मागितले आणि त्याला दिल्यावर लोणच्याच्या अनेक ऑर्डर येउ लागल्या. यातूनच डोक्यात मराठे होम फूडस चे खूळ शिरले. आपले मराठमोळे पदार्थ रास्त दरात विकायला सुरवात केली. मित्रांच्या ऑर्डर घ्यायच्या व बायकोकडून करून घेउन त्यांना त्या पुरवायच्या ! प्रचंड प्रतिसाद मिळू लागला ! बायको पार मेटाकुटीला आली. प्रयत्न करूनही कोणी मदतीला बाई मिळेना. तशात दिवाळीच्या फराळाच्या ऑर्डर घेतल्या ! दोन आठवडे आधी ऑर्डर घेणे बंद करून सुद्धा दिवाळीच्या आदल्या संध्याकाळी त्या पुरे करेपर्यंत नाकी नउ आले ! त्यात ऐनवेळी ऑर्डर देणार्यांना नाही म्हणण्यात सुद्धा वेळ वाया जाउ लागला. सगळ्यात जास्त मागणी भाजणीच्या चकलीला होती. पनवेल वरून थेट मुबईत ती न फोडता पोचवणे म्हणजे एक कसरतच असायची. एरवी मी मुलखाचा वेंधळा पण तूटलेली चकली वा फूटलेला लोडू कोणालाही विकावा लागला नाही. मला हे कसे जमत होते हे अजूनही आश्चर्यच वाटते ! तसे मला स्वयंपाक करण्यात काडीचीही गती नाही पण तेवढे सोडून बाकी सर्व व्याप मी सांभाळत असे.पॅकींग करताना स्टॅपलरची पीन लोकांच्या घशात जाउ नये म्हणून सीलींग मशीन घेतले, सरकारी नियमाप्रमाणे आवश्यक माहीती देणारी लेबल करून घेतली. FDA प्रमाणपत्र घ्यायचे होते. त्या करीता वर्ग कॉटन ग्रीनला असतात. अचानक 'अन्न प्रक्रीया व साठवणुक वर्ग' घेणार्या ताईंशीच ओळख निघाली. ब्राह्मण सभेच्या बॅनरखाली असा वर्गच पनवेलला भरवला. त्यालाही तब्बल १०० बायकांनी प्रतिसाद दिला ! अपूर्व उत्साहात हा पहीला वहीला वर्ग पार पडला. प्रमाणपत्र मिळण्यातली पहीली फेरी तर पार पडली होती. एका मित्राची बायको यात मदत करते असे म्हणू लागली. वेगळी जागा घेउन पूर्णवेळ हे काम करावे असेही ठरले.मी तर अगदी नोकरी सोडण्यासही तयार झालो होतो. पण पुढे हा विचार पार बासनातच गुंडाळला गेला. अनेक विचित्र अनुभव येउ लागले. कामावर उगाच काहींच्या पोटात दुखू लागले. आधी ऑर्डर देउन पदार्थ आणल्यावर 'आता मला नको' असे प्रकार होउ लागले. कोणत्याही कामाचा संबंध काही जण माझ्या नव्या व्यवसायाशी जोडू लागले. खूपच मनस्ताप होउ लागला. दरम्यान मालाच्या किमतीही गगनाला भीडू लागल्या. लागणारे सामान आम्ही किरकोळ विक्रेत्याकडून घेत असू त्यामुळे दर्जा राखण्याकरीता किंमती वाढवणे भाग पडू लागले. दोन रूपयाने जो रव्याचा लाडू विकायचो तो पार ६ रूपयावर गेला. दरवेळी ऑर्डर घेताना भाव आता वाढले असे सांगताना लाज वाटू लागली. आता घरून काही करून नेताना ते विकून किती मिळाले असते असा विचार येउ लागला. देण्यातला आनंदच नष्ट झाला ! मग ठरवले आता बस ! बायकोही कंटाळली होतीच. मराठे होम फूडस वर कायमचा पडदा पाडायचा निर्णय झाला !


या एप्रिल/मे मध्येच कामावर कोणीतरी आंबे डाळ आणि पन्हयाचा विषय काढला होता. माझ्या डोक्यात काहीतरी शिजू लागले . त्याला दिशा मिळाली संस्कारभारतीच्या एका कार्यक्रमाला गेल्यावर. त्या कार्यक्रमात आयोजकांनी तब्बल १२०० माणसांना नारळाची वडी व वसंत पेय दिले होते ! त्या आधीही एका कार्यक्रमात ( वसंत महोत्सव ) ५००० लोकांना पन्हे व आंबे डाळ दिली गेली होती ! हीच्या कानावर माझी योजना सांगितली. आंबे डाळ करण्यात काही अडचण नव्हती (तशी ती लागायची भीती होतीच) पण पन्हे कसे नेणार ? त्या वर पण संध्याने उपाय काढलाच. पन्हयाचा गर मला तीने दोन १.५ लीटरच्या बाटल्यात भरून दिला ! त्याचे मिश्रण समजावून सांगितले. मग ५० पेपरचे ग्लास, दोन बाटल्या गर, सोबत कागदी डिश व आंबेडाळ घेउन मी कामावर आलो. थंड पाण्याची एक बाटली घेउन एकास चार या प्रमाणात मिश्रण करून सर्व विभागात आंबेडाळ व पन्हे वाटून सगळ्यांना थक्क करून टाकले. पन्हे तर एवढे फर्मास झाले होते की मित्र त्याची अजूनही आठवण काढतात. अनेकांना पन्ह्याची चव कधी घेतलीच नव्हती. त्यांना ते कैरी पासून केले आहे हे पटता पटेना ! घरी अनेकांनी ताबडतोब बायकोला फोन करून तिचे कौतुक केले व असेच काहीतरी पाठवत जा असेही सांगितले.


'हरवले ते गवसले' अशीच मग मनाची अवस्था झाली. पदार्थ करून विकण्यापेक्षा दोस्तांना खिलवण्यातच अतीव समाधान आहे, तसेही धंदा आपला प्रांत नाहीच ! खरंच , देण्यातच आनंद असतो आणि कोणाच्या पोटात शिरण्याचा हा तर राजमार्ग आहे ! बाबा नेहमी म्हणतात , बाकी कशाची माणसाची भूक कधी शमणार नाही पण फक्त अन्नच असे आहे की पोट भरल्यावर माणूस चक्क गयावया करून नको म्हणून सांगतो ! बाबांचा हा गुण माझ्या मुलांत सुद्धा उतरेल हे तसे ध्यानीमनीही नव्हते ! घरी काही चांगले केले असेल तर मुले थोडे हातचे राखूनच खातात, का ? तर दूसर्या दिवशी डब्यात त्यांना ते घेउन जायचे असते ! मग शाळेतुन घरी येताच प्रियांका आईला घासून पूसून लख्ख केलेला डबा दाखवते , मग खोट्या रागाने म्हणते, 'मैत्रींणींना एवढं आवडलं, सगळ फस्त करून टाकले, मला एक कण सुद्धा मिळाला नाही, पुढच्या वेळी भरपूर करून दे काय !" हे सांगताना त्यांच्या चेहर्यावरचे समाधान आम्हा दोघांना काही आगळाच आनंद देउन जाते !


तर मित्रांनो एवढे सगळे मी का सांगतोय तुम्हाला ? आमच्या या खाद्ययात्रेत तुम्हीही सामील व्हा ना ! ओळख असेल तरी या आणि नसेल तरी याच ! ओळख काय या निमित्ताने तरी होईलच ना ! मग कधी येताय नवीन पनवेलला ? आम्ही खिलवायला तयार आहोत, आहे कोणी खवय्या ?

रविवार, १३ जुलै, २००८

पत्ते पिसता पिसता !

पत्ते पिसता पिसता !
साधारणपणे वयाच्या तिसर्या चवथ्या वर्षापासून पत्याच्या खेळाशी आपली ओळख होते. सुरवात भिकार सावकार पासून होउन , गुलाम चोर, सात-आठ, पाच-तिन-दोन, मेंढी कोट, चॅलेंज, नॉट ऍट होम, रमी, बदाम सात, झब्बू, लेडीज , ब्रीज अशा अनेक डावात आपण पारंगत होतो. सूट्ट्या सूरू झाल्या की घरा-घरात मित्र-मंडळींचे अड्डे जमवून पत्ते कूटणे चालू होते. लांबच्या प्रवासात पत्त्यांचा जोड आठवणीने बरोबर नेला जातोच. लहानपणी आपलासा केलेला खेळ पुढे म्हातारपणी एकटेपणा घालवायला ही तेवढाच उपयोगी पडतो ! खरंच , या बावन्न पानांच्या खेळाने जगाचा कानाकोपरा व्यापला आहे. मला वाटत नाही की जगात असा एखादा भाग असेल जिकडे पत्ते खेळले जात नसतील.


चित्रपट आणि पत्ते यांचा पण अतूट संबंध आहे. खलनायकाचे चित्रपटातले पहीले दर्शन बहुदा एखाद्या क्लबमध्ये पत्ते, त्यातही तीन-पत्ता खेळतानाच होते ! (मला तरी मेंढीकोट खेळताना कोणाला चित्रपटात तरी बघितलेले आठवत नाही. )मग पत्ते लावणे, दूसर्याचे पत्ते चोरून बघणे, पत्ते बदलणे आणि शेवटी शो करून टेबलावरचे सगळे पैसे आपल्या कवेत ओढून घेणे हे सगळे दाखविले की खलनायकाची प्रतिमा लोकांवर ठसायची. पुढे पुढे नायक लोक पण पत्ते खेळण्यात तरबेज झाले. मग पत्यांतले शह-काटशह अधिकच रंजक होउ लागले. रमी , रम आणि रमणी असे अनोखे काँबिनेशन मग कोणत्याही देमार चित्रपटाचा अविभाज्य भागच बनून गेले, नायकाने शो केल्यावर हाणामार्यांचे प्रसंग कथानकात चपखल बसू लागले.


काही वर्षापुर्वी आम्ही तिन कुंटुंब दक्षिण भारतात सहलीला गेलो होतो. आमची मुले चॅलेंज खेळत होती. मी त्यांचा खेळ बघत होतो. पण खोटे पत्ते कोणीच लावत नव्हते ! कोणी चॅलेंजही करत नव्हते ! मग मी त्यांच्यात सामील होउन चॅलेंज कसे खेळतात हे दाखवून दिले. पत्त्यांत कोणतेही पान जास्तीत जास्त चार असताना मी 'और --' करत बारा-बारा पाने लावत असे हे बघून मुलांनी तोंडात बोटेच घातली. आणि मग जो खेळ रंगलाय विचारता !


पत्त्यांचा खेळ आपल्यावर नकळत अनेक संस्कार करीत असतो तसेच आपले शिक्षणही करत असतो. माणसे जोखायची, पारखायची किमया सुद्धा पत्ते पिसता पिसता सहज साध्य होते. पटत नाही ? मोजणीची आपली कल्पना पत्त्यांमुळे पक्की होते, नियम म्हणजे काय हे ही कळते, त्यांचा अर्थ समजतो, वर्गवारी करता येते, तर्कशक्ती वाढते, स्मरणशक्ती वाढते. कमी आणि जास्त मूल्य म्हणजे काय, एखाद्या एक्क्या पेक्षा हूकमाची दूरी प्रसंगी कशी जड ठरते हे हे शिकायला मिळते. संयम पण शिकता येतो, जोडीने खेळायच्या खेळात आपल्या भिडूला सांभाळून घ्यायची सवय लागते, पत्यांमधल्या जादू आत्मसात करून मित्रांची वाहवा मिळवते येते, त्या दूसर्यांना शिकवून त्या बदल्यात त्यांच्या जादू आपल्याला शिकता येतात. परंतू या ही पुढे जाउन माणसे निरीक्षणाने आपण जोखू शकतो. घरात पत्याचा जोड ज्या स्थितीत असतो त्या वरून त्या घरातली शिस्त, टापटीप पणा पहीले-छूट लक्षात येतो. पत्यांचे कोपरे दुमडलेले, जोकरचा वापर हरवलेल्या पानांना बदली पान म्हणून केलेला असेल , त्यातही मूळ पान परत सापडल्यावर, जोकरवर खाडाखोड करून 'आता हे पान असे आहे' अशा सूचना असतील तर त्याचा काय अर्थ घ्याल ? साधे पत्ते पिसणे किंवा त्यांना कतरी मारणे घ्या ! खूप जणांना हे काम सफाईने करता येत नाही. कोणाचे पत्ते पिसताना घरभर उडत असतात, लागेलेली पाने मिसळतच नाहीत. कतरी मारताना पण एका गठ्ठ्याच्या एकापानावर दूसर्या गठ्ठ्यातले पान पडले पाहीजे. पाने वाटताना पण आधीच्या पानावरच दूसरे पान पडले पाहीजे, पाने उडता कामा नयेत, ती कोणालाच दिसता कामा नयेत, रमीची प्रत्येकी तेरा पाने वाटताना ती परत मोजायची गरज वाटलीच नाही पाहीजे आणि हे सर्व जलद व्हायला हवे. तीच सावधगिरी पाने उचलून घेताना बाळगली पाहीजे. आपली पाने दूसर्याला न दिसणे हे मुख्य, त्यानंतर पाने बघून त्यांची वर्गवारी लावणे, त्यांची ताकद जोखणे, ती डोक्यात घट्ट बसणे हे जमले पाहीजे. काहीजणांना प्रत्येकवेळी पानांचा पिसारा करून पानी का बघावी लागतात तेच कळत नाही. पानांचा पिसारा पण आटोपशीर असला पाहीजे. पाने बघितल्यावर चांगली असतील तर काहीजणांना आनंद तर काहींना दु:ख लपविता येत नाही पण चेहरा कोरा ठेवणे जमले पाहीजे ! बदाम सात सारख्या खेळात काहींना बदाम सत्ती आपल्याकडे आहे हेच पटकन कळत नाही. या खेळात पाने बघितल्या बघितल्याच गेम प्लान ठरविता आला पाहीजे. अनेक जण ज्या रंगाचा राजा आपल्याकडे आहे तीच सत्ती अडवून आपल्याच पायावर धोंडा मारून घेतात ! काही तर लावण्यासारखे पान असूनही 'पास' म्हणत बसतात आणि मग ओशाळवाणे होतात. मेंढीकोट सारख्या खेळात काही जण धडाधड एक्के काढून सुरवात करतात आणि जोडीदारा कडे ती मेंढी नसली की जोडा मारल्यासारखे तोंड करतात. एकाच रंगाची एक्का आणि राणी आली असेल तर नीट खेळल्यास विरूद्ध पक्षाच्या राजाचा 'गेम' करता येतो. हाताचे महत्व असलेल्या खेळात काहीजण मध्येच खेळतात किंवा पान आधीच हातात घेउन ठेवतात, अशांना हरवणे मग कठीण जात नाही. आपली पाने दूसर्याला न दिसता त्याची पाने आपण बघणे ही कला सगळ्यांना जमत नाही. एकाची पाने दूसरा बघतोय आणि तिसरा दूसर्याची पाने बघतोय असेही बघायला मिळते. हूकूम बनवणे, ठेवणे सुद्धा सगळ्यांनाच जमत नाही. काहीजण नुसता एक्का असेल तरी त्या रंगाचा हूकूम बोलून बसतात व मग पस्तावतात. काहीजण उतरी करताना एवढा वेळ लावतात की हे पत्ते खेळत आहेत की चेस असाच प्रश्न पडतो. काहींचे खेळात लक्षच नसते, उतरी कोणती आहे, जड पान कोणाचे आहे, मेंढ्या किती बाहेर आहेत या विचारातच ते वेळ वाया घालवतात. खोटा खेळ खेळणारेही अनेक असतात पण त्यांचा खोटारडेपणा त्यांच्या गळ्यात मारणारेही काही कमी नसतात. माझे आजोबा पाउणशेव्या वर्षी सुद्धा सगळे हात लक्षात ठेवत असत ! रमी हा खेळ पण भन्नाटच आहे. नशीबाचा भाग सोडला तर समोरच्याला हवे असलेले पान दाबून ठेवणे, रमी कल्पकतेने फिरवणे/जमवणे, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना शो करणे हा एक कौशल्याचाच भाग आहे. Truly mind game !


मुंबईच्या लोकलमध्ये पत्ते खेळणार्या टोळक्यांनी बराच उच्छाद मांडला होता. त्यांचे उपद्रव मूल्य सोडले तर शिकण्यासारखे त्यांच्याकडून बरेच होते. ईतक्या कमी जागेत हे पत्ते कसे खेळतात याचे मला आश्चर्यच वाटे. रमी असेल तर पॉइंट पण बरोबर लिहीले जात,खोटरडेपणा कोणी करत नसे, आणि जर केलाच तर सरळ त्याच्या कानाखाली जाळ काढला जाई. एक डाव संपून पाने पिसून, कतरी मारून, सात-आठ जणात गोंधळ न होता पाने कधी वाटली जात ते कळत पण नसे, विलक्षण सफाई असायची या सर्वात ! आमच्या गोदीत पत्ते फारसे निषिद्ध नाहीत. कामगार लोक तर तो अगदी कोठेही खेळताना दिसतात. जहाजावर केबिनमध्ये पत्ते खेळताना असेच गुंग झाल्यामुळे जहाज गोदीच्या बाहेर पडलेले सुद्धा काही कामगारांना कळले नव्हते व नोकरी जायचा प्रसंग त्यांच्यावर ओढवला होता ! मुमरी हा गोदीतला अतिशय लोकप्रिय खेळ आहे. लॅडीज सारखेच याच्यात हात बोलायचे असतात (सगळे तेरा हात बोलणे म्हणजे मुमरी ) , फरक एवढाच की जो जास्त हात करणार असतो त्याच्या भीडूने आपले पाने उघडी करायची असतात,त्याच्या सूचनेप्रमाणे खेळायचे असते. या खेळाने काहीकाळ मला पार झपाटून टाकले होते. एकदा आम्ही कन्याकूमारीला जात असताना गाडीत हा खेळ खेळत होतो आणि आमच्या आरडा-ओरड्याने अख्खा डबा या खेळाच्या प्रेमात पडला होता !


पत्त्यांचे अनेक खेळ संगणकावर आहेत पण ते एकट्यालाच खेळता येतात. एक बरे असते, पत्ते आवरायची, हरवायची , वाटायची कटकट नसते, हवे तेवढे undo, redo, restart करता येते, हरल्याचे दु:ख नसते !माझ्याकडे एक solsuite 2004 म्हणून खेळ आहे, त्यात विविध प्रकारचे ४१२ खेळ खेळता येतात. खेळाचे नियम बदलता येतात, नवीन खेळ बनवता येतात. आपण खेळलेल्या प्रत्येक खेळाची साद्यंत आकडेवारी मिळते !


आता घरी खेळताना बायको आणि मुलगी व मी व मुलगा असे पार्टनर असतो. मायलेकींना रडीचा डाव चांगलाच जमतो, खाणाखुणा करून कोणत्या मेंढ्या आहेत, कशाला कट आहे हे व्यवस्थित communicate केले जाते व आमच्यावर कोटावर कोट चढत जातात. चांगली पाने नसतील तर सरळ डाव फोडून मोकळ्या होतात ! बदाम सात खेळताना पण त्या संगनमताने खेळतात व आमची चांगलीच दमछाक करतात. प्रियांका बरोबर सात-आठ खेळताना तर ती अनेकदा माझे सगळे हात सुद्धा ओढते ! मूंगूस खेळताना त्या दोघी अगदी सतर्क असतात व पेनल्टी खाउन खाउन आमचे गठ्ठे वाढतच असतात. पण पत्यांत हरायला सुद्धा एक वेगळीच मजा येते. हीच्या बरोबर रमी खेळतो तेव्हा सुद्धा मला हरायलाच आवडते कारण चूकून जिंकलोच तरी चीटींग चा आरोप काही चूकत नाही. तसा आयुष्याचा लग्न हा एक मोठा जूगार तर जिंकलोच आहे ! मग या पराभवाचे दु:ख कशाला ! अपने पे भरोसा है तो एक दांव लगा ले !

शुक्रवार, ११ जुलै, २००८

लोकलमधले लोक !

लोकलमधले लोक !

रेल्वे स्थानकाच्या परीसरात किंवा लोकलमध्ये आपल्याला दिसतो कोणतीही ओळख नसलेला जमाव (मॉब) पण नीट निरीक्षण केल्यास त्यातल्या प्रत्येकाची वेगळी ओळख तुम्हाला दिसू लागते. ज्यांच्या डोक्यात लोकलचे वेळा-पत्रक नीट बसले आहे ते गाडी पकडताना कधीही धावपळ करणार नाहीत, नवखा माणूस मात्र गाडी स्थानकात उभी आहे एवढे बघूनच ती पकडण्यासाठी पळत सूटेल. तिकीट काढण्यासाठी सुद्धा गर्दी असतेच पण त्यातही अनुभवी लोकांना कोणती खिडकी कधी उघडणार , कोणती कधी बंद होणार, साधारण रांग बघून तिकीट मिळायला किती वेळ लागणार याचा अंदाज बांधता येतो. हल्ली तर कूपन आणि स्मार्ट कार्ड मुळे रांगेत उभ्या असणार्या माणसांची किवच करावीशी वाटते. ९ ते १२ डब्यांच्या गाडीत महीलांचा डबा कोणता, लगेजचा कोणता, फर्स्ट-क्लासचा कोठे येणार, घुडघुड्या डबा कोठे येणार याची रोजच्या माणसांना कल्पना असते. तसे यातही वर्षानुवर्ष रेल्वेने प्रवास करून सुद्धा गाडी आल्यावर तीच्या सोबत झुलणारेही असतातच म्हणा ! गाडी स्थानकात शिरताना 'उतरणार्या प्रवाशांना आधी उतरू द्या' ही घोषणा कोणीच गंभीरपणे घेत नाही. अनेकवेळा तर गाडी पूर्ण थांबायच्या आधीच भरते ! उतरणारी माणसे अंग चोरून बाजूला उभी राहतात, सगळे आत चढले की उतरतात ! हवेच्या दिशेच्या मोठ्या खिडक्या पहील्या भरतात, मग लहान खिडक्या, मग दूसर्या, मग तिसर्या, मग हवेच्या विरूद्ध दिशेच्या जागा, मग आठव्या मग चवथ्या व सर्वात शेवटी नवव्या सीट भरतात ! मग दोन सीटच्या मध्ये माणसे उभी राहू लागतात. ग्रूपने प्रवास करणार्यातला कोणी अपडाउन करत असतो किंवा आधी येउन, गाडी लागत असतानाच आत शिरून कोठे बॅग, कोठे रूमाल, कोठे पेपर तर कोठे पेन ठेउन आपल्या टोळीतल्या इतर सदस्यांसाठी जागा अडवून ठेवतो ! मग जसेजसे टोळके येत जाते, एकेक वस्तू उचलल्या जाउन त्या जागी माणसे स्थानापन्न होतात. गाडी सूटते व मग माणसे निरखण्याचा माझा अभ्यास चालू होतो.


कोणी आल्याआल्याच पेपर, कादंबरी, पोथी काढून वाचू लागतो, कोणी कागदावर जप लिहू लागतो, कोणी पेपर न आणलेला समोरच्याच्या पेपरची एखादी पुरवणी न विचारताच काढून घेउन वाचू लागतो, कोणी समोरच्याच्या उघड्या पेपरची उलट बाजू वाचू लागतो. कोणी भांडणे उरकून काढतो, मग अनेक रिकामटेकड्यांना हात साफ करायची संधी मिळते तर कोणाला दिलजमाई करायची संधी मिळते. बसलेल्या प्रवाशांच्या पायात उभ्या असलेल्या प्रवाशांची सम-दु:खी लोकांबरोबर पटकन मैत्री जमते व मग बसलेल्यांना टोमणे मारून हैराण केले जाते. ते ही कमी नसतात म्हणा, या रहायला पनवेलला किंवा करा अप-डाउन, आम्ही का तुम्हाला अडवले असे सुनावले जाते. हल्ली तर मोबाईल हा रेल्वे प्रवाशांचा मित्रच बनला आहे. मोबाईल वर गेम खेळणे, FM वर गाणी ऐकणे, आपल्या आवडीची गाणी ऐकणे किंवा तशी कोणती सोय नसेल तर विविध रिंग टोन्स ऐकत बसणे यात कसा वेळ जातो हेच कळत नाही. ( आता मात्र मोबाईलला स्पीकरची सोय झाल्यापासून मोबाईलखोरी हा नवाच उपद्रव जन्माला आला आहे ! तसे पत्ते कूटणार्या टोळक्यांनी व तारस्वरात भजने म्हणणार्यांनी प्रवाशांना बराच काळ दे माय धरणी ठाय करून सोडले होतेच !)खिडकीजवळ बसलेली माणसे झोपी जातात किंवा झोपेचे सोंग तरी घेतात, न जाणो कोणी ओळखीचा दिसला तर त्याला जागा द्यायला लागेल ना ! काहींना बसल्या जागी झोपायची कला अवगत असते तर काही शेजार्याचा खांदा हाच उशी समजतात. असे काही शेजारी मग अचानक खांदा काढून घेउन त्या झोपाळूची गंमत करतात तर काही सहन करतात. प्रत्येक स्टेशनागणिक गाडी दुधडी भरलेल्या नदीसारखी माणसांनी वाहू लागते, गर्दी असह्य होते मग माणसांचा खरा चेहरा समोर येउ लागतो. कधी पसरून बसून चवथ्या सीटवर बसलेल्याचे 'जळो जीणे लाजिरवाणे' करून टाकले जाते तर कधी तोच शिरजोर होउन खिडकीत बसलेल्याला पार जखडून टाकतो. त्यातही एखादा आडव्या सीटवर आठच माणसे बसल्याचे दाखवून, हक्काची नववी जागा पदरात पाडून घेतो. बहुतेक माणसांच्या हातात काहीतरी असतेच. कोणी ते आपल्याच मांडीवर घेउन बसतो, कोणी पायाशी ठेवतो , कोणी सीटखाली घालतो, कोणी ते रॅक वर ठेवतो, कोणी ते लांबूनच रॅक वर भिरकावतो, कोणी ते पास करत, खिडकीजवळ उभ्या असलेल्या माणसाकरवी रॅकवर ठेववतो. रोजच्या माणसांना बसलेल्यापैकी कोणाची विकेट कधी पडणार आहे हे माहीत असते त्याप्रमाणे त्यांनी पोझिशन घेतलेल्या असतात. खाणाखुणा करून ओळखीच्या माणसांना प्लेस केले जात असते. ज्याला आपले स्टेशन कधी येणार ते माहीत नसते तो आसपासच्या लोकांना 'अगला स्टेशन कौनसा' हे विचारत असतो, तसेच फलाट कोणत्या बाजूला येणार हा यक्ष प्रश्न असतोच !


हे कमी म्हणून की काय,नुसती भीक मागणारे , गाणी म्हणून भीक मागणारे ( त्यात पण फिल्मी गाणी म्हणणारे, भक्ती-गीते म्हणणारे, नुसतेच वाजविणारे, duet म्हणणारे , यात सुद्धा स्त्री-पुरूष किंवा दोन्ही पुरूष असे उप-प्रकार असतात ! कधी तर अख्खे कुटुंबच लोकांना रिझवण्यासाठी तत्पर असते. मग काय विचारता राव, बाप वाजवत / बडवत असतो, बायको गात असते, मोठी मुले सुर धरत असतात तर लहान मुले पब्लीक पुढे भीकेचा कटोरा फिरवत असतात ! धन्य तो सोहळा !) अंगातल्या शर्टाने फरशी पूसून भीक मागणारे, चित्र-विचित्र आवाज काढून नाना प्रकारच्या ( गीतेच्या पुस्तकापासून ते जडी-बुटी पर्यंत , या वस्तूंची यादी द्यायची म्हटली तरी काही scrap सहज भरतील !) वस्तू डेमो देउन विकणारे विक्रेते सीन अधिकच रंगतदार करत असतात. मध्येच केव्हातरी तृतीयपंथीय टाळी वाजवून हात पसरतात.


कशी असतात ही माणसे ? अर्धवट झोप झालेली, जीवाला वैतागलेली, प्रचंड काळजीत पडलेली, रॅक वर ठेवलेली बॅग आपल्याच कपाळावर पडणार या काळजीत असलेली ! कोणी माजोरडे, आपल्याच गुर्मीत असलेले, कोणी सर्वज्ञ, कोणी अडाणीपणाचे सोंग पांघरलेले, कोणी तिकीट नसल्यामुळे तिकीट तपासनीस चढत नाही ना या विवंचनेत असलेला, कोणी आपल्या सामानावर नजर ठेउन असलेला, कोणी एवढ्या गर्दीत आपल्याला उतरायला जमेल ना या काळजीत बुडालेला, कोणी आज पण आपल्याला उशीर होणार म्हणून धास्तावलेला, कोणी तोंडातल्या पानाची पिचकारी खिडकी बाहेर सोडून मोकळे होणारा, कोणी तंबाखूची गोळी दाढेखाली धरून निवांत बसलेला ! कोणी संधीसाधूपणे दोन सीटवर डोळे लावून बसलेला, चवथ्या सीटला बसलेला कोणी प्रत्येक गर्दीबरोबर रेटा वाढवून स्वत:साठी अधिक स्पेस करत असतो. क्रीकेट , चित्रपट, आणि राजकारण हे 'लोकल'करांचे अगदी आवडते विषय. त्यात आता TV वरील मालिकांची भर पडली आहे ! हे सगळे आपले लंगोटी यार असल्याप्रमाणे वा कधी काळी चवथ्या सीटवर बसणारे असल्याप्रमाणे त्यांचा एकेरी उल्लेख करीत , कधी उद्धार केला जातो तर कधी उदो-उदो ! कोण कसा चूकला, कोणी निवृत्त व्हायला पाहीजे, कोणती मॅच फिक्स झाली होती, कोणी कसा कोठे आणि किती पैसा कमावला याचा हिशोब सुद्धा अनेकांना पाठ असतो ! गंमत म्हणजे सरकारच्या कोणत्याच निर्णयाचे समर्थन कोणी केल्याचे मी निदान ट्रेन मध्ये तरी ऐकले नाही !हे सर्व enjoy करत माझा प्रवास कधी संपतो हेच मला कळत नाही. दिवसेगणिक माझ्या ज्ञानात मौलिक भरच पडत असते. रोज काही ना काही तरी घडत असतेच असते( अगदी happening !). अजून १८ वर्षानी मी निवृत्त होईन आणि या आनंदाला मुकेन ! काय बरे करावे ?

गोदीतल्या गमती-जमती !

गोदीतल्या गमती-जमती !
आमच्या कडे 'एक' जरा मंत्रचळी म्हणतात त्या प्रकारातला आहे. स्वत: वर त्याचा अजिबात विश्वास नाही. एखादे काम केले के दहा वेळा केले, केले , केले किंवा दिले, घेतले, तपासले असे काहीतरी बरळत राहतो. त्याच्या बरोबर काम करणार्याला त्याच्य या स्वभावामुळे वेड लागायची पाळी येते. अनेक महत्वाच्या पुस्तकांची पाने देताना आणि घेताना तपासायची असतात. दहा दहा वेळा तपासून पण याचे समाधान होत नाही. बेरजा मारताना पण तेच ! आमच्या कडे सहसा कामाची वेळ संपेपर्यंत कोणी थांबत नाही, काम संपले की निघाले तरी चालते. पण हा मात्र वेळ संपेपर्यंत जागचा हालणार नाही. कार्यालय बंद केलेत तर बाहेर थांबेल असा अवलिया ! एकदा असेच दूसर्या पाळीतले काम संपले. गोदाम मास्तरने गोदामाचे वीस दरवाजे व्यवस्थित बंद केल्याची खात्री केली. मुख्य दरवाजा सील केला आणि गेटवर चावी जमा करायला निघाला. गेट वीस मिनीटे लांब होते. सोबत 'हा' होताच ! तसे दरवाजे चेक करताना पण तो होताच ! गेट वर चावी जमा करताना हा बोलला, की अगदीच राहवत नाही म्हणून सांगतो की एका दरवाजाची चावी लावायची राहीली असावी, निदान मला तरी तसे वाटते. गोदाम मास्तर उडालाच. तसे त्याने तपासले होतेच पण विषाची परीक्षा कोण घेणार ? कारण एखादे दार उघडे राहीले तरी निलंबन नक्कीच ! सगळा लवाजमा परत शेडला आला. सील फोडून सर्व दरवाजांची कुलपे तपासली गेली. काहीही प्रोब्लेम नव्हता ! आता सगळे त्याच्यावर जाम भडकले, उगीच ताप दिला म्हणून ! त्याची प्रतिक्रीया एवढीच "सेफ्टी फर्स्ट" हा आपला मोटो आहे ना ! एखादा दरवाजा उघडा असता तर काय केले असतेत ?
एका गोदाम मास्तरने याला न जुमानता रात्री ११ वाजताच गोदाम बंद केले व सरळ चावी जमा करून निघून गेला ! हा दारासमोरच थांबून राहीला ! सिक्युरीटीची जीप आल्यावर तीच्या समोर उभा राहीला. आतल्या अधिकार्याला मी कामावर आहे माझा रीपोर्ट करू नका असे विनवू लागला ! त्याला काय प्रकार आहे तेच कळेना !
एकदा माझा मित्र रात्री १२ वाजता दूसर्या शेडला जाण्यासाठी लिफ्ट मागायला उभा होता. लांबून त्याला बुलेट येताना दिसली. याने हात दाखविला. पण बुलेट थांबल्यावर त्याची बोबडी वळली, कारण बुलेटवर होत्या ACP, Port Zone, श्रीदेवी गोयल, पावणे सहा फूट उंच व धिप्पाड ! बुलेट उभी करूनही मित्र पाठी बसत नाही म्हटल्यवर त्या कडाडल्याच ! 'लडकी जैसा क्या शर्माते हो, बैठो' झक मारत बसला, मॅडमने त्याला हवे तिकडे सोडले ! आता तो कोणाकडेही लिफ्ट मागत नाही !
आमच्याकडे तीन दिवसाहून जास्त काळ न कळविता रजेवर असल्यास एक घोषणापत्र द्यावे लागते व वैद्यकिय तपासणी करूनच कामावर घेतात. असाच एक जण न कळविता दांडी मारून कामावर आला. रूजू करून घेणार्याने त्याला असेच कामावर घेतले आणि मागाहून त्याच्या लक्षात आले. याला त्याने किमान फीट प्रमाणपत्र तरी आण म्हणून विनवले पण हा काही ऐकेना ! अनेक वेळा निरोप पाठवले, दम दिला पण हा ढीम्म ! एकदा मग संबंधित क्लार्क त्याला भेटायला गेला. 'हा' त्याला घेउन धक्क्याच्या टोकावर उभा राहीला. त्याला बोलला , तू मला रूजू करून घेतलेस, आता तूच काय ते निस्तर, मला परत त्रास दिसाल तर जीव देईन आणि तुझ्यामुळे हे केले असे लिहून ठेवीन ! बिचारा, करतो काय ? त्याने आपल्याच पदरचे १०० रूपये खर्च केले व याच्या नावाचे खोटे प्रमाणपत्र घेउन मोकळा झाला.
हीच वल्ली एकदा extra मध्ये होती. जेवणाच्या वेळात त्याच्या कोणातरी बॅचवाल्याला बरे वाटत नव्हते म्हणून थेट आमच्या रूग्णालयात घेउन गेला. कोणालाही, काहीही न सांगता ! एक उशीराची requirement आली. याचा काही पत्ता नव्हताच, पण याच्या जीवावर बाकी दोन extra घरी गेले होते, त्यांचाही report करावा लागला !

गोदीत अनेक लबाड आयातदार 'जुने-वापरलेले कपडे' या नावाखाली चांगले कपडे मागवायचे. ही बाब तशी लपून रहायची नाहीच. मग कस्टम तो माल अडवून ठेवायची. गोदीतले अनेक कर्मचारी मग ते कपडे घरी नेत. असाच मोह एका गोदाम मास्तरला झाला.तो होता पहील्या पाळीला. कपड्यांच्या गठ्ठ्यात त्याला मस्त त्याच्या मापाची नवी कोरी पॅण्ट सापडली. सगळे ताळतंत्र सोडून त्याने घातलेली पॅण्ट तिकडेच काढून ठेवली व नवी घालून आला ना बाहेर ! दूसर्या पाळीचा गोदाम मास्तर आला. प्रथेप्रमाणे सर्व दरवाजे चेक झाल्यावर त्याने चावी मागितली ! चाव्यांचा जुडगा खिषात नव्हता ! मग त्याला आठवले की आपल्या जुन्या पॅण्ट मध्येच होता ! त्याच्यावर जणू आभाळच कोसळले ! गोदामातला होता नव्हता तेवढा सगळा स्टाफ कामाला लावला गेला. तीन तास सगळे गठ्ठे उलटे पालटे केल्यावर ती पॅण्ट एकदाची सापडली व आत जुडगा सुद्धा !
आयतदाराचा एंजंट BE (bill of entry, खूप महत्वाचे कागद ) शोघत होता. शेडचा सगळा स्टाफ जेवायला बसला होता. त्याचे लक्ष त्यांनी टेबलावर ठेवलेल्या कागदाकडे गेले आणि तो उडालाच ! काही जण त्याला हव्या असलेल्या BE वर चक्क डबा उघडून बसले होते. तेलाने माखलेले ते कागदपत्र निदान मिळाले तरी याचाच त्याला जास्त आनंद झाला !
संगणक आमच्याकडे नवेच होते. लोकांना अगदी स्वीच कोठे आहे इथपासून शिकवायला लागायचे ! अनेक वेळा आम्हाला फोन करून काही समस्या सांगत पण ते रेकॉर्ड त्यांनी असेच उघडे ठेवले असल्याने आम्हाला बघता येत नसे. अशा वेळी 'तू बाहेर ये' असे आम्ही सांगत असू ! मी असेच एकाला सांगितल्यावर तो माझ्यावर जाम उखडला ! स्वत:ला काय भाई समजतोस काय ? बोल कोणत्या गेटच्या बाहेर येउ ? तू काय माझे वाकडे करणार ते बघतोच ? त्याला सर्व समजाउन सांगितल्यावर तो चांगलाच वरमला !
अगदी सुरवातीला आमच्या कडे RS6000 मशीन होते. ते AC रूम मध्ये होते व आम्ही सगळे बाहेर बसू. फोन मात्र आतल्या रूममध्ये होता. असेच मी मझ्या एका सहकार्याला , जो फोन घेत होता, त्यालाच फ्लॉपी आत टाकायला सांगितले. बराच वेळ होउनही फ्लोपी रीड होत नव्हती म्हणून मी आत गेलो तर फ्लोपी हव्या त्या स्लॉतमध्ये नव्हतीच. त्याला विचारले तर तो बोलला केव्हाच पार आत टाकली ! त्या मशीनला एक मोठी खाच होती, याने ती त्या खाचेत टाकली होती ! हे कळल्यावर एकच धावपळ उडाली. मशीन शटडाउन करून, अभियंत्याला पाचारण करून ते उघडावे लागले तेव्हाच ती फ्लॉपी परत मिळाली !
असेच एकदा एकाला मॉडेमचा स्वीच ऑफ करायला सांगितल्यावर त्याने सरळ मेन-स्वीच बंद करून टाकला होता ! काम फूल स्वींग मध्ये चालू असताना मशीन बंद केल्याने कोबोलच्या सगळ्या डाटा फाईल्स करप्ट झाल्या ! ते सगळे निस्तरायला चार दिवस लागले !
आमच्याकडे संगणकावर थकवाकी काढायचे काम चालू होते. त्याचे बॅक अप पण घेतेले जाई. असेच कोणीतरी नवखा माणूस बॅक अप घेत होता. त्याला ते जमत नव्हते म्हणून माझ्या एका सहकार्याने त्याला ते घेउन दिले. त्यानंतर त्या विभागाची तक्रार आली की आम्ही नवीन केलेले काम मिळत नाही ! शोध घेतल्यावर गोंधळ कळला. बॅक अप घेताना cvf च्या ऐवजी xvf कमांड दिली गेली होती ! त्या मूळे आधी घेतलेले बॅक अप परत हार्ड डिस्क वर टाकले गेले !
कार्बन असलेल्या कागदावर छपाई करताना पेपर योग्य दिशेनेच लावावा लागतो. एकाने कोर्या बाजूवर प्रिंट छान दिसते म्हणून ती बाजू वर ठेवली. पेपर होता थ्री-पार्ट ! सगळा गठ्ठा संपल्यावर हा गोंधळ समजला. तो वाया गेलेला ढीग डबा खाताना पुढेचे अख्खे वर्ष आम्ही वापरत होतो !

नोकरी लागण्याच्या आधीपासूनच कॉलनीत रहात होतो त्यामूळे बरीच जण ओळखीची होती. असाच एक जण जहाजावर फोरमन होता. जहाजात उतरून काम करणार्या कामगारांचा तो प्रमूख. एकदा तिसर्या पाळीत त्याने माझ्याकडे शीट्टी दिली आणि ३ ते ३:३० , रजेची वेळ झाली की ती जोरात वाजव असे सांगितले. मी पण होय म्हटले. पुढे जरा वेळाने माझ्या गँगचे काम संपले व मी लगोलग झोपायला निघून गेलो. साधारण पहाटे ५ वाजता कोणीतरी मला गदागदा हलवून उठवले व शीट्टी मागितली. मी त्याच्या बरोबरच धक्क्यावर आलो. त्याने जोरात शीट्टी वाजवली व मगच जहाजातले कामगार कामाला लागले ! काम कंटाळवाणे होते व फोरमन पण जागेवर नव्हता मग काय त्यांना निमित्तच मिळाले. रजेची वेळ संपली हे आम्हा अडाण्यांना कळत नाही, फोरमन शीट्टी वाजवेल तेव्हाच आम्ही काम सुरू करणार असा कायदा त्यांनी दाखविला. मी ती शीट्टी खिषात ठेउन झोपलो होतो, फोरमन माझ्या भरवश्यावर कोठेतरी बार मध्ये ढोसत पडला होता ! ३:३० वाजल्यापासून माझा शोध चालू होता, पण कोणी त्रास देउ नये म्हणून मी जरा लांबच जाउन झोपलो होतो, त्यामूळे तासभर कोणाला सापडलो नाही !


असेच एकदा तिसर्या पाळीत असताना धक्क्यावर गेल्यावर कळले की जहाज ३ च्या पुढे येणार आहे. ही संधी साधून आम्ही तडक झोपी गेलो. मध्येच केव्हातरी जाग आली आणि डोळे चोळत आम्ही धक्क्यावर आलो आणि आमची झोप पार उडाली. जहाज केव्हाच लागले होते व डेकवरचे सर्व कंटेनर उतरवले पण गेले होते ! आता त्यांचे नंबर कोठे मिळणार ? शेवटी ३० मिनीटे तंगडतोड करून स्टोरेज पॉईट ला गेलो, नंबर घेतले व मग टॅलीशीट भरली !


परत तिसरी पाळी ! धक्क्यावर काम जोरात चालू होते. रात्र पाळीचा अधिकारी पाहणी करण्याकरीता आला. टॅली मारणारे गेले कोठे ? अंदाजाने त्याने धक्क्यावर झोपलेल्या एकाला उठवले. कोण आहेस ? टॅली क्लार्क ! मग टॅली कोण मारतो आहे ? रीलिव्हर ! त्याच्या शेजारच्याला उठवले , त्याने पण तसेच उत्तर दिले. मग तिसर्याला उठवले, तू कोण ? तर उत्तर आले, रीलीव्हर !

लोकल मधल्या झोपा !

लोकल मधल्या झोपा !
तशी ट्रेन मध्ये बसल्यावर मला झोप लागत नाही पण जेव्हा कधी झोपलो आहे तेव्हा तेव्हा खूपच धमाल झाली आहे.
वडाळ्याला असताना अंतर कमी असल्यामुळे मी बहुदा दरवाजातच उभा रहायचो. एकदा असाचा रात्रपाळी करून पहाटे घरी परतत होतो. आमची ईमारत रेल्वे लाईनला समांतरच होती. लोकलच्या खिडकीतून मी आमचे घरही बघितले, दूध केंद्रासमोरची रांगही बघितली आणि मग कसा कोणास ठाउक पण डोळा लागला. जाग आली तेव्हा कुर्ला कारशेडमध्ये होतो !
एकदा अशीच दूपारी खरेदीची धावपळ करून मशीद बंदर स्टेशनला आल्यावर indicator वर पनवेल लोकल लागलेली दिसली. तशी दोन मिनीटे होउन गेली होती पण असेल ट्रेन लेट म्हणून येत असलेली ट्रेन धावतपळत पकडली. खिडकी मिळाली, सामान रॅक वर टाकून बसलो आणि दमल्यामुळे पेंगू लागलो. कोणीतरी उठवले तेव्हा बांदर्याला पोचलो होतो. ती गाडी पनवेल नसून बांद्रा होती. स्टेशनच्या कर्मचार्याने झोप लागल्याने इंडीकेटर बदलला नव्हता आणि मला संकटात टाकले होते. माझा त्या रूटचा पासपण नव्हता तेव्हा पहीली भीती तिकीट तपासनीसाची होती. उलटी गाडी तब्बल २० मिनीटांनी आली. वडाळ्याला पोचलो आणि काही सेकंदाने पनवेल लोकल चूकली. परत ३० मिनीटांनी पुढची गाडी मिळाली. मशीदला गाडी पकडताना बायकोला फोन करून लवकर येत आहे म्हणून सांगितले पण या उलट-सूलट प्रवासात दोन तास गेल्यामूळे नेहमीपेक्षा उशीराच घरी पोचलो.


असेच एकदा मानखुर्दला कोणीतरी खिडकीच्या बाहेरून गदागदा हलवून , भेदरलेल्या चेहर्याने बाहेर ये असे खुणावत होता. डोळे नीट उघडल्यावर दिसले की मीच एकटा डब्यात शिल्लल राहीलो होतो, आणि फलाटावर तूफान गर्दी. मी आता काय करावे या विचारात असतानाच ट्रेन हलली व उतरलेली माणसे धडाधड परत डब्यात चढली ! काय प्रकार आहे असे शेजार्याला विचारले तेव्हा तो बोलला की ट्रेन मानखुर्दला आली अणि कोणीतरी धूर धूर असे ओरडला ! आग लागली असे समजून सगळे लोक खाली उतरले होते, सगळी ट्रेनच खाली झाली होती. मोटरमनने सगळे तपासले. त्याची खात्री पटल्यावर सरळ हॉर्न वाजवून त्याने लोकल चालू केली. खाली उतरलेले सगळे परत आत शिरले. झोप लागल्यामुळे मला या गोंधळाची काही कल्पनाच नव्हती. मागाहून काही जणांनी संकटात सुद्धा शांत राहण्याच्या माझ्या वृत्तीचे कौतुक केले !


पुलंचे पुस्तक वाचताना एकदा ब्रह्मानंदी टाळी लागूल्याने प्रवास फार लांबला होता. झाले असे की मी दादरला भाईदर लोकल पकडली. मग मीरा-रोडला गाडी बदलून मला विरार लोकल पकडायची होती. पुलंचे व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक वाचण्यात रंगून गेलो. किती वेळ गेला कळलेच नाही. अचानक गाडीत लोकांचा लोंढा शिरल्यामुळे माझी तंद्री भंगली. मला वाटले विरारच आले. पण गाडी सुरू झाली व उलट दिशेने का जात आहे म्हणून मी हैराण झालो. नीट बघितल्यावर कळले तर मीरा-रोड सूटले होते व गाडी चर्चगेटॅच्या दिशेने चालली होती ! म्हणजे गाडी भाईदरला पोचली, निदान वीस मिनीटे उभी होती, परत उलट दिशेने निघून मीरा-रोड गेले तरी मला कळले नव्हते !

शनिवार, ५ जुलै, २००८

विसरभोळेगिरी !

विसरभोळेगिरी !
लक्षात ठेवायची क्षमता प्राप्त झाल्यापासूनच मी विसभोळेगिरी करतो आहे ! म्हणजे नक्की कोणत्या वर्षी काय विसरलो हे ही विसरलो. लग्न झाल्यापासून एक बरे झाले, मी केव्हा केव्हा आणि काय काय विसरलो हे हीच्या चांगलेच लक्षात आहे त्यामुळे ते आता लक्षात ठेवायला लागत नाही !
लहानपणी मी चपला विसरायचो. कोठेही गेलो की चपल तिकडेच विसरायचो. एरवी ती परत मिळायची पण सहलीला गेलो असेन तर मात्र ती जायची ती जायचीच. मग बरेच दिवस अनवाणी फिरायला लागायचे. एकदा एक मित्राची चप्पल घातली होती , ती ही विसरलो होतो ! दहावीनंतर संघाचे एक महीन्याचे (OTC) शिबिर केले होते. त्या शिबिराच्या पहील्याच दिवशी आंघोळ करताना बनियन बरोबर जानवे ही बाहेर निघाले. ते परत घालायचे विसरलो ते अगदी आजतागायत ! तसे काही मंगलकार्य असेल तर तात्पुरते घालतो, मग मात्र न विसरता काढतो ! पण ते बरेच झाले, सोवळे आणि जानवे म्हणजे ब्राह्मण्यत्व नव्हे हे तसे लवकरच कळले !
सतत न विसरता सलग २६ वर्षे मी छत्री विसरत आहे. त्यात पण वैविध्य आहे, कधी ट्रेन मध्ये, कधी कामावर, कधी दूकानात, कधी रिक्षात, अजून कोठे कोठे ते मात्र आठवत नाही, हे मात्र विसरलो ! बरे दर वर्षी एकच छत्री विसरावी असा काही दंडक नव्हता, त्यामूळे कधी दोन तरी कधी तीन सुद्धा विसरून बसलो आहे. मागच्या वर्षी छत्री हरवल्यावर स्कूटर चालवताना पण उपयोगी पडतो म्हणून रेनसूट घेतला होता, तो या वर्षी पाउस पडायच्या आधीच ट्रेनमध्ये विसरलो ! परत नवा घेतला आहे. विरारला असताना सगळ्या कुटंबाकरता ४ छत्र्या घेतल्या होत्या. उतरताना त्या ट्रेनच्या रॅकवरच राहील्या. रिक्षात बसत असतानाच आठवले आणि जीवाच्या आकांताने परत फिरलो. छत्र्या मिळाल्या ! असे काही परत मिळायची ती एकमेव घटना !
दिवाळीत अनेक एजंट भेट-वस्तू द्यायचे त्यातल्या फार थोड्या घरी पोचल्या, बहुतेक ट्रेनच्या रॅकवरच विसावल्या ! पनवेलला आल्यावर विरारच्या घरी दिवाळीचा फराळ घेउन चाललो होतो. बायकोने टपरवेयरच्या ५ किलोच्या दोन डब्यात सगळा फराळ व्यवस्थित भरून दिला होता. हजारदा बजावून सांगितले होती की ही पिशवी मांडीवरच ठेवायची ! ट्रेनमध्ये बसल्यावर हेच पहीले विसरलो ! रॅक वर ठेवलेली ती पिशवी अर्थातच वडाळ्याला गाडी बदली करताना विसरलो. पुढे बांद्रयाला विरार गाडी पकडली, भाईंदरची खाडी पार केल्यावर काय विसरलोय ते आठवले ! तेव्हा धावपळ करून काहीही उपयोग नव्हता ! विरारला उतरल्यावर मग कॅडबरीचा गिफ्टपॅक घ्यावा लागला होता. ही पिशवी ज्याला मिळाली असेल तो खरंच किती भाग्यवान असेल ! पिशवी अधिक दोन ५ किलोचे टपरवेयरचे डबे अधिक स्वादीष्ट फराळ ! आयुष्यभर तो ही गोष्ट विसरणार नाही !
लोकलचा पास काढणे ही सुद्धा एक विसरायचीच गोष्ट ! दर महीन्याला विसरायला लागू नये म्हणून मी तिमाही पास काढतो. lifetime पास मिळणार असेल तर तो मात्र मी न विसरता काढीन ! आधी पास संपल्याचे तिकीट तपासनीस सांगायचा तेव्हाच कळायचे. मग कधी पावती फाडून , कधी चिरी-मीरी कधी सरकारी ओळखपत्र दाखवून सूटका व्हायची. लग्न झाल्यानंतर बायको आठवण करून देउ लागली, मग मोबाईल रिमाईंडर व आता दहा दिवस आधीच online पास काढतो त्यामुळे ही समस्या आता सूटली आहे.
कामावरच डबा विसरणे हे अजून एक प्रकरण ! कधी पूर्ण डबा, कधी झाकण, कधी चमचा असे सतत काहीतरी विसरतच असतो. आधी एक डबा विसरलो की ही दूसरा डबा द्यायची पण एकदा ते दोन्ही डबे विसरलो आणि मग हीने कठोर धोरण स्वीकारले, पहीला डबा आणल्याशिवाय डबा मिळणार नाही ! अर्थात मी डबा विसरल्यावर कामावरच्या माझ्या महीला सहकारी न विसरता घरून माझ्यासाठी काही चांगले-चुंगले करून आणतात , मला प्रेमाने भरवतात हे कळल्यावर मात्र ---- !!
तीच गोष्ट पेनाची ! आतापर्यंत मला पेनाची रीफील कधीही घ्यायला लागली नाही आहे, यातच सगळे आले ! आता एक बरे आहे, पेन हरवले असे कबूल न करीता मुलांनीच घेतले असणार असे म्हणून बचाव करता येतो.मोबाइल चार्ज करण्याकरता कामावर ठेवला की तो सुद्धा तिथेच विसरायचो मग घरी गेल्यावरच मोबाईल चार्ज करतो. तसे घड्याळ आणि मोबाईल घरी विसरतो पण त्यात तापदायक प्रकार असा की हे नेमके VT ला उतरताना आठवते आणि आधी शंका येते कोणी 'हात की सफाई' दाखविली की काय ? मग कामावर पोचल्यावर घरी फोन करणे, हीने अगदी अंत बघायला लावून, भरपूर तोंडसूख घेउन 'आहे घरीच' असे सांगणे, मगच सूटलो असे वाटते. स्कूटरची किल्ली तशीच सोडून जाणे हे आणखी एक ! हे पण गाडी सूटल्यावरच लक्षात येते. मग कोणा शिफ्टवाल्या मित्राला फोनाफोनी करून तिकडे पिटाळणे व ती किल्ली ताब्यात घ्यायला सांगणे व हे घरी सांगू नकोस हे बजावणे . एकदा मात्र चावी तशीच राहीली आहे हे परत स्कूटरजवळ येई पर्यंत आठवले नव्हते, विसरावे तर असे विसरावे !
नवीन लग्न झाल्यावर घरी फोन नव्हता, हीचा तेव्हा पत्रव्यवहार भारी होता. पोस्ट-पाकीटे संपल्यावर पुन्हा आणून ठेवायला मी विसरायचो, हीने लिहून पोस्टात टाकायला दिलेली पत्रे मी आठवडा- आठवडा विसरायचो. पुढे ती वरच्या खिषात ठेउ लागलो, मग मित्र आठवण करू लागले व पुढे पुढे स्वत:च ती पोस्ट करू लागले !
माझ्याकडे ज्यांनी ज्यांनी रजेचे अर्ज दिले त्यांच्या रजा केव्हाच पास झाल्या नाहीत, कारण ते अर्ज मी योग्य ठीकाणी द्यायलाच विसरायचो, यात माझेही अर्ज असायचेच ! असाच एक पनवेलचा मित्र घरी वैद्यकीय रजेचा अर्ज घेउन आला. सात दिवसाची ती रजा होती. मी अर्ज घेतला आणि घरी विसरेन म्हणून त्याच्या समोरच बॅगेत ठेवला, अगदी न विसरता ! सात दिवसाने त्याचा फोन आला की मला कामावर घेत नाही आहेत, अर्ज कोणाकडे दिला होतास ? अर्ज अजूनही माझ्या बॅगेतच होता ! मग मीच पळापळ करून ती भानगड निस्तरली !
असेच एकदा धावपळीत कामावर जायला निघालो आणि दारच उघडेना. अजबच प्रकार झाला होता. बाहेर पडायचा दूसरा मार्गच नव्हता, शेजार्यांना हाक देउनही उपयोग नव्हता कारण बाहेर सेफ्टी दरवाजा बसवला आहे. शेवटी मोठा स्क्रू ड्रायवर घेउन, ३० मिनीटे घाम गाळून दाराचे लॅच पूर्ण उचकटले, बघतो तर काय दारालाच बाहेरून चावी लावून ठेवलेली. ती लॉक कशी झाली हे अजूनही एक गूढच आहे ! रात्री उशीरा सगळे घरी आलो, लॅच उघडून आत आलो पण किल्ली परत काढून घेतलीच नाही ! माझ्या भरवशावर दरवाजे / खिडक्या बंद करणे बायको कधीही सोडत नाही कारण मी एकटा असताना दार नुसते लोटून झोपलेलो होतो किमान तीनदा ! एका वेळी तीच सकाळी घरी आल्यावर दार उघडे पाहून घाबरून गेली होती, मी मात्र आत झोपलेलो होतो !
तशी मी माझ्याकडून पुरेपूर काळजी घेतो, आधुनिक तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग करतो. reminder लावून ठेवतो (पण तो कशाकरता लावला आहे हे मात्र कधी कधी विसरतो !). सगळी बिले , विम्याचे हप्ते , लॉकरचे भाडे ECS/Auto Debit ने भरतो, मुदतीच्या ठेवी काढताना auto renewal पर्यायाला न विसरता YES करतो ! एकदा ते करायला विसरल्यामुळे मात्र ठेव संपून ६ महीने मोडल्यामुळे एका बॅकेला स्मरणपत्र पाठवावे लागले होते !
तसे एकदा(?) लग्न झालय हे (चांगलेच) लक्षात आहे, दोन मुले आहेत हे ही लक्षात आहे, त्यांना कोठे घेउन गेल्यावर विसरत नसे (आता ती मोठी झाल्यामुळे हे ती मला विसरू देत नाहीत हे वेगळे !). तसे सूरळीत चालू आहे !
या वरून एक विनोद मात्र चांगला लक्षात राहीला आहे. एक विसरभोळा शास्त्रज्ञ पॅराशूट बनवतो. त्याची चाचणी घेण्याकरता विमानातून उडी मारतो. थोड्या वेळाने त्याला समजते की आता आपण 'वरच' जाणार आहोत, कारण आपण उडी मारण्यापुर्वी पॅराशूट घ्यायलाच विसरलो आहोत !
अरे कमाल आहे ! काय विसरलो हे लिहायला बसल्यावर बरेच आठवत आहे की ! अजून काय बरे ---- ?? अरे बापरे ! हे सगळे सेव करायला विसरलो आहे ! आता हो काय करायचे ???

शुक्रवार, ४ जुलै, २००८

कॉलेज लाईफ अर्थात कॉलेजातील दिवस !

कॉलेज लाईफ अर्थात कॉलेजातील दिवस !
मला वाणिज्य शाखेला प्रवेश घ्यायचा होता पोद्दार मधे , मार्क ७८% होते, ७५ % + मार्काला थेट प्रवेश मिळत होता. शाळेतुन निकालपत्र घेउन पोद्दारला आलो तर रांग पार माटूंग्याच्या कोपर्यापर्यंत पोचली होती ! इतर शाळा आदल्या दिवशीच निकालपत्र देत , ती मुले पहाटेपासूनच उभी होती ! साधारण चार तासांनी माझा नंबर आला आणि waiting list चालू झाली ! एक आठवडा वाट बघितली, प्राचार्यांनाही भेटलो पण ठाम आश्वासन मिळेना म्हणून वडाळ्याला नव्यानेच सुरू झालेल्या s.i.W.S. ची वाट धरली. पण तिथेही प्रवेश फुल्ल ! त्या प्राचार्यांना भेटलो. या वर्षी प्रथमच मराठी विषय तिथे सुरू होणार होता, प्रवेश मिळाला पण original certificate ठेउनच आणि दोनच दिवसात पोद्दार ला प्रवेश मिळाला, पण आता कॉलेज बदलायचा पर्याय बाद झाला होता. मला वाटते पुढील वर्षापासून दोन दिवस नुसते अर्ज वाटप आणि मग मेरीटप्रमाणे प्रवेश अशी पद्धत सुरू झाली !
SIWS अगदीच नवे होते. प्राध्यापक / स्टाफ बहुतेक दाक्षिणात्य पण प्राचार्य (गोवेकर) फक्त मराठी ! मराठी विषय घेतलेली आम्ही मोजून ४० टाळकी होतो, आश्चर्य म्हणजे अनेक मराठी मुलांनी हिंदी विषय घेतला होता पण एकाही अमराठी मुलाने मराठी घेतले नव्हते ! मराठी शिकवणार्या बुधकर मँडम त्यामुळे आम्हाला खूप जवळच्या वाटायच्या. मराठी फारसे कानावर पडत नव्हतेच पण बाकी प्रोफेसर vernacular medium ची मुले म्हणून आमची हेटाळणीच करायचे. organisation of commerce ला गिरी मँडम / मग गोखले मँडम , Economics ला मिस. उषा मँडम. अगदी राहवत नाही म्हणून सांगतो की यांचे लेक्चर कोणीही कधीही बंक केले नाही ! यांच्या लेक्चरला मुले पाठी उभी राहायची ! आमच्या बालमनावर फार परीणाम झाला यांच्यामूळे ! Secretarail Practice ला जोशी सर . हे मराठी नव्हते पण जोशी आडनावामुळे जवळचे वाटायचे ! शिकवायचे फारच छान ! English च्या मँडमचे नाव आठवत नाही पण पार डोक्यात शिरायच्या ! काँलेजचे कँण्टीन अगदीच बाल्यावस्थेत होते पण आमच्या सुदैवाने VJTI जवळच होते ! पुढे तेच आमचे official canteen झाले. तिकडच्या वाँचमनने आम्हाला कधीही ओळखपत्र विचारले नाही, आम्हाला वाटायचे चेहर्यावरून तरी आम्ही हूषार वाटत असावे ! तसा कोपर्यावर ईराणीही होताच. पानीकम चहाची ओळ्ख इथे झाली. पहील्याच दिवशी एका मित्राने आम्हाला mangola पाजला आणि पैसे द्यायच्या वेळी खिसे उलटे करून दाखविले ! आमक्या डोळ्यापुढे काजवे चमकले ! आम्ही म्हटले आमची I-CARD ठेउन घ्या , उद्या पैसे आणतो. पण मालक हसून म्हणाला, "इसकी कोई जरूरत नाही, कल देना पैसा !"
कॉलेज सुरू होउन काही दिवसच झाले होते. दूसर्या सत्रासाठी जात असताना raging चा प्रयोग रंगला होता. मला सगळ्या सिनीयर्स नी घेराव घातला होता. तेव्हा मी अगदीच बावळट, शामळू होतो (आताही काही फार फरक पडला नाही आहे !). उंची ४ फूट ९ ईंच, ह्डकूळा, कपडे साधेच, raging साठी अगदी आदर्श होतो ! पण एक चमत्कार झाला. त्या टोळक्यात माझ्या वरळीच्या लांबच्या नात्यतल्या बहीणीचा मित्र होता, साजन नावाचा. वरळीला गेलो असताना त्याची ओळख झाली होती. त्याने पटकन मला आपल्याकडे ओढून घेतले व म्हणाला "ये मेरा दोस्त है, इसे छोड दो" भाई असावा तो, लगेच माझी मुक्तता झाली ! अकरावीचे वर्ष असेच पार पडले, काहीही विशेष न घडता ! आम्ही मराठी मुले सतत घोळक्याने फिरायचो, एकमेकांचा आधार खूप मोलाचा वाटायचा. लेक्चर बंक निदान अकरावीला असताना तरी केल्याचे आठवत नाही. मराठी आधी भावे मँडम शिकवायच्या (बहुदा बातम्या वाचणार्या भाव्यांच्या पत्नी असाव्यात.) अगदी शेवटच्या सत्रात बुधकर मँडम आल्या आणि आम्ही मराठी मुलांना त्यांनी 'जागे' केले, आमच्यात नवा आत्मविश्वास ओतला ! आम्ही बारावीत गेल्यावर अकरावीत मराठी बँच आली त्यात अनेक उत्साही मुले होती. बुधकर मँडम यांचे मार्गदर्शनाने या नव्या दमाच्या मुलांना बेरोबर घेउन आम्ही कॉलेजात 'मराठी वाड्मय मंडळाची' रूजवात केली. उद घाटक होते कमलाकर व लालन सारंग हे कलाप्रेमी दांपत्य ! खूप छान झाला कार्यक्रम. मग आम्ही मागे वळून पाहीलेच नाही. मराठीतल्या अनेक नामवंत कलाकारांना आम्ही बोलावले आणि एक से एक कार्यक्रम सादर केले. मच्छीद्र कांबळी, लक्ष्मीकांत बेर्डे, रामदास आणि अपर्णा पाध्ये, व्.पु.काळे, यशवंत देव, नाना पाटेकर असे एकाहून एक दिग्गज कलाकार !
मी आमच्या सर्व कार्यक्रमांचे reporting करायचो. नवाकाळ मधे वडीलांमुळे ओळख होती. त्या मुळे आमचे सर्व वृतांत नवाकाळ सविस्तर छापायचा. 'SIWS मधे मालवणी' हा माझा मथळा तेव्हा खूप गाजला होता. मच्छीद्र कांबळी यांची ओळख तेव्हा आमचे प्राचार्य अय्यंगार यांनी मालवणीत करून देउन एकच धमाल उडवून दिली होती ! त्या बातमीचे कात्रण त्यांनी माझ्याकदून खास मागून घेतले होते. अनेक कलाकारांना जवळून बघता आले, त्यांचे नखरे, थेर, अडवणूक जवळून बघता आली. एक प्रसिद्ध कलाकाराची तासभर वाट बघून त्याला आणायला जेव्हा घरी गेलो तेव्हा स्वारी फूल टाईट होती ! उभे रहायचीही शुद्ध नव्हती ! कार्यक्रम रद्द करावा लागला !

दोन प्रोफेसर चांगल्या अर्थाने लक्षात राहीले आहेत. accounts शिकवणारे भाटकर सर आणि business law शिकविणारे साळवी सर ! प्रो. भाटकर यांनी स्वत:कडूनच पाच सहा बक्षिसे लावली होती त्यात एक हजेरी साठीचेही होते ! घाटकोपरवरून रोज टँक्सीने येत व जात ! आम्ही विचारायचो स्वत:ची गाडी का घेत नाही तर हसून म्हणायचे ज्याला व्यवहार समजतो तो हे कधीही करणार नाही. accounts चे सर्व problem तोंडी घालायचे ! ते पण रूपया पैशात ! त्यांची त्यात एकदाही चूक होत नसे ! सगळे आकडे त्यांच्या डोक्यात असत !साळवे सरांचे ईंग्रजी अगदी फर्डे होते ! ते ही वर्गात पुस्तक कधीही आणत नसत ! सगळी कलमे तोंडपाठ ! पहील्या लेक्चरची सुरवात "कायदा गाढव असतो" या वाक्याने करीत ! त्यांचे लेक्चर कधी संपूच नये असे वाटे !प्राचार्य अय्यंगार आम्हाला, fybcom ला , स्टँट्स शिकवत, त्याचेही ईग्रजी कानाला गोड वाटायचे ! traditional day ला महाषय चक्क लूंगी व शर्ट घालून आले होते ! एकदा आम्ही चक्क बाळासाहेब ठाकरे यांना एका कार्यक्रमासाठी आमंत्रण धाडले होते. हे कळल्यावर अय्यंगार हादरले, आम्हाला बोलावून घेतले व असे करू नका असे विनवले. आम्ही ते ऐकले पण त्या बदल्यात आमच्या कार्यक्रमांना निधी व कॉलेजचे सभागृह मिळवून घेतले !प्रा. बंडगर आमच्या NSS चे प्रमूख होते. पहीला कँम्प झाल्यावर मोटर सायकल विकत घेतली व सरळ सांगत की शिबीराच्या पैशातून 'बचत' करून घेतली म्हणून !

कॉलेजात असताना अगदीच सुमार रूप असलेला माझा एक मित्र rose day च्या दिवशी यच्चयावत सुंदरीना red rose द्यायचा ! मला कधी कोणाला पिवळे गुलाब देण्याचीही हिंमत झाली नाही (तसे मलाही कोणी कोठलेच गुलाब देण्याची तसदी घेतली नाही , ते अलाहीदा !) आणि हा पठ्ठ्या त्या दिवशी त्या सगळ्या सुंदर्यांबरोवर shake hand सुद्धा करायचा ! भले शाबास !अगदी अकरावी ते चौदावी, सलग चार वर्ष माझ्याच वर्गात शिकणारी एक मद्र्-सुंदरी होती. रोज कॉलनीत सकाळी दूधाच्या रांगेत आम्ही पाठी पुढे असायचो, पण एका शब्दानेही कधी बोललो नाही ! एकदा कॉलेजचे गँदरींग संपल्यावर एका मित्राने तिला बरोबर घेउन जाण्यास सांगितले तेव्हा मी चक्क वेळेआधीच कलटी मारली होती ! ती मात्र मला शोधत बराच वेळ थांबली होती !


अभ्यास बेतास बेत होता. NSS च्या १० मार्कानी बर्याचदा तारले ! हजेरी ७५% भरेल याची काळजी घ्यायचो तरी पण एकदा defaulter list मधे नाव आलेच, पण नशीबाने स्टाफ मधे माहेरचे मराठे आडनाव असेलेल्या एक मँडम होत्या त्यांनी घरी पत्र पाठवले नाही !वाचलो! NSS च्या कँपला जायचो, तेवढीच १० गुणांवर नजर ठेउन समाजसेवा ! BEST साठी रांगापण लावल्या ! शेवटच्या वर्षात मराठी मुलगा CR आणि पुढे UR म्हणून निवडला गेला आणि यशाचा कळस गाठून समाधानाने कॉलेज सोडले !

शब्दांची गटबाजी ! (एक शब्दखेळ )

शब्दांची गटबाजी ! (एक शब्दखेळ )
खेळ सोप्पा आहे ! याची सुरवात मी एक गट व त्यात बसणारे पाच शब्द देउन करणार आहे. पुढच्याने त्यातला किमान एक शब्द घेउन नवा गट बनवायचा आहे ! या गटात सगळे मिळून पाचच शब्द हवेत ! गटाचे नाव आधी देउन मग मागच्या गटातला घेतलेला शब्द आधी देउन बाकी शब्द मग द्यायचे आहेत.


उदा. खडू, फळा, बाक, वाचनालय, प्रयोगशाळा -- या शब्दांचा गट आहे 'शाळेचे घटक' .

आता यातला 'खडू' शब्द घेउन मी खडू, पेन, पेन्सिल, बोरू, बॉलपेन हे शब्द घेउन 'लिहीण्याची साधने' असा गट केला आहे.

आता तुम्ही हा गट घेउन खेळ पुढे चालू ठेवा !

हा छंद जिवाला लावी पिसे !

हा छंद जिवाला लावी पिसे !
मी नुकताच नोकरीला लागलो होतो. वय १९ ! ती दहावीत ! माझ्या घरासमोरच पादचारी पुल होता आणि त्याच्याच खाली कुंपण तोडून केलेला short-cut. पुलाचा वापर कोणीही करत नसत ! ही मुलगी मात्र ह्ट्कून पुलावरूनच जायची, कदाचित म्हणूनच नजरेत भरली ! दिसायला ही अगदी "graceful" होती. तिने काँलेजात प्रवेश करेपर्यंत नुसते बघणेच चालले होते. जीवश्च-कंठश्च असे आम्ही चार मित्र, समान धागा एकच, कोणालाही मैत्रीण नव्ह्ती ! दिसायली ही बावळेच ! मित्रांकडून 'तिचे' नाव गाव समजले. ती जातवाली नव्ह्तीच तर चक्क मागासवर्गीय होती ! आता मात्र बंडखोर स्वभाव उफाळून आला. या मुली बरोबर निदान ओळख तरी करून घ्यायचीच असा निश्चय केला ! मित्रांची फूस होतीच ! शेवटी एकदा आंबेडकर काँलेज समोरच्या बसस्टाँप वर तिला मैत्री प्रस्ताव सादर करायचा असे ठरले. मित्र समोरच्या बसस्टाँप वर उभे राहून माझे मनोधैर्य वाढवणार होते.


स्टाँप वर तिच्या जवळ उभा राहिलो. बरोबर तिची एक मैत्रिण पण होती. समोर मित्र होतेच ! एक भीती होती, तीची बस पटकन आली असती तर ? बस आली पण गर्दी असल्यामुळे तिने ती सोडून दिली. प्रचंड गर्दी आणि कोलाहलात मी "excuse me" म्हणून पहीला बाँल टाकला. मला तुझ्याशी मैत्री करायचीय असे बोलून एक मोठा श्वास घेतला !तिला आधी आश्चर्य वाटले. मला आपादमस्तक न्हाहाळून तीने माझ्यावर अक्षरश्: प्रश्नांची सरबत्ती सूरू केली ! नाव काय, करतोस काय, राहतोस कुठे -- ? मला अक्षरश्: घाम फूटला ! माझी उत्तरे देताना तत-पप होत होती. ती मात्र आता enjoy करत होती. शेवटी एकदाचे ती गोड हसली व मला आपले नाव सांगितले ! लगेच तिची बस आली, मला ह्ळूच bye करून ती बसमधे चढली ! समोरून मित्र धावतच माझ्याजवळ आले. "साल्या काय फाफलला होतास, तुझ्या कपाळावरचा घाम आम्हाला पण दिसत होता" म्हणाले. मार पडायचीच लक्षणे होती. पण एक मोठा टप्पा पार पडला होता !
माझ्या कामाच्या वेळा आठवड्याला बदलायच्या, दिवस पाळी सकाळी ८ त्ते ५, दूसरी पाळी ५ ते ११:३० तर ५ आठवड्यातुन एकदा रात्र पाळी (रात्री ११:३० ते सकाळी ६ ). पहीली भेट झाली तेव्हा दूसरी पाळी होती. आणि मग परत दिवस पाळी सूरू झाली. संपूर्ण आठवडा तिचे नख ही दिसले नाही ! त्या दिवसातली तगमग, व्याकूळता, घालमेल, कासावीस शब्दात व्यक्त करता येणारच नाही. माझ्या वागण्यातपण सकारात्मक बदल झाला होता. चिड्णे कमी झाले होते, समजूतदारपणा आला होता,चेहर्यावर एक निराळेच तेज आले होते. सगळे जगच सुंदर आहे असे वाटू लागले होते ! "हा छंद ---" हे गाणे त्या काळात हजारदा तरी ऐकले असेल ! सोमवारी दूपारी वाण्याकडून नारळ घेउन घरी निघालो होतो, आणि पाठून आवाज आला, 'आहेस तरी कोठे, काँलनी सोडलीस की काय '. ती 'तिच' होती ! सगळं अंग मोहरून निघाले ! तू गीताचा भाउ ना ? मी उडालोच, माझ्या बहीणीला ही कशी ओळखते ? तिची best friend आणि माझी बहीण एकमेकींच्या best friend होत्या. 'नारळ घेउनच स्टाँपवर येणार का ?' हो- नाही अशी उत्तरे मी आलटून पालटून देत होतो आणि ती खळखळून हसत होती. शेवटी हातात नारळ घेउनच मी तिच्या बरोबर स्टाँप वर गेलो ! मग हे रोजचेच झाले. घर ते स्टाँप या साधारण २० मिनिटांत आम्ही काय बोलायचो rather मी काही बोलायचो तरी का हे सुद्धा आता आठवत नाही !


शुक्रवारी मला off होता. मित्रांबरोबर briefing झाले. 'आगे बढो' असा सल्ला मिळाला ! हाँटेलात तिला चहाची आँफर द्यायचे ठरले. शनिवारची ती दूपार, एका वळणावर ती आणि मी. एक वाट स्टाँपची तर एक उडप्याच्या हाँटेलची. आपण चहा घ्यायचा ? धीर एकवटून मी विचारले. 'ही काय चहा प्यायची वेळ आहे, आणि मी पोट फूटे पर्यंत आज जेवले आहे' तीचे उत्तर ! पण मी अशा उत्तराची अजिबात अपेक्षा केली नव्ह्ती. त्यामुळे पुढे काय बोलायचे मला सूचेचना ! मी पार हडबडून गेलो ! loop मधे गेल्यासारखा 'चल ना, चल ना' करीत राहीलो ! आणि ती एकदम बोलून गेली,'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्ह्ती' ! झटकन पुढे निघुन गेली. माझ्या कानात गरम शीसे ओतल्यासारखे झाले. स्वत:चीच लाज वाट्ली. एवढे कसे आपण अधीर झालो, बस झाले हे प्रेमाचे खूळ, आता पुन्हा या भानगडीत पडायचे नाही असे स्वत:ला बजावुन घरी आलो. मग पुढचे काही दिवस प्रेमाच्या hangover मधुन बाहेर पड्ण्यात गेले. मित्रांना सगळा सीन सांगितला,तीला पुन्हा कधीही भेटणार नाही असे सांगितले. मित्र समजावू लागले ती 'दूपारी' चहाला नाही बोलली याचा अर्थ संध्याकाळी चहा घेउ असा होतो. पण माझ निर्णय ठाम होता. माझ्या मित्रांकडे ती अनेकदा माझी चौकशी करायची पण माझ्यात कमालीचा न्युनगंड निर्माण झाला होता. मी परत कधीही तिला भेटलो नाही.


त्या नंतर अनेक trek केले, बहुतेक भारत फिरलो, अनेक मुली भेटल्या. आवडल्याही, पण स्वत:हुन कधी कोणाशी ओळख करून घेतली नाही. एका मर्यादेपलीकडे कोणात अडकलो नाही. २५ व्या वर्षी लग्न झाले, arranged, यथावकाश सूरही जूळले, पण, पण पहील्या प्रेमातली ती अधीरता, कातरता, तरलता, संवेदनाशीलता, ते खयालों मे हरवुन जाणे, ती ओढ... पुन्हा कधी कधीच अनुभवली नाही ! एकदा अकस्मात बायकोबरोबर भाजी घेत असताना 'ती' दिसली ! तीने मला पाहीले की नाही, don't know ! पण अपराधीपणाची जाणीव मात्र प्रकर्षाने घर करून राहीली ! मागाहुन घरी आल्यावर बायकोला सगळी story सांगितली ! हसली, म्हणाली, 'प्रेम आंधळे असते' असे म्हणतात ते आज कळले !


आता तुम्ही म्हणू शकता "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं !"

--- परि ब्लॉगरूपी उरेन !

--- परि ब्लॉगरूपी उरेन !
अगदी वाचता यायला लागल्यापासूनच लेखनाची उर्मी जागृत झाली होती. स्वतंत्र विचार पण करता येत होता. शाळेत असताना गाईड कधी उघडावे लागले नव्हते. निबंध वर्गात वाचून दाखविले जात. पण मग निव्वळ अक्षर खराब असल्यामुळे लिहायचो भरपूर पण वाचलेच जात नव्हते ! कोणी आपले वाचत नाही तर आता आपणच दूसर्यांचे वाचूया असे ठरवून मी अफाट वाचन केले. अगदी विषयाचे कोणतेही बंधन न मानता दिसेल ते वाचून फस्त केले. वाचनायल्यतल्या बाई खोटे खोटे चिडायच्या व नियम सांगायच्या की दोन दिवसाच्या आत पुस्तक बदलून मिळणार नाही ! वाचनालय उघडायच्या ३० मिनीटे आधीच मी दाराबाहेर उभा असे !


माझे बाबा अगदी सिद्धहस्त लेखक आहेत. त्यांचे अक्षरही सुंदर आहे. त्यांचे वाचन, पाठांतर अफाट आहे. सतत काहीतरी ते लिहीत असतात. त्यांचे बघून मला सुद्धा लिहावे असे वाटू लागले. बाबा नवाकाळ साठी साप्ताहीक भविष्य लिहीत. मी ते घेउन नवाकाळच्या कचेरीत जात असे. संपादक विभागातील अनेक जणांशी ओळख झाली होती. मग हळूच भविष्याच्या बाडा बरोबर कॉलेजमधील कार्यक्रमाचे वृत्तातपण देउ लागलो. छापून येउ लागले. भीड चेपली. मग पुढे 'संपादकांना पत्रे' छापली जाउ लागली. पेपरात पत्र छापून आल्यावर सगळे जगच आपल्याला ओळखते असे वाटयला लागायचे. कोणी 'अरे तुझे पत्र छापून आले आहे' असे बोलले तरी हवेत तरंगायला लागायचो. मधल्या काही काळात नोकरी, लग्न, गिर्यारोहणाचा छंद या मूळे लेखन पाठीच पडले. मग मुले शाळेत जाउ लागल्यावर त्यांनी निबंध लिहून द्या असे सांगितल्यावर, तुम्ही तो आपल्या आपण लिहा, मला कोणी सांगत नव्ह्तो, वाचन वाढवा असा भाव खाउन झाल्यावर, त्यांना निबंध लिहून देत असे ! मग संगणक विभागात अगदी गढून गेलो. अनुभवांची शिदोरी जमा होत होती पण लिहायला वेळच नव्हता. मराठी लिहायचा सरावही सूटला होता. अक्षर अजून बिघडले होते. शब्द आठवावे लागत होते. काम थोडे कमी झाले. स्वत:च्या घरात पनवेलला रहायला गेलो. ३ तास प्रवासात जाउ लागले. या वेळेत डोक्यात विचारांचे नुसते मोहोळ उठे. डोके नुसते भंजाळून जाई. एक अजब मनाची अवस्था होती ती. विलक्षण कोंडमारा होत होता.

साधारण २००४ साली संगणक विभागातून सूटका झाली. टर्मिनलच्या ऐवजी PC आला. MS OFFICE शी मैत्री झाली. 'किरण' हा मराठी फॉण्ट मिळाला व जणू आशेचा नवा किरणच मिळाला ! नव्या कार्यालयात फॅक्स पण होता. मग संपादकांना पिडायची जुनी खोड पुन्हा उफाळून आली. विविध विषयांवर अकलेचे तारे तोडून ते पेपरना फॅक्स करू लागलो. आश्चर्य म्हणजे ती पत्रे छापूनही येउ लागली. मग थेट म.टा. च्या संपादक विभागात जाउन लेख देण्याची मिजास दाखवू लागलो ! एकदा मात्र मटाने ने मित्र म्हणता म्हणता चक्क विश्वासघात केला. हार्बरच्या प्रवाशांच्या व्यथा मांडणारे एक पत्र त्यांच्या एका महीला पत्रकारने (मनीषा नित्सुरे) चक्क आपल्याच नावावर खपविले वर चक्क 'नवीन पनवेल चे श्री. एकनाथ मराठे असे म्हणतात' असे लिहून एक किरकोळ मुद्दा त्याच लेखात माझ्या नावावर खपविला. याचा निषेध नोंदवला पण उत्तरही मिळाले नाही. त्या पुढेही माझी पत्रे मटात येत पण कटूता आली होतीच. मटाची सेन्सॉरशीप वाढू लागली. अनेक वेळा तर पत्र 'माझे' आहे हे फक्त खालचे नाव वाचूनच कळे ! मटाला लिहीणे बंद केले व सकाळच्या संपादकांशी ओळख झाली. मग सकाळ मध्ये बरेच लिखाण प्रसिद्ध झाले. पण मग याचा ही कंटाळा आला !

चितपावन संमेलनाच्या आसपास ऑर्कुट वर आलो. असेच शोधता शोधता 'कोकणस्थ चितपावन ब्राह्मण (KCB)' या कट्ट्यावर सभासद झालो आणि जणू विचारांच्या देवाण-घेवाणीचे एक अजब दालन उघडले गेले ! आधी नुसते वाचत होते मग केव्हातरी लिहू लागलो. लेखनात सफाई येउ लागली. संपादकांना लिहीणे आणि टॉपिकवर लोकांना बोलते करणे यात खूपच फरक आहे हे ही समजले. त्यातुनच काही टॉपिक मालक 'झाला आहे' असे सांगून उडवित. कोठेतरी ego दुखावला गेला आणि ठरवले की असे काही लिहावे की ते आधी कोणाला सूचलेच नसेल ! पनवेलवरून ट्रेन सूटली की डोक्यात अनेक टॉपिक घोळायला लागायचे. बेलापूर पर्यंत त्यातला एक पक्का व्हायचा व पुढे त्याची कल्पना शब्दरूप व्हायची ! कामावर पोचल्यावर रोजची कामे झाली की टॉपिक टाकणे हे ही ठरूनच गेले !अनेक स्क्रॅप येउ लागले. बहुतेक आवडले असे सांगणारे. काही टॉपिक पण चांगलेच गाजले. भरपूर कौतुक झाले. उत्साह वाढला. नवे काहीतरी सतत द्यावे असे वाटू लागले. जमूही लागले. असेच एका टॉपिक वर श्री. प्रशांत मनोहर यांनी 'तुम्ही ब्लॉग लिहा' असे सूचवले व लगोलग धोंडोंपंतानी 'पंत' संबोधून तो मुद्दा उचलून धरला ! दूसर्या दिवसाचा मुहुर्त ही काढून दिला ! त्या दिवशी लोडशेडींग मुळे तो मुहुर्त हुकला तो हुकलाच. दरम्यान या दोघांचे ब्लॉग वाचून काढले व 'ये अपने बस की बात नही' असा एक ग्रह झाला ! या दोघांची शैली खूपच भिन्न आहे व ती माझ्या लिखाणाच्या जातकुळीशी बिलकूल जूळत नाही. त्यांच्याशी चॅटींग करताना टेंशन यायचे, 'ब्लॉग लिहीला का' असे विचारले तर काय कारण सांगायचे ? मध्येच केव्हातरी मालकांच्या (आदी जोशी) ब्लॉगचे कौतुक वाचले व त्याचा ब्लॉग वाचून काढला. आदीची शैली बरीचशी माझ्याशी मिळती जूळती वाटली व परत ब्लॉग लिहावा या विचाराने उचल खाल्ली ! वाढदिवस महीन्यावर आला होता व तोच मुहुर्त साधावा असे ठरले. आधी ऑर्कुटवर लिहीलेले टॉपिक कॉपी-पेस्ट करावे असे ठरवले पण मग ते अगदीच हास्यास्पद वाटू लागले. काहीतरी वेगळे हवेच ! हटके ! तसे 'टॅलीनामा' हे नाव डोक्यात खूप आधीपासूनच होते, तेच नक्की केले. गोदीच्या नोकरीने मला घडवले आहे तेव्हा त्या वरच लिहावे हे ही ठरले. आणि अगदी एकाच दिवसात टॅलीनामाचे ६ विषय लिहून पण झाले. मित्रांना ते वाचायला दिले व त्यांनीही ग्रीन सिग्नल दिला. मग घरी गेल्यावर पण हेच काम चालू झाले. आधी बायको वैतागायची पण मग तीला ही यात गंमत वाटायला लागली. मागे एकदा दादर मीट मध्ये देवाच्या कानावर ही बातमी घातली होतीच. मग प्रशांतला व धोंडोपंताना पण कळविले. या दोघांना तांत्रिक बाबीसंबंधि मी बरेच पिडले पण त्यांनी कोणतीही खळखळ न करता अगदी साद्यंत सगळे फंडे क्लीयर केले ! मग दिपा, शरद, मंदार, अमित श्री यांना अवलोकनार्थ लिंक पाठवली व त्यांचे go ahead आल्यावर KCB वरच्या सर्व मित्रांना कळविले. अनेक सूचना आल्या. त्या प्रमाणे template बदलली, रंग बदलले, फॉण्ट साईझ वाढविली, लेबलींग केले, प्रस्तावना फोटोपासून वेगळी केली ! एकच गोष्ट आता करता येणार नाहे ती म्हणजे शुद्धलेखनाच्या चूका दूरूस्त करणे! (त्या बद्दल खरच दिलगीर आहे !)


आतापर्यंतच्या धरसोडीच्या आयुष्यात फारच थोड्या गोष्टी अशा आहेत की ठरवून करता आल्या. या ब्लॉगचे असेच ठरवून अनावरण करताना अतीव आनंद होत आहे. काही वेळा असेही झाले की तास तास बसून काही लिहून काढावे आणि सेव करताना सगळे ढूप व्हावे. अतिशय निराश व्हायचो पण परत नवी उमेद जागी व्हायची, मग पुनश्च हरी ओम ! डोळे, पाठ, मान, हात पार दूखत पण जिद्द मरत नव्हती !ब्लॉग लिहून होत आला होता, त्याची वाच्यता बाहेर कोणाकडे केली नव्हती आणि डोक्यात एक अजब किडा वळवळू लागला ! हे सगळे पूर्ण करायच्या आधीच आपले काही बरे-वाईट झाले तर ? हा आपला उपद्व्याप कोणाला कळणारच नाही ! पण हा विचार मोजक्या लोकांना link पाठवल्यावर झटकला गेला तो कायमचाच. या ब्लॉगचे नि:संशय सारे श्रेय या कट्ट्यावरच्या सर्वानाच आहे. तुमच्या प्रेमामुळेच मी ही मजल गाठू शकलो !
मी ब्लॉग लिहीला, तुम्ही केव्हा लिहीणार ? माझा ब्लॉग वाचून जर कट्ट्यावरच्या कोणाला ब्लॉग लिहावा असे वाटले, त्याने तो लिहीला तर मला अतीव समाधान मिळेल. मला जशी मदत प्रशांत व धोंडोपंतानी केली ती मी तुम्हाला नक्की करीन, फक्त तुम्ही लिहीते व्हा ! जसे गाता गळा तसेच लिहीता लिहीता ब्लॉग ! कोण देईल हे समाधान मला ?


वाढदिवसाच्या दिवशी या ब्लॉगचे अनावरण करतोय. आत्म्याचे अमरत्व मी मानतो म्हणून 'या जगात नसेन तरी (माझे) डोळे (नेत्रदान करणार आहे) व ब्लॉग रूपाने उरेन' हे नक्की !

गोदीमधले विंग्रजी !

गोदीमधले विंग्रजी !
कारकून या पदासाठी आमच्याकडे सध्या असलेली जास्तीत जास्त शैक्षणिक पात्रता १० वी पास आणि त्या आधी तर सगळा आनंदच होता. स्वातंत्र्यपुर्व काळात काही काळ ब्रिटीश अधिकारी होते, त्या मुळे सगळीकडे इंग्रजीचा पगडा होताच, साहेब गेला पण गोदीच्या गाळात रूतलेली इंग्रजी काही बाहेर आली नाही. सगळे कामकाज इंग्रजीत चालते. साहेबावर छाप पाडण्याकरीता सुद्धा इंग्रजी 'तोडले' जाते. तसा आमच्याकडे बहुसंख्य स्टाफ मराठीच आहे पण इंग्रजीत बोलल्यावर छाप पडते, कामे होतात हा समज टिकून आहे. या अट्टाहासामुळे मस्त विनोद निर्मिती होत असते.
टॅली क्लार्क ला टॅली-शीट वर जहाजाचे नाव लिहायचे असते, काहींना ते नाव कोणते ते ही कळत नाही. "beware of propeller", "Permission Denied", "No Smoking" ही काहीनी लिहीलेली जहाजांची नावे आहेत !
माल उतरताना त्याची स्थिती बघून landing remark लिहायचा असतो तसेच त्याचे वर्णनही लिहायचे असते. त्यातही अनेकांनी petee petara (cases), pimpe (drums), roolya (coils) असे तारे तोडले आहेत तर landing remark घेताना chepped (dented), tootake footake (damaged) असे लिहीले आहेत.vessel चे स्पेलींग सुद्धा धड लिहीत येत नाही, tally चे पण कोणी महाभाग tali असे करीत !
एकदा मी घेतलेली टॅली आमच्या निरीक्षकाने बघितली. एका पेटीचा remark मी damaged असा घेतला होता. तो मला सांगू लागला नुसते damaged काय, planks broken, nails loose, stips off, content exposed हे पण लिहा !
संगणक विभागात असताना मी एकदा बॅक-अप संबंधि एक प्रस्ताव बनवला होता. त्यात data हा शब्द होता. मसुदा फायनल करताना माझ्या साहेबाने तो datas असा केला. मी परत प्रिंट घेताना तो माझ्या अकलेने data असा करून घेतला. साहेबाने सही करताना माझी अक्कल काढली. काळ्या पेनाने तो शब्द परत datas असा केला ! परत काही दिवसाने मसुदा करताना मात्र मला त्याने data असेच लिहून दिले. मग मी पण मुद्दाम प्रिंट काढताना ते datas असेच केले. सही करताना त्याने झक मारत ते स्वत: data असे केले. मग कळले की datas ने त्याची पुरती लाज वरीष्ठांनी काढली होती !
मला माझ्या दोन ज्युनीयर सहकार्यांना मुदतवाढ घ्यायची होती. साहेबाला सांगितले की ते familiar आहेत म्हणून मला हवेत. साहेब बोलला मराठे हे तुझे काहीतरीच , माणूस संसारी झाला म्हणून त्याला मूदतवाढ द्यायची ?
उप निबंधकाच्या कार्यालयाला सकाळी , आदल्या शिफ्ट मधे झालेल्या कामाचा तपशील द्यावा लागे, तेव्हा कोणी ते असेही देत,
वन क्रेन इज वर्कींग झपाझपा , वन इज सीटींग आयडल !
वेसल इज डिसचार्जिंग पेटी-पेटारा ऍड सटर-फटर आयटमस !
आमच्या कडे रविवारीपण काम चालू असते. अशा कामगाराला मग मधे एखादा off द्यावा लागतो. असाच एकाच्या मित्राने फोन केला, त्याला उत्तर मिळाले, "he is off today". मित्र उडालाच. अहो असे कसे झाले, मी काल तर त्याच्याशी बोललो, अचानक असे काय झाले ? मग खुलासा झाला, "that i don't know, he is off today and i will be off tomorrow !"
ट्रेनमधे साहेबाने एकाला विचारले "where are you getting off ?" उत्तर आले, बुधवारी ! साहेबाचा परत प्रश्न पणॅ वैतागुन, मग उत्तर "if position is tight may be on monday or tuesday !"
तसे मी ही एकदा important role च्या ऐवजी important roll असे केले होतेच !
एकाने रजेच्या अर्जावर "my health was out of order" असे म्हटले होते. तसे my eyes have come हे तर नेहमीचेच आहे !

'स्वामी' आणि त्याचा स्वामी !

'स्वामी' आणि त्याचा स्वामी !
साधारण अकरावीला 'राजा दोन घरे पाठी घ्या' या शीर्षकाचा , स्वामी या श्री. रणजीत देसाई यांच्या कादंबरीतला उतारा होता. धडा मला भलताच आवडला. लगेच वाचनालयात जाउन ते पुस्तक मिळवले आणि एका बैठकीत वाचून काढले ! नंतर बुध्दीबळ सुद्धा शिकलो. त्याचवेळी जेव्हा कधी स्वत: कमवू लागू तेव्हा हे पुस्तक विकत घेउन संग्रही ठेवायचे असेही ठरले.
१९८६ मध्ये कामाला लागलो, ९२ मध्ये लग्न झाले तरी हा योग आला नव्हता. एकदा असेच एका पुस्तक प्रदर्शनात स्वामी मांडला होता. झटकन पैसे काढून त्याचा मालक झालो ! मग परत त्याचे एक पारायण झाले व मग ते पुस्तक पुस्तकाच्या शेल्फ मध्ये समाधिस्थ झाले. अनेकांनी ते वाचायला मागितले पण नेहमीचा भीडस्तपणा बाजूला ठेवत मी सगळ्यांना ठाम नकार दिला होता.
२००० साली, माझी मुलगी प्रियांकाला रूग्णालयात दाखल करावे लागले होते. रात्र पाळीची जबाबदारी माझ्यावर आली. रात्री वाचत बसलो तर झोप येणार नाही म्हणून 'स्वामी' बरोबर घेतले. पहाटे पुस्तक वाचता वाचता झोप अगदी अनावर झाल्यामुळे स्वामीला उशाशी ठेउन झोपलो. जाग आल्यावर स्वामी उशाशी नव्हता. एक नर्स ते पुस्तक वाचत होती. खूप छान आहे हो, जरा आज वाचून उद्या देउ का ? मी हो म्हटले ! तीन दिवसाच्या मुक्कामात त्या पुस्तकाचे तात्पुरते स्वामीत्व बदलत होते पण मुलीला discharge मिळाला तरी ते मूळ स्वामीकडे आले नाही ! नर्स नंतर ते सिस्टर्स नी वाचले, मग वार्ड बॉयसनी, मग डॉक्टरांनी and so on--- ! इतक्या दिवसाच्या बंदीवासातून सूटलेला स्वामी जणू अनंताच्या प्रवासालाच बाहेर पडला होता ! आठवडे , महीने मग पूर्ण वर्ष-- स्वामीचा प्रवास चालूच होता ! मधून मधून त्याची खुषाली मला कळायची एवढेच समाधान !
नवीन पनवेलच्या जागेचा स्वामी झालो होतो. सर्व सामान ट्रकमध्ये चढवून झाले. ६ वर्ष ज्या जागेत राहीलो त्या वास्तूकडे डोळे भरून पाहीले. शेजार्यांचा निरोप घेतला आणि ट्रक कडे आलो. एवढ्यात एका मित्राची मुलगी आली. 'मराठे काका हे तुमचे पुस्तक, बाबांनी द्यायला सांगितले आहे' असे म्हणून तीने 'स्वामी' मला परत सुपुर्द केला ! आश्चर्य म्हणजे एवढ्या लोकांनी हाताळून ते फारसे खराब झाले नव्हते, त्याच्यावर कोणी काही(बाही) लिहून पण ठेवले नव्हते ! अनंताचा प्रवास करून तो 'स्वामी' आपल्या मूळ स्वामीकडे, तो स्वत:च्या मालकीच्या घरात जात असतानाच परत आला होता. चांगले झाले, त्या 'माधवराव पेशव्याचे' आपल्यावर जे अनंत उपकार आहेत त्याची थोडीतरी परतफेड झाली !

पुण्यनगरीतील स्वप्नवत सत्कार !

पुण्यनगरीतील स्वप्नवत सत्कार !


मालकांच्या आदेशाप्रमाणे ठीक दूपारी २ वाजता पनवेल- नवीन पनवेल जोडणार्या उड्डाण पुलाच्या पायथ्याशी उभा होतो. बरोबर २ वाजता निळ्या रंगाची honda city रस्त्याच्या बाजूला उभी राहीली. निनाद, ऍडी, आदी, कर्मी, सौरभ (दोन्ही),मंगेश जोगळेकर असे आत दाटीवाटीने बसलेले होते. पुण्याला जायचे होते. आता मला हे पनवेल स्टॅण्ड वर सोडणार व लाल डब्याने पुण्याला या असे सांगणार अशी अटकळ मी बांधली. इतक्यात आदी खाली उतरला, अलिशान honda city च्या मागील भागातुन त्याने आपली मोटर सायकल (आमच्या मदतीने) काढली. शिरस्त्राण घालून तो तिच्यावर स्वार झाला. त्याच्या जागी मी बसलो ! ऍडी ने आता गाडी पिटाळली टोल नाक्यावर. तिकडे IRB चे संचालक 'जातीने' उपस्थित होते. आमच्याकडे (का माझ्याकडे ?) बघून ते गूढ हसले टोल टोलवून आम्ही पुण्याकडे कूच केले.
पुण्याची हद्द जवळ आली आणि जागोजागी लावलेल्या कट आउटस ने माझे लक्ष वेधून घेतले. २० फूट उंचीच्या त्या पोस्टरवर माझ्यासारखा कोणाचातरी फोटो होता. 'बडे भय्यांचे' पुण्यनगरीत स्वागत आहे असे लिहीले होते. अरे मग तो फोटो पण माझाच असणार ! कमाल आहे पुणेकरांची ! पुढे चितळ्यांची बाकरवडी हाताने खूण करून छान आहे असे सांगणारा माझा फोटो होता. त्या पुढे मस्तानीची चव बघताना माझा फोटो व खाली स्वागतेच्छूक "मणीसा" असे लिहीले होते. थोडे पुढे फोटोत हारा ऐवजी प्रचंड अजगर गळ्यात दाखवला होता, पायाशी सिंह, वाघ हे प्रेमळ प्राणी व हत्तीने मला सोंडेत धरले आहे असे दाखविले होते. या पोस्टरची कर्ती-धर्ती कोण हे वेगळे सांगायची गरजच नव्हती ! थोडे पुढे 'कोब्रा युवा संघाने' स्वागताची कमान उभारली होती व त्यावर माझे १२१ टॉपिक (व त्याला आलेल्या पोस्ट कंसात ) हाराच्या स्वरूपात दाखविले होते. अरविंद परांजपे यांच्या स्वागत फलकावर आकाशगंगा दाखविली होती व ते काठी घेउन 'एक' स्वयंभू तारा दाखवत होते. मग मला ऍडी म्हणाला की तुमचा भव्य नागरी सत्कार पुणेकरांनी ठेवला आहे. जिकडे लाखभर कोब्रा जमले होते त्याच मैदानात ! जंगी कार्यक्रम आहे, रंगारंग आणि खचाखच ! मजा आहे बुवा 'एका'ची !
पुणेकरांच्या या औदार्याने मी पार भारावून गेलो. आणि मग दिसू लागला गर्दीचा महापूर ! क्षणभर मला आपण दादरच्या चैत्यभूमीवर तर नाही ना आलो असा भास झाला ! पुण्य नगरीतले समस्त कोब्रा या सत्काराला आले होते. महा-संमेलनात ते का नाही आले याचा मला आता उलगडा झाला. खरंच किती समजूतदार ! व्यासपीठ भव्य व अत्यंत आकर्षक होते. प्रायोजक होते अत्तरवाले केळकर ! सभेला उपस्थित अनेकांनी माझा फोटो असलेले टी-शर्टस, त्यावर माझ्या गाजलेल्या टोपिक्स ची नावे, माझ्या नावाच्या टोप्या, बिल्ले लावले होते. प्रचंड उत्साह उतू जात होता नुसता !
मैदानाजवळ मी येताच सनई चौघडे वाजू लागले तर व्यासपिठाच्या पायर्या चढत असताना तुतारी ! सचिन परांजपे यांनी मला पुणेरी पगडी घातताच असंख्य कँमेर्यांचे फ्लॅश लखलखले. लगेच 'लखलख चंदेरी...' या गाण्याची धुन वाजली. व्यासपीठावर स्मित हास्य करीत शरद, गंभीर चेहरा करून मंदार, धीरगंभीर मुद्रेचे चंदेशेखर साने, ह्सतमुख मनीषा, हातात मांजर घेतलेली कांचन, कोर्या चेहर्याचा प्रसाद बसला होता. युवा प्रतिनीधी म्हणून गोड नचिकेत होता. तेजश्री ने सूत्रसंचालक म्हणून सूत्रे हाती घेतानाच सर्वाना कार्यक्रमाचा कॅफे झालेला खपवून घेणार नाही म्हणून बजावले ! स्वागत झाल्यावर करमणुकीचा कार्यक्रम झाला. त्यात माझ्या टॉपिकच्या नावांची अंताक्षरी, वन्य प्राणी व माणसांचा एकत्रित डान्स, 'चेहरा बोलतो' या कार्यक्रमात निवडक चेहर्यांचा खरा परीचय, वादग्रस्त टॉपिकच्या आठवणी असा मसाल होता. मालकांचा 'मी हे टॉपिक का उडवले' हा तर ऍडीचा 'लाल शाई' हे कार्यक्रम विशेष होते. त्या नंतर महीला कट्ट्याची 'स्लीवलेस, जीन्स आमचा हक्क' ही नाट्य छटा झाली. त्यातल्या सर्वच कलाकरांनी स्लीवलेस घातल्यामुळे औरंग्याचे पित्त खवळले व तो तडक 'निषेध, निषेध' असे ओरडत मैदानाबाहेर पडला. अरविंद परांजपे यांचा 'तारे जमीपर' पण सगळ्यांची दाद घेउन गेला ! वातावरण खरे तापले 'सावरकर व रा.स्व.संघ या परिसं'वादा'त ! श्री. साने व सौरभ आठवले (गॉड) यांच्यातला सुसंवाद मुद्यावरून गुद्यावर येणार असे दिसताच मनोरंजन कार्यक्रमच गुंडाळण्यात आला !
सर्व मनोरंजनाचे कार्यक्रम झाल्यावर व गर्दी पार कमी झाल्यावर माझ्या सत्काराच्या कार्यक्रमाची घोषणा झाली. आता सूत्रे अमित श्री यांच्या हाती होती. त्यांनी कट्ट्याला मरगळ आली असतानाच कोणा 'एका'च्या आगमनाने कसे नव-चैतन्याचे वारे वाहू लागले ते सांगितले. त्या नंतर सचिन परांजपे यांनी माझ्या टॉपिक मध्ये खानदानी आदब कशी असते ते सोदाहरण सांगितले. शरदने मला मराठीत लिहीण्यास कसे प्रवृत्त केले ते सांगितले. अभिरामने कॉलेज लाईफ ने मला कसा नॉस्टेल्जीयात नेले ते सांगितले व अजून काही अप्रकाशित किस्से सागितले ! मग नरेंन्द्र यांच्या हस्ते माझा शाल , श्रीफळ, मानपत्र देउन सत्कार करण्यात आला, तसेच 'बडे भैया', 'टॉपिक काका' 'टॉपिक नाथ' या पदव्या सुद्धा टाळ्यांच्या कडकडाट प्रदान करण्यात आल्या ! त्या नंतर गुणेश ने समस्त कट्ट्याच्या वतीने मला एक थैली अर्पण केली व फ्रेंच मध्ये काहीतरी बोलून ती काढून घेतली ! मी ती थैली कट्ट्याला दान दिली असा त्याचा अर्थ होता हे मला देवाने सांगितले! त्या नंतर मी ज्याची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आला. honda city च्या किल्लीची अलीशान प्रतिकृती सांभाळत निनाद आला. माझ्या 'चेहरा बोलतो' या टॉपिक ला १०,००० + पोस्ट मिळाल्यामुळे ती गाडी मला मिळाली होती ! स्वागताला उत्तर देण्यासाठी मी उभा राहीलो खरा पण माझ्याने एक शब्दही बोलवत नव्हता. नुसते हात जोडून टाळ्यांच्या कडकडात मी खाली बसलो ! या वेळी माझ्या झिंदाबादच्या घोषणात एका लहान मुलाने 'अमर रहे' चा सूर मिसळला होता !
कार्यक्रम संपल्यावर शरदच्या घरी श्रीखंड-पुरीवर आडवा हात मारला. त्या नंतर मस्तानी चा आस्वाद घेतला. सचिनने तोंडात एक फर्मास पान दिले. मग गाडीत बसून आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. मालक escort सारखे मागे होतेच ! नवीन पनवेलच्या पुलाजवळ येईपर्यंत रात्रीचे बारा वाजले. मला सन्मानाने उतरवून निनाद गाडी उडवत गेला . मग मला आठवले अरे आपलीच तर गाडी आहे ना, मग --- ?
पुलावर पाय टाकताच नाशिक बेंजो का कोंगो वाजू लागला आणि पुल रोषणाईने उजळून निघाला. त्या प्रकाशात मला माझ्या स्वागताच्या असंख्य कमानी दिसल्या, भव्य दिव्य, माझ्या उंचीहून (दोन्ही अर्थाने) उंच कट-आउटस, पताका, विविध शुभेच्छुकांचे बॅनर दिसले. खासदार रामशेठ ठाकूर, त्यांचा मुलगा नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर, आमदार विवेक पाटील भले मोठे हार घालुन मला माझ्या ४२ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते. मला पनवेल भूषण पुरस्कार देण्यात आला. एका पोस्टर वर माझा फोटो व 'हार्बरकरांचे राम नाईक, समस्त हार्बर प्रवाशांचे पाईक' असे लिहीले होते. त्या खाली मी हार्बरच्या प्रश्नांवर जी पत्रे लिहीली होती तीच्या कात्रणांच्या प्रती डकवल्या होत्या ! पुल पार केल्यावर 'ब्राह्मण सभा , नवीन पनवेल' ची संपूर्ण कार्यकारीणी व सभासद पुष्प-गुच्छ घेउन उभे होते. मग लगेचच ४२ सुवासिनींनी औक्षण करण्याचा कार्यक्रम चालू झाला. दुतर्फा नववारी साडीत, नटून थटून उभ्या असलेल्या सुवासिनी, सुहास्य वदनाने मला ओवाळत होत्या.
सगळ्यात शेवटी जी सुवासिनी होती ती मला थोडी ओळखीची वाटू लागली. ओवाळताना तीने अचानक हातवारे सुरू केले, हळू हळू बाकीचा सगळा माहोल धूसर-धूसर होउ लागला. मग मला गदागदा हालवणार्या त्या चेहर्याची ओळख 'चांगलीच' पटली, 'ही'च होती ती. अरे उठ, तुझा वाढदिवस आहे म्हणून गोदी बंद ठेवणार नाहीत ! त्याच वेळी रेडीओ वर 'स्वप्नात रंगले मी--' चालू झाले !

गुरुवार, ३ जुलै, २००८

क-का-कि-की-- बाराखडीचा शब्दखेळ !

क-का-कि-की-- बाराखडीचा शब्दखेळ !
क-का-कि-की-- बाराखडीचा शब्दखेळ !कोणतेही एक मूळाक्षर (क,ख,ग,घ---) घ्या, असे शब्द बनवा कि ज्यात त्या अक्षराची किमान दोन वेगवेगळी बाराखडीतली रूपे आली पाहीजेत. उदा. क वरून काकडी (क+आ, क+अ ), सासूरवास (यात स ची स+आ, स+ऊ, स+अ अशी तीन रूपे आली आहेत) पण करमरकर हा शब्द चालणार नाही कारण यात क दोनदा आणि र तीनदा आहे पण एकाच रूपात ! तसेच मामा, काका पण नाही चालणार पण काकू चालेल ! समजले ? मी सुरवात करतो कारकून या शब्दाने, यात क्+आ आणि क्+ऊ आला आहे.

बुधवार, २ जुलै, २००८

थोडे चाकोरी बाहेरचे !

थोडे चाकोरी बाहेरचे !
सरकारी नोकरीत नियमांचा बाउ फार केला जातो. अर्थात नियमावर बोट ठेउन काम टाळणे हाच हेतू असतो किंवा त्यात दूसराही 'अर्थ' अभिप्रेत असतो. नियम पण एवढे किचकट असतात की काहीही करायला जा, फट म्हणता ब्रह्महत्या ठरलेली ! मी जेव्हा नोकरीवर लागलो तेव्हा किमान १०० कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या. त्यांची एक प्रत तरी आम्हाला द्यायची, पण नाही ! कामाला लागल्यावर १८ वर्षानी मी आमचे नोकरीचे Rules and Regulations वाचले. त्याचा जर शब्दश: अर्थ घेतला तर आमचे बहुतेक कर्मचारी घरीच बसतील ! घटनेने जेवढे जेवढे हक्क दिले आहेत त्यावर त्यात गदा आणली आहे. माझी ऑर्कुटगिरी हा तर सरळ-सरळ नियमभंग आहे ! असो !


मी मात्र संगणक विभागाचा प्रमुख असताना नियमावर बोट केव्हाच ठेवले नाही. माझ्याकडे जे कोणी कामासाठी येत त्यांची योग्य कामे करणे हेच मी मुख्य मानले. चांगल्या हेतूने एखादे काम केल्यास त्रास होण्याचे कारणच काय ? आजतागायत त्यासाठी माझी कधीही चौकशी झालेली नाही.


आमच्या कडे व्यक्तीगत सामान (Unaccompanied Baggage (UB) ) सुद्धा हाताळले जाते. तसा माल आधी घोषित करायचा असतो. त्या साठी वेगळी शेड/गोदाम आहे. तिथे कस्ट्मस तपासणी झाल्यावर तो सोडवायची व्यवस्था आहे. एका विधवा बाईच्या नवर्याचे असेच सामान आले होते पण काही नजरचूकीने ते UB म्हणून घोषित केले नव्हते.त्यामुळे त्याच्या सोडवणूकीत असंख्य अडचणी उभ्या ठाकल्या. त्या दूरूस्त करायची प्रक्रीया खूपच वेळखाउ असते. ही विधवा बाई एवढी धावपळ कशी करणार ? संगणकातला डाटाबेस मला बदलता येत होता. मी बाकी सर्व कागदपत्रे तपासून तीला दूरूस्ती करून दिली, माझ्या जोखमीवर.


असाच UB माल कधी कधी भलत्याच शेडला पडलेला असतो. तो गाडी मागवुन योग्य त्या ठीकाणी पाठवावा लागतो. खरतर हा आमच्या कामाचाच भाग आहे पण त्रास देण्यासाठी याला विलंब केला जातो. कधी कधी व्ह्यक्ती स्वत: सोडवायला न येता एजंट नेमतात. मग अशा केस मध्ये एजंट अजून पैसे मागतो ! भोळी माणसे फसतात पण कधी कधी मालाच्या किमतीपेक्षा सोडवण्याचा खर्च जस्त होतो. यात आमच्याच अनेक कर्मचार्यांचे नातेवाईक असले तर तो मग हमखास माझ्याकडे येई. एका फोनने संध्याकाळच्या आत मग मालाची पाठवणी होत असे !


संगणकावर १०० % काम झाल्यावर अनेक अडचणींचा सामना करावा लागे. मी कामावर संध्या. ५ पर्यंत असे. डाटाबेस मध्ये काही चूका असल्यास किंवा कोणाकडून काही चूक झाल्यास ती दिवसाच दूरूस्त करता येत असे. असेच एकदा रात्री ११ वाजता घरी फोन आला. एक एजंट होता. आयातदाराचा कोड चूकीचा पडल्यामुळे त्याच्या सर्व गाड्या गेटवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यात खरे तर आमच्याच कर्मचार्याची चूक होती ! असा कोड मला कामावर असताना मिनीटात दूरूस्त करता आला असता पण आता काय करायचे ? चूका दूरूस्त करण्याचे प्रोग़्रॅम वेगळ्या लॉगीन मध्ये होते. व ते खूपच किचकट होते. तरी मी निर्णय घेतला. शेडमधल्या आमच्या कर्मचार्याला लाईनवर घेतले. मी ज्या ज्या सूचना देईन त्या प्रमाणे करायचे असे बजावले. तो ही तयार झाला. मी पुढची ३० मिनीटे फोनवरून त्याला login, passowrd सांगून, पुढच्या सर्व स्टेप्स सांगून ते काम करून घेतले. अनेक वेळा काम केल्यामुळे ते माझ्या अगदी डोक्यात बसले होते. चूक दूरूस्त झाली व तो माल पण सोडविला गेला.


कामगारांच्या हजेरी विभागात गेल्यावर अनेक समस्या समजल्या. सगळ्यात मुख्य म्हणजे आमच्याच लोकांच्या आळसाने त्यांची हजेरीच संगणकावर मारली जात नव्हती व काम करूनही त्यांचा खाडा होत होता. बरे तो कामगार अशी तक्रार घेउन आल्यावर त्यालाच पायपीट करायला लागायची ती वेगळीच. शेवटी मी हजेरी मारायचे login केल्यावर लगेच वाजता येईल अशी सोय करून सर्व संबंधिताना 'तंबी' दिली. तसेच जर यात कोणी हयगय केल्यास फोनवरूनच शेडला सांगायचो की अमक्या कामगाराची हजेरी मारा नाहीतर तुमचा पण खाडा करेन ! तसेच मेमो पण मिळेल. याचा परीणाम लगेच दिसून आला व हे खाडा प्रमाण खूपच कमी झाले.


तसेच कधी तरी काम वाढल्यास कामगारांना कंटीन्यु करावी लागे. त्याचे पैसे मात्र त्यांना तब्बल ४ महीन्यांनी मिळत. त्या मुळे नाराज होउन कामगार असे काम नाकारू लागले. या प्रश्नाचा मी संपूर्ण अभ्यास केला व थोड्या सुधारणा करून हे पैसे त्याच महीन्यात मिळतील अशी व्यवस्था केली. कामगारांना मुलांच्या शाळा/कॉलेज प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला हवा असे. हा आधी दोन तीन दिवसाने मिळे तो मी ताबडतोब देण्याची व्यवस्था केली.


कामगार अनेक पतपेढ्यांचे सभासद असत. त्यासाठीची पगारातुन करायची कपात करण्यासाठी data entry करायला लागायची. त्याची विवरणपत्र यायची, त्याची entry करणे, मेळ लावणे व परत त्यांना कळवणे यात बराच वेळ, कागद वाया जात असे. चूकापण भरपूर होत. मी स्वत: संबंधित पतसंस्थामधे जाउन ही सगळी माहीती फ्लॉपीवर द्या असे सूचवले. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला व काम सोपे झाले.
कामगारांना प्रोस्ताहन योजना लागू होती तशीच ती टॅली-क्लार्कसना सुद्धा होती. अट एवढीच होती की जहाजाने घोषित केलेला माल व टॅली यांचा मेळ ८० ते १०० % असला पाहीजे व १००% जास्त अजिबात होता कामा नये. हे सर्व काम संगणकावर चाले. मला कायम आश्चर्य वाटे की टॅली क्लार्कना हा भत्ता जवळ जवळ मिळतच नाही , असे कसे ? मग कळले की संगणकात हा मेळ कोणी नोंदवायचा यातच गोंधळ होता. त्या मुळे तो कोणी मारतच नसे व पुढे तो भत्ता मिळतच नसे. मी तो कोणी माराव हे निश्चीत केले. पुढे प्रश्न आला accuracy कशी काढायची याचा. उदा. जहाजाने घोषित केले आहे वूड पल्पचे यूनिट (८ बेल्सचे) पण उतरताना ते तूटले ते त्याची नोंद ८ नग अशी केली जायची accuracy मार खायची व त्याचा फटका हकनाक त्या जहाजावर काम केलेल्या सर्व टॅली घेणार्यांना बसायचा ! शेवटी मी यासाठी मार्गदर्शक सूत्रे बनविली. ती सगळ्यांना समजावली व मग मात्र हा प्रश्न कायमचा सूटला. टॅली-क्लार्कसना महीना ४०० ते ८०० रूपयाचा फायदा होउ लागला !

उलटा-पुलटा ! नावातल्या अक्षरांची अदला-बदल !

उलटा-पुलटा ! नावातल्या अक्षरांची अदला-बदल !
कोणतेही एक नाव घ्या. त्यातील अक्षरांची अदला-बदल करून जेवढे शब्द होतील तेवढे बनवा. एखादे वाक्य बनत असेल तर चांगलेच आहे !
काही उदाहरणे बघा,
माझेच नाव घ्या, एकनाथ जनार्दन मराठे,
एक
नाथ
नथ
जना
नाक
मरा
राम
नाना
नाम
मन
मर्दन
जनक
२) अमोल आत्माराम गोरे:मोल, आम, आत्मा, गोम, मल, अरे मरे, गोल, गोरा, राम, etc.
अरे राम, आम आत्मा मल-मोल मरे!
३) चरिता मिलिंद गोगटे
गत, तर, ताग, मिता, मित, लता, लाच, गोटे, गत, गट, ता ट, दम, दात, दाट, गम, गर, दरी, चादर, रीत
४) समीर उमेश जोग
जोश, सर, उर, समीश, उस, जोर, गर, सशर !
५) मंगेश दिलीप जोगळेकर--
मंद,मंदिर ,दिप, जोकर,गळे,लीप (लीप वर्ष- यातले लीप)कळे,कली,कप,दिर,गर,जोश,पर,गप,मंदी( पग आणि गली हे दोन हिंदी शब्द)
६) दीपा ईशान कर्वे.
पाईक,शाई,पाक,शान,पान,नशा,पाशान(ण)दीशा,शादी (हींदी)

७) अदिती आनंद लेले
अती, आनंद, आले, तिला, दिला, आला, दिलेले, नंदन, आलेले, दीदी

८) mahesh madhav dongare
mesh
shame
me
he
she
same
mad mahesh madhav dongare
dam
has
am
a
do
don
dog
are
dare
gear
ear
rage
red
dear
dane
९) मल्लीका मुकुंद घारपुरे
मुका,घार,मुद,कुंद,घारे,पुरे,काम,मका,मद,दर,दम,पुकार,घाम

मंगळवार, १ जुलै, २००८

गोदी व गोदी कामगार , भूतकाळ व भविष्य !

गोदी व गोदी कामगार , भूतकाळ व भविष्य !

गोदीत जहाजावर माल चढवण्या-उतरवण्यासाठी पुष्कळ मनुष्यबळ लागते. धक्क्यावर माल हाताळणी करण्यापेक्षा जहाजात उतरून काम करणे जास्त कष्टाचे, धोक्याचे आहे. माल हाताळणीच्या सोयी जेवढ्या अद्ययावत तितके त्यातले धोके कमी व खर्चही कमी. हल्ली जलद हाताळणीसाठी बहुतेक माल कंटेनर मधून येतो. या पद्धतीमध्ये माल कोणतेही नुकसान न होता थेट आयातदाराच्या आवारात आणता येतो तसेच निर्यात करण्याचा माला जागेवरच कंटेनरमध्ये भरून तो कंटेनर थेट जहाजावर चढवता येतो. पण त्या पुर्वी सूटा मालच हाताळणीसाठी येत असे व आताही मुंबई बंदर याच सेवेसाठी आपले अस्तित्व टिकवून आहे. आधी हे काम बरेच शारिरीक कष्टाचे, जोखमीचे होते. जहाजाचे मालक पठाणांच्या टोळ्या बाळगत व हे पठाण अक्षरश: चाबकाने फटके मारून कामगारांकडून काम करून घेत. धक्क्यावर उतरलेला माल हाताळण्यासाठी ज्या हातगाड्या असत त्याला रबरी धाव पण नसे ! स्व. श्री. पी.डिमेलो यांनी या कामगारांची संघटना उभारली व त्यांच्यानंतर त्यांचे सहकारी साथी एस. आर. कुळकर्णी यांनी ती मजबूत केली. त्यांच्या प्रत्यत्नामुळे कामगारांना रोजगार निश्चिती, चांगले वेतन, हक्काच्या रजा, साप्ताहीक रजा, जास्त काम केल्यास प्रोस्ताहन योजना (Piece Rate Scheme), राहण्याची सोय, वैद्यकीय सुविधा, स्वस्त कँण्टीन, सुरक्षेची साधने अशा अनेक सुविध मिळू लागल्या. त्यामुळे गोदी कामगार एस.आरांना देवा मानतो यात काय आश्चर्य !

पुढे मात्र कामगार फक्त हक्कापुरतेच बघू लागले व कर्तव्याचा त्यांना विसरच पडला. आपली लोकप्रियता कमी होईल या भयाने नेत्यांनी पण त्यांचे कान कधी उपटले नाहीत. सुबत्ता आल्यामुळे कामगारांत व्यसनाधीनता वाढू लागली. संघटनेची कवच-कुंडले लाभल्यामुळे माजोरडेपणा वाढला. 'हम करे सो कायदा' व 'हमसे जो टकरायेगा, मिट्टी मे मिल जायेगा' या घोषणा बुलंद झाल्या. पीस-रेट असेल तरच काम एरवी टाईम-पास असे होउ लागले. जहाजावर थेट माल भरण्यापेक्षा तो आधी कंटेनर मध्ये भरून हाताळायची पद्धत आली होती. यात जहाजाच्या आत-बाहेर असा काही प्रकार नव्हता , तरीही कंटेनरच्या आता एक टोळी व बाहेर एक टोळी अशी एक प्रथा पडली ! त्यात ही ठेका पद्धत आली. दिवसाला चारच डबे भरणार. जास्त भरायचे असेल तर दामाजी हवा ! या मुळे जहाज मालक हैराण झाले. हा खर्च त्यांना परवडेना. मग बाहेरूनच डबे भरून आणायला त्यांनी सुरवात केली. त्या मुळे काम अधिकच कमी झाले ! आधी एका टोळीत १३ माणसे असायची. पुढे कामाचे यांत्रिकीकरण झाल्यावर एवढ्या माणसांची गरज नव्हती. लोखंड, पॅलेटाइस्ड माल हाताळण्यासाठी २ किंवा ४ माणसे पुरत. मग बाकीचे माणसे खुषाल पत्ते खेळत बसू लागली. जहाज उद्योगात तीव्र स्पर्धा होतीच. मुंबई बंदरात जहाज आणल्यास जास्त खर्च येतो हे जहाजमालकांना कळत होते पण दूसरा पर्याय नव्हता. १९९० पर्यंत जहाजांना धक्का मिळण्यासाठी ३-३ दिवस नांगरून रहावे लागे. या काळात जहाज बांधणीतही सुधारणा झाल्या होत्या. आमच्या बंदरात लागणार्या जहाजांपेक्षा दुप्पट, तिप्पट क्षमता असलेली जहाजे बनू लागली होती. अशी जहाजे बंदराबाहेर उभी करून, त्यांचा माल लहान जहाजांत उतरवून बंदरात आणावा लागे, अर्थात यामूळे हाताळणी खर्च वाढू लागला. साधारण ९० च्या सुमारास जवाहरलाल नेहरू बंदर (जुने नाव न्हावा-शेवा बंदर) कार्यान्वित झाले व नंतरच्या काळात खाजगीकरणाच्या माध्यमातुन अनेक छोटी-मोठी बंदरे उभी राहीली. माल हाताळणीच्या आधुनिक सुविधा व कमी खर्च यामुळे मुंबई बंदरातले काम हळूहळू या बंदरांकडे जाउ लागले. आज मुंबई बंदरात धक्के जहाजांची वाट पहात आहेत असे चित्र आहे ! गोदी कामगार मात्र डोळ्यावर कातडे ओढूनच बसला होता. आधी देशातले सर्व गोदी कामगार एका छत्राखाली होते. गोदी कामगारांनी संपाची हाक दिली की सरकार हादरायचे. दिल्लीपर्यंत धक्के बसून कोणा नेत्याच्या मध्यस्थीने भरघोस लाभ पदरात पाडणार वेतन करार व्हायचा, नेत्यांची मुंबईत आल्यावर घोड्यावरून मिरवणूक निघायची. देशातल्या अकरा प्रमुख बंदरापैकी एकटे मुंबई बंदर ५५ % भार वाहत होते. सरकार तेव्हा मुंबई बंदरासाठी वेगळा करार करायला तयार होते पण कामगारांची एकी टिकावी म्हणून नेत्यांनी ते मानले नाही व बाकी १० तोट्यातल्या बंदराना आमच्या एवढेच वेतन मिळत होते. आज उलटी स्थिती आहे, आमचा वाटा अवघा २० % झाला आहे व बाकी बंदरे आमच्याच पैशावर कार्यक्षम झाली आहेत. दोर जळला पण पीळ कायम होता/आहे ! मधल्या काळात बंदरात दोन स्वेच्छा-निवृत्ति योजना येउन गेल्या पण यात हे कामगार फारसे गेलेच नाहीत उलट तृतीय श्रेणी कर्मचारी निघून गेले. अतिरीक्त कामगारांचा प्रश्न जैसे थेच राहीला. गोदी कामगारांचे वेतन करार आधी तीन वर्षाचे, मग पाच वर्षाचे (व १९९६ मधला दहा वर्षाचा ) असे होत. २००६ मध्ये मागचा करार संपून दोन वर्ष होतील ! चर्चेचे गुर्हाळ चालूच आहे ! सरकार गोदी कामगारांना जुमानत नाही, कडक भूमिका घेत आहे. विविध अटी लादत आहे. बघू काय होते ते ! आतली बातमी अशी आहे की मुंबई बंदराचे अस्तित्वच सरकारला मिटवायचे आहे व मग अनायसे मिळणारी बंदराची शेकडो एकर जागा शहराच्या विकासासाठी वापरायची आहे. त्या मुळे आहे त्याच स्थितीत बंदर चालवून योग्य वेळ आली की त्याला मूठमाती द्यायची असे घाटत आहे.

पण उशीरा का होईना कामगारांना शहाणपण सूचत आहे. अनिष्ट प्रथांना मूठमाती मिळत आहे. एक प्रकारची व्यवसायीकता कामात दिसत आहे. जहाज मालक हा आपला ग्राहक आहे, त्याला आपण ताटकळत ठेवल्यास, अकार्यक्षमता दाखविल्यास, महागडी सेवा दिल्यास तो दूसर्या बंदराची वाट धरेल व त्यात आपलेच नुकसान आहे हा विचार रूजत आहे. मागील दोन वर्षात बंदरातील माल हाताळणीत सातत्याने वाढ होत आहे हे एक शुभ-चिन्हच आहे !

समारोप !

समारोप !
सुमारे ३५० वर्षापुर्वी मरगळलेल्या महाराष्ट्राला समर्थाच्या या वाणीने संजीवनी दिली होती.उद्याचा भारत घडविणार्या विद्यार्थ्यांना ती अजूनही मार्गदर्शक ठरू शकते.हा या पुस्तिका कर्त्याचा उद्देश आहे तो सफळ होवो हीच समर्थांचरणी प्रार्थना!


अक्षरश: झपाटल्याप्रमाणे वरील सर्व लिहून पूर्ण केले ! एरवी या कामाला १० दिवस सहज लागले असते ! पण एक अध्याय लिहून झाला की आपसूकच दूसरा पण लिहायला घ्यावा असे होउ लागले ! एकदा लिहीणे म्हणजे तिनदा वाचणे, त्या मूळे माझेही वाचन, मनन होतच होते. आता संपूर्ण दासबोध विकत घेउन, वाचून पूर्ण करायचा आहे !


काही श्लोकांचे / शब्दांचे अर्थ मलाही कळले नाहीत उदा. 'बहुत दिवस राहो नये पिसुणाचेथे ' यातील पिसुणाचेथे चा अर्थ कोणी सांगू शकेल काय ? या श्लोकांचा / शब्दांचा अर्थ याच topic वर विचारावा व जाणकारांनी उत्तरे द्यावीत ही विनंती.


वरील श्लोकात शुद्ध लेखनाच्या काही चूका झाल्या असतील तर कृपया त्या ही निदर्शनास आणाव्यात ही विनंती. समर्थांच्या मराठीचा बाज काही वेगळाच आहे, मराठीतले नेहमीचे शुद्ध लेखनाचे नियम येथे लागू होत नाहीत हे लक्षात ठेउन प्रमाण ग्रंथ आवृत्ती समोर ठेउनच दूरूस्त्या सूचवाव्यात.


नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम नाना विकारी

नको रे मना सर्वदा अंगिकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू

जय जय रघुवीर समर्थ


श्री समर्थ रामदास स्वामींचा अखेरचा संदेश


माझी काया आणि वाणी


गेली म्हणाल अंत:करणी


परी मी आहे जगज्जीवनी


निरंतर १
आत्माराम दासबोध


माझे स्वरूप स्वत:सिद्ध


असता ना करावा खेद


मक्तजनी २

श्री समर्थांचा मुलांना उपदेश

श्री समर्थांचा मुलांना उपदेश

बरे सत्य बोला यथातथ्य चाला

बहू मानिती लोक येणे तुम्हाला

धरा बुद्धी पोटी विवेके मुले हो

बरा गुण तो अंतरामाजि राहो

दिसामाजी काही तरी रे लिहावे

प्रसंगी अखंडीत वाचीत जावे

गुणश्रेष्ठ उपास्य त्यांचे करावे

बरे बोलणे सत्य जीवी धरावे

बहू खेळ खोटा सदालस्य खोटा

समस्तांसि भांडेल तोचि करंटा

बहुता जनांलागि जीवी भजावे

भल्यासंगती न्याय तेथे भजावे

भला रे भला बोलती ते करावे

बहुता जनांचे मुखे येश घ्यावे

परी शेवटी सर्व सोडोनी द्यावे

मरावे परी कीर्तिरूपे उरावे

भगवंताकडे काय मागावे ?

भगवंताकडे काय मागावे ?--

कोमळ वाचा दे रे राम विमळ करणी दे रे राम धृ

प्रसंग ओळखी दे रे राम धूर्तकळा मज दे रे राम

हितकारक दे रे राम जनसुखकारक दे रे राम

अंतरपारखी दे रे राम बहुजनमैत्री दे रे राम

विद्यावैभव दे रे राम उदासीनता दे रे राम

मागो नेणे दे रे राम मज न कळे ते दे रे राम

तुझी आवडी दे रे राम दास म्हणे मज दे रे राम

संगीत गायन दे रे राम आलाप गोडी दे रे राम

धातमाता दे रे राम अनेक धाटी दे रे राम

रसाळ मुद्रा दे रे राम जाड कथा मजा दे रे राम

दस्तक टाळी दे रे राम नृत्यकला मज दे रे राम

प्रबंध सरळी दे रे राम शब्द मनोहर दे रे राम

सावधपण मज दे रे राम बहुत पाठांतर दे रे राम

दास म्हणे रे सद्-गुण धाम उत्तम गुण मज दे रे राम

पावनभिक्षा दे रे राम दीनदयाळा दे रे राम

अभेदभक्ती दे रे राम आत्मनिवेदन दे रे राम

तद्रूपता मज दे रे राम अर्थारोहण दे रे राम

सज्जनसंगती दे रे राम अलिप्तपणा मज दे रे राम

ब्रह्म अनुभव दे रे राम अनन्यसेवा दे रे राम

मजविण तू मज दे रे राम दास म्हणे मज दे रे राम

बोलणे सुंदर--वाचणे सुंदर -- लिहिणे सुंदर

बोलणे सुंदर--वाचणे सुंदर -- लिहिणे सुंदर--

बालके बाळबोध अक्षर घडसुनी करावे सुंदर

जे देखतांचि चतुर समाधान पावती

वाटोळे सरळ मोकळे वोतले मसीचे काळे

कुळकुळीत वळी चालिल्या ढाळे मुक्तमाळा जैशा

अक्षरमात्र तितुके नीट नेमस्त पैस काने नीट

आडव्या मात्र त्याहि नीट आकुर्ली वेलांड्या

पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपेतो पाहात गेले

येका टाकेचि लिहिले ऐसे वाटे

वोळीस वोळी लागेना आकुर्ली मात्रा भेदीना

खालिले वोळीस स्पर्शेना अथवा लंबाक्षर

पान शिषाने रेखाटावे त्यावरी नेमकचि ल्याहावे

दुरी जवळी न व्हावे अंतर वोळीचे

कोठे शोधासी आडेना चुकी पाहता सापडेना

गरज केली हे घडेना लेखकापासुनी

ज्याचे वय आहे नूतन त्याने ल्याहावे जपोन

जनासी पडे मोहन ऐसे करावे

भोवती स्थळ सोडून द्यावे मधेचि चमचमित ल्याहावे

कागद झडताही झडावे नलगेचि अक्षर

ऐसा ग्रंथ जपोनी ल्याहावा प्राणिमात्रास उपजे हेवा

ऐसा पुरूष तो पहावा म्हणती लोक

सुंदर अक्षर ल्याहावे पष्ट नेमस्त वाचावे

विवर विवरो जाणावे अर्थांतर

अभ्यासे प्रगट व्हावे नाही तरी झाकोन असावे

प्रगट होउन नासावे हे बरे नव्हे

अक्षरे गाळून वाची कां ते घाली पदरिंची

नीगा न करी पुस्तकाची तो येक मूर्ख

आपण वाचीना कधी कोणास वाचावया नेदी

बांधोन ठेवी बंदी तो येक मूर्ख

समूळ ग्रंथ पाहिल्याविण उगाच ठेवी जो दूषण

गुण सांगतां अवगुण पाहे तो येक पढतमूर्ख

आधीच सिकोन जो सिकवी तोचि पावे श्रेष्ठ पदवी

गुंतल्या लोकांस उगवी विवेकबळे

अक्षर सुंदर वाचणे सुंदर बोलणे सुंदर चालणे सुंदर

भक्ति ज्ञान वैराग्य सुंदर करून दावी

अखंड येकांत सेवावा ग्रंथमात्र धांडोळावा

प्रचित येईल तो घ्यावा अर्थ मनी

विद्या उदंडचि सिकला प्रसंगमान चुकतचि गेला

तरी मग तये विद्येला कोण पुसे

कुणाचे अंत:करण दुखवू नका

कुणाचे अंत:करण दुखवू नका --

दुसर्याचे चालणी चालावे दुसर्याचे बोलणी बोलावे

दुसर्याचे मनोगत जावे मिळोनिया

आधी अंतर हाती घ्यावे मग हळुहळु उकलावे

नाना उपाये न्यावे परलोकासी

प्रसंग जाणोनि बोलावे जाणपण काहीच न घ्यावे

लीनता धरून जावे जेथतेथे

परांतरास न लावावा ढका कदापि पडो नेदावा चुका

क्षमासीळॅ तयाच्या तुका हानी नाही

बरे बोलता सुख वाटते हे तो प्रत्यक्ष कळते

आत्मवत परावे ते मानीत जावे

जे दुसर्यास दु:ख करी ते अपवित्र वैखरी

आपणास घात करी कोणीयेके प्रसंगी

कोण कोण राजी राखिले कोण कोण मनी भंगिले

क्षणाक्षणा परीक्षिले पाहिजे लोक

पेरिले ते उगवते बोलण्यासारिखे उत्तर येते

तरी मग कर्कश बोलावे ते काये निमित्य

जगामध्ये जगमित्र जिव्हेपासी आहे सूत्र

कोठे त-ही सत्पात्र शोधून काढावे

शेजार्यांना मदत करा

शेजार्यांना मदत करा---
आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे
परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे
तैसे ज्ञाने तृप्त व्हावे तेचि ज्ञान जनास सांगावे
तरतेन बुडो नेदावे बुडतयासि
शरीर परोपकारी लावावे बहुतांच्या कार्यास यावे
उणे पडो नेदावे कोणियेकाचे
आडले जाकसले जाणावे यथानशक्ती कामास यावे
मृदवचने बोलत जावे कोणीयेकासी
दुसर्याच्या दु:खे दुखवावे परसंतोषे सुखी व्हावे
प्राणिमात्रास मेळउन घ्यावे बर्या शब्दे
बहुतांचे अन्याये क्षमावे बहुतांचे कार्यभाग करावे
आपल्यापरीस व्हावे पारखे जन
दुसर्याचे अंतर जाणावे तदनुसारचि वर्तावे
लोकांस परीक्षित जावे नाना प्रकारे
नेमकचि बोलावे तत्काळचि प्रतिवचन द्यावे
कदापी रागास यावे क्षमारूपे उत्तम पदार्थ दूसर्यास द्यावा शब्द निवडून बोलावा
सावधपणे करीत जावा संसार आपला
आपल्या पुरूषार्थ वैभवे बहुतांस सुखी करावे
परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया
शाहाणे करावे जन पतित करावे पावन
सृष्टीमधे भगवद्-भजन वाढवावे
जितुके काही आपणासी ठावे तितुके हळुहळु सिकवावे
शाहाणे करूनि सोडावे बहुत जन
अपार असावे पाठांतर सन्निधचि असावा विचार
सदा सर्वदा तत्पर परोपकारासी
मुलाचे चालीने चालावे मुलाच्या मनोगते बोलावे
तैसे जनास सिकवावे हळुहळु
जीव जीवात घालावा आत्मा आत्म्यांत मिसळावा
राहराहो शोध घ्यावा परांतरांचा

खूप मित्र जोडा

खूप मित्र जोडा --
आपण दुसर्यास करावे ते उसिणे सवेचि घ्यावे
जना कष्टविता कष्टावे लागेल बहु
लोक आपणासि वोळावे किंवा आवघेच कोसळावे
आपणास समाधान पावे ऐसे करावे
समाधाने समाधान वाढे मित्रिने मित्रि जोडे
मोडिता क्षणमात्र मोडे बरेपण
तने नमे झिजावे तेणे भले म्हणोन घ्यावे
उगेचि कल्पिता सिणावे लागेल पुढे
आपण येकायेकी येकला सृष्टीत भांडत चालिला
बहुतांमध्ये येकल्याला येश कैचे
बहुतांचे मुखी उरावे बहुतांचे अंतरी भरावे
उत्तम गुणी विवरावे प्राणिमात्रासी
उदंड धि:कारून बोलती तरी चळो नेदावी शांती
दुर्जनास मिळोन जाती धन्य ते साधु
स्वये आपण कष्टावे बहुतांचे सोसित जावे
झिजोन कीर्तीस उरवावे नाना प्रकारे
कीर्ती पाहो जाता सुख नाही सुख पाहता कीर्ती नाही
विचारेविण कोठेचि नाही समाधान

उत्तम गुण अभ्यासिता येती

उत्तम गुण अभ्यासिता येती--
वाट पुसिल्याविण जाउ नये फळ वोळखिल्याविण खाउ नये
पडिली वस्तु घेउ नये येकायेकी अति वाद करू नये पोटी कपट धरू नये
शोधिल्याविण करू नये कुळहीन कांता
विचारेविण बोलो नये विवंचनेविण चालो नये
मर्यादेविण हालो नये काही येक
वक्त्यास खोदू नये ऐक्यतेसी फोडू नये विद्याअभ्यास सोडू नये काही केल्या
अति क्रोध करू नये जोवलगांस खेदू नये
मनी वीट मानू नये सिकवणेचा
क्षणाक्षणा रूसो नये लटिका पुरूषार्थ बोलो नये
केल्याविण सांगो नये आपला पराक्रमु
बोलिला बोल विसरो नये प्रसंगी सामर्थ्य चूको नये केल्याविण निखंदू नये पुढिलांसी कदा
आळसे सुख मानू नये चाहाडी मनास आणू नये
शोधिल्याविण करू नये कार्य काही
सुखा आंग देउ नये प्रेत्न पुरूषे सांडू नये
कष्ट करिता त्रासो नये निरंतर
कोणाचा उपकर घेउअ नये घेतला तरी राखो नये
परपीडा करू नये विस्वासघात
बहुत अन्न खाउ नये बहुत निद्रा करू नये
बहुत दिवस रहो नये पिसुणाचेथे
धूम्रपान घेउ नये उन्मत्त द्रव्य सेउ नये
बहुचकासी करू नये मैत्री कदा
तोंडी सीवी असो नये दुसर्यास देखोन हांसो नये
उअणे अंगी संचारो नये कुळवंताचे
देखिली वस्तू चोरू नये बहुत कृपण होउअ नये
जिवलगांसी करू नये कळह कदा
अलाधने माजो नये हरिभक्तीस लाजो नये
मर्यादेविण चालो नये पवित्र जनी
सभा देखोन गळो नये समई उत्तर टळो नये
धि:कारिता चळोप नये धारिष्ट आपुले
सत्यमार्ग सांडू नये असत्य पंथे जाउअ नये
कदा अभिमान घेउ नये असत्याचा
अपकीर्ती ते सांडावी सदकीर्ती वाढवावी
विवेके दृढ धरावी वाट सत्याची
पोटी चिंता धरू नये कष्टे खेद मानू नये
समी धीर सांडू नये काही केल्या
अपमानित सिणो नये निखंदिता कष्टो नये
धि:कारिता झुरो नये काही केल्या
नित्यनेम सांदू नये अभ्यास बुडो देउ नये
परतंत्र होउ नये काही केल्या
परोपकार सांडू नये परपीडा करू नये
विकल्प पडो देउ नये कोणीयकासी
बहुसाल बोलो नये अबोलणे कामा नये बहुत अन्न खाउ नये उपवास खोटा
बहुसाल निजो नये बहुत निद्रा मोडू नये
बहु नेम धरू नये बाश्कळ खोटे
बहुजनी असो नये बहु आरण्य सेउ नये
बहुदेह पाळू नये आत्महत्या खोटी
उत्तम गुण स्वये ते बहुतांस सांगावे
वर्तल्याविण बोलावे ते शब्द मिथ्या
उत्तम गुणी श्रृंघारला ज्ञानवैराग्ये शोभला
तोचि येक जाणावा भला भूमंडळी
जंवरी चंदन झिजेना तंव तो सुगंध कळेना
चंदन आणि वृक्ष नाना सगट होती
जनीजनार्दन वोळला तरी काय उणे तयाला
राजी राखावे सकळांला कठीण आहे