बुधवार, ३१ ऑगस्ट, २०११

अरे माणसा माणसा !

पैसे नसतात तेव्हा झाडपाला खाऊनही दिवस काढायची माणसाची तयारी असते. पैसा आल्यावर हाच झाडपाला तो महागड्या हॉटेलात ऑर्डर करतो.

पैसे नसतात तेव्हा माणूस सायकलने रपेट करतो, पैसा आल्यावर मात्र हीच सायकल तो जिममध्ये व्यायामासाठी चालवतो.

पैसे नसतात तेव्हा रोजीरोटीसाठी त्याची पायपीट चालू असते. पैसे आल्यावर मात्र हीच पायपीट तो चरबी कमी करण्यासाठी करतो.

माणूस स्वत:शीच प्रतारणा करीत असतो.

पत नसली तरी लग्न करायला एका पायावर तयार असतो, ऐपत असली की मात्र त्याला घटस्फोट हवा असतो.

पैसे वाचवायला तो कधी बायकोलाच आपली सेक्रेटरी बनवितो, पुढे पैसा आला की सेक्रेटरीलाच बायको सारखे वापरतो.

पैसे नसेल तेव्हा तो असल्याचे सोंग आणतो, पैसा असतो तेव्हा मात्र कंगाल असल्याचे नाटक करतो.

माणसा रे माणसा. तू वास्तव तरी कधी स्वीकारतोस ?

शेयर बाजाराला सट्टाबाजार म्हणातोस पण सट्टा लावतोस,

पैसा वाईट असे म्हणतोस पण त्याचा मोह काही सोडत नाहीस,

मोठ्या पोस्टचा हव्यास नाही असे म्हणातोस पण डोळा मात्र ती पोस्ट कधी मिळते इकडे असतो,

जुगार आणि दारू वाइट म्हणतोस पण तिचा नाद काही तुला सोडवत नाही.

माणसाचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे असतात.

माणूस जे बोलतो ते कधी करत नाही, करतो ते कधी बोलत नाही.

माणसाची कथनी वेगळी, करणी वेगळी !

माजी पंतप्रधानांच्या मारेकर्यांना फाशी झालीच पाहिजे.

तब्बल ११ वर्षाच्या विलंबानंतर राष्ट्रपतींनी राजीव गांधी यांच्या मारेकर्यांचा दया अर्ज फेटाळला. अर्थात १९९१ मध्ये हत्या झाल्यावर १० वर्षे हा खटलाच चालला होता. खुद्द सोनिया गांधीनीच राजकारणात प्रवेश करताना , व त्यांच्याच पक्षाचे नरसिंहराव पंतप्रधान असताना या दिरंगाईबद्दल अमेठीच्या जाहीर सभेत नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्याच मर्जीतल्या राष्ट्रपतींना ही फाइल क्लियर करायला एवढा विलंब का लागला या बद्दल त्यांनी किंवा त्यांच्या मुलाने राहुलने कधी बोंब मारली नव्हती हे ही लक्षात घ्यायला हवे.

आपला स्वत:चा नवरा / बाप मारला गेला तरी सोनिया व राहुलला तामिळनाडूतली सत्ता जास्त प्रिय वाटत होती / आहे. काय दळभद्री मायलेक आहेत बघा ! यातुनच द्रमुक बरोबर चुंबाचुंबी सुरू होती. करूणानिधी उघडपणे तामिळ वाघांचे समर्थन तेव्हाही करत होते व आजही करीत आहेत. जेव्हा राजीव गांधी यांची हत्या झाली तेव्हा त्यांचेच सरकार तिकडे सत्तेत होते. तामिळ वाघांशी हातमिळवणी केली असल्याच्या सबळ पुराव्यावरून तेव्हा त्यांचे सरकार चंद्रशेखर यांनी बरखास्त केले होते. राजीव हत्येपाठोपाठ झालेल्या लोकसभा व राज्य विधानसभेच्या निवडणुकित करूणानिधींचा द्रमुक पार भुईसपाट झाला होता व तेव्हा अण्णाद्रमुकने कॉंग्रेसशी केंद्रात व राज्यात युती केली होती. यावरून तामिळनाडूतील जनतेची सहानुभूति श्रीलंकेतील फुटीरतावादी तामिळ वाघांना केव्हाही नव्हती हे सुस्पष्ट आहे. संख्येच्या बळावर जयललिता यांनी अत्यंत बेमुर्वतखोरपणे तेव्हा काँग्रेसला राज्यातील सत्तेतला वाटा नाकारला होता. जयललिता यांनी मग टाडाचा वापर करत द्रमुकला चांगलेच अडचणीत आणले होते. आज तामिळ अस्मितेच्या नावाने गळा काढणारे जयललिता व करूणानिधी कधी काळी तामिळ वाघांच्या हिटलिस्टवर होते, प्रभाकर त्यांच्या जीवावर उठला होता तेव्हा केंद्र सरकारने दिलेल्या संरक्षणातच त्यांना रहावे लागले होते ! आज श्रीलंकेने तामिळ वाघांचा पुरता बिमोड केल्यावर व त्यांचा म्होरक्या प्रभाकरनचा खातमा केल्यावर तामिळनाडूतल्या तामिळ नेत्यांना त्याचा पुळका आला आहे.


 

राष्ट्रपतींनी ११ वर्षे विलंब का केला हे विचारायचा अधिकार मद्रास उच्च न्यायालयाला कसा आहे ? दया अर्ज करताना खुन्यांनी "वेळेत निर्णय द्या" अशी काही अट घातली होती का ? "इतका विलंब का होत आहे" असे आधी कधी विचारले होते का ? फाशीला दिलेली स्थगितीच बेकायदा ठरवून ठरल्या दिवशी सगळ्यांना फासावर लटकवायलाच हवे. कहर म्हणजे तामिळनाडू विधानसभेने "फाशी रद्द करावी" असा एकमुखी ठराव केंद्राला पाठविला आहे. हा तर सरळ सरळ देशाच्या एकात्मतेवर घाला आहे. मारेकरी तामिळ होते म्हणून त्यांना फाशी देवू नये ही मागणी मान्य केल्यास देशाच्या विघटनाची प्रक्रीयाच सुरू होणार आहे. देशाच्या सीमावर्ती भागातल्या फुटीरतावादी कारवायांना अलिकडे बराच चाप बसला आहे, त्यांना या निर्णयाने नव्याने बळ मिळेल. उद्या मुसलमान दुखावतील म्हणून कसाबची फाशी रद्द करायची का ? का त्यामुळेच संसद हल्ल्याचा सूत्रधार अफझलला फाशी दिले जात नाही ? शीख मारेकर्यांनी इंदिरा गांधी यांची हत्या केली होती तेव्हा उडालेल्या आगडोंबात ३००० पेक्षा जास्त शीखांची कत्तल झाली होती. त्यांच्या मारेकर्यांना फासावर लटकाविले गेले व त्यानंतरही कॉंग्रेसचे सरकार पंजाबात सत्तेवर आले होते. तेव्हा कोणाचीही प्रादेशिक अथवा भाषिक अस्मिता कुरवाळण्याची गरज नाही. वेळ आली तर राजीव यांच्या मारेकर्यांबरोबरच त्यांच्या सहानुभूतिदारांना सुद्धा फासावर लटकावयची धमक केंद्र सरकारने दाखवायला हवी. "देरसे आये लेकिन दुरूस्त आये" या न्यायाने देशाच्या सार्वभौमत्वाला आवाहन देणार्यांना जरब बसावी म्हणून तसेच देशाची अखंडता टिकवण्यासाठी ही फाशी अत्यंत आवश्यक आहे.


 


 


 


 

रविवार, २८ ऑगस्ट, २०११

…. पण राजा तर नागडा आहे !

गेले बारा दिवस दिल्लीच्या रामलीला मैदानावर अण्णा हजारे यांनी षड्डू ठोकला होता. दिल्लीतले केंद्र सरकार सुद्धा हादरले होते. समस्त देश , विशेषकरून तरूणाई अण्णांच्या साथीला होती. मिडीयाला सुद्धा टीआरपी वाढविण्यासाठी बिनपैशाचा तमाशा मिळाला होता. देशभर जणू दूसर्‍या स्वातंत्र्य लढ्याचाच माहोल होता. गेले दोन दिवस तर सरकारने ठाम भूमिका घेतली होती. कायदे करण्याचा अधिकार लोकांनी निवडून दिलेल्या खासदारांचा आहे. कोणीही दबाव आणून या अधिकारावर गदा आणू शकणार नाही. अण्णांचे जहाल असे जनलोकपाल डावलून सरकार सौम्य लोकपाल बिल आणू पाहत होती. भाजपा सारखा कसलेला विरोधीपक्ष सुद्धा निर्नायकी अवस्थेत होता. अण्णांच्या बाजूने कोणताही पक्ष अधिकृतपणे उभा नव्हता. आणखी ७ दिवस आपण उपोषण करू शकतो असे अण्णांनी जाहीर केल्यावर सरकारच्या नाकी नऊ आल्याचेच चित्र होते. काय होणार याची उत्सूकत अगदी शिगेला पोचली होती. सरकार अण्णांचा रामदेव बाबा करणार की सरकारच गडगडणार अशी स्थिती होती. कालपर्यंत उपोषण अजून किती चालवायचे याची अण्णा टीमला काळजी पडली होती तर अजून किती काळ सलाइनवर रहायचे असा सरकारपुढे प्रश्न होता. कोणीतरी पड घ्यायलाच हवी होती. पण कोणी पडल्याचे सोंग करायचे ? अण्णांनी उपोषण सोडले तर त्यांच्या मागे असलेली तरूणाई त्यांना कचखाऊ म्हणायचा धोका होता, सरकारने पडान घेतले तर विरोधी पक्ष त्याचा मुद्दा करणार होता. अर्थात मिडीयाला मात्र त्याने काहीही फरक पडणार नव्हता. ढोल काय कोठूनही वाजतो !


 

अति झाल्यावर दोन्हीकडून हालचाली सुरू झाल्या. पडान तर घ्यायचे पण दूसर्या पार्टीने पडला म्हणून हसायचे नाही ऊल्ट मीच माती खाल्ली असे म्हणायचे, असा काहीतरी मध्यममार्ग निवडण्यात आला. शेवटी महाराष्ट्रातले फिक्सर नेत दोन्ही बाजू लढू लागले. राजाला नागडा तर फिरवायचा पण बघणार्यांनी त्याला नागडा न म्हणता, वा, काय दिव्य वस्त्रे परिधान केली आहेत असे म्हणायचे असेही ठरले ! मिडीयासुद्धा हसत हसत या तोडग्यात सामील झाला. ठरल्याप्रमाणे अण्णांच्या तीन प्रमुख मागण्या संसदेत मान्य झाल्याचे फर्मान घेवून इलासराव रामलीला मैदानावर आले. त्यांनी अण्णांना डोळा मारला व अण्णांनी संकेत समजून उपोषण सोडत असल्याचे जाहीर केले ! जनलोकपालाची दिव्य वस्त्रे घालून अण्णा रामलीला मैदानावर जमलेल्या जनसमुदायाला सामोरे गेले ! सर्व देशभर क्रांती यशस्वी झाल्याचा जयजयकार झाला. मिडीया अण्णा ट्यून आळवू लागला. जय हो !


 

म्या पाप्याला मात्र अण्णांची दिव्य वस्त्रे दिसत नाहीत बाबा ! अण्णांच्या तीन प्रमुख मागण्या होत्या १)पंतप्रधानांना जनलोकपालाच्या कक्षेत आणणे २) न्याययंत्रणा जनलोकपालाच्या कक्षेत आणणे ३) सर्व सनदी अधिकारी जनलोकपालाच्या कक्षेत आणणे. आज पेपरात, मिडीयात सगळीकडे ३ प्रमुख मागण्या मान्य झाल्याचा ढोल बडविला जात आहे. यातली एकही मागणी प्रमुख नाही ! पेपरात आज प्रमुख म्हणून मान्य झालेल्या मागण्या खरेतर अगदी तिय्यम दर्जाच्या आहेत. नागरिकांची सनद, कनिष्ठ नोकरशाही योग्य यंत्रणेद्वारे लोकपालाच्या कक्षेत आणणे व राज्यात लोकायुक्त या प्रमुख मागण्या कधी होत्या ? कनिष्ठ नोकरशाही चौकशीच्या फेर्यात आणणे ही प्रमुख मागणी ? अहो मुंगीला चिरडण्याकरीत एके ४७ कशाला हवी ? लोकांना बनवायचे तरी किती ? आणि या साठी अण्णांनी एवढा अट्टाहास केला होता ? सरकारने अण्णांना सरळ-सरळ गुंडाळले आहे, त्यांचा अगदी मामा केला आहे ! अण्णा जिंकले म्हणून जी दिव्य वस्त्रे घालून लोकांचे अभिवादन स्वीकारत चालले आहेत ती खरे तर वस्त्रच नाहीत ! राजा नागडा आहे ! पण सांगणार कोण ?

सोमवार, २२ ऑगस्ट, २०११

चॅटरूममध्ये गप्पा मारायला आला बाप्पा !

बाप्पा – हाय ! मला का बोलावतो आहेस ?

मी – मी तुला बोलाविले ? नाही. तू आहेस तरी कोण ?

बाप्पा – मी बाप्पा आहे. तुझी प्रार्थना ऐकली. तेव्हा तुझ्याशी गप्पा मारायला आलो.

मी – मी प्रार्थना करतो. तेवढेच जरा बरे वाटते. पण आता मात्र मी खूप कामात आहे. कशात तरी मी अगदी गुरफटून गेलो आहे.

बाप्पा – कोणत्या कामात एवढा गर्क आहेस ? मुंग्या सुद्धा सतत उद्योगी असतात.

मी – नाही सांगता येणार. निवांतपणाच हरविला आहे. आयुष्य अगदी धकाधकीचे झाले आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग !

बाप्पा – खरे आहे. सतत कार्यमग्न असता. पण निर्मितीक्षम असाल तर तुम्हाला परिणाम मिळेल. कामात तुमचा वेळ जातो. निर्मिती कराल तर तुमचा वेळ मिळेल.

मी – थोडे थोडे समजते आहे. पण तू असा चॅटरूम मध्ये मला पिंग करशील असे कधी वाटलेही नव्हते !

बाप्पा – तू वेळेबरोबर झगडतो आहेस, त्यात तुझी थोडी मदत करावीशी वाटली. आजच्या काळात तुम्ही याच माध्यमातुन संवाद साधता तेव्हा मी सुद्धा त्याच मार्गाने तुझ्यापर्यंत आलो.

मी – जगणे एवढे गुंतागुंतीचे कसे बनले ते सांगशील का ?

बाप्पा – कसे जगायचे याचा विचारच सोडून द्या ! आयुष्याला सामोरे जा ! कसे जगायचे याची विवंचना करीत बसल्याने गुंता होतो.

मी – कशामुळे आम्ही सतत दु:खात बुडालेले असतो ?

बाप्पा – वर्तमानात तुम्ही भूतकाळाची काथ्याकूट करीत बसता व भविष्याची चिंता करता. कारणे शोधत बसता म्हणून काळजी वाढते. काळजी करत बसायची तुम्हाला खोडच लागली आहे. म्हणून तुम्ही कष्टी होता.

मी – पण आज अनिश्चितता एवढी वाढली आहे की काळजी वाटणे अगदी स्वाभाविकच आहे ना ?

बाप्पा – अनिश्चितता अपरिहार्य आहे पण काळजी करणे आपण टाळू शकतो.

मी – पण मग अनिश्चितततेमुळे होणार्या यातनांचे काय ?

बाप्पा – यातना अपरिहार्य आहे पण त्रासणे टाळता येण्या सारखे आहे.

मी – मग चांगल्या माणसांच्याच वाटेला सगळे भोग का लागतात ?

बाप्पा – हिर्याला पैलू पाडावे लागतात, सोने कसाला लावावे लागते. चांगल्या माणसांना कठोर परीक्षा द्यावी लागते पण त्याला ते त्रास समजत नाहीत. त्यांचे जीवन अनुभवाने समृद्ध बनते, कडवट नाही.

मी – म्हणजे अशी अग्नीपरीक्षा गरजेची आहे ?

बाप्पा – हो. सर्वाथाने. अनुभव हा एक कठोर गुरू आहे. इथे परीक्षा आधी मग धडे असा प्रकार असतो.

मी – पण तरीही अशी परीक्षा द्यायची वेळच का यावी ? आपण PROBLEMS पासून मुक्त का होवू शकत नाही ?

बाप्पा – PROBLEMS म्हणजे;

Purposeful Roadblocks Offering Beneficial Lessons to Enhance Mental Strength.

आंतरिक शक्ती समस्यामुक्त असताना येत नाही तर ती संघर्षातुन व दृढ निग्रहातुन येते.

मी – खरे सांगायचे तर समस्यांच्या या झंझाळात मी वाटच हरवून बसलो आहे.

बाप्पा – बाहेर बघितलत तर तुम्हाला आपण कोठे चाललो आहोत ते कळणारच नाही. आत डोकावा. बाहेर तुम्हाला स्वप्ने दिसतील. आत बघाल तर जागे व्हाल. डोळे तुम्हाला बाहेरचे जग दाखवितात. ह्रुदय तुम्हाला अंतरंग दाखविते.

मी – यशाच्या मार्गावर चालताना कधी कधी यश चटकन वश होत नाही तेव्हा ते जास्त बोचते. अशावेळी काय करू ?

बाप्पा – यशाचे मापदंड प्रत्येकाचे वेगळे असतात. समाधान मिळाले का हे मात्र तुमचे तुम्हीच ठरवायचे असते. वेगावर हावी होण्यापेक्षा योग्य मार्गावर आहोत हे माहित असणे जास्त महत्वाचे. तुम्ही होकायंत्राप्रमाणे जा. भले इतर घड्याळाशी स्पर्धी करू देत !

मी – कठीण प्रसंगात निर्धार कसा टीकवायचा ?

बाप्पा – अजून किती अंतर पार पडायचे आहे हे बघू नका. आपण किती अंतर पार केले ते बघा. तुमच्या मागे असलेल्या आशीर्वादांवर जास्त भरोसा ठेवा , काय कमी आहे त्याचा विचार करू नका.

मी – तुला लोकांच्या कोणत्या गोष्टीचे नवल वाटते ?

बाप्पा – दु:ख वाट्याला आले की लोक "मीच का ?" असे विचारतात पण सुखात लोळताना मात्र हा प्रश्न त्यांना कधी पडत नाही ! प्रत्येकाला आपली बाजू सत्याची वाटत असते. सत्याच्या बाजूला मात्र कोणी उभाही रहात नाही.

मी – माझे भले कशात आहे ?

बाप्पा – भूतकाळाची खंत करू नका. वर्तमानाला आत्मविश्वासाने तोंड द्या. भविष्याला निर्भयतेने सामोरे जा.

मी – एक शेवटचा प्रश्न . कधी कधी मला वाटते की माझी प्रार्थना ऐकलीच जात नाही.

बाप्पा – प्रार्थना ऐकली नाही असे कधीही होत नाही. तुम्हाला असे वाटते तेव्हा "ती वेळ" अजून आलेली नसते.

मी – मजा आली देवा ! आता माझ्यात एक नवी प्रेरणा जागी झाली आहे.

बाप्पा - चांगले आहे. भरवसा ठेव , भय सोड. शंकेला थारा देवू नकोस , श्रद्धा सोडू नकोस. एखादी समस्या नाही तर आयुष्याचे कोडे सोडवायचे आहे. माझ्यावर विश्वास ठेव. कसे जगायचे हे कळले तर हे जीवन सुंदर आहे !


 

बुधवार, १७ ऑगस्ट, २०११

300+ धावांचा पाठलाग करणारे फलंदाज.

300+ धावांचा पाठलाग करणारे फलंदाज.

मागील एका आकडेमोडीत म्हटल्याप्रमाणे ३०० धावांचा पाठलाग नक्कीच खडतर असतो व अशा स्थितीत आकडेमोडीच्या आधारे संघांमध्ये तुलना केली होती व त्यांचे बलाबल स्पष्ट केले होते. आता हीच आकडेमोड फलंदाजाच्या बाबतीत करू. या साठी माहितीचे संकलन करताना ३००+ धावांचे लक्ष्य असताना फलंदाजाची कारकिर्दीतील आकडेवारी व मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतानाची आकडेवारी विचारत घेतली आहे.

अलिकडच्या १० वर्षात ३००+ धावांचा डोंगर उभारण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे हे नक्की. अझर हा या यादीतला सगळ्यात बुजुर्ग फलंदाज आहे. त्याचा काळ आहे १९८५-२०००. एकूण ३२० सामन्यात फक्त ६ वेळा त्याच्यावर अशी वेळ आली आहे. पण त्यालाही बुजुर्ग असणार्या अरविंद डीसिल्वावर २९५ सामन्यात अशी वेळ तब्बल १९ वेळा आलेली आहे. याचा अर्थ लंकेचा संघ तेव्हा गोलंदाजीत दुबळा असावा असाही होवू शकतो. यादीतला सर्वात अलिकडे कारकिर्द सुरू केलेला खेळाडू आहे संगकारा (२०००-२०११), २८५ सामने खेळताना त्याच्यावर ही वेळ १९ वेळा आलेली आहे. या काळात श्रीलंका वनडेतला दादा संघ म्हणून ओळखला जातो. म्हणजेच ३०० धावा फटकाविणे आज तेवढे कठीण राहीलेले नाही.

३००+ धावांचा पाठलाग करताना विजयाची टक्केवारी जमेस धरली तर अझर पहिला आहे पण तो अशा प्रसंगातुन फक्त ६ वेळा गेला आहे व दोनदा विजयी ठरला आहे. गांगुली हा मात्र खरेच दादा आहे कारण तो असताना २३ वेळा असा पाठलाग करताना ६ वेळा भारत जिंकलेला आहे ! अर्थात तेंडल्याही फारसा मागे नाही. तो संघात असताना अशा प्रसंगात २६ पैकी ५ वेळा भारत सामना जिंकलेला आहे. बडे खेळाडू मोठ्या धावांचा पाठलाग करताना टेन्शन घेत नाहीत हे सुद्धा दिसून येते. यादीतल्या सर्वच खेळाडूंची सरासरी अशा वेळी त्यांच्या कारकिर्दीतल्या सरासरीपेक्षा चांगलीच अधिक भरते आहे. लारा असताना त्याचा संघ १२ पैकी फक्त एकदा जिंकला असेल पण तो मात्र कमी पडला असे म्हणता येणार नाही. एरवी त्याची सरासरी ४० असताना, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना ती चक्क ६५ आहे !


 

सविस्तर कोष्टक खाली दिले आहे.

Player

Carrer Stats

When Chasing 300 Plus Target in ODI

Span

Mat

Inns

Runs

Avg.

Mat

Won

Win %

Btg Avg.

M Azharuddin (India)

1985-2000

320

301

9143

36.57

6

2

33.33

55.32

SC Ganguly (Asia/India)

1992-2007

295

293

11293

41.67

23

6

26.09

57.24

JH Kallis (Afr/ICC/SA)

1996-2011

304

292

11127

45.6

12

3

25.00

61.9

AC Gilchrist (Aus/ICC)

1996-2008

280

273

9568

36.51

8

2

25.00

51.59

Mohammad Yousuf (Asia/Pak)

1998-2010

283

270

9578

41.64

18

4

22.22

45.8

RT Ponting (Aus/ICC)

1995-2011

352

344

13315

43.51

10

2

20.00

50.76

SR Tendulkar (India)

1989-2011

429

426

17593

45.11

26

5

19.23

54.57

DPMD Jayawardene (Asia/SL)

1998-2011

336

319

9561

33.31

21

4

19.05

54.16

ST Jayasuriya (Asia/SL)

1989-2011

429

423

12987

31.83

22

4

18.18

56.12

R Dravid (Asia/ICC/India)

1996-2009

323

305

10456

39.3

28

5

17.86

54.81

KC Sangakkara (Asia/ICC/SL)

2000-2011

285

271

9245

38.2

19

3

15.79

55.33

Inzamam-ul-Haq (Asia/Pak)

1991-2007

369

343

11696

40.33

15

2

13.33

52.57

BC Lara (ICC/WI)

1990-2007

286

281

10157

40.79

12

1

8.33

65.27

PA de Silva (SL)

1984-2003

295

288

9143

35.3

16

1

6.25

58.6


 

विजय मिळेपर्यंत बॅट खाली न ठेवणारे फलंदाज !


विजय मिळेपर्यंत बॅट खाली न ठेवणारे फलंदाज !
क्रिकेटमध्ये असे अनेकदा घडते की एखादा फलंदाज धडाकेबाज खेळी करून संघाला अगदी विजयाच्या समीप आणून ठेवतो व बाद होतो. सेट झालेला फलंदाज बाद झाला की पराभवाच्या खाईत लोटल्या गेलेल्या संघाचे मनोधैर्य उंचावतो. नवा आलेला फलंदाज सेट व्हायला थोडा वेळ घेतो, आवश्यक धावगती चेंडूगणिक वाढत जाते. फलंदाजाला धोका पत्करणे भाग पडते. यातच मग त्याची विकेट पडते व एक दुष्टचक्रात संघ फसतो व अगदी आटोक्यात असलेल्या विजयाचे पराभवात रूपांतर होते. शेवटी पब्लिक पराभवाचे खापर धडाकेबाज खेळून विजयाचे स्वप्न दाखविणार्या खेळाडूवर फोडून मोकळे होते. त्याने विकेट फेकली, शेवटपर्यंत उभा राहिला असता तर हाता-तोंडाशी आलेला विजय पराभवात बदलला नसता. यात थोडेफार तथ्य जरूर आहे. सेट झालेल्या खेळाडूने विजय आटोक्यात आल्यावर थोडा संयम राखून फलंदाजी करण्याची गरज असते. त्याने विजय प्राप्त होईपर्यंत उभे राहण्याचे अपेक्षा असते. इंग्रजीत "कॅरी करणे" !
एक दिवसीय सामन्यात दूसर्या डावात धावांचा पाठलाग करताना विजय प्राप्त होईपर्यंत लढणार्या खेळाडूंची, नाबाद राहणार्या खेळाडूंचा ताळेबंद खाली मांडलेला आहे. संघाला नाबाद राहून विजय मिळावून देणारे पहिले 20 खेळाडू खालीप्रमाणे –
PlayerSpanMatRunsHSAveSR
100
50
JN Rhodes (SA)1992-2002
33
941
75*
28.52
82.61
0
5
Inzamam-ul-Haq (Pak)1993-2006
32
1787
118*
55.84
86.91
3
15
RT Ponting (Aus)1995-2011
30
1504
124*
50.13
86.38
4
10
M Azharuddin (India)1985-2000
30
1419
108*
47.30
87.7
1
12
JH Kallis (SA)1996-2008
29
1648
121*
56.83
74.06
2
17
A Ranatunga (SL)1982-1999
27
1366
131*
50.59
87.78
1
11
MS Dhoni (India)2005-2011
27
1347
183*
49.89
94.32
2
9
DR Martyn (Aus)1999-2006
27
906
92*
33.56
79.75
0
7
SR Waugh (Aus)1986-2001
26
861
120*
33.12
77.01
1
6
SR Tendulkar (India)1991-2009
25
1847
127*
73.88
92.21
8
10
Yuvraj Singh (India)2002-2011
25
1268
107*
50.72
93.09
1
14
BC Lara (WI)1992-2007
25
1244
146*
49.76
91.06
3
7
MG Bevan (Aus)1994-2003
25
1020
102*
40.80
68.91
1
8
MV Boucher (SA)1998-2009
25
604
63*
24.16
90.96
0
3
SM Pollock (SA)1996-2008
25
264
26*
10.56
91.66
0
0
DPMD Jayawardene (SL)1998-2011
24
950
126*
39.58
91.25
2
4
Mohammad Yousuf (Pak)1998-2008
23
1288
108*
56.00
71.83
2
10
RB Richardson (WI)1984-1996
23
1143
108*
49.70
64.32
2
10
MJ Clarke (Aus)2003-2011
23
1012
105*
44.00
80.12
3
8
CL Hooper (WI)1988-2003
22
637
110*
28.95
68.34
1
3

 

सचिनवर टीका करणारे कायम म्हणत असतात की सचिनला संघाला विजयी करून देता येत नाही. तो विजयाची आशा दाखवितो व अर्ध्या वाटेवरच बाद होतो. संघाचे तारू भरकटते. आकडेवारी मात्र हा समज पार खोटा ठरविते. वरील यादी प्रमाणे सचिनने ही करामत 25 वेळा करताना 8 शतके व 10 अर्धशतके ठोकली आहेत. तसेच त्याची कारकिर्दीतली सरासरी व धावगती 44 व 88 असताना या प्रसंगात मात्र ती 74 आणि 92 आहे ! इथे हे सद्धा लक्षात घेतले पाहिजे की वरील यादीत सचिनच सलामीला खेळतो व असे असूनही संघाला नाबाद राहून विजय मिळवून द्यायची कामगिरी त्याने तब्बल 25 वेळा केली आहे ती सुद्धा जास्त सरासरी व धावगती राखून !