रविवार, १३ मार्च, २०११

म्या मरीन पण तुका ---- !

“म्या मरीन पण तुका रांड करीन” अशी एक इरसाल मालवणी म्हण आहे ! टीम इंडीयाने या म्हणीचा प्रत्यय काल शतक ठोकणार्या सचिनला दिला ! हीच टीम इंडीया सचिनला विश्वचषकाची भेट देणार आहे म्हणे ! मुंह मे राम और बगल मे छुरी ! इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात सुद्धा सचिनने शतक केल्यावर बाकी फलंदाजानी योजनाबद्ध हाराकिरी केली होती पण सचिनच्या पुण्याईनेच तो सामना टाय झाला. हल्ली काही दळभद्री लोक सचिनने शतक ठोकले की भारत हरतो अशी बोंब ठोकत आहेत. अशांच्या xx मध्ये बेल्ससकट सहा स्टंप ठोकायला हवेत. संघातला एक फलंदाज चेंडूगणिक धाव घेवून शतक ठोकतो व बाकिचे त्याला नाट लावण्यासाठी आपले नाक कापून घेतात हेच खरे ! माणूस जेवढा मोठा होतो तेवढेच त्याला शत्रू सुद्धा निर्माण होतात. सचिनवर बंगाली काला-कांडी करून गांगुली थकला, अझरने बेंटींग करून सचिनच्या अनेक चांगल्या खेळींची माती केली. द्रविडने वेळ येताच कानडीपणा दाखविला आता धोणी तीच गादी पुढे चालवित आहे !


कालचा पराभव माझ्या मते सर्वात लाजिरवाणा पराभव म्हणावा लागेल ! अगदी जावेदने शेवटच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराचे वळ एक वेळ बुजतील पण हा सचिनच्या खेळीला नाट लावण्यासाठी ओढवून घेतलेला पराभव विसरू विसरता येणारा नाही ! काल आपल्याला दक्षिण आफ्रिकेने हरविले यावर अजूनही माझा विश्वास बसलेला नाही. नक्की कोठे घोटाळा झाला ? चावलाला काढून टाकले तर त्याच्या जागी अश्विनला घ्यायचे सोडून नेहराच बरा धोणीला गवसला ? आणि सुरेश रैना काय फक्त क्षेत्ररक्षणासाठीच संघात आहे का ? गंभीर किंवा विराट कोहली यातल्या एकाला आलटून पालटून विश्रांती देवून रैनाला का खेळविले जात नाही ? रैना गोलंदाजी सुद्धा करू शकतो व त्याची फिल्डींग हा बोनसच आहे.


सचिन-सेहवागच्या धडाकेबाज सलामीनंतर भारताची धावसंख्या कमाल ४०० ते किमान ३५० असायलाच हवी होती. इंग्लंडविरूद्ध अशीच दणकून सलामी मिळून सुद्धा शेवटी उडालेल्या घसरगुंडीने शेवटचा चेंडू खेळायला आपल्याकडे फलंदाजच शिल्लक उरला नव्हता. या इतिहासातुन टीम इंडीयाने कोणता बोध घेतला ? तर या वेळी शेवटचे आठ चेंडू खेळायला आपल्याकडे फलंदाजच शिल्लक नव्हता ! याला म्हणतात अनुभवाने शहाणे होणे ! धोणीचे गणित सुद्धा कच्चे आहे हे नक्की. शेवटचे षटक आपल्या सर्वोत्तम गोलंदाजाकडे कसे यावे यासाठी त्याने शिकवणी लावायची गरज आहे. धोणीच्या वकुबाबद्द्ल सुद्धा शंका घ्यायला बराच वाव आहे. पॉवर प्ले कधी घ्यायचा याचा निर्णय कायम त्याच्या व पर्यायाने संघाच्या अंगलट आला आहे. शतकी खेळी केलेला सचिन दमला असणे स्वाभाविक होते व पॉवर प्ले मध्ये उलचून चेंडू मारण्यात तो यशस्वी होण्याची शक्यता कमी होती. तो एकेरी-दुहेरी धावा घेवून धावफलक हलता ठेवत असताना पॉवर प्लेचा अवसानघातकी निर्णय पुढे ढकलता आला असता. बरे पॉवर प्ले मध्ये विकेट पडत आहेत हे लक्षात आल्यावर आक्रमकपणाला मुरड घालून खेळपट्टीवर तळ ठोकला असता तरी निदान ३०० चा पल्ला गाठता आला असताच. सचिन असेपर्यंत फलंदाजीला साथ देणारी खेळपट्टी एकदम रंग बदलेल हे संभवत नाही. पण सचिनला नाट लावायची या एकाच प्रेरणेने सगळे खेळत होते व हे सगळे दूसर्या टोकाला धोणीच्या साक्षीने चालले होते. धोणी कॅप्टन कुल नसून खूनशी आहे नाहीतर बथ्थड तरी आहेच आहे ! अगदी शेवटच्या षटकात तेरा धावा हव्या असताना धोणीने चेंडू दिला नेहराकडे ! काय त्या नेहराचा चेहरा ! एरंडेल घेतलेला नेहरा शेवटचे षटक टाकणार म्हटल्यावर छातीत धस्स झाले होते ! सचिन गोलंदाजीसुद्धा ( हो, सेहवाग सुद्धा ! ) करू शकतो याचा हल्ली धोणीला विसरच पडलेला आहे ! याच सचिनने पोरसवदा असताना याच आफ्रिकेविरूद्ध शेवटचे षटक टाकून सामना टाय केला होता , इंझमाम हक सारख्या कसलेल्या फलंदाजाला शेवटच्या चेंडू पर्यंत जखडून ठेवण्याची करामत केलेली होती --- पण सचिन द्वेषाने पछाडलेल्या झारखंडी धोणीला त्याचे काय ? मराठ्यांचे पानिपत कसे करायचे हेच त्याच्या सडक्या डोक्यात असणार ! निदान शेवटच्या चेंडू पर्यंत तरी उत्कंठा वाटेल असेही नेहराने काही केले नाही ! चोकार, षटकार, चौकार ! खेळ खल्लास ! हीच का टीम इंडीयाची सचिनला संस्मरणीय भेट ? ३७ वर्षाचा तरूण तडाखेबंद शतक ठोकतो, तेवढ्याच उत्साहात स्वत:च्या शरीराचा कोट करून क्षेत्ररक्षण करतो व त्याला नाट लावण्यासाठी बाकी टोळभैरव विकेट विकतात, हातातले झेल सोडतात, तो जेव्हा दूसरी धाव घेण्यासाठी अर्धे अंतर पार करून आलेला असतो तेव्हा त्याचा तरूण सहकारी एक धाव कशीबशी पुरी करीत असतो !


सचिन भारतात जन्माला आला हे आपले भाग्य पण त्याचे काय ? ही कसली टीम इंडीया ही तर ’शेम इंडीया’ !

२ टिप्पण्या:

सिद्धार्थ म्हणाले...

काश सचिन फेडररसारखा टेनिस खेळत असता... निदान त्याला जिंकण्यासाठी बाकी फाटक्या लोकांवर अवलंबुन रहावं लागलं नसतं. अहो हे स्वत: चार धावा नाही करू शकत, सचिनला WC देण्याची ह्यांची लायकी आहे का?

काल चेतन भगतने छान Tweet केलं होतं.
Well, apart from 3, at least the rest of them can say they sell pepsi for a living.

epundit म्हणाले...

फ़क्त चिडचिड झाली....अत्यंत दळभद्री कप्तान...एकतर शेवटचे पाच विकेट हा non striker म्हणून राहिला...batting आली की १ रन काढून परत non striker...कसला भुक्कड आहे हा धोनी...सचिन ची माती करतात हे सर्व YZ माणसे...