मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

रमेश किणीचे काय झाले ?

सामना सिनेमात मास्तर एकच प्रश्न विचारत असतात "मारूती कांबळेचे काय झाले ?" मला पण राजना एकच प्रश्न विचारायला आहे "रमेश किणीचे काय झाले" ? 

शिवशाहीत एक सामान्य मराठी माणूस, सामना कार्यालयात शेवटचे बघितलेला , खिषात विष खायलाही पैसा नसलेला माणूस मुंबईतुन वादळी पावसात पुण्याला पोचला कसा, अलका सिनेमात, ब्रोकन अ‍ॅरो च्या शेवटच्या शोला गेला कसा, सोडीयम सायनाइड पिवून मेला कसा व हे रहस्य अनेक वर्षे सी.आय.डी तपास होवूनही कसे उलगडल गेले नाही ? सामनाच्या पुणे आवृत्तीत रमेश किणी मृत अवस्थेत सापडल्याची बातमी नव्हती पण मुंबई आवृत्तीत होती - Exclusive !

या प्रकरणाचे कंगोरे जबरदस्त आहेत, मेलेला माणूस मराठी, त्याला जागा खाली करायला लावणारा निरंजन शहा हा गुजराती व या शहाला वडीलांसमान मानणार कोण तर मराठीचा एकमेव कैवारी राज ठाकरे ! हे प्रकरण उघडकीला आणणारे होते छगन भुजबळ ! राजची चौकशी तेव्हा पोलिसांनी तेव्हाच्या गृहराज्यमंत्री सेनेच्या किर्तीकरांच्या उपस्थितीत केली होती ! 

रमेश किणींच्या विधवा शीला किणी न्याय मिळावा म्हणून झगडत होत्या . स्वत: बाळ ठाकरे अतिषय अश्लाघ्य भाषेत त्यांच्यावर सामनात टीका करीत होते ! रमेश किणी यांचे दुसर्यांदा शव विच्छेदन केले तेव्हा त्यात मेंदू सापडला नव्हता. रमेश किणी यांना मेंदूच नव्हता असे सामनात बाळ ठाकरे यांनी लिहिले होते ! 

शिवसेने बद्दल जबरदस्त भ्रमनिरास माझा या एकाच प्रकरणातुन झाला !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: