सोमवार, २० ऑक्टोबर, २०१४

ओवैसी फॅक्टर !

या निवडणुकीत उघड चिथावणीखोर भाषणे करणार्या ओवैसी संघटनेचे 3 उमेदवार निवडून आल्याने अनेक जण अस्वस्थ आहेत. लोकशाही मार्गाने 3 उमेदवार निवडून आले हे खरे तर स्वागतार्हच आहे ! ही संघटना वाढली तर देशाच्या एकात्मतेला धोका आहेच. पण काळजी करायचे काहीही कारण नाही. देशात मुस्लिम 15 % असले तरी ते एकगट्ठा मतदान करतात हा सिद्धांत खोटा असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. मुस्लिम समाजात सुधारणेचा वेग कमी असला तरी प्रक्रीया चालूच आहे. शिक्षण घेतलेला, सरकारी / खाजगी नोकरी करणारा सर्वसाधारण मुसलमान ना चार लग्ने करत ना खाटवळभर मुले जन्माला घालत.

भीती वाटते आहे ती अशा धर्मांध संघटनेच्या झेंड्याखाली मुस्लिम एकत्र होण्याची. तसे झाले तरी वांदा नाही. या वेळीही मुस्लिम बहुल भाग भिवंडी व मुंब्रा, या संघटनेचे कोणीही निवडून आलेले नाही. आता जे आले आहेत ते मतविभाजनाचा फायदा मिळून, निव्वळ मुस्लिम मते घेवून नाही. जी मुस्लिम मते सपा, कॉंग्रेसला एकगठ्ठा मिळत होती ती ओवैसी यांच्या पक्षाला मिळाली तर नुकसान सपा व कॉंग्रेसचे आहे ! अगदी टोकाची शक्यता म्हणून मुस्लिम मतांचे ध्रूवीकरण झाले तर काय ? देशात 20 % लोकसभा मतदारसंघ असे आहेत की जिकडे मुस्लिम मते निर्णायक ठरतात. पण जेव्हा 20-30 % मतांचे ध्रूवीकरण होइल तेव्हा हिंदूत त्याची प्रतिक्रीया उमटणारच व 80 % हिंदू मतांचे ध्रूवीकरण होण्याची प्रक्रीया सुद्धा सुरू होइलच ! तेव्हा देश लोकशाही मार्गाने धर्मांधाच्या हातात जाणार नाही हे नक्की !

आता याच ओवैसींनी कायदा हातात घेतला तर काय ? देशात आता प्रखर राष्ट्रीय विचारसरणीचे सरकार आहे. आधीच्या राजवटीत मतांच्या बेगमीसाठी जे लांगुलचालन चालायचे तसे अजिबात होणार नाही. काही आगळीक केल्यास सरकार ती कठोर पणे मोडून काढेल याची खात्री बाळगा ! मुस्लिमांना सुद्धा शांतता व विकास हवा आहे हे गुजरातेतील मुसलमानांनी दाखवून दिलेच आहे. तेव्हा ते अशा चिथावणीला बळी पडतील असेही वाटत नाही. मोदी सगळ्यांनाच सोबत घेवून चालले आहेत तेव्हा मुस्लिमही त्यांनाच साथ देतील यात काही शंका नाही.

२ टिप्पण्या:

Vijay Shendge म्हणाले...

Very True.

sharayu म्हणाले...

शिवसेनेला शह देता यावा म्हणून राज ठाकरे यानी मुस्लिम ध्रुवीकरणाचे भूत उठविले होते. त्याचा फायदा ओवैसी याना झाला आहे. तो टिकून राहीलच असे म्हणता येणार नाही.