शुक्रवार, १ जुलै, २०११

समस्यांचा मुकाबला कसा करायचा ?

आधुनिक व्यवस्थापन तंत्रावर कार्यशाळा भरलेली होती. विषय होता समस्यांचा मुकाबला कसा करायचा आणि तो सुद्धा ताण न येता. कार्यशाळा घेणार्या अध्यापकाने हातात पाण्याने भरलेला एक पेला घेतला व वर्गाला उपस्थित सगळ्यांना प्रश्न विचारला की "या पेल्याचे वजन किती असेल " त्यातुन सुरू झालेली प्रश्नोत्तरे ----

50 ग्रॅम !

100 नाहीतर 125 ग्रॅम !

जो तो आपापल्या अंदाजाप्रमाणे उत्तर देवू लागला.

खरे तर मला सुद्धा मोजल्याशिवाय याचे वजन किती ते सांगता येणार नाही, पण ते एवढे महत्वाचे नाही, खरा प्रश्न हा आहे की जर हा पाण्याने भरलेला पेला मी काही मिनिटे असाच हातात धरून ठेवला तर काय होईल ?

काहीही होणार नाही !

ठीक आहे, जर मी हा पेला तासभर असाच धरून ठेवला तर काय होईल ?

हात दुखायला लागेल !

बरोबर आहे ! आता सांगा , जर हाच पेला जर मी दिवसभर हातात धरून ठेवला तर काय होईल ?

तुमच्या हाताला मुंग्या येतील, बधीर होईल तो आणि कदाचित तो लुळा पडून दवाखान्यात सुद्धा भरती व्हावे लागेल !

या उत्तराने वर्गात हास्याची एक लहर उसळली !

छान ! पण मला सांगा, हे सगळे होताना पेल्याच्या वजनात काही फरक पडला का ?

नाही !

मग हात दुखायचे, मुंग्या यायचे व लुळा पडायचे कारण तरी काय ?

वर्गात आता चांगलाच गोंधळ उडाला ! जो तो विचारात पडला.

आता या समस्येतुन मला कसा मार्ग काढावा लागेल ?

अहो तो पेला खाली ठेवायचा !


 

अगदी बरोबर ! आपल्याला जीवनात भेडसावणार्या समस्या या अशाच असतात. या समस्यांवर डोके काही मिनिटे विचार करू शकते, तासभर जर तुम्ही त्यावर विचार करीत बसाल तर तुमचे डोके दुखू लागेल आणि दिवसभर डोक्यात तेच भरून ठेवल्यास तुमच्या डोक्याचा पार भुगा होवून जाईल !

यातुन साध्य काहीही होणार नाही. समस्यांना तोंड तर दिलेच पाहिजे पण त्याहून महत्वाचे आहे ते दिवस संपल्यावर झोपी जाण्यापुर्वी त्या डोक्यातुन काढून बाजूला ठेवणे ! अशाने तुम्ही ताणमुक्त व्हाल, झोप छान लागेल, सकाळी उठल्यावर प्रसन्न वाटेल, उत्साहाने आणि नव्या उमेदीने तुम्ही समस्यांचा सामना करू शकाल !


 

काय ? काही डोस्क्यात प्रकाश पडला का ? मग तो पेला कशाला अजून हातात धरून ठेवलाय ?!!!!!!!


 

ठेवा तो पेला खाली !!!!


 


 

३ टिप्पण्या:

Prajakat म्हणाले...

khupach chan

अनामित म्हणाले...

Very very nice article. Everybody will have nice sleep : AA

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

१०० टक्के पटलं.