गुरुवार, ११ मार्च, २०१०

निर्बल से लड़ाई बलवान की --- !

“बळी तो कान पिळी” याचा प्रत्यय लहानपणी अनेकदा घेतला होता. अगदी महाविद्यालयात गेल्यावर सुद्धा बाहुबल वापरूनच सर्व प्रश्न सूटतात/सुटतील असा ठाम विश्वास होता. आपल्या सुद्धा अंगात रेड्याची शक्ती असावी असे वाटायचे. जिम मध्ये गेलो तरच शरीर कमावता येते असेही वाटायचे, पण जिमची फी समजली की ’ये अपनी बस की बात नही’ असे वाटायचे ! अंगात शक्ती नसेल तर निदान एखादे शस्त्र तरी असावे असे वाटायचे. गेला बाजार एखादा खटकन उघडणारा रामपुरी चाकू तरी खिषात बाळगावा असे खूप वाटायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा तेव्हा जबरदस्त पगडा होता. शिवसैनिकांना नुसते भाषण करून पेटाविणार्या बाळासाहेबांचा फोटो बघितला व पुढे केव्हातरी प्रत्यक्ष बघितले तेव्हा “हा एवढा किरकोळ माणूस ?” हाच विचार प्रथम डोक्यात आला. पण मग मात्र जगाला हादरविणार्यांची यादी जेव्हा जेव्हा समोर आणली तेव्हा खरा आश्चर्याचा धक्का बसला, सगळॆच सिंगल फसली म्हणावे असेच होते / आहेत ! नेपोलियन बोनापार्ट पासून ते अगदी सध्याच्या पंतप्रधान मनमोहन सिंगांपर्यंत सगळॆच वामनमुर्ती ! आडमाप शरीर आणि ताडमाड उंची असलेले बाहुबली जगावर कधीच राज्य करू शकलेले नाहीत. खायला काळ आणि भुमीला भार ! त्यांच्या ताकदीचा वापर मात्र किडकिडीत देहयष्टीच्या डोकेबाज माणसांनीच करून घेतला व आपली उद्दीष्टे साध्य केली. पहिलवानाचा मेंदू गुढग्यात असतो असे केव्हातरी वाचले तेव्हा खूप मस्त वाटले होते. पुढे हे ही समजले की हातातल्या शस्त्रापेक्षा ते धरणार्या मनगटातला निर्धार जास्त महत्वाचा असतो. शरीर भक्कम असले पाहिजेच पण त्याहुन मन खंबीर हवे ! पुढे गिर्यारोहणाचा नाद लागल्यावर असे लक्षात आले की सडसडीत लोकच सहज डोंगर पार करतात, हाडापेराने मजबूत वाटणारे चढ चढताना फाफलतात ! शरीराला असलेली सुज म्हणजे सुदृढपणा नव्हे. व्यायाम करून शरीर कमावर येते पण मनाला खंबीर , सुजाण करण्यास त्याचा काहीही उपयोग नाही ! मनाची मशागत चांगले वाचल्याने, चांगले ऐकल्याने व चांगल्या माणसांच्या संगतीत राहल्याने होते. बाहुबल किती वाढू शकते याला नक्कीच काही मर्यादा असतील पण मनाची शक्ती अपार आहे. आजारपणाने जसे शरीर खंगते तसे एकदा खंबीर झालेले मन मात्र कधीत खचत नाही.

खूप वर्षापुर्वी फक्त एकदाच ऐकून कायमचे स्मरणात राहिलेले गाणे खाली देत आहे. वाचतानाच गाण्याचा अर्थ थेट तुमच्या अंत:करणात भिडेल.

निर्बल से लड़ाई बलवान की -२
यह कहानी है दीये की और तूफ़ान की -२

इक रात अंधियारी, थीं दिशाएं कारी-कारी
मंद-मंद पवन था चल रहा
अंधियारे को मिटाने, जग में ज्योत जगाने
एक छोटा-सा दीया था कहीं जल रहा
अपनी धुन में मगन, उसके तन में अगन
उसकी लौ में लगन भगवान की
यह कहानी है दीये की और तूफ़ान की

कहीं दूर था तूफ़ान...
कहीं दूर था तूफ़ान, दीये से था बलवान
सारे जग को मसलने मचल रहा
झाड़ हों या पहाड़, दे वो पल में उखाड़
सोच-सोच के ज़मीं पे था उछल रहा
एक नन्हा-सा दीया, उसने हमला किया -२
अब देखो लीला विधि के विधान की
यह कहानी है दीये की और तूफ़ान की

दुनिया ने साथ छोड़ा, ममता ने मुख मोड़ा
अब दीये पे यह दुख पड़ने लगा -२
पर हिम्मत न हार, मन में मरना विचार
अत्याचार की हवा से लड़ने लगा
सर उठाना या झुकाना, या भलाई में मर जाना
घड़ी आई उसके भी इम्तेहान की
यह कहानी है दीये की और तूफ़ान की

फिर ऐसी घड़ी आई - २, घनघोर घटा छाई
अब दीये का भी दिल लगा काँपने
बड़े ज़ोर से तूफ़ान, आया भरता उड़ान
उस छोटे से दीये का बल मापने
तब दीया दुखियारा, वह बिचारा बेसहारा
चला दाव पे लगाने, (बाज़ी प्राण की) - ४
चला दाव पे लगाने, बाज़ी प्राण की
यह कहानी है दीये की और तूफ़ान की

लड़ते-लड़ते वो थका, फिर भी बुझ न सका -२
उसकी ज्योत में था बल रे सच्चाई का
चाहे था वो कमज़ोर, पर टूटी नहीं डोर
उसने बीड़ा था उठाया रे भलाई का
हुआ नहीं वो निराश, चली जब तक साँस
उसे आस थी प्रभु के वरदान की
यह कहानी है दीये की और तूफ़ान की

सर पटक-पटक, पग झटक-झटक
न हटा पाया दीये को अपनी आन से
बार-बार वार कर, अंत में हार कर
तूफ़ान भागा रे मैदान से
अत्याचार से उभर, जली ज्योत अमर
रही अमर निशानी बलिदान की
यह कहानी है दीये की और तूफ़ान की
निर्बल से लड़ाई बलवान की
यह कहानी है दीये की और तूफ़ान की

चित्रपट तूफान और दिया

गायकमन्ना डे

संगीतवसंत देसाई

गीतकारभरत व्यास

पडद्यावर सदर करणारे कलाकारउल्हास, नंदा, राजेंद्र कुमार, सतीश व्यास, वत्सला, शांता कुमारी

प्रकाशन वर्ष१९५६

साभार :- http://smriti.com/hindi-songs

वि.सू. - या गाण्याची एमपी ३ हवी असल्यास ejmarathe@gmail.com वर मला कळवा !