गुरुवार, ४ जून, २००९

इतिहास का शिकायचा ?

इतिहास – साधा सोपा अर्थ “जे घडले ते असे घडले” ! व्यासांच्याच वाक्यात सांगायचे तर महाभारत हा “जय” नावाचा इतिहास आहे ! माझ्या मते तो जगातला पहीला आणि शेवटचा इतिहास आहे बाकी सगळा विपर्यास आहे ! महाभारतात व्यास आपण अनैतिक संबंधातुन जन्मलो हे लपवून ठेवत नाहीत, युधीष्ठीराचे अवगुण सांगताना दुर्योधनाचे सदगुण सुद्धा नमूद करतात ! भीष्म ’अर्थस्य पुरूषो दासा” म्हणत द्रौपदी वस्त्रहरण प्रकरणात हात झटकतात, गीता सांगताना कृष्ण अर्जुनाला गांडू (क्लैब्य) असे म्हणतो ! कोठेही लपवाछपवी नाही, कोणाचे भलते उदात्तीकरण नाही ! याला म्हणतात इतिहास. आता हाच इतिहास झाला आहे !

इतिहासाला विंग्रजीत History म्हणतात, बरोबर आहे his or her story ! जेत्यांचा इतिहास. तर असा हा इतिहास आपल्या माथी अगदी शालेय जीवनापासून मारला जातो. सनसनावल्या लक्षात ठेवताना अनेकांची साले निघतात. इतिहास का शिकायचा तर म्हणे चुकांची पुनरूक्ती हो़उ नये म्हणून ! हेच मुळात साफ़ चूक आहे ! पहील्या महायुद्धा नंतर दूसरे झालेच ना ? युद्धात जिंकणारे मराठे तहात हरतात हा सुद्धा इतिहासच आहे ना ? तसे या वाक्यात मराठे या शब्दा ऐवजी हिंदू, भारत हे शब्द वापरलेत तरी इतिहास बदलणार नाही ! शिवरायांना मोघलांनी जेवढे छळले नाही तेवढे स्वकीयांनी छळले हा सुद्धा इतिहासच ना ? गद्दारी / फ़ितुरी कोणी, कोणाशी आणि केव्हा केली हे इतिहासात शिकून वर्तमानात (वर्तनात सुद्धा !) काही फ़रक पडला का ? सापाला दूध पाजले तरी तो विषारी फ़ुत्कारच सोडणार, हे सुद्धा इतिहासच सांगतो ना ?

बरे जो काही इतिहास म्हणून आहे त्यात तरी एकवाक्यता आहे का ? शिवाजी सेक्युलर होते की हिंदुत्ववादी ? समर्थ रामदास शिवरायांचे गुरू होते की औरंगजेवाचे हेर ? महाराजांनी खानाचा कोथळा काढला की कुरवाळले, पैगंबर पळाला की त्याने यशस्वी माघार घेतली ? संभाजी बदफ़ैली होता की धर्मवीर ? आर्य मुळचे कोणते ? १८५७ चे बंड हे भटा-बामणांचे, गादी टीकवण्यासाठीचे प्रयत्न होते का स्वातंत्र्य-समर ? इतिहास कोणात्याच प्रश्नावर निर्विवाद मत मांडत नाही, मत बनवायचा प्रयत्न मात्र जरूर करतो. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या ! मग परत समाजात दुफ़ळी निर्माण होते, आपलाच इतिहास खरा, जाज्वल्य, त्यांचा विपर्यास, रचलेला , रंजक हे सिद्ध करण्यासाठी नवा रक्तरंजित इतिहास रचला जातो ! इतिहासाबरोबरच भूगोल सुद्धा बदलला जातो. सरकार बदलले की इतिहास सुद्धा बदलतो !

तरीही आपल्याला इतिहास शिकायलाच लागतो, तो तरी कोणाचा ? शिवरायांचा इतिहास वा भारतीय मातीत घडलेला इतिहास चवथीपर्यंतच गुंडाळला जातो व मग जगाचा इतिहास ’पढवला’ जातो ! अमेरीकन यादवी, दोन महायुद्धे – त्यांची कारणे – परीणाम (युद्धाच्या अंतातच युद्धाचे बीज असे ) इंग्रज, फ़ेंच, रशियन राज्यक्रांत्या तर अगदी वांत्या आणतात. कित्येक हजारो वर्षे सहीष्णुता या मातीत रुजलेली आहे, इतिहास शिकवतो की ती फ़्रेंच राज्यक्रांतीची देन आहे ! भारताबाहेरच्या मुलांना असा दूसर्यांचा इतिहास खचितच पढवला जात असेल ! अडकलेली फ़ीत जशी पुन्हा पुन्हा वाजत राहते तसा तोच इतिहास पुन्हा पुन्हा नव्याने जन्म घेतो ! अगदी पहीले पाढे पंचावन्न ! अमेरीका लादेन नावाचा भस्मासुर पोसते आणि इकडे भारतातले राज्यकर्ते मतांच्या राजकारणासाठी जात्यंध हीरवी किड कुरवाळतील, अगदी दूसरी फ़ाळणी इतिहासाजमा होईपर्यंत, मग परत तिसरीचे खोदकाम !

इतिहासापासून कोणीच, कोणताच धडा केव्हाच कसा घेतला नाही हे शिकण्यासाठी मात्र इतिहास जरूर शिका ! इतिहासच साक्षी आहे !

इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेउन ना नाचा,
करा उल्लंघन त्याचे आणिक रचा इतिहास नवा !

’इति’श्री !

1 टिप्पणी:

Abhi म्हणाले...

farach chan!!! agadi yogya thikani bot thevale aahe